कर्जत तालुक्यातील करमाळा रोडवरील एका फर्निचर दुकानासमोर कर्जत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत सुमारे ३०० किलो गोमांस आणि एक इर्टिगा कार असा एकूण ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या बेकायदेशीर गोमांस वाहतूक प्रकरणी दोघांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल मनोज मुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सहायक फौजदार अण्णासाहेब चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, करमाळा येथून गोवंशाची कत्तल करून त्याचे गोमांस विक्रीसाठी मारुती सुझुकी इर्टिगा कारमधून कर्जतकडे आणले जात आहे. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रविण सुतार, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुपेकर, सचिन झुनगुरे, गोविंद हिंगे व पोलिसांच्या पथकाने करमाळा रोडवर सापळा लावला होता. दरम्यान, संशयित इर्टिगा कार (एमएच १६, डीएस ३७२२) तेथे आल्यानंतर पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता, वाहनामध्ये सात प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये काळ्या प्लास्टिकमध्ये पॅक केलेले सुमारे ३०० किलो गोमांस आढळून आले. पोलिसांनी ६० हजार रुपये किमतीचे गोमांस आणि ६ लाख रुपये किमतीची कार जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी सैफाली मुहम्मद हफिज कुरेशी (वय ३२ वर्षे, रा. मौला अलीचा माळ, करमाळा, जि. सोलापूर) आणि नागनाथ मच्छिंद्र देवकर (वय ४५ वर्षे, रा. शिंदे गल्ली, करमाळा, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेतले असून चौकशीत ते गोमांस विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कर्जत तालुक्यातील करमाळा रोडवरील एका फर्निचर दुकानासमोर कर्जत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत सुमारे ३०० किलो गोमांस आणि एक इर्टिगा कार असा एकूण ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या बेकायदेशीर गोमांस वाहतूक प्रकरणी दोघांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल मनोज मुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सहायक फौजदार अण्णासाहेब चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, करमाळा येथून गोवंशाची कत्तल करून त्याचे गोमांस विक्रीसाठी मारुती सुझुकी इर्टिगा कारमधून कर्जतकडे आणले जात आहे. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रविण सुतार, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुपेकर, सचिन झुनगुरे, गोविंद हिंगे व पोलिसांच्या पथकाने करमाळा रोडवर सापळा लावला होता. दरम्यान, संशयित इर्टिगा कार (एमएच १६, डीएस ३७२२) तेथे आल्यानंतर पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता, वाहनामध्ये सात प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये काळ्या प्लास्टिकमध्ये पॅक केलेले सुमारे ३०० किलो गोमांस आढळून आले. पोलिसांनी ६० हजार रुपये किमतीचे गोमांस आणि ६ लाख रुपये किमतीची कार जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी सैफाली मुहम्मद हफिज कुरेशी (वय ३२ वर्षे, रा. मौला अलीचा माळ, करमाळा, जि. सोलापूर) आणि नागनाथ मच्छिंद्र देवकर (वय ४५ वर्षे, रा. शिंदे गल्ली, करमाळा, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेतले असून चौकशीत ते गोमांस विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
- पुणे जिल्ह्यातील पुरंदरमध्ये आपलेच नोकर आपल्याला कोणत्याही सुविधा देत नसून उलट आपल्यालाच धमक्या देत असल्याचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ज्यांच्याकडून सुविधा मिळणे अपेक्षित आहे, तेच नोकर उलट आपल्याला दमदाटी आणि धमकी देत असल्याचे समोर आले आहे.3
- पिंपरी चिंचवड येथील मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील बचावकार्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून आतापर्यंत ८ मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले असून इमारतीमधील रेस्क्यू ऑपरेशन आता संपले आहे. या दुर्घटनेबाबत माहिती देताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, इमारतीतील शोधकार्य संपले असले तरी बाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली आणखी एक व्यक्ती दबली असल्याची शक्यता आहे. त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम अद्याप सुरू आहे.1
- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरासर खोटं बोलत असून हीच आपल्या भारत देशाची खरी अवस्था असल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. या परिस्थितीवर सामान्य नागरिकांनी नक्की काय अर्थ काढायचा आणि आपला देश नेमका विकासाच्या दिशेने चालला आहे की अविकासाच्या, असा गंभीर व संतप्त प्रश्न येथे उपस्थित करण्यात आला आहे. अशाच प्रकारच्या भन्नाट माहितीसाठी त्वरित सबस्क्राईब करण्याचे आवाहनही यादरम्यान करण्यात आले आहे.1
- मापेगाव निम्न दुधना प्रकल्पातील मच्छीमारांचे जाळे जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत मच्छीमारांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी आता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे.1
- सुनेत्रा पवार यांच्यासमोर त्यांच्या नातेवाईकांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी "दादा असते तर..." असे म्हणत भावना व्यक्त करताना नातेवाईक कमालीचे भावुक झाले आणि त्यांचे अश्रू अनावर झाले.1
- पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधून अत्यंत हतबल करणारी आणि वेदनादायी परिस्थिती समोर आली आहे. "आता काय करायचं, कुठे जायचं आम्ही, माझ्या नातवाला, पोराला काय झालं.....!" अशा अत्यंत व्याकुळ करणाऱ्या शब्दांत तिथून एक वेदनादायक आक्रोश व्यक्त केला जात असून, या आर्त हाकेने संपूर्ण वातावरण सुन्न झाले आहे.1
- पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये पालिका आयुक्तांच्या हलगर्जीपणामुळे ९ लोकांचा बळी गेला आहे. हे ९ लोक थेट पालिका आयुक्तांच्या हलगर्जीपणाचे बळी ठरले आहेत.1