नाशिकरोड परिसरात दुपारच्या वेळी घरात एकट्या असलेल्या महिलांना लक्ष्य करून विनयभंग करणाऱ्या 'सायको' आरोपीला गुन्हेशाखा युनिट-२ ने अवघ्या दोन दिवसांत अटक केली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३३३ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील गुन्हा असल्याने गुन्हेशाखा युनिट-२ ने तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळ व परिसरातील तब्बल ७५ सीसीटीव्ही फुटेजची बारीक पडताळणी करण्यात आली. याद्वारे काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर फिरणाऱ्या संशयिताचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख अभिलाष अंकुश थोरात (वय ३५, रा. संजयगांधी नगर, उपनगर, नाशिकरोड) अशी पटली. गुन्हेशाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे विहीतगाव येथील आण्णा गणपती पुलाजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली सुमारे ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपीला पुढील तपासासाठी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, संजय सानप, शंकर काळे व त्यांच्या पथकाने केली.
नाशिकरोड परिसरात दुपारच्या वेळी घरात एकट्या असलेल्या महिलांना लक्ष्य करून विनयभंग करणाऱ्या 'सायको' आरोपीला गुन्हेशाखा युनिट-२ ने अवघ्या दोन दिवसांत अटक केली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३३३ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील गुन्हा असल्याने गुन्हेशाखा युनिट-२ ने तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळ व परिसरातील तब्बल ७५ सीसीटीव्ही फुटेजची बारीक पडताळणी करण्यात आली. याद्वारे काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर फिरणाऱ्या संशयिताचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख अभिलाष अंकुश थोरात (वय ३५, रा.
संजयगांधी नगर, उपनगर, नाशिकरोड) अशी पटली. गुन्हेशाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे विहीतगाव येथील आण्णा गणपती पुलाजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली सुमारे ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपीला पुढील तपासासाठी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, संजय सानप, शंकर काळे व त्यांच्या पथकाने केली.
- नाशिक शहरातील भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत कथितपणे सुरू असलेल्या अवैध जुगार, मटका आणि सट्टा व्यवसायाविरोधात कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आवामी विकास पक्षाचे नाशिक शहर अध्यक्ष सरफराज पठाण यांनी पोलिस प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. हे निवेदन पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त आणि भद्रकाली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना संबोधित करून देण्यात आले आहे. भद्रकाली परिसरातील काही ठिकाणी अशा बेकायदेशीर हालचाली चालत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या अवैध धंद्यांमुळे स्थानिक नागरिक आणि विशेषतः तरुणांवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. वेळीच यावर प्रभावी कारवाई न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेसह सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. निवेदनाद्वारे सरफराज पठाण यांनी या तक्रारींची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आरोप सत्य आढळल्यास संबंधित चालक, यात सहभागी व्यक्ती आणि अशा कामांसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्यांवर महाराष्ट्र जुगार बंदी कायदा व इतर लागू कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अवैध जुगार आणि सट्ट्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडतात आणि तरुणांचे भविष्य प्रभावित होते, त्यामुळे यावर वेळेत आणि प्रभावी कारवाई होणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आवामी विकास पक्षाने पोलिस प्रशासनाकडे या परिसरात नियमित गस्त, विशेष मोहीम आणि देखरेख वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच, नागरिकांनी आपल्या भागात असा कोणताही अवैध धंदा आढळल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता या प्रकरणी पोलिस प्रशासनाच्या आगामी कारवाईकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात आणि पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध भावली धरण १००% भरून ओव्हरफ्लो झाले आहे. पावसाची संततधार कायम राहिल्याने जलसाठा पूर्ण क्षमतेने भरला असून धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पावसामुळे परिसरातील निसर्गरम्य भाग जलमय झाला आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि शेतीची चिंता मिटल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, प्रशासनाकडून भावली व भाम नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिसरात निसर्गसौंदर्य खुलले असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पर्यटकांनी पाण्यात उतरणे व हुल्लडबाजी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.1
- नाशिक येथील नवीन नाशिक सेंटर पार्क येथे स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. दिनांक 22 जुलै 2026 रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांची विशेष उपस्थिती होती. नवीन नाशिक परिसरातील सेंटर पार्कमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा जयंती सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.1
- दिल्लीतील जंतर-मंतरपासून ते बिहारपर्यंत NEET पेपर लीक आणि परीक्षा व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांचे आंदोलन अत्यंत तीव्र झाले आहे. या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचे विरोध प्रदर्शन सातत्याने सुरूच आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे विधान समोर आले आहे. या घडामोडींनंतर आता सरकार याप्रकरणी काही मोठी कारवाई करण्यास जात आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलक मुलांवर झालेल्या पोलीस लाठीचार्जच्या निषेधार्थ आज, 23 जुलै रोजी चांदवड शहर बंद ठेवण्यात आले. या कारवाईच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आली.1
- इगतपुरी येथे पुराच्या तावडीत अडकलेल्या १६ आदिवासींची प्रशासनाकडून थरारक कामगिरी करत सुखरूप सुटका करण्यात आली आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून राबवण्यात आलेल्या या बचाव मोहिमेत १६ नागरिकांसोबतच एका मुक्या प्राण्यालाही पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या मोहिमेदरम्यान बचाव पथकाने अत्यंत कठीण परिस्थितीत काम केले. पुराच्या वाढत्या विळख्यात बचाव पथकातील जवान थेट छातीएवढ्या पाण्यात उतरले आणि त्यांनी सर्वांचे प्राण वाचवत हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण केले.3