मनरेगा कुशल कामगारांची सन २०२४ पासूनची बिले प्रलंबित; १० दिवसांनंतरही प्रशासनाकडून उत्तर नाही अहिल्यानगरसह राज्यातील प्रलंबित निधी व देयकांबाबत रोजगार हमी आयुक्तांकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी अहिल्यानगर | प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामांवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या कुशल कामगारांची सन २०२४ पासूनची बिले व देय रक्कम प्रलंबित असल्याच्या प्रश्नावर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रवीकुमार शिंदे यांनी महाराष्ट्र रोजगार हमी योजना आयुक्तांकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. याबाबत ६ सप्टेंबर २०२६ रोजी ई-मेलद्वारे निवेदन पाठवून राज्यातील तसेच विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रलंबित कुशल कामगारांची संख्या, एकूण प्रलंबित रक्कम आणि उपलब्ध होणाऱ्या निधीची माहिती मागण्यात आली होती. निवेदनात प्रलंबित निधी संबंधित जिल्ह्यांना कधीपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि कुशल कामगारांची देयके कोणत्या कालमर्यादेत अदा केली जाणार आहेत, याबाबतही स्पष्ट माहिती मागण्यात आली आहे. � Screenshot_20260916_062601.jpg दहा दिवसांनंतरही प्रतिसाद नाही ६ सप्टेंबर रोजी निवेदन पाठवूनही १६ सप्टेंबरपर्यंत कोणताही अधिकृत प्रतिसाद अथवा कार्यवाहीचा तपशील प्राप्त झालेला नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे आता संबंधित विभागाकडे स्मरणपत्राद्वारे पुन्हा मागणी करण्यात येत आहे. अहिल्यानगरच्या प्रलंबित निधीची माहिती जाहीर करावी अहिल्यानगर जिल्ह्यात कुशल कामगारांची किती बिले प्रलंबित आहेत, त्यांची एकूण रक्कम किती आहे, निधी उपलब्ध होण्याची अपेक्षित तारीख कोणती आहे आणि संबंधित यंत्रणांना कोणते निर्देश देण्यात आले आहेत, याची अधिकृत माहिती प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. “कुशल कामगारांनी प्रत्यक्ष काम केले असून त्यांच्या मेहनतीची देय रक्कम दीर्घकाळ प्रलंबित राहू नये. संबंधित कामगारांना त्यांची थकीत देयके मिळण्यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करून स्पष्ट कालमर्यादा जाहीर करावी.” — रवीकुमार शिंदे, पत्रकार / सामाजिक कार्यकर्ता, अहिल्यानगर मागणीचे प्रमुख मुद्दे सन २०२४ पासून प्रलंबित कुशल कामगारांची संख्या जाहीर करावी. प्रलंबित बिलांची एकूण रक्कम जाहीर करावी. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रलंबित निधी व देयकांचा तपशील द्यावा. निधी उपलब्ध होण्याची अपेक्षित तारीख जाहीर करावी. प्रलंबित देयके अदा करण्याची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी. संबंधित यंत्रणांना तातडीचे निर्देश द्यावेत. — पत्रकार रवीकुमार शिंदे हिंदी मराठी पत्रकार संघ तालुका संघटक भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव माहिती अधिकार कार्यकर्ता #मनरेगा #कुशलकामगार #रोजगारहमी #अहिल्यानगर #प्रलंबितबिले #मनरेगानिधी #शेतकरी #ग्रामीणरोजगार
मनरेगा कुशल कामगारांची सन २०२४ पासूनची बिले प्रलंबित; १० दिवसांनंतरही प्रशासनाकडून उत्तर नाही अहिल्यानगरसह राज्यातील प्रलंबित निधी व देयकांबाबत रोजगार हमी आयुक्तांकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी अहिल्यानगर | प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामांवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या कुशल कामगारांची सन २०२४ पासूनची बिले व देय रक्कम प्रलंबित असल्याच्या प्रश्नावर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रवीकुमार शिंदे यांनी महाराष्ट्र रोजगार हमी योजना आयुक्तांकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. याबाबत ६ सप्टेंबर २०२६ रोजी ई-मेलद्वारे निवेदन पाठवून राज्यातील तसेच विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रलंबित कुशल कामगारांची संख्या, एकूण प्रलंबित रक्कम आणि उपलब्ध होणाऱ्या निधीची माहिती मागण्यात आली होती. निवेदनात प्रलंबित निधी संबंधित जिल्ह्यांना कधीपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि कुशल कामगारांची देयके कोणत्या कालमर्यादेत अदा केली जाणार आहेत, याबाबतही स्पष्ट माहिती मागण्यात आली आहे. � Screenshot_20260916_062601.jpg दहा दिवसांनंतरही प्रतिसाद नाही ६ सप्टेंबर रोजी निवेदन पाठवूनही १६ सप्टेंबरपर्यंत कोणताही अधिकृत प्रतिसाद अथवा कार्यवाहीचा तपशील प्राप्त झालेला नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे आता संबंधित विभागाकडे स्मरणपत्राद्वारे पुन्हा मागणी करण्यात येत आहे. अहिल्यानगरच्या प्रलंबित निधीची माहिती जाहीर करावी अहिल्यानगर जिल्ह्यात कुशल कामगारांची किती बिले प्रलंबित आहेत, त्यांची एकूण रक्कम किती आहे, निधी उपलब्ध होण्याची अपेक्षित तारीख कोणती आहे आणि संबंधित यंत्रणांना कोणते निर्देश देण्यात आले आहेत, याची अधिकृत माहिती प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. “कुशल कामगारांनी प्रत्यक्ष काम केले असून त्यांच्या मेहनतीची देय रक्कम दीर्घकाळ प्रलंबित राहू नये. संबंधित कामगारांना त्यांची थकीत देयके मिळण्यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करून स्पष्ट कालमर्यादा जाहीर करावी.” — रवीकुमार शिंदे, पत्रकार / सामाजिक कार्यकर्ता, अहिल्यानगर मागणीचे प्रमुख मुद्दे सन २०२४ पासून प्रलंबित कुशल कामगारांची संख्या जाहीर करावी. प्रलंबित बिलांची एकूण रक्कम जाहीर करावी. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रलंबित निधी व देयकांचा तपशील द्यावा. निधी उपलब्ध होण्याची अपेक्षित तारीख जाहीर करावी. प्रलंबित देयके अदा करण्याची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी. संबंधित यंत्रणांना तातडीचे निर्देश द्यावेत. — पत्रकार रवीकुमार शिंदे हिंदी मराठी पत्रकार संघ तालुका संघटक भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव माहिती अधिकार कार्यकर्ता #मनरेगा #कुशलकामगार #रोजगारहमी #अहिल्यानगर #प्रलंबितबिले #मनरेगानिधी #शेतकरी #ग्रामीणरोजगार
- देवळाली प्रवराच्या लोड शेंडीग बाबद दीलेल्या सर्व पक्षीय निवेदनावर काय कारवाई झाली1
- हलवाई चौक गणेश मंडळातर्फे चार शिक्षकांचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मान शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}समाजात विधायक परिवर्तन घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानदानाबरोबरच समाजहिताच्या उपक्रमांत शिक्षकांचा सहभाग मोलाचा असतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराने सन्मानित आदर्श शिक्षक हरिभाऊ नाथू पानसरे यांनी केले. श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हरिभाऊ पानसरे, साधना संजय शितोळे, संजय पंढरीनाथ वेदपाठक आणि जयश्री ज्ञानेश्वर दांडगे यांना ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष सुकुमार बोरा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पानसरे म्हणाले, “यशासाठी कष्ट, अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. शिस्त, नियमित व्यायाम अंगीकारून आळसापासून दूर राहिले पाहिजे.” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार व शिष्यवृत्तीची दिशा देत तसेच मुलींच्या शिक्षणासाठी जनजागृती, शाळा उभारणी व समाजकार्याला हातभार लावणाऱ्या पानसरे यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. साधना शितोळे यांनी शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन असून शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात, असे सांगितले. संजय वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर माफक प्रमाणात करावा तसेच दैनंदिन जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करावा, असे मार्गदर्शन केले. संगणक शिक्षण क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षण घेतले आहे. सुकुमार बोरा म्हणाले, ज्ञानदान केल्याने ज्ञान वाढते. शिक्षकांनी सतत कार्यमग्न, कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि क्षमाशील राहून विद्यार्थ्यांमध्ये सद्गुणांची पेरणी करावी. परिवर्तनवादी शिक्षणातून विद्यार्थ्यांना जीवनाची योग्य दिशा मिळते. हलवाई चौक गणेश मंडळाचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्कार उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर व प्राचार्य डॉ. समीर ओंकार, जयश्री दांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त मंडळाच्या वतीने ३० हून अधिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला असून, सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रम वर्षभर राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे, माजी उपनगराध्यक्ष डॉ. वसंत पानसरे, माजी नगरसेविका राजश्री पानसरे, माजी सभापती प्रदीप बारवकर, राजेंद्र जाधवराव, माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड, प्रेम मुसळे, अशोक काळे, सिकंदर मणियार, महेंद्र डेरे, उषादेवी बढे, डॉ. क्रांती पैठणकर, राहुल निकुंभ, विजय शेजवळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शितल ढवळे यांनी केले तर आभार मयूर काळे यांनी मानले.4
- गंगापुर तालुक्यातील शिक्षकांचा निवासस्थानाच्या मागणीसाठी पंचायत समिती गंगापूर येथे शाळा बंद आंदोलन सुरू…1
- महंत प्रेममुर्ती शिवाजी महाराज (मठाधिपती नारायणगड संस्थान), आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (नवगण राजुरी), महंत महादेव महाराज भारती (बेलेश्वर संस्थान बेलगाव) श्री क्षेत्र भालचंद्र गणपतीच्या चरणी नतमस्तक.:-डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर1
- येवल्यात श्री गजानन महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषीपंचमी) निमित्त श्री गजानन महाराज मंदिर, दत्तनगर (विंचुर रोड, येवला) येथे श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. दिवसाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता श्रीं ना महावस्त्र अर्पण आणि महाअभिषेक पूजेने झाली. सकाळी ७.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या अभिषेकानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्रीं ची बावन्नी, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन आणि स्वागत हिरालाल नारायणसा बाकळे, दिगंबर नारायणसा बाकळे व समस्त बाकळे परिवार (येवला) यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमास वक्रतुंड बिल्डर्स & डेव्हलपर्स (येवला व कोपरगाव) आणि इंजि. ऋषिकेश हिरालाल बाकळे यांचे सहकार्य लाभले. श्री गजानन महाराजांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- बारामती शहर पोलिसांनी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले ऑपरेशन मॉक ड्रिल द्वारे बस स्थानकावर झाली धावपळ..1
- आपला गणेश मंडळ जरीपुरचा राजा गणरायाचे धुमधडाक्यात आगमन1
- शिक्षक सामूहिक रजेवर, पण शाळा बंद नाही! आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेशी १००% सहमत; पर्यायी व्यवस्था करण्याचे सभापती कविता चव्हाण यांचे निर्देश1