लक्ष तीर्थ वसाहत मध्ये गवळी परिवाराच्या श्रीप्रेमी गणेश मंडळाचे सेलिब्रिटीनी घेतले दर्शन कष्टकऱ्यांची वसाहत अशी ओळख असलेल्या लक्षतीर्थमधील गवळी कुटूंबांच्या श्री प्रेमी मंडळाच्या गणेशाचं सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीन आगमन. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गवळी कुटुंबीयांनी दोन फुटापासून गणेश मूर्ती बसवण्यास सुरुवात केली. या गणेशाच्या आगमनानं गेल्या २० वर्षात गवळी कुटुंबियांसोबतच वसाहत आणि अनेक सेलिब्रेटींचा उद्घार झाला. त्याच्या दर्शनानं जीवन बदलण्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. या गणेशाच्या चरणी लिन होण्यासाठी अनेक सेलिब्रेटीं इथं येतात. शनिवारी या मंडळाच्या गणेशाचं मालिकांमधित कलाकार आणि राजकारण्यांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीन जल्लोषात आगमन झालं. गणेशाच्या दर्शनासाठी लक्षतीर्थ वसाहत लोटली होती. कोल्हापूरच्या पश्चिम दिशेला पूर्वीचा तोफेचा माळ. शहराचा विस्तार झाला आणि या तोफेच्या माळावर झोपड्या मारून लोकं राहू लागली. याच परिसराला लक्षतीर्थ वसाहत अस देखील म्हटल जात. अतिशय पुण्यभूमी असलेल्या या वसाहतीत झोपडपट्टीमुळ सामाजिक जीवन अस्थिर बनलं होतं.अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि शिक्षणाच्या अभावामुळ अनेकजण खून, मारामारी, चोऱ्यामाऱ्याकडं वळले. त्यामुळं समाजात वसाहतीकंडं पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. या परिसराची ओळख गुन्हेगारांची वसाहत अशी बनली. याच परिसरात गवळी कुटुंबियांचं घर. अविनाश आणि मनोज हे दोघेजण कष्ट करून कुटुंब सांभाळत होते. परिस्थिती नसतानाही त्यांनी दोन फुटी श्री गणेशाच्या मूर्तीची २० वर्षापूर्वी प्रतिष्ठापना केली. दरवर्षी या मूर्तीची उंची वाढत गेली. परिस्थिती बदलण्यासाठी गोवा इथं गेलेला मनोज गवळी यांन तिथं सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रात आपला जम बसवला. दरम्यान या गणपतीमुळ अनेकांच्या जीवनाच कल्याण झालं, अशी भावना निर्माण झाल्यानं,अनेक जण या उत्सवासाठी कोल्हापुरात येऊ लागले. गवळी कुटुंबियांनी चक्क २० फुटी गणेश मूर्ती श्री प्रेमी मंडळात बसवण्यास सुरुवात केली. नवसाचा श्री गणेश अशी ख्याती झाल्यामुळ नाट्य, मालिका, चित्रपट, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक जण या गणेशाच्या दर्शनाला येतात. सुवर्णालंकार जडीत या गणेश मूर्तीच मनोभावे दर्शन घेतात. यंदा या श्री गणेशाची आगमन मिरवणूक जल्लोषात निघाली. देव माणूस... या मालिकेतील अभिनेत्री वैशाली कल्याणकर आणि अभिनेते किरण गायकवाड तसच साताऱ्याचे नगरसेवक पंकज चव्हाण, उद्योजक मनोज गवळी, अविनाश गवळी यांच्या हस्ते या गणेशाच पूजन झालं. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीला प्रारंभ झाला. विद्युत झोतात निघालेल्या गणेशाच्या आगमन मिरवणूकीत सहभागी होण्यासह गणेशाच दर्शन आणि सेलिब्रिटींच्या भेटण्यासाठी अवघी लक्षतीर्थ वसाहत या मिरणूकीकडं लोटली होती. नागरिक आणि गणेश भक्तांनी मनोभावे श्रीं प्रेमींच्या गणेशाचं दर्शन घेतलं. सामाजिक अस्वस्थता आणि आर्थिक अस्थिरता असलेल्या या परिसरात या श्रींच्या प्रतिष्ठापनेमुळ तरुण पिढी गैरमार्ग सोडून भक्ती मार्गाकडं वळलीयं.
लक्ष तीर्थ वसाहत मध्ये गवळी परिवाराच्या श्रीप्रेमी गणेश मंडळाचे सेलिब्रिटीनी घेतले दर्शन कष्टकऱ्यांची वसाहत अशी ओळख असलेल्या लक्षतीर्थमधील गवळी कुटूंबांच्या श्री प्रेमी मंडळाच्या गणेशाचं सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीन आगमन. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गवळी कुटुंबीयांनी दोन फुटापासून गणेश मूर्ती बसवण्यास सुरुवात केली. या गणेशाच्या आगमनानं गेल्या २० वर्षात गवळी कुटुंबियांसोबतच वसाहत आणि अनेक सेलिब्रेटींचा उद्घार झाला. त्याच्या दर्शनानं जीवन बदलण्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. या गणेशाच्या चरणी लिन होण्यासाठी अनेक सेलिब्रेटीं इथं येतात. शनिवारी या मंडळाच्या गणेशाचं मालिकांमधित कलाकार आणि राजकारण्यांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीन जल्लोषात आगमन झालं. गणेशाच्या
दर्शनासाठी लक्षतीर्थ वसाहत लोटली होती. कोल्हापूरच्या पश्चिम दिशेला पूर्वीचा तोफेचा माळ. शहराचा विस्तार झाला आणि या तोफेच्या माळावर झोपड्या मारून लोकं राहू लागली. याच परिसराला लक्षतीर्थ वसाहत अस देखील म्हटल जात. अतिशय पुण्यभूमी असलेल्या या वसाहतीत झोपडपट्टीमुळ सामाजिक जीवन अस्थिर बनलं होतं.अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि शिक्षणाच्या अभावामुळ अनेकजण खून, मारामारी, चोऱ्यामाऱ्याकडं वळले. त्यामुळं समाजात वसाहतीकंडं पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. या परिसराची ओळख गुन्हेगारांची वसाहत अशी बनली. याच परिसरात गवळी कुटुंबियांचं घर. अविनाश आणि मनोज हे दोघेजण कष्ट करून कुटुंब सांभाळत होते. परिस्थिती नसतानाही त्यांनी दोन फुटी श्री
गणेशाच्या मूर्तीची २० वर्षापूर्वी प्रतिष्ठापना केली. दरवर्षी या मूर्तीची उंची वाढत गेली. परिस्थिती बदलण्यासाठी गोवा इथं गेलेला मनोज गवळी यांन तिथं सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रात आपला जम बसवला. दरम्यान या गणपतीमुळ अनेकांच्या जीवनाच कल्याण झालं, अशी भावना निर्माण झाल्यानं,अनेक जण या उत्सवासाठी कोल्हापुरात येऊ लागले. गवळी कुटुंबियांनी चक्क २० फुटी गणेश मूर्ती श्री प्रेमी मंडळात बसवण्यास सुरुवात केली. नवसाचा श्री गणेश अशी ख्याती झाल्यामुळ नाट्य, मालिका, चित्रपट, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक जण या गणेशाच्या दर्शनाला येतात. सुवर्णालंकार जडीत या गणेश मूर्तीच मनोभावे दर्शन घेतात. यंदा या श्री गणेशाची
आगमन मिरवणूक जल्लोषात निघाली. देव माणूस... या मालिकेतील अभिनेत्री वैशाली कल्याणकर आणि अभिनेते किरण गायकवाड तसच साताऱ्याचे नगरसेवक पंकज चव्हाण, उद्योजक मनोज गवळी, अविनाश गवळी यांच्या हस्ते या गणेशाच पूजन झालं. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीला प्रारंभ झाला. विद्युत झोतात निघालेल्या गणेशाच्या आगमन मिरवणूकीत सहभागी होण्यासह गणेशाच दर्शन आणि सेलिब्रिटींच्या भेटण्यासाठी अवघी लक्षतीर्थ वसाहत या मिरणूकीकडं लोटली होती. नागरिक आणि गणेश भक्तांनी मनोभावे श्रीं प्रेमींच्या गणेशाचं दर्शन घेतलं. सामाजिक अस्वस्थता आणि आर्थिक अस्थिरता असलेल्या या परिसरात या श्रींच्या प्रतिष्ठापनेमुळ तरुण पिढी गैरमार्ग सोडून भक्ती मार्गाकडं वळलीयं.
- Post by E city news network1
- लाखो भाविक हजर असताना तासगाव गणपती रथाजवळ रूग्णवाहिका आली असता सर्वानी वाट करून दिली,व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल1
- मराठ्यांच्या लेकराचे भविष्य घडवण्यासाठी जरांगे पाटील मुंबईकडे रवाना महाराष्ट्रातील मराठ्यांच्या लेकरा बाळांचे भविष्य चांगलं घडावं या अनुषंगाने जरागे पाटील यांनी आंदोलन उपोषण करून शासनाला जागा केलं व मुंबई मराठ्यांचा मोर्चा धडकणार होता पण शासनाने त्यांच्या बंदी घातली मग जरांगे पाटील स्वतः मुंबईला रवाना झाले यावेळी ठिकठिकाणी गावातून त्यांचे पुष्पवृष्टी करून महिलांनी स्वागत केले1
- गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.... जल्लोष साजरा करताय पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा!1
- Post by Mahadoot news1
- निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास! संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात विशेष प्रतिनिधी : परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे. संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे. रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा. 🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज1
- गदिमा रोडवर दोन दुचाकींची धडक; युगेंद्र पवारांची तत्परता, जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल1
- मंत्री शंभुराजे देसाई हे तासगाव गणपती रथोत्सवला होते,त्यानी सोशल मिडियावर व्हिडीओ केला व्हायरल1