कोठडीत मृत्यू' लपविता येणार नाही; शासनाची कठोर नियमावली लागू सीसीटीव्ही, सीआयडी तपास, व्हिडिओसह शवविच्छेदन बंधनकारक; पोलिस ठाण्यांवर वाढणार उत्तरदायित्व नाशिक : राज्यातील पोलिस कोठडीतील मृत्यूच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी आणि प्रत्येक प्रकरणात पारदर्शक, निष्पक्ष तसेच उत्तरदायी चौकशी सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गृह विभागाने जारी केलेल्या नव्या शासन निर्णयानुसार आता पोलिस कोठडीतील मृत्यूच्या घटना स्वतंत्र तपास, वैज्ञानिक पुरावे, अत्याधुनिक सीसीटीव्हीची देखरेख आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या कक्षेत येणार आहेत. यामुळे पोलिस ठाण्यांतील कामकाजावर अधिक बारीक नजर राहणार असून आरोपींच्या मानवी हक्कांच्या संरक्षणाला कायदेशीर बळ मिळणार आहे. नवीन नियमावलीनुसार राज्यातील कोणत्याही पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यास त्याचा तपास स्थानिक पोलिस ठाण्याकडे न राहता मुंबईत गुन्हे शाखा, तर राज्याच्या इतर भागात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) केला जाणार आहे. घटनास्थळ तातडीने सील करणे, सर्व पुरावे जतन करणे, फुटेज सुरक्षित ठेवणे आणि स्वतंत्र तपास सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने या प्रकरणांमध्ये वेळेचेही बंधन घातले आहे. मृत्यूची माहिती २४ तासांच्या आत राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राज्य मानवाधिकार आयोग आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणात दंडाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रियेवर दुहेरी नियंत्रण राहणार आहे. पोलिस कोठडीतील मृत्यूची चौकशी अधिक विश्वासार्ह करण्यासाठी शवविच्छेदन प्रक्रियेतही मोठे बदल करण्यात आले आहेत. किमान तीन तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून शवविच्छेदन करणे, संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करणे, मृतदेहावरील सर्व जखमांची स्वतंत्र नोंद ठेवणे तसेच आवश्यक जैविक व रासायनिक नमुने प्रयोगशाळेत पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये फुटेजचे व्यवस्थेचे जाळे अधिक सक्षम करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. मुख्य प्रवेशद्वार, निर्गमन मार्ग, चौकशी कक्ष, तपास अधिकाऱ्यांची दालने, लॉकअप, लॉकअप परिसर तसेच ठाण्याच्या बाह्य परिसरात ऑडिओसह कॅमेरे बसविणे अनिवार्य राहणार आहे. या कॅमेऱ्यांचे फुटेज सलग १८ महिने जतन करावे लागणार असून यंत्रणा बंद पडल्यास त्याची तत्काळ नोंद करून वरिष्ठांना माहिती देणे आवश्यक राहणार आहे. आरोपींच्या आरोग्य आणि सुरक्षेबाबतही शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. अटक करताना आरोपीच्या शरीरावरील जखमांची नोंद करणे, दुखापत असल्यास तातडीने उपचार करणे, पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीची दर ४८ तासांनी वैद्यकीय तपासणी करणे तसेच लॉकअप रजिस्टरमध्ये सर्व हालचालींची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोठडीत आत्महत्येस कारणीभूत ठरू शकणाऱ्या त्रुटी दूर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. नियमावलीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पयर्वेक्षण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्या पोलिस ठाण्यांतील सीसीटीव्ही व्यवस्था, लॉकअपची स्थिती, आरोपींची सुरक्षा आणि शासन निर्णयाचे पालन याची नियमित तपासणी करणार आहेत. मृत्याच्या वारसाना एक लाखाची तत्काळ मदत (चौकट) पोलिस निष्काळजीपणामुळे कोठडीत मृत्यू झाल्याचे तपासात सिद्ध झाल्यास मृताच्या वारसांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यास ही मदत दीड लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची तरतूद केली आहे. या निर्णयामुळे पोलिस कोठडीतील मृत्यूच्या प्रकरणांमध्ये पारदर्शकता वाढण्यासह पुराव्यांचे संरक्षण होण्यास आणि पोलिस यंत्रणेची जबाबदारी अधिक स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. -- कोठडीतील मृत्यूचा तपास सीआयडी/ मुंबई गुन्हे शाखेकडून --२४ तासांत मानवाधिकार आयोगांना माहिती देणे बंधनकारक. --तीन डॉक्टरांच्या पथकाकडून व्हिडिओसह शवविच्छेदन. --सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ऑडिओसह सीसीटिव्ही व्यवस्था. --सिसीटिव्ही फुटेज १८ महिने सुरक्षित ठेवणे अनिवार्य. -- आरोपीची दर ४८ तासांनी वैद्यकीय तपासणी. -- राज्य व जिल्हास्तरीय समित्यांकडून नियमित पयर्वेक्षण.
कोठडीत मृत्यू' लपविता येणार नाही; शासनाची कठोर नियमावली लागू सीसीटीव्ही, सीआयडी तपास, व्हिडिओसह शवविच्छेदन बंधनकारक; पोलिस ठाण्यांवर वाढणार उत्तरदायित्व नाशिक : राज्यातील पोलिस कोठडीतील मृत्यूच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी आणि प्रत्येक प्रकरणात पारदर्शक, निष्पक्ष तसेच उत्तरदायी चौकशी सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गृह विभागाने जारी केलेल्या नव्या शासन निर्णयानुसार आता पोलिस कोठडीतील मृत्यूच्या घटना स्वतंत्र तपास, वैज्ञानिक पुरावे, अत्याधुनिक सीसीटीव्हीची देखरेख आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या कक्षेत येणार आहेत. यामुळे पोलिस ठाण्यांतील कामकाजावर अधिक बारीक नजर राहणार असून आरोपींच्या मानवी हक्कांच्या संरक्षणाला कायदेशीर बळ मिळणार आहे. नवीन नियमावलीनुसार राज्यातील कोणत्याही पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यास त्याचा तपास स्थानिक पोलिस ठाण्याकडे न राहता मुंबईत गुन्हे शाखा, तर राज्याच्या इतर भागात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) केला जाणार आहे. घटनास्थळ तातडीने सील करणे, सर्व पुरावे जतन करणे, फुटेज सुरक्षित ठेवणे आणि स्वतंत्र तपास सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने या प्रकरणांमध्ये वेळेचेही बंधन घातले आहे. मृत्यूची माहिती २४ तासांच्या आत राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राज्य मानवाधिकार आयोग आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणात दंडाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रियेवर दुहेरी नियंत्रण राहणार आहे. पोलिस कोठडीतील मृत्यूची चौकशी अधिक विश्वासार्ह करण्यासाठी शवविच्छेदन प्रक्रियेतही मोठे बदल करण्यात आले आहेत. किमान तीन तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून शवविच्छेदन करणे, संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करणे, मृतदेहावरील सर्व जखमांची स्वतंत्र नोंद ठेवणे तसेच आवश्यक जैविक व रासायनिक नमुने प्रयोगशाळेत पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये फुटेजचे व्यवस्थेचे जाळे अधिक सक्षम करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. मुख्य प्रवेशद्वार, निर्गमन मार्ग, चौकशी कक्ष, तपास अधिकाऱ्यांची दालने, लॉकअप, लॉकअप परिसर तसेच ठाण्याच्या बाह्य परिसरात ऑडिओसह कॅमेरे बसविणे अनिवार्य राहणार आहे. या कॅमेऱ्यांचे फुटेज सलग १८ महिने जतन करावे लागणार असून यंत्रणा बंद पडल्यास त्याची तत्काळ नोंद करून वरिष्ठांना माहिती देणे आवश्यक राहणार आहे. आरोपींच्या आरोग्य आणि सुरक्षेबाबतही शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. अटक करताना आरोपीच्या शरीरावरील जखमांची नोंद करणे, दुखापत असल्यास तातडीने उपचार करणे, पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीची दर ४८ तासांनी वैद्यकीय तपासणी करणे तसेच लॉकअप रजिस्टरमध्ये सर्व हालचालींची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोठडीत आत्महत्येस कारणीभूत ठरू शकणाऱ्या त्रुटी दूर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. नियमावलीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पयर्वेक्षण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्या पोलिस ठाण्यांतील सीसीटीव्ही व्यवस्था, लॉकअपची स्थिती, आरोपींची सुरक्षा आणि शासन निर्णयाचे पालन याची नियमित तपासणी करणार आहेत. मृत्याच्या वारसाना एक लाखाची तत्काळ मदत (चौकट) पोलिस निष्काळजीपणामुळे कोठडीत मृत्यू झाल्याचे तपासात सिद्ध झाल्यास मृताच्या वारसांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यास ही मदत दीड लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची तरतूद केली आहे. या निर्णयामुळे पोलिस कोठडीतील मृत्यूच्या प्रकरणांमध्ये पारदर्शकता वाढण्यासह पुराव्यांचे संरक्षण होण्यास आणि पोलिस यंत्रणेची जबाबदारी अधिक स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. -- कोठडीतील मृत्यूचा तपास सीआयडी/ मुंबई गुन्हे शाखेकडून --२४ तासांत मानवाधिकार आयोगांना माहिती देणे बंधनकारक. --तीन डॉक्टरांच्या पथकाकडून व्हिडिओसह शवविच्छेदन. --सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ऑडिओसह सीसीटिव्ही व्यवस्था. --सिसीटिव्ही फुटेज १८ महिने सुरक्षित ठेवणे अनिवार्य. -- आरोपीची दर ४८ तासांनी वैद्यकीय तपासणी. -- राज्य व जिल्हास्तरीय समित्यांकडून नियमित पयर्वेक्षण.
- काळ्या बाजारातील १९ लाखांचा युरिया जप्त; दोघांना अटक...... निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात काळ्या बाजारात विक्रीसाठी आणलेला सुमारे १९ लाख रुपये किमतीचा युरिया लासलगाव पोलिसांनी आणि जिल्हास्तरीय भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विंचूर परिसरात युरियाचा साठा अवैधरित्या विक्रीसाठी आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लासलगाव पोलीस आणि जिल्हास्तरीय भरारी पथकाने संयुक्त सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान सुमारे १९ लाख रुपये किमतीचा युरिया जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या अवैध व्यवहारामागील इतर संबंधितांचा शोधही पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे कृषी निविष्ठांच्या काळ्या बाजाराला मोठा आळा बसल्याचे बोलले जात आहे.4
- येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशी | प्रतिनिधी सुभान शेख धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडशी येथील हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आज (31 जुलै) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. 31 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यासाठी दर्गा परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघाला असून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भाग तसेच परराज्यातूनही हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. श्रद्धा, भक्ती, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा ऊरूस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हजरत जमादार बाबा रहे यांच्या दर्ग्याला विविध धर्मीय भाविकांची अखंड श्रद्धा लाभलेली आहे. त्यामुळे हा ऊरूस केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या तीन दिवसांच्या कालावधीत धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऊरूसाच्या पहिल्या दिवशी 31 जुलै रोजी पारंपरिक संदल मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात येणार आहे. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून जाणार असून भाविक मोठ्या श्रद्धेने या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. दर्गा परिसरात विशेष रोषणाई आणि सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी ऊर्स शरीफ, कव्वालीची रंगतदार मैफल आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सुप्रसिद्ध कव्वालांच्या जुगलबंदीची विशेष मैफल रंगणार आहे. भोकरदनचे प्रसिद्ध कव्वाल आसिफ अली आणि मिरजच्या प्रसिद्ध कव्वाल रेश्मा ताज यांच्यात भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली कव्वालीची जुगलबंदी होणार असून, या मैफलीची भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सूफी परंपरेतील भक्तिगीते आणि आध्यात्मिक संदेशांनी सजलेली ही मैफल रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेणार असून, समाजातील सर्व स्तरातील नागरिक एकत्र येऊन बंधुभावाचा संदेश देणार आहेत. ऊरूसाच्या निमित्ताने परिसरात विविध खाद्यपदार्थांची दुकाने, धार्मिक साहित्याची विक्री, खेळणी तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांची दुकानेही उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे. 2 ऑगस्ट रोजी जियारत कार्यक्रमाने या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे. या दिवशी भाविक दर्ग्यात दर्शन घेऊन चादर अर्पण करतील तसेच देशात शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येईल. ऊरूसाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वयंसेवक आणि ऊरूस समितीचे सदस्य भाविकांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणार आहेत. हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसाची अनेक दशकांची परंपरा असून, या सोहळ्यामुळे धार्मिक ऐक्य, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याचे भाविकांनी सांगितले. विविध धर्मीय नागरिक या ऊरूसात सहभागी होऊन परस्परांतील प्रेम, बंधुता आणि एकतेचे दर्शन घडवितात, ही या सोहळ्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत. ऊरूस समितीने जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रम, कव्वालीची मैफल, महाप्रसाद आणि जियारतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा हा तीन दिवसीय ऊरूस येडशी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करणार असून भाविकांसाठी तो एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.2
- टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; त्र्यंबकेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरणत्र्यंबकेश्वर:नाशिक जिल्ह्याचा मानबिंदू आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगावचे सुपुत्र आदरणीय श्री. संतोष खोरगडे साहेब हे मंत्रालयातील उच्च व तंत्रशिक्षण 'सचिव' या सर्वोच्च पदावरून ३५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या गौरवशाली कामगिरीमुळे संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुका आणि नाशिक जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.श्री. खोरगडे साहेब यांनी आपल्या ध्येयवादी प्रशासकीय कारकिर्दीच्या जोरावर आपल्या जन्मभूमीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल केले. त्यांनी प्रशासनात बजावलेली उल्लेखनीय सेवा आणि त्यांचे मार्गदर्शन येथील तरुण पिढीसाठी व मातीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.त्यांच्या या गौरवशाली निवृत्तीनिमित्त आणि भावी आयुष्यासाठी नाशिक जिल्हा पत्रकार व लाईव्ह महाराष्ट्र टाइम्सचे तळोदा वृत्तांकन प्रतिनिधी श्री. भगवान आचारी (मु.पो. अस्वली हर्ष, ता. त्र्यंबकेश्वर) यांनी खोरगडे साहेबांना पुढील आनंदी, सुदृढ आणि दीर्घायुषी सेवानिवृत्त जीवनाच्या मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.2
- वणी ता दिंडोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी दिंडोरी तालुक्यातील वनी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास आबा कड ; किरण गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते सागर चौधरी ;रवी भाऊ सोनवणे पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रेड पीएसआय सोनवणे व पोलीस हवालदार बागुल आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते . यावेळेस महामानवांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावर्षी प्रथमच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केल्याने कार्यकर्त्यांचे वनी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य किरण गांगुर्डे यांनी कौतुक केले यावेळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . जागर जनस्थान साठी शामराव सोनवणे दिंडोरी1
- *अप्पर पोलीस अधिक्षक मालेगांव यांचे पथक व चांदवड पोलिसांची धडक कारवाई:* *चांदवड टोलनाक्यावर लाखो रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त, आरोपी किया गाडीसह ताब्यात* प्रतिनिधी, चांदवड चांदवड : मुंबईहून मालेगावच्या दिशेने होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्कराला चांदवड पोलिसांनी उघडकीस आणले आहे. गुप्त माहितीच्या आधारे चांदवड टोलनाक्यावर सापळा रचून पोलिसांनी एमडी (Mephedrone) ड्रग्जचा माल जप्त केला असून किया कार क्रमांक एम .एच एक्केचाळीस बी एल सत्तावीस वीस या वाहनासह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुंबईहून मालेगावच्या दिशेने एका संशयित किया कारमधून काही प्रमाणावर अमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना मिळाली होती. माहिती मिळताच चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक मालेगांव यांच्या पोलीस पथकाने व चांदवड पोलीस स्टेशनच्या पथकाने चांदवड टोलनाक्यावर तात्काळ नाकाबंदी केली आणि संशयित गाडी अडवली. गाडीची कसून तपासणी केली असता त्यामध्ये बंदी असलेले 'एमडी ड्रग्ज' आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ड्रग्ज आणि वाहनासह तीन आरोपींना ताब्यात घेतले.सदरच्या कारवाईत चांदवड पोलीस स्टेशनच्या पथकात पोलीस निरीक्षक कैलास वाघ, भाऊसाहेब गुळे, विक्रम बस्ते, स्वप्निल रंधे, स्वप्निल जाधव, सुनील जाधव, अमोल जाधव, . दिनेश सूळ, प्रदीप आजगे,शंकर पवार यांचा समावेश होता चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी सध्या घटनास्थळीच रीतसर पंचनामा करत असून ड्रग्जचे नेमके वजन आणि बाजारभाव निश्चित करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या तस्करीत आणखी कोणाचा हात आहे का? याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथक करत आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.1
- भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी बोरगाव : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी शासकीय आश्रमशाळा सराड येथे भेट देऊन शाळेच्या इमारतीची तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पाहणी केली. भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शासकीय आश्रमशाळा सराड येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार भगरे यांनी शाळेत प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांचे निवासस्थान तसेच इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शिक्षक व शाळा प्रशासनाकडून माहिती घेतली.यावेळी सुरगाण्याचे तहसीलदार रामजी राठोड, सराडचे सरपंच नामदेव भोये, जनार्दन भोये, हरिभाऊ भोये यांच्यासह ग्रामस्थ व संबंधित अधिकारी उपस्थित होते भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या इमारतीची तांत्रिक तपासणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका यावेळी खासदार भगरे यांनी व्यक्त केली. भूकंपाच्या धक्क्यानंतर खासदारांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्याने विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांमध्ये काही प्रमाणात दिलासाचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे येवल्यात दिमाखात लोकार्पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी येवला शहरात उभारण्यात आलेल्या 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारका'चे लोकार्पण राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. हे स्मारक केवळ वास्तू नसून सामाजिक न्याय, समता आणि श्रमिकांच्या सन्मानाची प्रेरणाभूमी ठरेल, असे प्रतिपादन मंत्री भुजबळ यांनी केले. लोकार्पण सोहळ्यात बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, "पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे," हा अण्णाभाऊंचा विचार आजही दिशादर्शक आहे. अण्णाभाऊंनी आपल्या ज्वलंत शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गाजवली आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमानसात पोहोचवले. त्यांचे 'माझी मैना गावावर राहिली' हे गीत मराठी अस्मितीचे प्रतीक आहे. तसेच, ३५ हून अधिक कादंबऱ्या लिहून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या प्रसिद्ध 'फकिरा' कादंबरीचा रशियन भाषेतील अनुवाद हा मराठी साहित्याचा जागतिक सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रमुख उपस्थिती: या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जि.प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- केशव सृष्टी तर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केशव सृष्टीतर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे शैक्षणिक साहित्य मध्ये मुलांना सुंदर अशी पुस्तक ठेवण्यासाठी बॅग वह्या अशा प्रकारचे साहित्य देण्यात आलेले आहे समाजाची बांधिलकी राखत गोरगरिबांची आदिवासींची मुलं पुढे जाऊयात हा त्यांचा आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्याची कमी पडू नये असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे3