कर्मयथार्थ फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम नवे भामपूर जि.प. शाळेला क्रीडा साहित्याची भेट. दोंडाईचा :- शिक्षण आणि खेळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.' याच उदात्त विचारांतून आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून 'कर्मयथार्थ फाउंडेशन'तर्फे शिरपूर तालुक्यातील नवे भामपूर येथील जिल्हा परिषद शाळेला नुकतीच क्रीडा साहित्याची भेट देण्यात आली. मुंबई येथील पोलीस निरीक्षक महेश श्रीराव साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या प्रेरणादायी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवनवीन खेळणी आणि क्रीडा साहित्य हाती पडताच शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. यामुळे शालेय परिसरात कमालीचे उत्साही वातावरण पाहायला मिळाले. या दिमाखदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास कोळी उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राहुल बागुल, जगन्नाथ कोळी, आबाजी हरकलाल महाजन आणि रविंद्र पेंढारकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चंद्रकला रविंद्र महाजन म्हणाल्या, शिक्षण हाच धर्म आणि एकच ध्यास, समाजाचा विकास या ध्येयाने प्रेरित होऊन आमची शाळा कार्य करत आहे. समाजातील समविचारी आणि दानशूर व्यक्तींनी एकत्र येत विद्यार्थ्यांसाठी तुम्ही फक्त शिका, आम्ही तुमची काळजी घेऊ हा जो आश्वासक दृष्टिकोन ठेवला आहे, तो अत्यंत कौतुकास्पद आणि दिशादर्शक आहे. या सुंदर सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन ज्ञानेश्वर भाऊराव पाटील सर यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार शामकांत पंढरीनाथ नेरकर सर यांनी मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी 'कर्मयथार्थ फाउंडेशन'चे पदाधिकारी विवेक ईशी, विनय कोळी, हर्षल ईशी, मनोज ईशी, राज कुंवर, राजा थोरात, योगेश ईशी आणि संदीप ईशी यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थांकडून फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कर्मयथार्थ फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम नवे भामपूर जि.प. शाळेला क्रीडा साहित्याची भेट. दोंडाईचा :- शिक्षण आणि खेळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.' याच उदात्त विचारांतून आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून 'कर्मयथार्थ फाउंडेशन'तर्फे शिरपूर तालुक्यातील नवे भामपूर येथील जिल्हा परिषद शाळेला नुकतीच क्रीडा साहित्याची भेट देण्यात आली. मुंबई येथील पोलीस निरीक्षक महेश श्रीराव साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या प्रेरणादायी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवनवीन खेळणी आणि क्रीडा साहित्य हाती पडताच शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. यामुळे शालेय परिसरात कमालीचे उत्साही वातावरण पाहायला मिळाले. या दिमाखदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास कोळी उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राहुल बागुल, जगन्नाथ कोळी, आबाजी हरकलाल महाजन आणि रविंद्र पेंढारकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चंद्रकला रविंद्र महाजन म्हणाल्या, शिक्षण हाच धर्म आणि एकच ध्यास, समाजाचा विकास या ध्येयाने प्रेरित होऊन आमची शाळा कार्य करत आहे. समाजातील समविचारी आणि दानशूर व्यक्तींनी एकत्र येत विद्यार्थ्यांसाठी तुम्ही फक्त शिका, आम्ही तुमची काळजी घेऊ हा जो आश्वासक दृष्टिकोन ठेवला आहे, तो अत्यंत कौतुकास्पद आणि दिशादर्शक आहे. या सुंदर सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन ज्ञानेश्वर भाऊराव पाटील सर यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार शामकांत पंढरीनाथ नेरकर सर यांनी मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी 'कर्मयथार्थ फाउंडेशन'चे पदाधिकारी विवेक ईशी, विनय कोळी, हर्षल ईशी, मनोज ईशी, राज कुंवर, राजा थोरात, योगेश ईशी आणि संदीप ईशी यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थांकडून फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त... Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त... - Grand procession on the occasion of Prophet's birth anniversary in Dhule; Attractive scenes attracted attention, tight police security - #DhuleNews #EidEMilad #PaigambarJayanti #DhuleEidEMilad #DhulePolice1
- पत्रकारावरही गुन्हा; माध्यमस्वातंत्र्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा आरोप पुणे | प्रतिनिधी पुण्यातील प्रतिष्ठित सी ओ पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहातील वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सुरू झालेल्या या प्रकरणात विद्यार्थी संघटनांमधील संघर्षानंतर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आणि आता ए बी पी माझाचे पुणे प्रतिनिधी पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातही तक्रार गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने पत्रकाराने परवानगीशिवाय वसतिगृह परिसरात प्रवेश केल्याचा आरोप करत कायदेशीर तक्रार केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने तीव्र नाराजी व्यक्त करत पत्रकारांवर अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करून माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. सी ओ पी परिसरातील घटनेनंतर पोलिसांनी आधी ए बी व्ही पी सदस्याच्या तक्रारीवरून एन एस यु आय आणि युवक काँग्रेसशी संबंधित ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार मंदार गोंजारी यांनी सी ओ पी परिसरातील विद्यार्थ्यांच्या कथित प्रश्नांबाबत केलेले वृत्तांकनही चर्चेत आले आहे. एबीपी माझाच्या अधिकृत संकेतस्थळावर गोंजारी यांच्या नावाने सी ओ पी प्रकरणावरील वृत्त प्रकाशित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने वृत्तांकन करणे हा पत्रकारितेचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्याचा भाग आहे. एखाद्या पत्रकाराने नियमांचे उल्लंघन केले असल्यास कायदा आपले काम करेल; मात्र पत्रकाराने केलेल्या वृत्तांकनामुळे प्रशासन किंवा सत्ताधारी अस्वस्थ झाले म्हणून पत्रकाराविरोधात कारवाई होत असेल, तर हा माध्यमस्वातंत्र्यासाठी गंभीर इशारा आहे, अशी भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने व्यक्त केली आहे. सी ओ पी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या शुल्क, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवरून वाद निर्माण झाल्याचे विविध वृत्तांतून समोर आले आहे. एका विद्यार्थिनीने सुरुवातीला कॉलेजकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे सांगितले होते; त्यानंतर तिने दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्यावर दबाव निर्माण झाल्याचे सांगत राजकीय वादात आपल्याला ओढू नये, असे आवाहन केले. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत, त्यावर प्रशासनाची भूमिका काय आहे, विद्यार्थी संघटनांमध्ये नेमका संघर्ष कशामुळे झाला आणि पत्रकाराविरोधातील तक्रारीमागील वास्तविक कारण काय आहे, हे स्पष्टपणे समोर येणे गरजेचे आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. म्हस्के म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने बातमी केली म्हणून पत्रकाराला गुन्ह्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा केवळ एका पत्रकाराचा प्रश्न राहात नाही; हा संपूर्ण माध्यमविश्वाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न बनतो. “पत्रकार चुकीचा असेल तर कायदा तपास करेल, पुरावे असतील तर न्यायालयीन प्रक्रिया होईल. मात्र पत्रकाराने प्रश्न उपस्थित केले म्हणून त्याच्यावर दबाव निर्माण करणे, त्याला घाबरवणे किंवा गुन्ह्याच्या माध्यमातून त्याची लेखणी रोखण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या माध्यमांकडे संशयाने पाहिले जात असेल, तर ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचेही म्हस्के यांनी नमूद केले. “महाराष्ट्रातील पत्रकार निर्भयपणे काम करतील. माध्यमांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असा इशाराही त्यांनी दिला. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनीही सी ओ पी प्रकरणातील पत्रकाराविरोधातील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला. चोरडिया म्हणाले की, पत्रकार हा समाजातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या समोर आणणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे. “पत्रकाराने बातमी केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. पत्रकारितेवर दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न महाराष्ट्रातील पत्रकार सहन करणार नाहीत. पत्रकाराच्या लेखणीला घाबरवण्याऐवजी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” अशी भूमिका चोरडिया यांनी मांडली. सी ओ पी प्रकरणात पत्रकाराविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि पत्रकाराला केवळ त्याच्या व्यावसायिक कर्तव्यामुळे लक्ष्य केले जात नाही ना, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सी ओ पी प्रकरण आता केवळ विद्यार्थी संघटनांमधील संघर्षापुरते मर्यादित राहिलेले नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यापीठ प्रशासनाची भूमिका, राजकीय हस्तक्षेप, विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आणि आता पत्रकाराविरोधातील कायदेशीर कारवाई या सर्व मुद्द्यांमुळे प्रकरण अधिक व्यापक झाले आहे. पोलिसांनी सी ओ पी परिसरात राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर तसेच राजकीय कार्यक्रमांवर काही काळ निर्बंधही लागू केले होते. मात्र प्रश्न असा आहे की, विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमके काय आहेत? त्यांची उत्तरे कोण देणार? आणि ते प्रश्न जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकाराचे संरक्षण कोण करणार? व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने स्पष्ट केले आहे की, पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर संघटना पत्रकारांच्या घटनात्मक अधिकारांच्या बाजूने ठामपणे उभी राहील. “पत्रकारांवर दबाव टाकून प्रश्न सुटणार नाहीत. उलट दबाव वाढला की प्रश्न अधिक तीव्रतेने जनतेसमोर येतील. विद्यार्थ्यांना न्याय आणि पत्रकारांना निर्भयपणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणे, हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे,” अशी भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे. दरम्यान, पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातील तक्रारीसह सी ओ पी प्रकरणातील सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आणि विद्यार्थी, विद्यापीठ प्रशासन, विद्यार्थी संघटना तसेच पत्रकार,सर्वांची बाजू ऐकून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यावर पुढची भूमिका घेणार आहे.1
- शिवधाम उद्याना शेजारी दक्षिण मुखी हनुमान, शनी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी शोभायात्रा रविवारी महाप्रसाद शिवधाम उद्याना शेजारी दक्षिण मुखी हनुमान, शनी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी शोभायात्रा रविवारी महाप्रसाद नंदुरबार शहरातील नेहरू चौक परिसरातील शिवधाम उद्याना शेजारी श्री शिव पंचायतन दक्षिण मुखी श्री हनुमान आणि शनि देवाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. दाक्षिणात्य पद्धतीचे सुंदर व आकर्षक मंदिर लक्ष वेधून घेत आहे. या भव्य मंदिरात तीन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते बारा वाजता मूर्तीची शोभायात्रा निघेल. गणेश अंबिका हनुमानजी आणि शनि देवाची मूर्ती नेहरू चौकातील श्रीराम मंदिरापासून नगरपालिका, द्वारकाधीश मंदिर, हाट दरवाजा, गांधी पुतळा मार्गे पुन्हा शिवधाम शेजारी मंदिरात शोभायात्रा येईल. शनिवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत प्रांत पूजन देवता आवाहन स्थापन ग्रहण दुपारी दोन ते सायंकाळी सात पर्यंत प्राणप्रतिष्ठा विधी होईल. रविवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत देवता मूर्ती संस्कार मंगल स्नान न्यास प्राणप्रतिष्ठा प्रधान हवन उत्तरांग हवन कलश शिखर स्थापन ध्वजारोहण, बलिदान, महा पूर्णा होती होईल. त्यानंतर महाआरती महाप्रसाद होईल भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री दक्षिणमुखी हनुमान व शनी मंदिर सेवा समिती तर्फे करण्यात आले आहे.3
- जायखेडा पोलिसांनी पाठलाग करून पिकअप मधून गोवंश जनावरे केली जप्त जायखेडा पोलिसांची पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत ३ लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गोवंश घेऊन जाणारी पिक अप पाठलाग करून ताब्यात घेणेत आली.1
- आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार1
- जलगाव जिल्हे मे एक औरत को नहाते हुए छेड रहा था एक आदमी उसे पकड के चारो तरफ से की पिटाई जलगाव लेटेस्ट न्यूज #जलगावन्यूज #जळगावजिल्हा #viralnewz #shuruapp1
- नेपाल का जलप्रलय भारत के दरवाजे पर! बिहार-UP में हाई अलर्ट, कोसी-गंडक मचा सकती हैं तबाही1
- Dhule News | धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यातर्फे ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा; सण शांततेत आणि जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन - धुळे: ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस हा पवित्र आणि महत्त्वाचा असून, हा सण सर्वांनी उत्साहात, जल्लोषात परंतु शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य टाळावे, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. `#DhuleNews` `#DhulePolice` `#VishalAnandSP` `#EidEMilad2025` `#DhuleCity` Dhule News | धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यातर्फे ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा; सण शांततेत आणि जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन - धुळे: ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस हा पवित्र आणि महत्त्वाचा असून, हा सण सर्वांनी उत्साहात, जल्लोषात परंतु शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य टाळावे, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. `#DhuleNews` `#DhulePolice` `#VishalAnandSP` `#EidEMilad2025` `#DhuleCity`1