14 लाख भरून नोकरी, नंतर कारण न देता संस्थेने कामावरून काढलं, अंबाजोगाईच्या शिक्षिकेने थेट मरणाची परवानगी मागितली बीड येथे सुरू आहे चार दिवसापासून आमरण उपोषण 14 लाख भरून नोकरी, नंतर कारण न देता संस्थेने कामावरून काढलं, अंबाजोगाईच्या शिक्षिकेने थेट मरणाची परवानगी मागितली बीड येथे सुरू आहे चार दिवसापासून आमरण उपोषण बीड/प्रतिनिधी बीडमधील एका महिला शिक्षिकेने जिल्हाधिकाऱ्याकडे कुटुंबासह स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. शिक्षण संस्थेच्या मनमानी जाचाला कंटाळून महिला शिक्षिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. बीड जिल्हा परिषदेसमोर गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू असून न्याय मिळविण्यासाठी त्यांनी शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. बीडच्या आंबेजोगाई येथील फातिमा उर्दू माध्यमिक शाळेच्या सहशिक्षिका नाझिया बेग नूरुल हसन यांनी अशी परवानगी मागत बीड जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. नाझिया बेग नूरुल हसन यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. संस्थाचालकाने 14 लाख रूपये घेऊन त्यांना शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नियुक्ती दिली. मात्र त्यानंतर 2019 मध्ये काहीही कारण न दाखवता शाळेतून कमी केले. तसेच त्या जागी नव्याने दुसरे व्यक्ती भरण्यात आली. * शिक्षिकेच्या मागणीमुळे शिक्षण विभागात खळबळ * या विरोधात अनेक वेळा तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने तसेच संस्थाचालक वारंवार धमकी देत असल्याने नाझिया बेग यांनी हे आमरण उपोषण सुरू केले असून कुटुंबासह स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. त्यामुळे खळबळ असून शिक्षण विभाग आणि शिक्षण संस्थेमधील कारभार चव्हाट्यावर आला आहे. *शिक्षण संस्थेचे नेमके काय म्हणणे आहे? दुसरीकडे शिक्षण संस्थेची बाजू जाणून घेण्याकरिता आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. परंतु आम्हाला त्यावरती काहीही बोलायचे नाही, आम्ही त्यांना कायदेशीर उत्तर देऊ, असे शिक्षण संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. पीडितेचे काय म्हणणे आहे? २० किंवा ४० टक्क्यावर पगार सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग माध्यमिक, जिल्हा परिषद बीड या कार्यालयातील खालच्या अधिकाऱ्यापासून ते वरच्या अधिकाऱ्यापर्यंत एकूण ४ लाख रूपये दिल्याशिवाय तुझे पगाराबाबतचे प्रस्ताव घेण्यास स्पष्ट नकार देत असून तात्काळ रक्कम जमा करा अन्यथा तू मेलीस तरी तुझा पगार कधीच सुरू होऊ शकत नाही, असे कोहिनूर मागासवर्गीय एज्युकेशन आणि वेलफेअर सोसायटी संचलित, फातिमा उर्दू माध्यमिक शाळा, गांधीनगर, गुरुवारपेठ, अंबाजोगाई, या संस्था आणि शाळा व्यवस्थापनाकडून मला वेळोवेळी सांगतिले असून या मानसिक त्रासापोटी माझ्याकडे सहकुटुंब व्यवस्थापनाकडून मला वेळोवेळी सांगण्यात येत होते. आत्महत्या केल्याशिवाय कोणतेही पर्याय नाही. त्यामुळे कुटुंबाला इच्छा मरणाची परवानगी मिळावी, असे निवेदन शिक्षिकेने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि जिल्हा पोलीस प्रशासनाला दिले आहे.
14 लाख भरून नोकरी, नंतर कारण न देता संस्थेने कामावरून काढलं, अंबाजोगाईच्या शिक्षिकेने थेट मरणाची परवानगी मागितली बीड येथे सुरू आहे चार दिवसापासून आमरण उपोषण 14 लाख भरून नोकरी, नंतर कारण न देता संस्थेने कामावरून काढलं, अंबाजोगाईच्या शिक्षिकेने थेट मरणाची परवानगी मागितली बीड येथे सुरू आहे चार दिवसापासून आमरण उपोषण बीड/प्रतिनिधी बीडमधील एका महिला शिक्षिकेने जिल्हाधिकाऱ्याकडे कुटुंबासह स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. शिक्षण संस्थेच्या मनमानी जाचाला कंटाळून महिला शिक्षिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. बीड जिल्हा परिषदेसमोर गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू असून न्याय मिळविण्यासाठी त्यांनी शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. बीडच्या आंबेजोगाई येथील फातिमा उर्दू माध्यमिक शाळेच्या सहशिक्षिका नाझिया बेग नूरुल हसन यांनी अशी परवानगी मागत बीड जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. नाझिया बेग नूरुल हसन यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. संस्थाचालकाने 14 लाख रूपये घेऊन त्यांना शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नियुक्ती दिली. मात्र त्यानंतर 2019 मध्ये काहीही कारण न दाखवता शाळेतून कमी केले. तसेच त्या जागी नव्याने दुसरे व्यक्ती भरण्यात आली. * शिक्षिकेच्या मागणीमुळे शिक्षण विभागात खळबळ * या विरोधात अनेक वेळा तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने तसेच संस्थाचालक वारंवार धमकी देत असल्याने नाझिया बेग यांनी हे आमरण उपोषण सुरू केले असून कुटुंबासह स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. त्यामुळे खळबळ असून शिक्षण विभाग आणि शिक्षण संस्थेमधील कारभार चव्हाट्यावर आला आहे. *शिक्षण संस्थेचे नेमके काय म्हणणे आहे? दुसरीकडे शिक्षण संस्थेची बाजू जाणून घेण्याकरिता आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. परंतु आम्हाला त्यावरती काहीही बोलायचे नाही, आम्ही त्यांना कायदेशीर उत्तर देऊ, असे शिक्षण संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. पीडितेचे काय म्हणणे आहे? २० किंवा ४० टक्क्यावर पगार सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग माध्यमिक, जिल्हा परिषद बीड या कार्यालयातील खालच्या अधिकाऱ्यापासून ते वरच्या अधिकाऱ्यापर्यंत एकूण ४ लाख रूपये दिल्याशिवाय तुझे पगाराबाबतचे प्रस्ताव घेण्यास स्पष्ट नकार देत असून तात्काळ रक्कम जमा करा अन्यथा तू मेलीस तरी तुझा पगार कधीच सुरू होऊ शकत नाही, असे कोहिनूर मागासवर्गीय एज्युकेशन आणि वेलफेअर सोसायटी संचलित, फातिमा उर्दू माध्यमिक शाळा, गांधीनगर, गुरुवारपेठ, अंबाजोगाई, या संस्था आणि शाळा व्यवस्थापनाकडून मला वेळोवेळी सांगतिले असून या मानसिक त्रासापोटी माझ्याकडे सहकुटुंब व्यवस्थापनाकडून मला वेळोवेळी सांगण्यात येत होते. आत्महत्या केल्याशिवाय कोणतेही पर्याय नाही. त्यामुळे कुटुंबाला इच्छा मरणाची परवानगी मिळावी, असे निवेदन शिक्षिकेने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि जिल्हा पोलीस प्रशासनाला दिले आहे.
- लातूर मनपा प्रशासनाने 2026-27 चे अर्थ संकल्पचे अंदाज पत्रक स्थायी समिती समोर के सादर, लातूर मनपा चे नवनिर्वाचित सभापती सचिन बंडापल्ले यांनी सदर अंदाज पत्रकात काही त्रुटी असल्याचे सांगत सदर अंदाज पत्रक दुरुस्त करून अचूक अंदाज पत्रक सादर करण्याच्या केल्या सूचना.1
- ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.1
- लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.1
- *वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकावर सुविधाचा अभाव, अनेक समस्यांनी नगरीक वचीत गेल्या अनेक वर्षापासून कुठली सुविधा नाही रेल्वे स्टेशन.वर वडवळ नागनाथ रेल्वे स्टेशन येथे सुविधाचा अभाव आहे. कारण या रेल्वे स्थानकावर कसलीच सुविधा नाही. या रेल्वे स्थानकावर पाण्याची व्यवस्था नाही येथे कसलाच निवारा नाही. 16000 लोकसंख्येचे गाव असलेले वडवळ नागनाथ येथे रेल्वे टेशन आहे येथे दिवसभरातून आठ रेल्वे गाडी थांबतात. आणि दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. पण या रेल्वे स्थानकावर सुविधा कसलीच नाही. महत्त्वाची म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही कारण आता उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे पाण्याची सुविधा नाही. दुसरी म्हणजे निवारा नाही कडक उन्हामध्ये प्रवाशांना थांबावे लागत आहे कारण येथे निवारा नाही. तसेच येथे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. कारण येथे प्लॅटफॉर्म ची उंची खूप कमी आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध यांना रेल्वे चढण्यासाठी खूप त्रास होत आहे. तरी रेल्वे प्रशासन याची लवकरच दखल घ्यावी ही मागणी नागरिकातून होत आहे. आणि त्वरित येथे रेल्वे स्थानकामध्ये पाण्याची व्यवस्था करावी तसेच निवार्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.4
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- --- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश भागात सध्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. खाण्यापेक्षा पिकांची नासाडीच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ----- “रात्री पाणी देताना जीव धोक्यात” --- सध्या दिवसा वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. यावेळी रानडुकरे अंगावर येण्याचा धोका निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.“काबाडकष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका या सारखे पिक रानडुकरांकडून पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते; मात्र साधा मोबाईल असल्याने ते शक्य होत नाही,” असे नुकसानग्रस्त शेतकरी रामदास मुळे यांनी सांगितले. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी त्यांनी मागणी केली. ----- सौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करावी. --- डॉ.श्यामाप्रसाद जन-वन-विकास योजने अंतर्गत सध्या फक्त जंगलालगतच्या गावांना सौर कुंपणाचा लाभ दिला जातो. मात्र रानडुकरे, मोर, हरिण या सारख्या वन्यजीवांचा त्रास अनेक गावांमध्ये होत असल्याने ही योजना सर्व गावांमध्ये सरसकट लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे. -----1
- Post by AapTak Hindi News Channel1
- (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.1