टँकरचा प्रस्ताव पाठवूनही प्रशासनाचे दुर्लक्ष पिण्याच्या पाण्यासाठी बोलठाणवासीयांची 'भटकंती '.! गंगापूर तालुक्यातील बोलठाण गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, बोलठाण गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी प्रस्ताव पाठवून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तसेच शासनाने तात्काळ बोलठाण गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.गेल्या काही आठवड्यांपासून बोलठाण गावातील विहिरींमध्ये असलेले पाणी आटले असून, काही ठिकाणी अत्यल्प पाणीसाठा उरला आहे. परिणामी महिलांना आणि लहान मुलांना लांब अंतरावर जाऊन पाणी भरावे लागत आहे. गावात पाण्यासाठी रानवनात फिरुन पाणी आणावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लवकरात लवकर टँकर सुरू करावे अशी मागणी गट ग्रामपंचायत तांदुळवाडीतर्फे गटविकास अधिकारी यांच्याकडे १ मार्च रोजी करण्यात आली होती. परंतु अद्यापही त्यांनी या मागणीची दखल घेतली नाही त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.दरम्यान, ग्रामपंचायतीने टँकरच्या पुरवठ्यासाठी तालुका प्रशासन टंचाई विभागाचे अरुण राऊत यांना प्रस्ताव पाठवला होता. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. उन्हाळा सुरू होताच गावात पाणीटंचाई वाढत जाते, त्यामुळे वेळेत उपाययोजना झाली नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते असे ग्रामपंचायत समिती सदस्य करीमा हारुण पठाण यांनी सांगितले.
टँकरचा प्रस्ताव पाठवूनही प्रशासनाचे दुर्लक्ष पिण्याच्या पाण्यासाठी बोलठाणवासीयांची 'भटकंती '.! गंगापूर तालुक्यातील बोलठाण गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, बोलठाण गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी प्रस्ताव पाठवून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तसेच शासनाने तात्काळ बोलठाण गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.गेल्या काही आठवड्यांपासून बोलठाण गावातील विहिरींमध्ये असलेले पाणी आटले असून, काही ठिकाणी अत्यल्प पाणीसाठा उरला आहे. परिणामी महिलांना आणि लहान मुलांना लांब अंतरावर जाऊन पाणी भरावे लागत आहे. गावात पाण्यासाठी रानवनात फिरुन पाणी आणावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लवकरात लवकर टँकर सुरू करावे अशी मागणी गट ग्रामपंचायत तांदुळवाडीतर्फे गटविकास अधिकारी यांच्याकडे १ मार्च रोजी करण्यात आली होती. परंतु अद्यापही त्यांनी या मागणीची दखल घेतली नाही त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.दरम्यान, ग्रामपंचायतीने टँकरच्या पुरवठ्यासाठी तालुका प्रशासन टंचाई विभागाचे अरुण राऊत यांना प्रस्ताव पाठवला होता. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. उन्हाळा सुरू होताच गावात पाणीटंचाई वाढत जाते, त्यामुळे वेळेत उपाययोजना झाली नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते असे ग्रामपंचायत समिती सदस्य करीमा हारुण पठाण यांनी सांगितले.
- सूरत में अपने गाँव लौट रहे यात्रियों की उमड़ी भीड़। बैरिकेड तोड़ने की कोशिश पुलिस ने किया लाठीचार्ज! . .1
- सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून रोजगार सेवकांनी दिला राजीनामा1
- आकाशवाणी परिसरामध्ये एका चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असून सदरील घटना ही छत्रपती संभाजी नगर शहरातील आकाशवाणी चौकामध्ये घडली आहे सदरील व्हिडिओ हा समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- Post by Changdev Barge1
- येवला: राज्यात उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत चालला असून, नाशिक जिल्ह्याचा पारा आता ४०°C च्या पुढे गेला आहे. एप्रिल महिना सुरू होताच सूर्यनारायण कोपल्याचे पाहायला मिळत असून, कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आता अबालवृद्धांची व बच्चे कंपनीचे पावले जलतरण तलावांकडे वळू लागली आहेत. नाशिकसह जिल्ह्यातील येवला, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सध्या उष्णतेची मोठी लाट पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट असतो, मात्र येवला शहरातील क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव मात्र 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. शरीराला थंडावा मिळवण्यासाठी बालगोपाळांसह तरुणांची येथे तुडुंब गर्दी होत आहे. सकाळपासूनच सुरू होणारी ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम असते. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुलांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी 'जलतरण' हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे नागरिक सांगत आहेत. वाढत्या उन्हामुळे शीतपेये आणि जलतरण तलावांना सध्या मोठी पसंती मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखरे येवला1
- 👩💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*1
- चांदा व अहिल्यानगर शहरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 11 गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अहिल्यानगर (प्रतिनिधी) – पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीविरोधात मोठी कारवाई करत चांदा (ता. नेवासा) व अहिल्यानगर शहर परिसरातून एकूण 11 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पहाटे सोनई व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे : 1) सोनई पोलीस स्टेशन हद्द गु.र. नं. 138/2026 अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 (सुधारीत 2015) व प्राण्यांवरील क्रूरतेच्या कलमांनुसार कारवाई करत सुमारे 90,000/- रुपये किमतीची 6 गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली. आरोपी: आसिफ आतीक कुरेशी (फरार) लियाकत इस्माईल कुरेशी (फरार) उबेद कुरेशी (फरार) (सर्व रा. चांदा, ता. नेवासा) 2) कोतवाली पोलीस स्टेशन हद्द गु.र. नं. 259/2026 अन्वये 1,02,000/- रुपये किमतीची 5 गोवंशीय जनावरे व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपी: सुफियान आयाज कुरेशी (फरार), रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर एकूण कारवाई: 2 गुन्हे दाखल 11 गोवंशीय जनावरे मुक्त 1,92,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त 4 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल (सर्व फरार) ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील काळातही अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.1
- सिल्लोड : भवन येथे सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण स्मारणार्थ महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शासनाच्या ईमेल आयडीवर हरकती नोंदवण्यासाठी घरोघरी जाऊन हरकती नोंदविले जाईल असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला1