वडवणीच्या रेणुकामाता संस्थानात सोमवारी भव्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम * हजारो रामभक्त होणार ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार (फोटो) वडवणी,दि.११(प्रतिनिधी):- वडवणी शहरातील श्री.रेणुकामाता संस्थान याठिकाणी मागील ६ महिन्यांपासून भावार्थ रामायण कथा सुरु असून या रामायणातील अतिशय महत्त्वाच्या युध्दकाण्ड यातील भव्य अशा लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमाचे येत्या दि.१६ मार्च २०२६ सोमवार रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता आयोजन करण्यात आले असून याठिकाणी वडवणी व पंचक्रोशीतील हजारो रामभक्त, वाचक, सूचक व भाविक गण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार असून तरी या भव्य लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमासाठी वडवणी पंचक्रोशीतील सर्व वाचक, सूचक व रामभक्तांनी रामायण कथा श्रवणाचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा व सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन श्री.रेणुकामाता संस्थानचे संस्थानप्रमुख अण्णा महाराज दुटाळ यांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी येथील चिंचवण रोडवरील श्री.रेणुकामाता संस्थान याठिकाणी मागील सहा महिन्यांपासून भावार्थ रामायण कथेस प्रारंभ झालेला असून या रामायण कथेसाठी वाचक म्हणून राहुल महाराज दुटाळ तर सुचक म्हणून बाबासाहेब महाराज आंधळे हे दैनंदिन रामायण कथेचे वाचन व विस्तृत वर्णन करत आहेत. या ठिकाणीच या अगोदरही भव्य असे रामायण कथा सोहळा संपन्न झालेले आहेत. संपुर्ण रामायणामध्ये रामायणाचे सात काण्ड असून यामध्ये बालकाण्ड, आयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड, किष्किंधाकाण्ड, सुंदरकाण्ड, युध्दकाण्ड (लक्ष्मण शक्ती), उत्तर काण्ड असे एकूण सात काण्ड आहेत. यापैकी बालकाण्ड, आयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड, किष्किंधाकाण्ड, सुंदरकाण्ड हे पूर्ण झाले असून आता युध्दकाण्डामध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेल्या लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमाचे भव्य अशा आयोजनाची तयारी याठिकाणी सुरु झालेली असून येत्या दि.१६ मार्च २०२६ सोमवार रोजी श्री.रेणुकामाता संस्थान वडवणी या ठिकाणी या भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीचा हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी ठीक ७ वाजता या लक्ष्मण शक्तीच्या वाचन कार्यक्रमास सुरुवात होईल. तसेच दुसऱ्या दिवशी दि.१७ मार्च २०२६ मंगळवार रोजी सकाळी ठीक ७ वाजता महाप्रसादाची पंगत सुरु होईल. वडवणी व पंचक्रोशीतील हजारो रामभक्त, वाचक, सूचक व भाविक गण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार असून तरी या लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमासाठी वडवणी पंचक्रोशीतील सर्व वाचक, सूचक व रामभक्तांनी रामायण कथा श्रवणाचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा व सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन श्री.रेणुकामाता संस्थानचे संस्थानप्रमुख अण्णा महाराज दुटाळ व वडवणी पंचक्रोशीतील समस्त रामभक्त यांनी केले आहे.
वडवणीच्या रेणुकामाता संस्थानात सोमवारी भव्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम * हजारो रामभक्त होणार ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार (फोटो) वडवणी,दि.११(प्रतिनिधी):- वडवणी शहरातील श्री.रेणुकामाता संस्थान याठिकाणी मागील ६ महिन्यांपासून भावार्थ रामायण कथा सुरु असून या रामायणातील अतिशय महत्त्वाच्या युध्दकाण्ड यातील भव्य अशा लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमाचे येत्या दि.१६ मार्च २०२६ सोमवार रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता आयोजन करण्यात आले असून याठिकाणी वडवणी व पंचक्रोशीतील हजारो रामभक्त, वाचक, सूचक व भाविक गण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार असून तरी या भव्य लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमासाठी वडवणी पंचक्रोशीतील सर्व वाचक, सूचक व रामभक्तांनी रामायण कथा श्रवणाचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा व सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन श्री.रेणुकामाता संस्थानचे संस्थानप्रमुख अण्णा महाराज दुटाळ यांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी येथील चिंचवण रोडवरील श्री.रेणुकामाता संस्थान याठिकाणी मागील सहा महिन्यांपासून भावार्थ रामायण कथेस प्रारंभ झालेला असून या रामायण कथेसाठी वाचक म्हणून राहुल महाराज दुटाळ तर सुचक म्हणून बाबासाहेब महाराज आंधळे हे दैनंदिन रामायण कथेचे वाचन व विस्तृत वर्णन करत आहेत. या ठिकाणीच या अगोदरही भव्य असे रामायण कथा सोहळा संपन्न झालेले आहेत. संपुर्ण रामायणामध्ये रामायणाचे सात काण्ड असून यामध्ये बालकाण्ड, आयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड, किष्किंधाकाण्ड, सुंदरकाण्ड, युध्दकाण्ड (लक्ष्मण शक्ती), उत्तर काण्ड असे एकूण सात काण्ड आहेत. यापैकी बालकाण्ड, आयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड, किष्किंधाकाण्ड, सुंदरकाण्ड हे पूर्ण झाले असून आता युध्दकाण्डामध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेल्या लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमाचे भव्य अशा आयोजनाची तयारी याठिकाणी सुरु झालेली असून येत्या दि.१६ मार्च २०२६ सोमवार रोजी श्री.रेणुकामाता संस्थान वडवणी या ठिकाणी या भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीचा हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी ठीक ७ वाजता या लक्ष्मण शक्तीच्या वाचन कार्यक्रमास सुरुवात होईल. तसेच दुसऱ्या दिवशी दि.१७ मार्च २०२६ मंगळवार रोजी सकाळी ठीक ७ वाजता महाप्रसादाची पंगत सुरु होईल. वडवणी व पंचक्रोशीतील हजारो रामभक्त, वाचक, सूचक व भाविक गण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार असून तरी या लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमासाठी वडवणी पंचक्रोशीतील सर्व वाचक, सूचक व रामभक्तांनी रामायण कथा श्रवणाचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा व सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन श्री.रेणुकामाता संस्थानचे संस्थानप्रमुख अण्णा महाराज दुटाळ व वडवणी पंचक्रोशीतील समस्त रामभक्त यांनी केले आहे.
- पुसरा येथील मेंढपाळ बांधव यांना मारहाण. वडवणी प्रतिनिधी- वडवणी तालुक्यातील पुसरा येथील मेंढपाळ बांधव लहू बीटे आणि बाबा बीटे यांना झालेली मारहाण ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. गाडीचे झालेले नुकसान भरून दिल्यानंतरही, केवळ सत्तेच्या किंवा पैशाच्या माजातून गरीब मेंढपाळांना ढोरासारखे मारणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. तातडीने गुन्हा दाखल: संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा. पोलीस अधीक्षक हस्तक्षेप: बीड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या घटनेची स्वतः दखल घेऊन पीडित मेंढपाळ बांधवांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- जालना शहरातील आझाद मैदान परिसरात असलेल्या अंकुश कोचिंग क्लासेस येथे विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करण मोरे (वय १८, रा. खरपुडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक कोचिंग क्लासच्या इमारतीवर टँकरद्वारे पाणी चढवण्याचे काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत काही नागरिकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यातही गर्दी केली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.1
- *महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर.. कोणीच सुरक्षित नाही -आमदार अमित देशमुख by photocrimenews* https://youtube.com/live/kF4kuxSpXI4?feature=share1
- Post by अखंड भारत1
- माननीय मोहदय आमदार साहेब यांनी भूकंपग्रस्त विभाग याचे प्रश्न अधिवेशन मध्ये खूप चागल्या प्रकारे विषय घेऊन या गरीब 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारकांना न्याय मिळवून देण्याचे सतत कर्यस्थ ब प्रयत्न करीत आहेत कारण आज भूकंप होऊन दुसरी पीडी चालू आहे प्रत्तेक घरात तीन चार वारस आहेत त्यांना घर नको का याचा पण या आमदार साहेबानो विचार करून मुद्दा अधिवेशन मध्ये उचलूम धरले आहेत या बद्दल मी महादेव शिंदे 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक याच्या वतीने आमदार साहेब याचे मनापासून आभार व्यक्त करीत आहे1
- तालुक्यातील मौजे बेलोरा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग, पोखरा योजना तसेच सामाजिक वनीकरण योजनेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर अर्ज सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, गावातील ग्रामरोजगार सहाय्यक व कृषी सहाय्यक यांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर फळबाग, पोखरा योजना व सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत झाडे प्रत्यक्षात न लावता अनुदान काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाची योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे, खोटी हजेरी व काल्पनिक अहवाल तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होण्यासोबतच शेतकऱ्यांचाही विश्वासघात झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. शासनाच्या निधीचा अपहार करणे हा भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याने संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमून सर्व कागदपत्रे व नोंदींची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेण्यात टाळाटाळ झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.1
- *धार रोड कचरा डेपोच्या जागेवर कचरा टाकने बंद करा धार रोड परिसरातील नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन*1
- भाजपा जिल्हा महामंत्री संजय गिरी यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तात्काळ भाजप जिल्हा शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर दखल घेत संजय गिरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची केली मनधरणी, पक्ष मोठा आहे इच्छुकांची संख्या ही मोठी आहे, पण पक्ष आणि पक्षश्रेष्ठी कायम सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे आहेत, येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी नक्कीच संजय गिरी यांच्या बाबतीत विचार करतील आणि एक चांगली संधी येणाऱ्या काळात त्यांना मिळेल, असे यावेळी अजित पाटील कव्हेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. #CMOMaharashtra #abhimanyupawar #sambhajinagarkar #bavnkule #pankajmunde1