*सिंदी रेल्वे परिसरात 'लक्झरी' चोरांचा थरार* *सिंदी (रेल्वे):* वर्धा एकीकडे तंत्रज्ञान प्रगत होत असताना, चोरीच्या पद्धतीही आता हायटेक झाल्या आहेत. सिंदी रेल्वे शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, चक्क एका आलिशान कारमधून येत डबक्यांच्या कळपावर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री मोठी मस्जिद परिसरातून ५ बकऱ्या लंपास करण्यात आल्या, तर बैल चोरीचा प्रयत्न थोडक्यात फसला. मिळालेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२:५१ च्या सुमारास शहरात एक लाल रंगाची आलिशान कार दाखल झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कारमधून ४ ते ५ अज्ञात इसम खाली उतरले. मोठी मस्जिद परिसरातून शुभम निमजे यांच्या ३ बकऱ्या (किंमत ४५,००० रुपये) आणि इरफान काजी प्यारू शेख यांच्या २ बकऱ्या (किंमत ३०,००० रुपये) गाडीत कोंबून पळवून नेल्या. एकाच रात्रीत एकूण ७५ हजार रुपयांचे पशुधन लंपास करण्यात आले. त्याच रात्री या टोळीने पळसगाव मार्गावरील वसंता बावणे यांच्या गोठ्यातील दोन बैल चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र काही कारणास्तव तो प्रयत्न फसला आणि बैल वाचले. या चोरीच्या घटनेनंतर नागरिक संतापलेले आहेत. विशेष म्हणजे, पीडित तरुण तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना तातडीने मदत मिळण्याऐवजी 'लेखी रिपोर्ट' आणण्यास सांगण्यात आले. या कागदपत्रांच्या दिरंगाईमुळे तक्रार नोंदवण्यास संध्याकाळ झाली. जर पोलिसांनी वेळीच सीसीटीव्ही फुटेज तपासून नाकाबंदी केली असती, तर आरोपी कारसह जेरबंद झाले असते, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. सिंदी परिसरात चोऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. गेल्याच आठवड्यात पिपरा मार्गावरील गणपत बेलखोडे यांच्याही ५-६ बकऱ्या चोरीला गेल्या होत्या. चोरटे आता आलिशान गाड्यांचा वापर करत असल्याने त्यांना ओळखणे कठीण होत आहे. आलिशान कारचा वापर जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. मध्यरात्री १२:३० ते २:०० च्या दरम्यान. रात्रीची गस्त वाढवावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष देऊन आरोपींना तात्काळ अटक करावी. रात्रभर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या डोळ्यादेखत आलिशान कारमधून पशुधनाची तस्करी होतेच कशी? शहर आता सुरक्षित राहिले आहे का?
*सिंदी रेल्वे परिसरात 'लक्झरी' चोरांचा थरार* *सिंदी (रेल्वे):* वर्धा एकीकडे तंत्रज्ञान प्रगत होत असताना, चोरीच्या पद्धतीही आता हायटेक झाल्या आहेत. सिंदी रेल्वे शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, चक्क एका आलिशान कारमधून येत डबक्यांच्या कळपावर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री मोठी मस्जिद परिसरातून ५ बकऱ्या लंपास करण्यात आल्या, तर बैल चोरीचा प्रयत्न थोडक्यात फसला. मिळालेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२:५१ च्या सुमारास शहरात एक लाल रंगाची आलिशान कार दाखल झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कारमधून ४ ते ५ अज्ञात इसम खाली उतरले. मोठी मस्जिद परिसरातून शुभम निमजे यांच्या ३ बकऱ्या (किंमत ४५,००० रुपये) आणि इरफान काजी प्यारू शेख यांच्या २ बकऱ्या (किंमत ३०,००० रुपये) गाडीत कोंबून पळवून नेल्या. एकाच रात्रीत एकूण ७५ हजार रुपयांचे पशुधन लंपास करण्यात आले. त्याच रात्री या टोळीने पळसगाव मार्गावरील वसंता बावणे यांच्या गोठ्यातील दोन बैल चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र काही कारणास्तव तो प्रयत्न फसला आणि बैल वाचले. या चोरीच्या घटनेनंतर नागरिक संतापलेले आहेत. विशेष म्हणजे, पीडित तरुण तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना तातडीने मदत मिळण्याऐवजी 'लेखी रिपोर्ट' आणण्यास सांगण्यात आले. या कागदपत्रांच्या दिरंगाईमुळे तक्रार नोंदवण्यास संध्याकाळ झाली. जर पोलिसांनी वेळीच सीसीटीव्ही फुटेज तपासून नाकाबंदी केली असती, तर आरोपी कारसह जेरबंद झाले असते, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. सिंदी परिसरात चोऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. गेल्याच आठवड्यात पिपरा मार्गावरील गणपत बेलखोडे यांच्याही ५-६ बकऱ्या चोरीला गेल्या होत्या. चोरटे आता आलिशान गाड्यांचा वापर करत असल्याने त्यांना ओळखणे कठीण होत आहे. आलिशान कारचा वापर जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. मध्यरात्री १२:३० ते २:०० च्या दरम्यान. रात्रीची गस्त वाढवावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष देऊन आरोपींना तात्काळ अटक करावी. रात्रभर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या डोळ्यादेखत आलिशान कारमधून पशुधनाची तस्करी होतेच कशी? शहर आता सुरक्षित राहिले आहे का?
- User7331Wardha, Maharashtra😤on 18 March
- मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews1
- Post by धरती पुत्र4
- *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान। मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा। करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़। पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया। पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित1
- पाटोदा येथे लोक कलावंतांनी गायलेले लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस याच्या वरील एक सुंदर गित...1
- Post by RAJA news1
- पूर्व पुलिस महानिदेशक अनिल प्रथम गुजरात के साथ जयंती मे जाने का मौका मिला..2
- Post by Labour addaa.1
- रेल मंत्री जी, ज़रा इधर भी देखिए! ट्रेन के फर्श और टॉयलेट के पास सोने को मजबूर हैं लोग।" #viralreels #viralvideos #bihar #reality #mantri #worldbiharnews1