*सिंदी रेल्वे परिसरात 'लक्झरी' चोरांचा थरार* *सिंदी (रेल्वे):* वर्धा एकीकडे तंत्रज्ञान प्रगत होत असताना, चोरीच्या पद्धतीही आता हायटेक झाल्या आहेत. सिंदी रेल्वे शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, चक्क एका आलिशान कारमधून येत डबक्यांच्या कळपावर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री मोठी मस्जिद परिसरातून ५ बकऱ्या लंपास करण्यात आल्या, तर बैल चोरीचा प्रयत्न थोडक्यात फसला. मिळालेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२:५१ च्या सुमारास शहरात एक लाल रंगाची आलिशान कार दाखल झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कारमधून ४ ते ५ अज्ञात इसम खाली उतरले. मोठी मस्जिद परिसरातून शुभम निमजे यांच्या ३ बकऱ्या (किंमत ४५,००० रुपये) आणि इरफान काजी प्यारू शेख यांच्या २ बकऱ्या (किंमत ३०,००० रुपये) गाडीत कोंबून पळवून नेल्या. एकाच रात्रीत एकूण ७५ हजार रुपयांचे पशुधन लंपास करण्यात आले. त्याच रात्री या टोळीने पळसगाव मार्गावरील वसंता बावणे यांच्या गोठ्यातील दोन बैल चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र काही कारणास्तव तो प्रयत्न फसला आणि बैल वाचले. या चोरीच्या घटनेनंतर नागरिक संतापलेले आहेत. विशेष म्हणजे, पीडित तरुण तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना तातडीने मदत मिळण्याऐवजी 'लेखी रिपोर्ट' आणण्यास सांगण्यात आले. या कागदपत्रांच्या दिरंगाईमुळे तक्रार नोंदवण्यास संध्याकाळ झाली. जर पोलिसांनी वेळीच सीसीटीव्ही फुटेज तपासून नाकाबंदी केली असती, तर आरोपी कारसह जेरबंद झाले असते, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. सिंदी परिसरात चोऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. गेल्याच आठवड्यात पिपरा मार्गावरील गणपत बेलखोडे यांच्याही ५-६ बकऱ्या चोरीला गेल्या होत्या. चोरटे आता आलिशान गाड्यांचा वापर करत असल्याने त्यांना ओळखणे कठीण होत आहे. आलिशान कारचा वापर जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. मध्यरात्री १२:३० ते २:०० च्या दरम्यान. रात्रीची गस्त वाढवावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष देऊन आरोपींना तात्काळ अटक करावी. रात्रभर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या डोळ्यादेखत आलिशान कारमधून पशुधनाची तस्करी होतेच कशी? शहर आता सुरक्षित राहिले आहे का?
*सिंदी रेल्वे परिसरात 'लक्झरी' चोरांचा थरार* *सिंदी (रेल्वे):* वर्धा एकीकडे तंत्रज्ञान प्रगत होत असताना, चोरीच्या पद्धतीही आता हायटेक झाल्या आहेत. सिंदी रेल्वे शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, चक्क एका आलिशान कारमधून येत डबक्यांच्या कळपावर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री मोठी मस्जिद परिसरातून ५ बकऱ्या लंपास करण्यात आल्या, तर बैल चोरीचा प्रयत्न थोडक्यात फसला. मिळालेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२:५१ च्या सुमारास शहरात एक लाल रंगाची आलिशान कार दाखल झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कारमधून ४ ते ५ अज्ञात इसम खाली उतरले. मोठी मस्जिद परिसरातून शुभम निमजे यांच्या ३ बकऱ्या (किंमत ४५,००० रुपये) आणि इरफान काजी प्यारू शेख यांच्या २ बकऱ्या (किंमत ३०,००० रुपये) गाडीत कोंबून पळवून नेल्या. एकाच रात्रीत एकूण ७५ हजार रुपयांचे पशुधन लंपास करण्यात आले. त्याच रात्री या टोळीने पळसगाव मार्गावरील वसंता बावणे यांच्या गोठ्यातील दोन बैल चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र काही कारणास्तव तो प्रयत्न फसला आणि बैल वाचले. या चोरीच्या घटनेनंतर नागरिक संतापलेले आहेत. विशेष म्हणजे, पीडित तरुण तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना तातडीने मदत मिळण्याऐवजी 'लेखी रिपोर्ट' आणण्यास सांगण्यात आले. या कागदपत्रांच्या दिरंगाईमुळे तक्रार नोंदवण्यास संध्याकाळ झाली. जर पोलिसांनी वेळीच सीसीटीव्ही फुटेज तपासून नाकाबंदी केली असती, तर आरोपी कारसह जेरबंद झाले असते, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. सिंदी परिसरात चोऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. गेल्याच आठवड्यात पिपरा मार्गावरील गणपत बेलखोडे यांच्याही ५-६ बकऱ्या चोरीला गेल्या होत्या. चोरटे आता आलिशान गाड्यांचा वापर करत असल्याने त्यांना ओळखणे कठीण होत आहे. आलिशान कारचा वापर जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. मध्यरात्री १२:३० ते २:०० च्या दरम्यान. रात्रीची गस्त वाढवावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष देऊन आरोपींना तात्काळ अटक करावी. रात्रभर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या डोळ्यादेखत आलिशान कारमधून पशुधनाची तस्करी होतेच कशी? शहर आता सुरक्षित राहिले आहे का?
- आरोग्य सुविधांसाठी आमदार समीर कुणावार यांची धडपड; मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक हिंगणघाटः वर्धा हिंगणघाट तालुक्यातील मौजा शेकापूर (बाई) तसेच समुद्रपूर तालुक्यातील कांढळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला गती देणे आणि सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालयाच्या स्थापनेबाबत निर्णय प्रक्रियेला चालना देण्यासाठी विधानसभेचे आमदार समीर कुणावार यांच्या विशेष प्रयत्नातून शासनस्तरावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आमदार कुणावार यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. या संदर्भात दिनांक ११ मार्च रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या दालनात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये संचालक (आरोग्य सेवा – रुग्णालये) मुंबई, उपसचिव – सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, सहसंचालक (रुग्णालये) आरोग्य सेवा, सहसंचालक (प्राथमिक आरोग्य केंद्र) आरोग्य सेवा, उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर परिमंडळ, जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा, जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा तसेच इतर संबंधित अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान शेकापूर (बाई) व कांढळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार समीर कुणावार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रस्तावातील आवश्यक बाबींचा आढावा घेत अंतिम मंजुरीच्या दिशेने सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. तसेच सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावावरही सकारात्मक चर्चा झाली असून या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. सध्या शेकापूर (बाई), कांढळी व आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवांसाठी दूरवर जावे लागत असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या भागात तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणे अत्यंत आवश्यक असल्याची बाब आमदार समीर कुणावार यांनी बैठकीत अधोरेखित केली. त्याचप्रमाणे सिंदी (रेल्वे) येथे प्रस्तावित ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यास परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना तातडीची व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले. प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर शेकापूर (बाई), कांढळी तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना तपासणी, उपचार आणि विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ गावाजवळच मिळणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या प्रस्तावांना आता सकारात्मक दिशा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.1
- वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?" #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।1
- sourav plumber Roy 83486438921
- ಹಾನಗಲ್. ಸತತ 6 ವರ್ಷಗಳ ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಪಯಣ. ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಪ್ರಕಾಶಗೌಡ ಹಾಗೂ ಅವರ ಬಳಗದ ವತಿಯಿಂದ ಸಾಯಿಬಾಬಾ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತೆರಳಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿವುದರೊಂದಿಗೆ ಡಿಸಿಎಂ.ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು.1
- Post by Pitam Parjapati4
- सरकारने आम्हाला सिलेंडरचा नियोजन द्यावं कॅटरिंग असोशीएशनची मागणी वर्धा इरान आणी इजराईलच्या सुरु असलेल्या युद्ध मुळे भारतात सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे.आता या सिलेंडर तुटवड्यामुळे व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा अत्यल्प होत आल्याने कॅटरिंग व्यवायिक संकटात सापडला आहे. पुढे घेतलेले लग्न आणी इतर समारोहचे ऑर्डर कसे करायचे याची चिंता व्यावसायिकांना पडली आहे.सरकारने आम्हाला सिलेंडरच नियोजन द्यावं अशी मागणी कॅटरिंग असोशीएशन केली आहे. जिल्ह्यात कॅटरिंग व्यावसायिकांना सिलेंडरचा पुरवठा बंद केला आहे. टंचाईलामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय मात्र कॅटरिंग व्यावसायिकांनी पुढील घेतलेले ऑर्डर कसे करायचे याची चिंता त्यांना लागली आहे. सिलेंडर पुरवठादार हे पुढे दहा ते पंधरा दिवस थांबण्याचा सांगत आहे यामुळे कॅटरिंग काम बंद पडणार असल्याच्या मार्गांवर आहे. - पुढे लग्नाचे मुहूर्त आहे यात नागरिकांची पहिलेच घेतलेली ऍडव्हान्स बुकिंग मात्र आता सिलेंडरचा तुटवडा आलाय. यात कामे बंद पडल्याने मोठा आर्थिक संकट समोर ठाकलंय. मजुरांचे पगार, नागरिकांकडून घेतलेली ऍडव्हान्स रक्कम आणी कामाचे नुकसान याची चिंता आता कॅटरिंग व्यवसायिकांना सतावत आहे.1