रस्त्यावरील अतिक्रमणाने शिवनगर कॉलनीतील वाहनधारक त्रस्त झाले आहेत शिवनगर कॉलनीतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची रहिवाशांची मागणी; नगर परिषदेकडे निवेदन उदगीर( प्रतिनिधी)उदगीर शहरातील शिवनगर कॉलनी येथील मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीसह नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप करत शिवनगर कॉलनीतील रहिवाशांनी नगर परिषद प्रशासनाकडे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी तथा अध्यक्ष, नगर परिषद उदगीर यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सर्व्हे क्रमांक ३०८, प्लॉट क्रमांक २०१, दुकान क्रमांक ३-२-३७५३/१ समोरील रस्ता मंजूर लेआउटनुसार सुमारे ३० फूट रुंदीचा आहे. मात्र, संबंधित ठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन ती सध्या केवळ १७ ते १८ फूट इतकीच उरली आहे. हा रस्ता शिवनगर कॉलनीतील प्रमुख मार्ग असल्याने वाहनचालक, पादचारी तसेच परिसरातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी व गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. यामुळे संबंधित अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ता मूळ मंजूर रुंदीनुसार उपलब्ध करून द्यावा तसेच या प्रकरणात आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी शिवनगर कॉलनीतील रहिवाशांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रस्त्यावरील अतिक्रमणाने शिवनगर कॉलनीतील वाहनधारक त्रस्त झाले आहेत शिवनगर कॉलनीतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची रहिवाशांची मागणी; नगर परिषदेकडे निवेदन उदगीर( प्रतिनिधी)उदगीर शहरातील शिवनगर कॉलनी येथील मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीसह नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप करत शिवनगर कॉलनीतील रहिवाशांनी नगर परिषद प्रशासनाकडे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी तथा अध्यक्ष, नगर परिषद उदगीर यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सर्व्हे क्रमांक ३०८, प्लॉट क्रमांक २०१, दुकान क्रमांक ३-२-३७५३/१ समोरील रस्ता मंजूर लेआउटनुसार सुमारे ३० फूट रुंदीचा आहे. मात्र, संबंधित ठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन ती सध्या केवळ १७ ते १८ फूट इतकीच उरली आहे. हा रस्ता शिवनगर कॉलनीतील प्रमुख मार्ग असल्याने वाहनचालक, पादचारी तसेच परिसरातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी व गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. यामुळे संबंधित अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ता मूळ मंजूर रुंदीनुसार उपलब्ध करून द्यावा तसेच या प्रकरणात आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी शिवनगर कॉलनीतील रहिवाशांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
- मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम1
- ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.2
- 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026. लातूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील महादेवनगर आणि गरुड चौक परिसरात तब्बल 8 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज घंटागाडी दाखल झाली. नेहमी रखडणाऱ्या या सेवेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे यांनी घंटागाडीला चक्क पुष्पहार बांधून आणि कर्मचाऱ्यांना फुले देऊन 'गांधीगिरी' पद्धतीने अनोखे आंदोलन केले. लातूर जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या महादेवनगर व गरुड चौक परिसरात गेल्या 8 दिवसांपासून घंटागाडी आली नव्हती. त्यामुळे घरात साचलेला कचरा कुठे टाकायचा? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला होता. नाईलाजास्तव काही नागरिकांना खुल्या जागेत व रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथीचे आजार व रोगराई पसरण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात होती. तब्बल आठ दिवसांनंतर आज परिसरात घंटागाडी येताच सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे व स्थानिक नागरिकांनी घंटागाडी चालकाचे स्वागत केले. गाडीला पुष्पहार घालून आणि चालकाला पुष्प देऊन प्रशासनाचा उपरोधिक निषेध नोंदवण्यात आला. "गेल्या 8 दिवसांपासून परिसरात घंटागाडी न आल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले होते. कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या भागात रोजच्या रोज नियमित वेळात घंटागाडी पाठवावी." यावेळी नागरिकांनी दररोज नियमितपणे परिसरात घंटागाडी पाठवून कचरा संकलन करण्याची आग्रही मागणी दीपक गंगणे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. या अनोख्या 'गांधीगिरी' आंदोलनाची सध्या संपूर्ण प्रभागात चर्चा रंगली आहे.1
- लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी1
- महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.1
- पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi1
- भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा2