Shuru
Apke Nagar Ki App…
पिशोर में बिजली गिरने से 3 महिलाओं की मौत, 3 गंभीर। हर्षवर्धन जाधव ने घटना पर दुख हर्षवर्धन जाधव ने घटना पर दुख जताया #AQSNEWS #KannadNews #PishorNews #ChhatrapatiSambhajinagar #AQSNewsDigital#anisqureshisillod #sillod
Anis qureshi sillod
पिशोर में बिजली गिरने से 3 महिलाओं की मौत, 3 गंभीर। हर्षवर्धन जाधव ने घटना पर दुख हर्षवर्धन जाधव ने घटना पर दुख जताया #AQSNEWS #KannadNews #PishorNews #ChhatrapatiSambhajinagar #AQSNewsDigital#anisqureshisillod #sillod
More news from महाराष्ट्र and nearby areas
- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टाकलेला कचरा ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला स्वच्छ तालुक्यातील भवन ग्रामपंचायत च्या वतीने छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावरील कचरा स्वच्छ करण्यात आला सदरील कचरा भवन ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छ करण्यात आला1
- भोकरदन नगरपरिषदेचे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण ६७ वर्षीय अंध माता शशिकलाबाई जोगदंडे यांच्या हस्ते संपन्न स्वत च्या राहत्या घराची जागा बौद्ध विहारासाठी दान करणाऱ्या मातेचा नगरपरिषदेकडून सन्मान भोकरदन इसरारखान पठाण आज १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त भोकरदन नगरपरिषद कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक दिनाचे ध्वजारोहण शहरातील त्यागाची मूर्ती असलेल्या ६७ वर्षीय अंध माता शशिकलाबाई उत्तम जोगदंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या बाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे आणि नगराध्यक्षा सौ. समरीन मिर्झा यांनी १९ ऑगस्ट रोजीच घोषणा केली होती की, यंदाचा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा ध्वज शशिकलाबाई जोगदंडे यांच्या हस्ते फडकवण्यात येईल. त्या घोषणेनुसार आज सकाळी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शशिकलाबाईंच्या हस्ते ध्वज फडकवताना संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्ती आणि अभिमानाचे वातावरण होते. फुलेनगर धनगरवाडी येथील रहिवासी असलेल्या शशिकलाबाई या दोन्ही डोळ्यांनी अंध असून स्नेहनगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा दीपक उत्तम जोगदंडे याचे काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले, त्यानंतर पती उत्तम जोगदंडे यांचेही निधन झाले. एकट्या पडलेल्या या मातेने खचून न जाता मुलाच्या स्मृतीस अनोखी श्रद्धांजली देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वत राहते घर पाडून त्या जागेवर बुद्धविहार उभारण्याचा आणि आपल्या मालकीची सुमारे ५० लाख रुपये किंमतीची दोन गुंठे जागा समाजासाठी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मंगळवार दि. १९ ऑगस्ट रोजी त्यांनी भोकरदन नगर परिषद कार्यालयात येऊन मुख्याधिकारी गजानन तायडे आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा समरीन नाज वसीम बेग मिर्झा यांची भेट घेऊन दोन गुंठे जागेचे ७/१२ उतारे व ५०० रुपयांच्या बॉन्डवर केलेले दानपत्र नगरपरिषदेकडे सुपूर्द केले होते. आईच्या ममतेतून आणि मुलाच्या स्मृतीतून साकारलेले हे बुद्धविहार हे मातृत्व, त्याग आणि दानशूरपणाचे अनोखे उदाहरण ठरले आहे. स्वत ची मौल्यवान मालमत्ता समाजासाठी दान करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल नगर परिषदेने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला होता. समाजासाठी आपल्या आयुष्याची आणि संपत्तीची मोठी आहुती देणाऱ्या शशिकलाबाईंचा गौरव म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष कर्तृत्ववान दानशूर अशा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांचा गौरव करण्याची परंपरा या माध्यमातून अधोरेखित होणार आहे. नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार जोगदंडे ताईंनी स्वत च्या जागेवर बौद्ध विहार बांधून ते नगरपालिकेला दान केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला असून त्यांच्या कार्याचे शहरातून सर्व स्तरातून स्वागत होत आहे.1
- ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत देशभक्तीपर वातावरणात हुतात्म्यांना अभिवादन फुलंब्री प्रतिनिधी : भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा तब्बल १३ महिने निजामाच्या जुलमी राजवटीखाली होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील मुक्ती चळवळ, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खंबीर भूमिकेमुळे आणि भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन पोलो' लष्करी कारवाईनंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाड्याची निजामाच्या राजवटीतून मुक्तता झाली. त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ रिधोरा येथे मराठवाडा मुक्तीदिन उत्साहात साजरा करण्यात आला.सुट्टी वर आलेले सैनिक यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आजी सैनिक अर्जुन कोलते व संतोष शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच अश्विनी कोलते, ग्रामपंचायत सदस्य शरद कोलते , बाळू घागरे, अनिल देशमुख, अंगणवाडी सेविका व कर्मचारी , आशा सेविका, शिक्षक खरात सर, कासार मॅडम , पोलीस पाटील गजानन कोलते,कय्युम पठाण,राजू बंडूगे, रमेश कोलते, भाऊसाहेब शिंदे, सुनील शिंदे, बद्रीनाथ कोलते,विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या कार्याचे स्मरण करून देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात पार पडला.4
- सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध ठिकाणी उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, वर्धिनी केंद्र तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाला अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उस्मान तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस जमादार व अंमलदार, माजी सैनिक, पत्रकार मंडळी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावळदबारा वर्धिनी केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक तसेच गावातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.1
- दररोज व्यायाम करा, निरोगी आणि आनंदी जीवन जगा!आजच कॉल करा1
- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहरांमध्ये मुख्यमंत्री... छत्रपती संभाजीनगर: शहरांमध्ये आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यामुळे नागरिकांचे हाल शहरातील व्हीआयपी रोडची ट्राफिक जाम चोही बाजूने रस्ते बंद करण्यात आले होते1
- छत्रपती संभाजीनगर - वीज पडून मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट - कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा येथे शेतात काम करताना वीज पडून दोन महिलांसह एका तरुणीचा झाला आहे मृत्यू. - मंत्री संजय शिरसाट यांनी कुटुंबीयांचं सांत्वन करत दिला धीर छत्रपती संभाजीनगर - वीज पडून मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट - कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा येथे शेतात काम करताना वीज पडून दोन महिलांसह एका तरुणीचा झाला आहे मृत्यू. - मंत्री संजय शिरसाट यांनी कुटुंबीयांचं सांत्वन करत दिला धीर - प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्याची घेतली माहिती - Anc : छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा येथे शेतात काम करत असताना वीज पडून दोन महिलांसह एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी शिरसाट यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. नियतीपुढे कुणाचं काही चालत नाही, अशा शब्दांत त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत या दुःखाच्या प्रसंगी शासन आणि प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. दरम्यान, या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्याचीही पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माहिती घेतली. कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.2
- बीड - पुणे रेल्वे सेवेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते शुभारंभ1
- अल्लामा इक्बाल शाळेतील कथित गैरप्रकारांविरोधात जिल्हा परिषदेसमोर इम्रान खान यांचे आमरण उपोषण!.. शिक्षक भरतीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा; शिक्षण विभागाच्या दिरंगाईविरोधात संताप; अल्लामा इक्बाल शाळेच्या चौकशीसाठी उपोषण!.. अल्लामा इक्बाल शाळेतील कथित गैरप्रकारांविरोधात जिल्हा परिषदेसमोर इम्रान खान यांचे आमरण उपोषण!.. शिक्षक भरतीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा; शिक्षण विभागाच्या दिरंगाईविरोधात संताप; अल्लामा इक्बाल शाळेच्या चौकशीसाठी उपोषण!.. तीन नोटिसा, तरीही चौकशीचा अहवाल नाही! अल्लामा इक्बाल शाळेच्या प्रकरणात जिल्हा परिषदेसमोर उपोषण.. शिक्षण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर नगरसेवक इमरान अमानुल्ला खान यांचे उपोषण स्थगित.. जालना : जुना जालना येथील अल्लामा इक्बाल उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कथित शिक्षक भरतीतील गैरप्रकार तसेच मुख्याध्यापक व व्यवस्थापनाच्या कथित गैरकारभाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जमियत उल मुस्लिमीन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य इम्रान खान अमानुल्ला खान यांनी जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी यापूर्वी 19 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद जालना यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. शाळेतील शिक्षकांची कथित बेकायदेशीर भरती तसेच इतर प्रशासकीय अनियमिततेबाबत पुरावे व माहितीही सादर केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.1