Shuru
Apke Nagar Ki App…
परभणी जिल्हयातील नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा-- जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
Jafar tarodekar
परभणी जिल्हयातील नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा-- जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Jafar tarodekar1
- शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार ग्रामपंचायत अधिकारी यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक असताना अनेक अधिकारी ना मुख्यालयी वास्तव्यास आहेत, ना स्वतःच्या ग्रामपंचायतीत वेळेवर हजर असतात. यामुळे सामान्य नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. मंगरूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अंबुलगे यांच्याकडे मंगरूळ व वांजुळा पुनर्वसन अशा दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणीमध्ये त्या दोन्ही ठिकाणी अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. पंचायत समितीमध्ये चौकशी केली असता त्या रजेवरही नसल्याचे समोर आले. म्हणजेच रजेवर नाहीत, ग्रामपंचायतीत नाहीत, मुख्यालयी वास्तव्यास नाहीत, मग नेमके अधिकारी कुठे आहेत? ग्रामपंचायतचे दप्तर गावात नसून तालुक्याच्या ठिकाणी ठेवले जाते, ग्रामस्थांना वेळेवर सेवा मिळत नाही, आणि प्रशासन कागदोपत्रीच चालते हीच आजची खरी परिस्थिती आहे. संभाजी ब्रिगेड मंठा याचा तीव्र निषेध करते आणि संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर तात्काळ विभागीय चौकशी, पगार कपात, शिस्तभंग कारवाई आणि संपूर्ण तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याची ठाम मागणी करते. गावकऱ्यांचा हक्क हिरावणाऱ्यांना आता जाब द्यावाच लागेल. संभाजी ब्रिगेड अन्याय सहन करणार नाही. जय जिजाऊ! जय शिवराय! जय संविधान! प्रयत्न आज करण्यात आला. शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार ग्रामपंचायत अधिकारी यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक असताना अनेक अधिकारी ना मुख्यालयी वास्तव्यास आहेत, ना स्वतःच्या ग्रामपंचायतीत वेळेवर हजर असतात. यामुळे सामान्य नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. मंगरूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अंबुलगे यांच्याकडे मंगरूळ व वांजुळा पुनर्वसन अशा दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणीमध्ये त्या दोन्ही ठिकाणी अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. पंचायत समितीमध्ये चौकशी केली असता त्या रजेवरही नसल्याचे समोर आले. म्हणजेच रजेवर नाहीत, ग्रामपंचायतीत नाहीत, मुख्यालयी वास्तव्यास नाहीत, मग नेमके अधिकारी कुठे आहेत? ग्रामपंचायतचे दप्तर गावात नसून तालुक्याच्या ठिकाणी ठेवले जाते, ग्रामस्थांना वेळेवर सेवा मिळत नाही, आणि प्रशासन कागदोपत्रीच चालते हीच आजची खरी परिस्थिती आहे. संभाजी ब्रिगेड मंठा याचा तीव्र निषेध करते आणि संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर तात्काळ विभागीय चौकशी, पगार कपात, शिस्तभंग कारवाई आणि संपूर्ण तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याची ठाम मागणी करते. गावकऱ्यांचा हक्क हिरावणाऱ्यांना आता जाब द्यावाच लागेल. संभाजी ब्रिगेड अन्याय सहन करणार नाही. जय जिजाऊ! जय शिवराय! जय संविधान!1
- Post by Karan1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळून १५ ठार, अनेक जखमी; बघा भयानक व्हिडिओ ! उधमपूर जिल्ह्यात सोमवारी (दि. २० एप्रिल २०२६) सकाळी प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत किमान १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.1
- नांदेड /महाराष्ट्र ब्युरो अरविंद जाधव यांचा रिपोर्ट हदगाव तालुक्यातील मौजे टाकराळा येथील एका शेतकऱ्यांनी महिंद्रा नोवा कंपनीचे ट्रॅक्टर 19 महिन्यापूर्वी खरेदी केले होते. सदरील ट्रॅक्टर शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून ऊस वाहतुकीसाठी घेतले होते 19 महिने ट्रॅक्टर सुरळीत चालल्यानंतर त्यांना ट्रॅक्टरच्या क्लच प्लेटमध्ये प्रॉब्लेम वाटत होता सदरील ट्रॅक्टर वारंटी मध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्या ट्रॅक्टरला दुरुस्तीसाठी महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीच्या शोरूम ला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन गेले वारंटी मध्ये असतानाही कंपनी म्हणते ते ट्रॅक्टरचे काही पार्ट वॉरंटी मध्ये असतात आणि काही नाही त्यामुळे सदरील शेतकरी हतास झाला. महेंद्र कंपनीच्या मॅनेजर कडे वारंवार विनंती करून देखील महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स न देता पूर्व उडवा उडवीचीच उत्तरे दिली. ट्रॅक्टर खरेदी करते वेळेस कंपनीच्या डीलरने सदरील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करण्याचा सल्ला दिला त्यामुळे शेतकऱ्याने त्याच कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी केले परंतु ज्या वेळेस ट्रॅक्टर मध्ये तांत्रिक प्रॉब्लेम उद्भवला त्यावेळेस मात्र महिंद्रा कंपनीने आपले हात वर केले सदरील शेतकऱ्यांनी न्यायासाठी वंदे भारत टीव्ही चॅनलचे ब्युरो अरविंद जाधव यांच्याकडे चॅनलच्या माध्यमातून न्यायाची मागणी केली असता आमचे ब्युरो अरविंद जाधव यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची बाजू ऐकल्यानंतर महिंद्रा कंपनीचे हादगाव येथील मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला असता ते काय म्हणाले ते पहा4
- क्षितिज पुरम” की GRAND OPENING : Skyline Builders & Developers का भव्य प्रोजेक्ट लॉन्च1
- गॅसवर स्वयंपाक का केला ? आशा किरकोळ वादातून आईसह दोन चिमुकल्यांची आत्महत्या.... लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे धक्कादायक घटना.... सासू-सुनेच्या वादाने घेतलं भीषण रूप.....1
- Post by Nandkumar Motiram Totewad1