logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेड शहरात अज्ञात कारणावरून हत्यासत्र सुरूच असून, मध्यरात्रीच्या सुमारास एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेख शमीम शेख इसाक (वय ४२ वर्षे) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजताच्या सुमारास शेख शमीम शेख इसाक हे एका मित्रासोबत वाघी रस्त्यावरील पान टपरी जवळील ओट्ट्यावर बसले असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ येऊन परिसरातील दर्ग्याचा पत्ता विचारला. शेख शमीम शेख इसाक पत्ता सांगत असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर धारदार शस्त्राने अनेक वार केले. गंभीर जखमी झालेल्या इसाक यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. गोळीबार झालेल्या ठिकाणी रिकामी काडतूसे सापडल्याचेही सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक रामेश्वर व्यंजने, पोलीस निरीक्षक अजित कुंभार, अतुल भोसले तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा पंचनामा केला असून, या हत्येमागे नेमके कोणते कारण आहे, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलीस आरोपींचा शोध तात्काळ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. नांदेड शहरात आधी गोळ्या झाडून नंतर धारदार शस्त्राने वार करण्याच्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

5 hrs ago
user_जयपाल चांदोबा दावनगीरकर
जयपाल चांदोबा दावनगीरकर
Social worker देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
5 hrs ago
2b79c7ce-8520-4a7c-8c7c-53b29c494a92

नांदेड शहरात अज्ञात कारणावरून हत्यासत्र सुरूच असून, मध्यरात्रीच्या सुमारास एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेख शमीम शेख इसाक (वय ४२ वर्षे) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजताच्या सुमारास शेख शमीम शेख इसाक हे एका मित्रासोबत वाघी रस्त्यावरील पान टपरी जवळील ओट्ट्यावर बसले असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ येऊन परिसरातील दर्ग्याचा पत्ता विचारला. शेख शमीम शेख इसाक पत्ता सांगत असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर धारदार शस्त्राने अनेक वार केले. गंभीर जखमी झालेल्या इसाक यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. गोळीबार झालेल्या ठिकाणी रिकामी काडतूसे सापडल्याचेही सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक रामेश्वर व्यंजने, पोलीस निरीक्षक अजित कुंभार, अतुल भोसले तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा पंचनामा केला असून, या हत्येमागे नेमके कोणते कारण आहे, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलीस आरोपींचा शोध तात्काळ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. नांदेड शहरात आधी गोळ्या झाडून नंतर धारदार शस्त्राने वार करण्याच्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • उदगीर शहरासह आसपासच्या परिसरात शुक्रवार, २० जून रोजी अचानक हवामानात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाने हजेरी लावली. दिवसभरातील उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. सायंकाळच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि त्यानंतर वाऱ्याचा वेग वाढून हलका पाऊस सुरू झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानातही घट झाली आहे. शेतकरी वर्गाने या पावसाचे स्वागत केले आहे, तसेच आगामी पेरणीसाठी चांगल्या पावसाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. उदगीर शहर आणि परिसरातील लोकांना या पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
    1
    उदगीर शहरासह आसपासच्या परिसरात शुक्रवार, २० जून रोजी अचानक हवामानात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाने हजेरी लावली. दिवसभरातील उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. सायंकाळच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि त्यानंतर वाऱ्याचा वेग वाढून हलका पाऊस सुरू झाला.

या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानातही घट झाली आहे. शेतकरी वर्गाने या पावसाचे स्वागत केले आहे, तसेच आगामी पेरणीसाठी चांगल्या पावसाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. उदगीर शहर आणि परिसरातील लोकांना या पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
    user_संग्राम पवार विक्रांत न्युज
    संग्राम पवार विक्रांत न्युज
    Press advisory उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • लातूर शहरात कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा दिसून आली आहे, जिथे बार्शी रोडवरील वसवाडी परिसरात एका महिला आणि एका लहान मुलाला कोयत्याने व दगडाने मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    1
    लातूर शहरात कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा दिसून आली आहे, जिथे बार्शी रोडवरील वसवाडी परिसरात एका महिला आणि एका लहान मुलाला कोयत्याने व दगडाने मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पुणे जिल्ह्यामध्ये जगातील एकमेव आणि नंबर वन जिल्हा परिषद शाळा असल्याचे वृत्त आहे.
    1
    पुणे जिल्ह्यामध्ये जगातील एकमेव आणि नंबर वन जिल्हा परिषद शाळा असल्याचे वृत्त आहे.
    user_SANDEEP
    SANDEEP
    TV News Anchor देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) उदगीर शहरात सुरळीत, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासन आणि पोलीस विभागाकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय आणि लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय या दोन परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परीक्षा केंद्रांच्या परिसरात कोणत्याही प्रकारची गर्दी, गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशांनुसार, परीक्षा केंद्राच्या निश्चित परिघात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी आहे, तसेच संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. परीक्षार्थींना ओळखपत्रे व प्रवेशपत्रांची काटेकोर तपासणी केल्यानंतरच केंद्रात प्रवेश दिला जाईल. मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर प्रतिबंधित साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे. केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख केली जात असून, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग आणि पोलीस यंत्रणा यांच्यात समन्वय साधून परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही. परीक्षार्थी व पालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली नीट परीक्षा निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात आयोजित करण्यासाठी उदगीर प्रशासन सज्ज असून, शहरात शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात आले आहे.
    1
    राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) उदगीर शहरात सुरळीत, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासन आणि पोलीस विभागाकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय आणि लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय या दोन परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

परीक्षा केंद्रांच्या परिसरात कोणत्याही प्रकारची गर्दी, गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशांनुसार, परीक्षा केंद्राच्या निश्चित परिघात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी आहे, तसेच संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. परीक्षार्थींना ओळखपत्रे व प्रवेशपत्रांची काटेकोर तपासणी केल्यानंतरच केंद्रात प्रवेश दिला जाईल. मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर प्रतिबंधित साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे. केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख केली जात असून, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग आणि पोलीस यंत्रणा यांच्यात समन्वय साधून परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही. परीक्षार्थी व पालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली नीट परीक्षा निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात आयोजित करण्यासाठी उदगीर प्रशासन सज्ज असून, शहरात शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात आले आहे.
    user_संग्राम पवार विक्रांत न्युज
    संग्राम पवार विक्रांत न्युज
    Press advisory उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथे एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यशवाडी येथील मारुती मंदिराच्या सभामंडपाचा काही भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेमुळे अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सध्या या घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या दुर्घटनेतील बाधित नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळो व सर्वजण सुरक्षित राहोत, अशी प्रार्थना केली जात आहे.
    1
    परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथे एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यशवाडी येथील मारुती मंदिराच्या सभामंडपाचा काही भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेमुळे अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सध्या या घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

या दुर्घटनेतील बाधित नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळो व सर्वजण सुरक्षित राहोत, अशी प्रार्थना केली जात आहे.
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.