logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

"गोदा ते नर्मदा" जलयात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिमाखदार शुभारंभ; जलसंवर्धनाचा जागर करत अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना नदीजोड प्रकल्पच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोदावरी निर्मळ आणि अविरल करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही ​नाशिक, दि. २५ एप्रिल -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भव्य शुभारंभ झाला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अहिल्यादेवींचे विचार, वारसा आणि विकास हा त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. कार्यक्रमाला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, इंदूर संस्थानचे श्रीमंत युवराज महाराज यशवंतराव होळकर, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, वेदात नदीचे महात्म्य वर्णन केले असून नदीला आई मानले आहे. नदी स्तुतीसुक्तात ऋषींमुनींनी नदीच्या उपयुक्ततेचे वर्णन केले आहे. वारशाचे संवर्धन आणि विकास याचा समन्वय देशाच्या उज्वल भवितव्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच अहिल्यादेवींच्या विचाराच्या आधारे भविष्यातील विकासाची दिशा दाखविण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेशासाठी महत्वाची असल्याने ती बारमाही प्रवाहित राहावी यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जलव्यवस्थापनातील योगदानाचे स्मरण केले. ते म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी घाट, बारव यांची निर्मिती करतांना अध्यात्मिकता आणि उपयुक्तता याचा समन्वय साधला. पाण्याचे महत्व लक्षात घेऊन जलव्यवस्थापनावर भर दिला. त्यांनी निर्माण केलेले बारव आजही सुस्थितीत असून त्याचे संवर्धन राज्य शासन करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अहिल्यादेवी होळकर यांनी नद्यांचे महत्व जाणले आणि नदी प्रदूषण रोखण्याचे प्रयत्न केले. महिला, गरीब आदिवासीना समाजाच्या मुख्य धारेत आणण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांचे विचार आजही महत्वाचे आणि मार्गदर्शक असून छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांच्या आधारेच शाश्वत विकास साधता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, त्र्यंबकेश्वर आणि चौँडी येथून दोन यात्रा सुरू होत असून मध्य प्रदेशातील माहेश्वर येथे नर्मदातीरी समारोप होणार आहे. राज्यातील ३० नदीखोऱ्यांतील पाणी कलशांच्या माध्यमातून नर्मदेला अर्पण करण्यात येईल. गोदावरी आणि नर्मदेचे महात्म्य लक्षात घेऊन आणि विचार, वारसा आणि विकास ही त्रिसुत्री घेऊन यात्रेच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलेले जलसंवर्धनाचे कार्य जनतेत रुजविण्याचा प्रयत्न या यात्रेद्वारे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी या यात्रेत सहकार्य करावे असे आवाहनही श्री. विखे पाटील यांनी केले. आण्णासाहेब मोरे म्हणाले, जलसाक्षरतेचे विचार सेवेकऱ्यांमार्फत पोहोचविण्यात येत आहेत. गुरुपिठाच्या माध्यमातून नदी स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशाच्या विकासासाठी थोरामोठांचे विचार भारतभर पोहोचविण्याचे काम करावे लागतील. संस्कृती, संस्कार केले तर देश बलशाली आणि विकसित होईल. नवीन पिढीने निर्व्यसनी राहून देशाचे संस्कारदूत बनावे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या आगमनाने कुंभमेळ्याच्या कामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करून कुंभमेळ्यात गर्दीचे नियोजनाबाबत त्यांनी सूचना केल्या. युवराज होळकर म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी जलव्यवस्थापनाची सुरुवात नर्मदा येथे केली. जलसाक्षरता आणि जलव्यवस्थापन ही काळाची गरज आहे. गोदावरी आणि नर्मदेला जोडून 'एक भारत श्रेष्ठ भारत'चा संदेश दिला जाणार आहे. गोदावरी महाराष्ट्राची तर नर्मदा मध्यप्रदेशची जीवनधारा आहे. जन्मभूमी ते कर्मभूमी जलयात्रेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. अहिल्यादेवींनी सुरू केलेली फड पद्धती उपयुक्त असून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते कुशावर्तातील जलकलश मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला आणि राज्यातील ३० नदीखोऱ्यांतील पाणी कलशांच्या माध्यमातून आणून त्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. केदार कंठशिखर वयाच्या सहाव्या वर्षी सर करणाऱ्या चिमुकल्या मनकर्णिका देशपांडे हिचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. 'गोदा ते नर्मदा जलयात्रा २०२६' या गीताचे विमोचन आणि उन्नत नाशिक अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी श्री. विखे पाटील यांनी सपत्नीक १०८ कन्यकांचे पूजन केले. कार्यक्रमाला माजी मंत्री रवींद्र चव्हाण, सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, राहुल आहेर, सीमा हिरे, देवयानी फरांदे, हिरामण खोसकर, दिलीप बनकर, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, मंत्री विखे पाटील यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, ह.भ.प.संजय नाना धोंगडे, महंत उद्धव महाराज मंडलिक, मंदाकिनी मोरे, महामंडलेश्वर रामचंद्रदास मोरे, उपमहापौर विलास शिंदे आदी उपस्थित होते. 'जल व्यवस्थापन कृती पंधरवड्या' अंतर्गत आयोजित या जलयात्रेचा मुख्य उद्देश राज्यातील जलस्त्रोतांबाबत जनजागृती करणे, लोकसहभाग वाढवणे आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाची संकल्पना अधिक बळकट करणे हा आहे. ही जलयात्रा २५ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. ​यात्रेत सुमारे ५०० जलयात्री, वारकरी आणि तरुण सहभागी झाले आहेत. जलयात्रेचा प्रवास असा राहील- ​२५ एप्रिल: त्र्यंबकेश्वर ते संगमनेर (मुक्काम: संगमनेर). ​२६ एप्रिल: संगमनेरमार्गे शिर्डी (मुक्काम: शिर्डी). ​२७ एप्रिल: कोपरगाव, वैजापूर, संभाजीनगर, घृष्णेश्वर (मुक्काम: घृष्णेश्वर). ​२८ एप्रिल: कन्नड, चाळीसगाव, धुळे (मुक्काम: धुळे). ​२९ एप्रिल: धुळे ते महेश्वर, मध्य प्रदेश (समारोप).

15 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
15 hrs ago

"गोदा ते नर्मदा" जलयात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिमाखदार शुभारंभ; जलसंवर्धनाचा जागर करत अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना नदीजोड प्रकल्पच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोदावरी निर्मळ आणि अविरल करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही ​नाशिक, दि. २५ एप्रिल -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भव्य शुभारंभ झाला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अहिल्यादेवींचे विचार, वारसा आणि विकास हा त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. कार्यक्रमाला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, इंदूर संस्थानचे श्रीमंत युवराज महाराज यशवंतराव होळकर, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, वेदात नदीचे महात्म्य वर्णन केले असून नदीला आई मानले आहे. नदी स्तुतीसुक्तात ऋषींमुनींनी नदीच्या उपयुक्ततेचे वर्णन केले आहे. वारशाचे संवर्धन आणि विकास याचा समन्वय देशाच्या उज्वल भवितव्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच अहिल्यादेवींच्या विचाराच्या आधारे भविष्यातील विकासाची दिशा दाखविण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेशासाठी महत्वाची असल्याने ती बारमाही प्रवाहित राहावी यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जलव्यवस्थापनातील योगदानाचे स्मरण केले. ते म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी घाट, बारव यांची निर्मिती करतांना अध्यात्मिकता आणि उपयुक्तता याचा समन्वय साधला. पाण्याचे महत्व लक्षात घेऊन जलव्यवस्थापनावर भर दिला. त्यांनी निर्माण केलेले बारव आजही सुस्थितीत असून त्याचे संवर्धन राज्य शासन करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अहिल्यादेवी होळकर यांनी नद्यांचे महत्व जाणले आणि नदी प्रदूषण रोखण्याचे प्रयत्न केले. महिला, गरीब आदिवासीना समाजाच्या मुख्य धारेत आणण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांचे विचार आजही महत्वाचे आणि मार्गदर्शक असून छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांच्या आधारेच शाश्वत विकास साधता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, त्र्यंबकेश्वर आणि चौँडी येथून दोन यात्रा सुरू होत असून मध्य प्रदेशातील माहेश्वर येथे नर्मदातीरी समारोप होणार आहे. राज्यातील ३० नदीखोऱ्यांतील पाणी कलशांच्या माध्यमातून नर्मदेला अर्पण करण्यात येईल. गोदावरी आणि नर्मदेचे महात्म्य लक्षात घेऊन आणि विचार, वारसा आणि विकास ही त्रिसुत्री घेऊन यात्रेच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलेले जलसंवर्धनाचे कार्य जनतेत रुजविण्याचा प्रयत्न या यात्रेद्वारे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी या यात्रेत सहकार्य करावे असे आवाहनही श्री. विखे पाटील यांनी केले. आण्णासाहेब मोरे म्हणाले, जलसाक्षरतेचे विचार सेवेकऱ्यांमार्फत पोहोचविण्यात येत आहेत. गुरुपिठाच्या माध्यमातून नदी स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशाच्या विकासासाठी थोरामोठांचे विचार भारतभर पोहोचविण्याचे काम करावे लागतील. संस्कृती, संस्कार केले तर देश बलशाली आणि विकसित होईल. नवीन पिढीने निर्व्यसनी राहून देशाचे संस्कारदूत बनावे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या आगमनाने कुंभमेळ्याच्या कामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करून कुंभमेळ्यात गर्दीचे नियोजनाबाबत त्यांनी सूचना केल्या. युवराज होळकर म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी जलव्यवस्थापनाची सुरुवात नर्मदा येथे केली. जलसाक्षरता आणि जलव्यवस्थापन ही काळाची गरज आहे. गोदावरी आणि नर्मदेला जोडून 'एक भारत श्रेष्ठ भारत'चा संदेश दिला जाणार आहे. गोदावरी महाराष्ट्राची तर नर्मदा मध्यप्रदेशची जीवनधारा आहे. जन्मभूमी ते कर्मभूमी जलयात्रेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. अहिल्यादेवींनी सुरू केलेली फड पद्धती उपयुक्त असून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते कुशावर्तातील जलकलश मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला आणि राज्यातील ३० नदीखोऱ्यांतील पाणी कलशांच्या माध्यमातून आणून त्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. केदार कंठशिखर वयाच्या सहाव्या वर्षी सर करणाऱ्या चिमुकल्या मनकर्णिका देशपांडे हिचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. 'गोदा ते नर्मदा जलयात्रा २०२६' या गीताचे विमोचन आणि उन्नत नाशिक अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी श्री. विखे पाटील यांनी सपत्नीक १०८ कन्यकांचे पूजन केले. कार्यक्रमाला माजी मंत्री रवींद्र चव्हाण, सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, राहुल आहेर, सीमा हिरे, देवयानी फरांदे, हिरामण खोसकर, दिलीप बनकर, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, मंत्री विखे पाटील यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, ह.भ.प.संजय नाना धोंगडे, महंत उद्धव महाराज मंडलिक, मंदाकिनी मोरे, महामंडलेश्वर रामचंद्रदास मोरे, उपमहापौर विलास शिंदे आदी उपस्थित होते. 'जल व्यवस्थापन कृती पंधरवड्या' अंतर्गत आयोजित या जलयात्रेचा मुख्य उद्देश राज्यातील जलस्त्रोतांबाबत जनजागृती करणे, लोकसहभाग वाढवणे आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाची संकल्पना अधिक बळकट करणे हा आहे. ही जलयात्रा २५ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. ​यात्रेत सुमारे ५०० जलयात्री, वारकरी आणि तरुण सहभागी झाले आहेत. जलयात्रेचा प्रवास असा राहील- ​२५ एप्रिल: त्र्यंबकेश्वर ते संगमनेर (मुक्काम: संगमनेर). ​२६ एप्रिल: संगमनेरमार्गे शिर्डी (मुक्काम: शिर्डी). ​२७ एप्रिल: कोपरगाव, वैजापूर, संभाजीनगर, घृष्णेश्वर (मुक्काम: घृष्णेश्वर). ​२८ एप्रिल: कन्नड, चाळीसगाव, धुळे (मुक्काम: धुळे). ​२९ एप्रिल: धुळे ते महेश्वर, मध्य प्रदेश (समारोप).

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • त्र्यंबकेश्वरमध्ये जलदिंडींचा जल्लोष; ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा उत्साहात शुभारंभ ‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेच्या शुभारंभानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे जलदिंडींचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ढोल-ताशा, टाळ-मृदुंगाच्या गजरात जलजागृतीचा संदेश देण्यात आला. कुशावर्त तीर्थावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन पार पडले. शहरातून पालखी व जलदिंडी काढत लोकसहभागातून जलसंवर्धनाचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
    1
    त्र्यंबकेश्वरमध्ये जलदिंडींचा जल्लोष; ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा उत्साहात शुभारंभ
‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेच्या शुभारंभानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे जलदिंडींचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ढोल-ताशा, टाळ-मृदुंगाच्या गजरात जलजागृतीचा संदेश देण्यात आला. कुशावर्त तीर्थावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन पार पडले. शहरातून पालखी व जलदिंडी काढत लोकसहभागातून जलसंवर्धनाचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • राजकोट में इंसानियत शर्मसार: पिता-पुत्र की बेरहमी, निर्दोष पर हमला, बचाने आई महिलाओं को भी पीटा 📰 न्यूज़: राजकोट के माधापर चौकड़ी इलाके में एक बेहद शर्मनाक घटना सामने आई है, जिसने मानवता को झकझोर कर रख दिया है। आरोप है कि महेंद्रसिंह जाडेजा और उनके पुत्र अभिराजसिंह जाडेजा ने एक निर्दोष व्यक्ति को बेरहमी से पीटा। इतना ही नहीं, जब कुछ महिलाएं पीड़ित को बचाने पहुंचीं, तो उन्हें भी नहीं बख्शा गया और उनके साथ भी मारपीट की गई। घटना के बाद इलाके में आक्रोश का माहौल है। राजकोट पुलिस ने मामले को गंभीरता से लेते हुए आरोपियों के खिलाफ FIR दर्ज करने की प्रक्रिया शुरू कर दी है और आगे की जांच जारी है। #Rajkot #Gujarat #CrimeNews #HumanityShamed #BreakingNews #Violence #JusticeForVictim #PoliceAction #ViralNews #IndiaNews
    1
    राजकोट में इंसानियत शर्मसार: पिता-पुत्र की बेरहमी, निर्दोष पर हमला, बचाने आई महिलाओं को भी पीटा
📰 न्यूज़:
राजकोट के माधापर चौकड़ी इलाके में एक बेहद शर्मनाक घटना सामने आई है, जिसने मानवता को झकझोर कर रख दिया है। आरोप है कि महेंद्रसिंह जाडेजा और उनके पुत्र अभिराजसिंह जाडेजा ने एक निर्दोष व्यक्ति को बेरहमी से पीटा। इतना ही नहीं, जब कुछ महिलाएं पीड़ित को बचाने पहुंचीं, तो उन्हें भी नहीं बख्शा गया और उनके साथ भी मारपीट की गई।
घटना के बाद इलाके में आक्रोश का माहौल है। राजकोट पुलिस ने मामले को गंभीरता से लेते हुए आरोपियों के खिलाफ FIR दर्ज करने की प्रक्रिया शुरू कर दी है और आगे की जांच जारी है।
#Rajkot #Gujarat #CrimeNews #HumanityShamed #BreakingNews #Violence #JusticeForVictim #PoliceAction #ViralNews #IndiaNews
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • सलमान खान पर वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल शिंदे का शिकंजा,मंगवाई माफी BNN NEWS
    1
    सलमान खान पर वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल शिंदे का शिकंजा,मंगवाई माफी BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Sanam Fadnis News Mumbra
    1
    Post by Sanam Fadnis News Mumbra
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by YASER BAGHDADI
    1
    Post by YASER BAGHDADI
    user_YASER BAGHDADI
    YASER BAGHDADI
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • मुस्लिमों के खिलाफ ज़हर उगाने वाला सलीम निकला कातिल,हुआ गिरफ्तार || Islamuddin Khan
    1
    मुस्लिमों के खिलाफ ज़हर उगाने वाला सलीम निकला कातिल,हुआ गिरफ्तार || Islamuddin Khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • रघुनाथपुर थाना के SI का कथित अश्लील वीडियो वायरल, मचा हड़कंप
    1
    रघुनाथपुर थाना के SI का कथित अश्लील वीडियो वायरल, मचा हड़कंप
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • जलयात्रेतून समाज एकत्र येणार; जलसंवर्धनाचा संदेश बळकट – मुख्यमंत्री “नद्यांना जसे परस्परांशी जोडले जाते, तसेच ही जलयात्रा लोकमानस, समाज आणि संस्कृतीला एकत्र आणण्याचे कार्य करणार आहे,” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या यात्रेतून जलसंवर्धनाबाबत जनजागृती, पाणी बचतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, महिला सक्षमीकरणाला चालना आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे पुनर्जीवन साध्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
    1
    जलयात्रेतून समाज एकत्र येणार; जलसंवर्धनाचा संदेश बळकट – मुख्यमंत्री
“नद्यांना जसे परस्परांशी जोडले जाते, तसेच ही जलयात्रा लोकमानस, समाज आणि संस्कृतीला एकत्र आणण्याचे कार्य करणार आहे,” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या यात्रेतून जलसंवर्धनाबाबत जनजागृती, पाणी बचतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, महिला सक्षमीकरणाला चालना आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे पुनर्जीवन साध्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • सूरत में नाबालिग से छेड़खानी, आरोपी गिरफ्तार—री-कंस्ट्रक्शन के दौरान भड़का जनआक्रोश 📰 न्यूज़: गुजरात के सूरत शहर के अलथाण इलाके में एक नाबालिग लड़की के साथ छेड़खानी की घटना ने पूरे इलाके को हिला कर रख दिया है। पुलिस ने इस मामले में आरोपी मो. अजीज इम्तियाज शेख को गिरफ्तार कर लिया है। जांच के तहत पुलिस आरोपी को घटनास्थल पर ले गई, जहां क्राइम सीन का री-कंस्ट्रक्शन किया गया। इस दौरान बड़ी संख्या में स्थानीय लोग मौके पर जुट गए और आरोपी के खिलाफ जबरदस्त गुस्सा देखने को मिला। लोगों ने आरोपी को कड़ी से कड़ी सजा देने की मांग करते हुए सख्त कार्रवाई की अपील की है। पुलिस मामले की गहन जांच में जुटी हुई है। #Surat #GujaratNews #CrimeNews #JusticeForMinor #BreakingNews #LawAndOrder #PublicAnger #CrimeAlert #IndiaNews #StrictAction
    1
    सूरत में नाबालिग से छेड़खानी, आरोपी गिरफ्तार—री-कंस्ट्रक्शन के दौरान भड़का जनआक्रोश
📰 न्यूज़:
गुजरात के सूरत शहर के अलथाण इलाके में एक नाबालिग लड़की के साथ छेड़खानी की घटना ने पूरे इलाके को हिला कर रख दिया है। पुलिस ने इस मामले में आरोपी मो. अजीज इम्तियाज शेख को गिरफ्तार कर लिया है।
जांच के तहत पुलिस आरोपी को घटनास्थल पर ले गई, जहां क्राइम सीन का री-कंस्ट्रक्शन किया गया। इस दौरान बड़ी संख्या में स्थानीय लोग मौके पर जुट गए और आरोपी के खिलाफ जबरदस्त गुस्सा देखने को मिला।
लोगों ने आरोपी को कड़ी से कड़ी सजा देने की मांग करते हुए सख्त कार्रवाई की अपील की है। पुलिस मामले की गहन जांच में जुटी हुई है।
#Surat #GujaratNews #CrimeNews #JusticeForMinor #BreakingNews #LawAndOrder #PublicAnger #CrimeAlert #IndiaNews #StrictAction
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.