चिखली तालुक्यातील भानखेडे येथील गोडंबी (बिब्बा) प्रक्रिया उद्योग संशोधनाची दखल महाराष्ट्र राज्य स्तरावर . चिखली तालुक्यातील भानखेडे येथील गोडंबी (बिब्बा) प्रक्रिया उद्योग संशोधनाची दखल महाराष्ट्र राज्य स्तरावर 2008 साली महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री एस. एम. कृष्णा यांनी महाराष्ट्रातील संशोधनाला चालना मिळावी यासाठी "आविष्कार" ही स्पर्धा सुरू केली. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ही स्पर्धा UG, PG, आणि PPG (Ph.D) या तीन गटांमध्ये जिल्हास्तर विद्यापीठ स्तर आणि आंतर विद्यापीठ स्तर (महाराष्ट्र राज्य स्तर) या तीन स्तरावर आयोजित केली जाते. यावर्षी सुद्धा अठराव्या आविष्कार स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री आचार्य देवव्रत यांच्या आदेशान्वये करण्यात आली. या स्पर्धेमध्ये श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली, ता. चिखली जि. बुलढाणा या संशोधन केंद्राचे अर्थशास्त्र विषयाचे संशोधक विद्यार्थी प्रमोद विश्वनाथ पंडीत यांनी डॉ. सुनिता महादेव कलाखे यांच्या मार्गदर्शनाखाली PPG (Ph.D) आपला संशोधन प्रकल्प बुलढाणा जिल्हा स्तरावर सादर केला यामध्ये त्यांच्या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळून त्यांची निवड विद्यापीठ स्तरावर करण्यात आली. दिनांक 30 व 31 डिसेंबर 2025 रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठ स्तरीय स्पर्धेमध्ये त्यांच्या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळून त्यांच्या प्रकल्पाची निवड आंतर विद्यापीठ स्तरावर म्हणजेच महाराष्ट्र राज्य स्तरावर झाली आणि त्यांना विद्यापीठ स्तरावर अत्यंत मानाचा समजला जाणाऱ्या 'कलरकोट' ने सन्मानित करण्यात आले 28 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत 18 वी राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील 26 विद्यापीठांनी सहभाग घेऊन UG, PG, PPG (Ph.D) या ग्रुप मधून 910 संशोधक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रकल्प सादर केले यामध्ये प्रमोद विश्वनाथ पंडीत यांनी सादर केलेल्या प्रकल्पाची Ph.D ग्रुप मधून पहिल्या दहा प्रकल्पामध्ये निवड झाली त्यांना या प्रकल्पासाठी डॉ. सुनिता कलाखे, डॉ. प्रदिप बारड, आणि भानखेड येथील पोलीस पाटील मिलिंद इंगळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रमोद विश्वनाथ पंडीत यांचे या यशाबद्दल सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे
चिखली तालुक्यातील भानखेडे येथील गोडंबी (बिब्बा) प्रक्रिया उद्योग संशोधनाची दखल महाराष्ट्र राज्य स्तरावर . चिखली तालुक्यातील भानखेडे येथील गोडंबी (बिब्बा) प्रक्रिया उद्योग संशोधनाची दखल महाराष्ट्र राज्य स्तरावर 2008 साली महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री एस. एम. कृष्णा यांनी महाराष्ट्रातील संशोधनाला चालना मिळावी यासाठी "आविष्कार" ही स्पर्धा सुरू केली. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ही स्पर्धा UG, PG, आणि PPG (Ph.D) या तीन गटांमध्ये जिल्हास्तर विद्यापीठ स्तर आणि आंतर विद्यापीठ स्तर (महाराष्ट्र राज्य स्तर) या तीन स्तरावर आयोजित केली जाते. यावर्षी सुद्धा अठराव्या आविष्कार स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री आचार्य देवव्रत यांच्या आदेशान्वये करण्यात आली. या स्पर्धेमध्ये श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली, ता. चिखली जि. बुलढाणा या संशोधन केंद्राचे अर्थशास्त्र विषयाचे संशोधक विद्यार्थी प्रमोद विश्वनाथ पंडीत यांनी डॉ. सुनिता महादेव कलाखे यांच्या मार्गदर्शनाखाली PPG (Ph.D) आपला संशोधन प्रकल्प बुलढाणा जिल्हा स्तरावर सादर केला यामध्ये त्यांच्या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळून त्यांची निवड विद्यापीठ स्तरावर करण्यात आली. दिनांक 30 व 31 डिसेंबर 2025 रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठ स्तरीय स्पर्धेमध्ये त्यांच्या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळून त्यांच्या प्रकल्पाची निवड आंतर विद्यापीठ स्तरावर म्हणजेच महाराष्ट्र राज्य स्तरावर झाली आणि त्यांना विद्यापीठ स्तरावर अत्यंत मानाचा समजला जाणाऱ्या 'कलरकोट' ने सन्मानित करण्यात आले 28 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत 18 वी राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील 26 विद्यापीठांनी सहभाग घेऊन UG, PG, PPG (Ph.D) या ग्रुप मधून 910 संशोधक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रकल्प सादर केले यामध्ये प्रमोद विश्वनाथ पंडीत यांनी सादर केलेल्या प्रकल्पाची Ph.D ग्रुप मधून पहिल्या दहा प्रकल्पामध्ये निवड झाली त्यांना या प्रकल्पासाठी डॉ. सुनिता कलाखे, डॉ. प्रदिप बारड, आणि भानखेड येथील पोलीस पाटील मिलिंद इंगळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रमोद विश्वनाथ पंडीत यांचे या यशाबद्दल सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे
- स्टंटबाजी बेतली जीवावर: सापाच्या दंशाने ख्यातनाम सर्पमित्राचा खामगावात दुर्दैवी मृत्यू.1
- या प्रकरणी कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासन आणि रुग्णवाहिका चालकाबाबत लेखी तक्रार दिली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. बातमी : मिळालेल्या माहितीनुसार, जनुना येथील रहिवासी मंगेश प्रकाश कांबळे यांना ९ मार्च रोजी सकाळी सर्पदंश झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तक्रारीनुसार, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रेफर केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर रुग्णाला अकोला येथे नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला. मात्र त्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णवाहिका बोलावण्यात आल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णवाहिका चालकाने अकोला येथे नेण्यासाठी पैशांची मागणी केली. नातेवाईकांनी काही रक्कम तातडीने देऊन उर्वरित रक्कम अकोला येथे देण्याची विनंती केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मात्र पैसे तात्काळ न मिळाल्याने रुग्णवाहिका पुन्हा खामगाव येथील रुग्णालयात परत आणण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर सुमारे एका तासाने मंगेश कांबळे यांचे दुर्दैवी निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. दरम्यान, मयताचे भाऊ सुनील कांबळे यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करत खामगाव शहर पोलीस ठाणे आणि सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली आहे.1
- खामगाव : पोलीस स्टेशनमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या महिला आणि त्यांच्या लहान मुलांच्या सोयीसाठी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये 'हिरकणी कक्ष' सुरू करण्यात आला आहे. या अद्ययावत कक्षाचे रीतसर उद्घाटन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते पार पडले. या उपक्रमामुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या मातांना आता सुरक्षित आणि हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. महिलांच्या समस्यांचे निराकरण करताना त्यांना सन्मानजनक वातावरण मिळावे, या उद्देशाने या 'हिरकणी कक्षा'ची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षाची रचना करताना विशेषतः स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये मातांना विश्रांती घेण्यासाठी पलंगाची व्यवस्था करण्यात आली असून, सोबत येणाऱ्या लहान मुलांचे मन रमावे यासाठी विविध प्रकारची शैक्षणिक खेळणी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी शहर पोलीस स्टेशनच्या एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हे नियंत्रण आणि जनसेवेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध बाबींवर मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्यासह शहरातील इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या या संवेदनशील उपक्रमाचे शहरात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.1
- #jalna#marathinews#1
- सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..1
- आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली1
- भोकरदन शहरातील फुलेनगर येथे दिलीप मामा पगारे, शुभम पगारे,सागर पगारे यांच्या गृहप्रवेश सोहळा आणि सान्वी शुभम पगारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🎂💐देताना माजी नगरसेवक दीपक भाऊ बोर्डे, मिथुन पगारे, किरण वाघमारे,पत्रकार कमलकिशोर जोगदंडे आदी.1
- सरपंच पतीवर महिलेचा विनयभंगाचा आरोप बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचे आमरण उपोषण**1