खामगाव व शेगावमधील घरफोडीचा छडा; जालना येथील अट्टल गुन्हेगार गजाआड स्थानिक गुन्हे शाखा व खामगाव शहर पोलिसांची संयुक्त कारवाई; ८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त खामगाव: खामगाव आणि शेगाव शहरात घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि खामगाव शहर पोलीस पथकाला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन मोठ्या गुन्ह्यांची उकल केली आहे. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादी रवि राजूमल होतबानी (रा. सिंधी कॉलनी, खामगाव) यांनी तक्रार दिली होती की, २४ ते २५ जानेवारी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या काकांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरून नेले. या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. अशाच प्रकारचा गुन्हा शेगाव येथेही घडला होता. जिल्ह्यातील वाढत्या घरफोडीच्या घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुनील अंबुलकर आणि खामगाव शहरचे पोनि. रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि तपासाअंती या गुन्ह्यामागे जालना येथील गुन्हेगाराचा हात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून संजयसिंग कृष्णासिंग भादा (वय ३० वर्ष, रा. जालना) याला जालना येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे दागिने ३० ग्रॅम वजनाचे ४,५०,०००/- रु.),(स्कोडा कंपनीची चारचाकी गाडी (किंमत ३,५०,०००/- रु.),मोबाईल २०,०००/- रु.), असा एकूण ८,२०,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पकडण्यात आलेला आरोपी संजयसिंग भादा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. पोलीस बऱ्याच दिवसांपासून त्याच्या शोधात होते. प्राथमिक चौकशीत त्याने खामगाव आणि शेगाव येथील गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनील अंबुलकर, पोनि. रामकृष्ण पवार, पोउपनि. पंकज सपकाळे, सपोनि. विकास पाटील आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
खामगाव व शेगावमधील घरफोडीचा छडा; जालना येथील अट्टल गुन्हेगार गजाआड स्थानिक गुन्हे शाखा व खामगाव शहर पोलिसांची संयुक्त कारवाई; ८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त खामगाव: खामगाव आणि शेगाव शहरात घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि खामगाव शहर पोलीस पथकाला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन मोठ्या गुन्ह्यांची उकल केली आहे. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादी रवि राजूमल होतबानी (रा. सिंधी कॉलनी, खामगाव) यांनी तक्रार दिली होती की, २४ ते २५ जानेवारी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या काकांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरून नेले. या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. अशाच प्रकारचा गुन्हा शेगाव येथेही घडला होता. जिल्ह्यातील वाढत्या घरफोडीच्या घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुनील अंबुलकर आणि खामगाव शहरचे पोनि. रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि तपासाअंती या गुन्ह्यामागे जालना येथील गुन्हेगाराचा हात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून संजयसिंग कृष्णासिंग भादा (वय ३० वर्ष, रा. जालना) याला जालना येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे दागिने ३० ग्रॅम वजनाचे ४,५०,०००/- रु.),(स्कोडा कंपनीची चारचाकी गाडी (किंमत ३,५०,०००/- रु.),मोबाईल २०,०००/- रु.), असा एकूण ८,२०,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पकडण्यात आलेला आरोपी संजयसिंग भादा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. पोलीस बऱ्याच दिवसांपासून त्याच्या शोधात होते. प्राथमिक चौकशीत त्याने खामगाव आणि शेगाव येथील गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनील अंबुलकर, पोनि. रामकृष्ण पवार, पोउपनि. पंकज सपकाळे, सपोनि. विकास पाटील आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
- अर्थसंकल्पातून ग्रामीण भाग 'आउट': आमदार सिद्धार्थ खरात यांची सरकारवर टीका. *ग्रामीण भागाकडे अर्थसंकल्पात दुर्लक्ष; शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी ठोस तरतूद नाही – आमदार सिद्धार्थ खरात* मेहकर दि. ११: राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अर्थसंकल्पात मोठमोठ्या योजना आणि आकडेवारीचा पाऊस पाडला असला, तरी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे त्यांनी नमूद केले. *१. घोषणांचा पाऊस आणि डिजिटलचा दिखावा:* कृषी क्षेत्रासाठी ५ अब्ज डॉलरचे उद्दिष्ट आणि १५ पिकांसाठी मूल्यसाखळी उभारण्याचा संकल्प मांडला आहे. 'अॅग्रो स्टॅक' अंतर्गत १ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून ३ कोटींचे लक्ष्य आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि व्हिडिओ मार्गदर्शनापेक्षा शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदतीची जास्त गरज असल्याचे खरात यांनी सांगितले. *२. शहर विरुद्ध ग्रामीण: निधीचा मोठा असमतोल:* मुंबई-पुणे सारख्या शहरांतील मेट्रो आणि हायवेसाठी सरकारकडे हजारो कोटींचा निधी आहे, परंतु ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण यांसाठ ठोस तरतूद नाही.* शहरांसाठी उदारपणे निधी दिला जातो, मात्र ग्रामीण भाग या विकासापासून मैलोन्मैल दूर फेकला जात आहे *३. अर्थसंकल्पीय आकडेवारीचे वास्तव:* राज्याचा अर्थसंकल्प सुमारे ७ लाख कोटींचा असला, तरी प्रत्यक्ष विभागांना मिळणारा निधी केवळ २.८८ लाख कोटी आहे. अनेक विभागांना दिलेला निधी पूर्णपणे खर्चच होत नाही, त्यामुळे योजनांची अंमलबजावणी केवळ कागदावरच राहते. *४. शेती, दूध आणि कर्जमाफीचा मुद्दा:* दुग्ध व्यवसाय: दुधाला केवळ १ रुपया प्रोत्साहन भत्ता देणे ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या डेअरी विकासासाठी जुन्या करारांप्रमाणे ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. कर्जमाफी: मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यात स्पष्टता नाही. केवळ पीक कर्ज नव्हे, तर ट्रॅक्टर आणि स्प्रिंकलरच्या कर्जाचाही यात समावेश असावा. *५. आर्थिक विषमतेची दरी:* महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांचे प्रति व्यक्ती उत्पन्न राज्याच्या आणि देशाच्या सरासरीपेक्षाही कमी आहे. विकास केवळ काही औद्योगिक जिल्ह्यांपुरता मर्यादित असून, उर्वरित महाराष्ट्र आजही आर्थिकदृष्ट्या मागासलेलाच राहिल्याची टीका खरात यांनी केली.1
- बुलढाण्यात उद्यापासून 'भारतीय समता संघटने'चे आमरण उपोषण; प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.... बुलढाणा :-शासकीय जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्काची सनद मिळावी आणि वनहक्क कायद्यांतर्गत प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागावेत, या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय समता संघटनेच्या वतीने उद्या, १२ मार्च २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा पवित्रा घेण्यात आला आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संघटनेने हे आक्रमक पाऊल उचलले आहे. भारतीय समता संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सन १९९० पूर्वीपासून शासकीय जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी नियमानुकूल करण्यासंदर्भात अनेकवेळा निवेदने देण्यात आली. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय किंवा मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या चुकीच्या अहवालांमुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. काय आहेत मुख्य मागण्या? निवेदनात एकूण ७ प्रमुख मागण्यांचा समावेश आहे, त्यापैकी महत्त्वाच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेतः जमीन नियमितीकरणः सन १९७८ ते १९९१ च्या शासन निर्णयानुसार जमिनी नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. ७/१२ वर नोंदः शासकीय जमिनीवर उपजीविका करणाऱ्या आदिवासी व इतर पारंपारिक रहिवाशांना जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे देऊन ७/१२ वर नोंद घ्यावी. वनहक्क दावेः ७५ वर्षांचे पुरावे असूनही तांत्रिक कारणास्तव (जीपीएस सर्व्हेक्षण) नाकारलेले वनहक्क दावे मंजूर करावेत.निवासी सनदः अंढेरा येथील पारधी समाज बांधवांना त्यांच्या निवासी जागेची मालकी सनद देण्यात यावी. शिक्षणः मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील आदिवासी मुलांची शाळा पूर्ववत सुरू करण्यात यावी. आम्ही २७ फेब्रुवारी रोजीच या संदर्भात निवेदन दिले होते, मात्र प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आता १२ मार्चपासून आम्ही संपूर्ण कार्यकर्त्यांसह आमरण उपोषणाला बसणार आहोत. उपोषणादरम्यान आंदोलकांच्या आरोग्यास किंवा जीवितास काही धोका निर्माण झाल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि शासनाची राहील," असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आम्रपालभाऊ वाघमारे व अन्य पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.1
- अंधारी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाली आहे तर कुत्रा गंभीर जखमी झाला आहे सदरील प्रकारमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण या परिसरात बघण्यात येत आहे1
- मंदिरातील दानपेटी चोरणारा चोरट्या पोलिसांच्या जाळ्यात मालेगाव शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुणवंत बाबा मंदिरातील दानपेटी व मलानेश्वर हॉटेल दिनांक ९व१० च्या मध्यरात्री चोरट्याने चोरल्याची घटना घडली होती. याबाबत पोलीस स्टेशन मालेगाव मध्ये गुन्हा क्र.219/2026 कलम 334(1) BNS व गुन्हा क्र. 220/2026 कलम 303(2)BNS मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा दिनांक 09/03/2026 ते 10/03/2026 चे रात्री दरम्यान चोरी झाली होती सदर गुन्ह्यात संशयावरून दोन आरोपी यांना अटक करुन त्यांचे कडून दोन्ही गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करुन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. मालनेश्वर हॉटेलमधील चोरीस गेलेले चांदीचे दोन नाणे,सिगारेटचे पाकीट, चिल्लर खुर्दा, नगदी रुपये व संग्रही असलेले जुने चलनी नोटा.तसेच संत श्री गुणवंत बाबा मंदिरातील दान पेटी व नगदी रुपये एकुण 8675/₹ चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपी नाव*मंगेश शेषराव बदर वय 25 वर्षे रा.गांधीनगर,मालेगाव,2) राहुल दौलत गायकवाड वय 31 वर्षे रा. चांडस ता. मालेगाव या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पी आय श राजेश खेरडे यांचे मार्गदर्शनात पी एस आय रवी सैबेवार जमादार सुनिल पवार, किशोर चिंचोळकर शिवाजी काळे, जितु पाटील,मनिष राठोड, पोलिस शिपाई आमोल पवार, गणेश मेटांगळे, प्रशांत चौधरी, मिलिंद राजगुरु, मारोती गायकवाड.सैनिक महादेव मुठाळ. पोलीस स्टेशन मालेगाव यांनी कारवाई केल आहे.1
- सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख1
- जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन असलेल्या वेरूळ लेणीतील दहा नंबरच्या लेणीतील बौद्ध मूर्तिवर किरणोत्सव या सोळाव्याला मोठ्या संख्येने पर्यटकासह भाविकांना अनुभवयास मिळाला. स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण चौतीस लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध लेणी आहेत. तर यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार असून यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे येत असतात. हीच सूर्यकिरणें मूर्तिच्या चेहऱ्यावरती आले. आगामी पाच ते सहा दिवस हा सोहळा भाविकासह पर्यटकाना अनुभवता येईल..1
- मार्चची चाहूल; डोक्यावर कुलर घेऊन निघालेला शेतकरी सांगतो उन्हाळ्याची सुरुवात... शेगांव : मार्च महिन्याची सुरुवात होताच संत नगरी शेगांवमध्ये उन्हाळ्याची चाहूल स्पष्ट जाणवू लागली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी तयारी सुरू केली असून बाजारात कुलर खरेदीची लगबग वाढली आहे. याचे जिवंत चित्र म्हणजे शहराच्या रस्त्यावर डोक्यावर कुलर घेऊन जात असलेला शेतकरी — जो बदलत्या हवामानाचा आणि ग्रामीण वास्तवाचा प्रतीकात्मक संदेश देताना दिसतो. कडक उन्हाची सुरुवात होताच एसी परवडत नसलेल्या सर्वसामान्य व शेतकरी वर्गासाठी कुलर हा “गरिबांचा एसी” ठरत आहे. कमी खर्च, कमी वीज वापर आणि तात्काळ थंडावा यामुळे कुलरची मागणी वाढली असून इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत आहे. दुपारच्या वेळी वाढणारा उकाडा, गरम वारे आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेता यंदाचा उन्हाळा अधिक कडक जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मार्चपासूनच नागरिकांनी उष्णतेविरुद्ध तयारी सुरू केली असून शेगांवमध्ये उन्हाळ्याचा हंगाम अधिकृतपणे सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.1
- बुलढाण्यात ठाकरे गटाला धक्का जयश्री शेळके यांचे दीर संदीप शेळके यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश1
- सिल्लोड तालुक्यातील शिवना मादनी रस्त्यावरती एक मृतदेह आढळून आला आहे सदरील व्यक्तीचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला याचा शोध अजिंठा पोलीस घेत आहे1