नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील आरोग्यसेवेला जागतिक दर्जाची नवी दिशा देणाऱ्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे लोकार्पण रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाले. अत्याधुनिक उपचार, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णकेंद्रित सेवा यांचा संगम असलेली ही आरोग्यनगरी उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा प्रभू श्रीरामांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, अशोका ग्रुपचे अध्यक्ष अशोक कटारिया, व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख, डॉ. सुशील पारख, अंकिता पारख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. लोकसभा अध्यक्ष बिर्ला म्हणाले की, खाजगी क्षेत्र आरोग्य व्यवस्थेत प्रभावी योगदान देत असून यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर मिळतील. नाशिकच्या आध्यात्मिक महत्त्वासोबतच या प्रकल्पामुळे शहराला नवी ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी ही संस्था वैद्यकीय संशोधनाचे प्रमुख केंद्र बनावी, अशी अपेक्षा व्यक्त करत नागरिकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. अशोका ग्रुपचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी सांगितले की, गेल्या २५ वर्षांपासून पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत असलेल्या अशोका ग्रुपने सामाजिक बांधिलकीतून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात पाऊल टाकले आहे. या अशोका हेल्थ सिटीमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिले थीम-आधारित अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटल, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका आणि लवकरच सुरू होणारे अशोका कॉलेज ऑफ नर्सिंग एक्सलन्स एकाच परिसरात कार्यरत राहणार आहेत. या सोहळ्याला तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय सल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंकिता पारख यांनी केले।
नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील आरोग्यसेवेला जागतिक दर्जाची नवी दिशा देणाऱ्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे लोकार्पण रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाले. अत्याधुनिक उपचार, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णकेंद्रित सेवा यांचा संगम असलेली ही आरोग्यनगरी उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा प्रभू श्रीरामांची मूर्ती
देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, अशोका ग्रुपचे अध्यक्ष अशोक कटारिया, व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख, डॉ. सुशील पारख, अंकिता पारख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. लोकसभा अध्यक्ष बिर्ला म्हणाले की, खाजगी क्षेत्र आरोग्य व्यवस्थेत प्रभावी योगदान देत असून यामुळे उत्तर महाराष्ट्रातील
नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर मिळतील. नाशिकच्या आध्यात्मिक महत्त्वासोबतच या प्रकल्पामुळे शहराला नवी ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी ही संस्था वैद्यकीय संशोधनाचे प्रमुख केंद्र बनावी, अशी अपेक्षा व्यक्त करत नागरिकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. अशोका ग्रुपचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी सांगितले की, गेल्या २५ वर्षांपासून पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत असलेल्या अशोका ग्रुपने सामाजिक बांधिलकीतून शिक्षण
आणि आरोग्य क्षेत्रात पाऊल टाकले आहे. या अशोका हेल्थ सिटीमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिले थीम-आधारित अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटल, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका आणि लवकरच सुरू होणारे अशोका कॉलेज ऑफ नर्सिंग एक्सलन्स एकाच परिसरात कार्यरत राहणार आहेत. या सोहळ्याला तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय सल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंकिता पारख यांनी केले।
- उत्तर महाराष्ट्रातील आरोग्यसेवेला नवे बळ देणाऱ्या अत्याधुनिक अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अपेक्षा व्यक्त केली की, अशोका हेल्थ सिटी ही केवळ उपचारांची संस्था न राहता वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचे जागतिक दर्जाचे केंद्र बनावे. तसेच, या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना आधुनिक सुपर स्पेशालिटी आरोग्यसेवा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.1
- नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी टवाळखोरांच्या विरोधात केलेल्या कडक कारवाईचे शहरभरात कौतुक होत आहे. या कारवाईनंतर आवामी विकास पार्टीचे नाशिक शहर अध्यक्ष सरफराज पठाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांची भेट घेऊन पोलिसांच्या या कामगिरीची प्रशंसा केली. या भेटीदरम्यान त्यांनी मागणी केली की, ज्याप्रमाणे टवाळखोरांच्या विरुद्ध मोहीम राबवून कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर भद्रकाली परिसरात कथित स्वरूपात सुरू असलेल्या अवैध जुगार, मटका आणि सट्ट्याच्या धंद्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी. या बेकायदेशीर व्यवसायांमध्ये सहभागी असलेले चालक आणि खेळाडू यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांच्या यापुढील कारवाईकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे आज खेडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले. या पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी दिंडोरी पेठचे माजी आमदार धनराज महाले यांनी दिंडीला भेट दिली. यावेळी त्यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत।1
- नाशिक–पळसन मार्गावरील एसटी बस सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा फाटा येथे अचानक पंक्चर झाली, मात्र बसमध्ये टायर बदलण्यासाठी आवश्यक असलेला जॅकच उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे तासन्तास हाल झाले. या महत्त्वाच्या साधनसामग्रीअभावी बस दुरुस्तीचे काम जागेवरच खोळंबले. परिणामी, बसमधील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करत रस्त्यावरच ताटकळत राहावे लागले. एसटीसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनात जॅकसारखे मूलभूत साहित्यही उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असून, यामुळे एसटी महामंडळाच्या निष्काळजी कारभारावर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अभावामुळे केवळ प्रवाशांचा वेळच वाया गेला नाही, तर चालक आणि वाहकालाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व बसमध्ये आवश्यक साधनसामग्रीची खात्री करावी, अशी संतप्त मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.1
- संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावामध्ये ग्रामपंचायतीने गारुडी आणि मातंग समाजाच्या अतिक्रमित जागेवरील घर बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, आश्वी पोलीस स्टेशनमध्ये मानवाधिकार राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या प्रकारानंतर संगमनेर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत निर्णय न झाल्यास, पक्षाच्या वतीने आश्वी पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा देण्यात आला आहे.2
- येवला-मनमाड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची आणि स्थानिक नागरिकांची त्रासातून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पावसाळ्यात या रस्त्यावर निर्माण झालेले चिखलाचे साम्राज्य आता संपले असले, तरी उन्हाच्या तीव्रतेमुळे संपूर्ण महामार्गावर 'धुळीचे साम्राज्य' पसरले आहे. या उडणाऱ्या धुळीमुळे ये-जा करणारे प्रवासी कमालीचे हतबल झाले असून नागरिक आणि प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गाच्या अत्यंत संथ गतीने चाललेल्या कामामुळे नागरिक आधीच त्रस्त होते. पावसाळ्यात चिखलातून रस्ता काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती, तर आता चिखल सुकल्यानंतर रस्त्यावर धूलिकणांचे प्रचंड मोठे थर साचले आहेत. महामार्गावरून जड वाहने किंवा एसटी बस गेल्यास एवढी प्रचंड धूळ उडते की, मागून येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना समोरील रस्ता दिसणे कठीण होते. अशा प्रकारे निर्माण होणाऱ्या 'ब्लाइंड स्पॉट'मुळे या महामार्गावर लहान-मोठे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहे. या धुळीचा सर्वाधिक फटका रस्त्याच्या कडेला असणारे हॉटेल व्यावसायिक, दुकानदार आणि स्थानिक रहिवाशांना बसत आहे. दुकानांमधील साहित्यावर धुळीचे थर साचत असल्याने व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, सतत उडणाऱ्या या धुळीमुळे लहान मुले आणि वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले असून, त्यांना श्वसनाचे आजार, खोकला आणि डोळ्यांचे विकार जडण्याची भीती निर्माण झाली आहे.1
- नाशिकच्या सातपूर परिसरातील बहुचर्चित 'गोल्ड मॅन' जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत मुख्य आरोपीला गुन्हेशाखा युनिट-२च्या पथकाने पिंपरी-चिंचवडमधील दिघी येथून अटक केली आहे. राकेश आबालाल सोनार (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी, अंबड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास 'गोल्ड मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिर्यादी हे आपल्या चारचाकी वाहनातून घरी जात असताना तिघा अज्ञातांनी त्यांना अडवले होते. आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्या वाहनात प्रवेश केला आणि धारदार चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे १४ लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमालही जप्त केला आहे. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राकेश सोनार हा गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार होता. गुन्हेशाखा युनिट-२ ने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे राकेश सोनार पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले आणि त्यांनी चोहोली फाटा परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्याला सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हेशाखा युनिट-२चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर तसेच डॉ. समाधान हिरे, यशवंत बेडकोळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.3
- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. परिसरात 'गेला पाऊस कुणीकडे' अशी स्थिती निर्माण झाली असून, पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.2