logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की राज्यातील परिस्थिती रसातळाला गेली असून खालच्या स्तरापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहोचवले जात आहेत. त्यांच्या आरोपानुसार, हप्ता वसुलीमुळे पोलीस प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही, म्हणूनच राज्यात ड्रग्जचा खुलेआम काळाधंदा, गांजाची विक्री, तसेच हातभट्ट्या आणि विषारी दारूचे थैमान सुरू आहे. पुण्यात विषारी दारूमुळे २२ निष्पाप लोकांचा बळी जाण्याची घटना याच बेबंदशाहीचा परिणाम असून, राज्याचा गृहविभाग 'पांडू हवालदार' चालवत असल्यामुळे सर्वत्र अराजक माजले आहे, असे सपकाळ यांनी घणाघाती आरोप केला. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी पुण्यातील घटनेनंतरच सरकारला जाग आल्याचे सांगितले आणि आता हातभट्ट्या तोडण्याची कारवाई केली जात असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, या हातभट्ट्या काही एका रात्रीत उभ्या राहिलेल्या नाहीत; राज्यात ५०० शहरे आणि ४३ हजार गावखेड्यांमध्ये अवैध धंदे आणि हातभट्ट्या राजरोसपणे सुरू आहेत. गुजरातमधून महाराष्ट्रात येणारे ड्रग्ज, 'जामतारा'सारखी प्रकरणे आणि अवैध धंद्यांची साखळी गृहविभागाच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्यच बदलल्याचा दावा करत, पुण्यातील प्रकरणामुळे सर्व स्तरातून व्यक्त होत असलेल्या संतापामुळे स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी सध्या कारवाईचे नाटक केले जात असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. गृहविभागाची कार्यपद्धतीवर टीका करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बुलढाणा जिल्ह्यातील एका प्रकरणाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, एक मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांना एक मृतदेह सापडला. हा मृतदेह त्याच मुलीचा आहे असे समजून पोलिसांनी बेपत्ता मुलीच्या वडील आणि भावाला अटक करून बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडून कबुलीजबाब घेतला. पोलिसांनी ४८ तासात प्रकरण सोडवल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली, मात्र नंतर ती बेपत्ता मुलगी परत समोर आली. यातून पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता हे प्रकरण हाताळले, हा प्रकार 'चोर सोडून संन्याशाला फाशी' दिल्यासारखा आहे आणि महाराष्ट्रात पोलीस विभागाचे काम असेच चालत असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणावर बोलताना सपकाळ यांनी मराठा आंदोलनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील वाशी येथे मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण दिल्याचे जाहीर करत गुलाल उधळला होता याची आठवण करून दिली. तसेच, आझाद मैदानातील आंदोलनावेळीही गुलाल उधळला गेला होता, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, असेही ते म्हणाले. या दोन्ही आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले होते, ते जाहीर करावे अशी मागणी सपकाळ यांनी केली. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर जातनिहाय जनगणना करावी, त्यातून मराठा समाजासह सर्वच समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असे मतही सपकाळ यांनी व्यक्त केले. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवेंद्र फडणवीस यांनी याचे प्रायश्चित्त घेऊन राज्याला पूर्णवेळ आणि सक्षम गृहमंत्री द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांच्या मते, महाराष्ट्राचा गृहविभाग 'पांडू हवालदार' चालवतो म्हणूनच राज्यात अवैध धंदे, ड्रग्ज आणि विषारी दारूचे थैमान सुरू आहे.

1 hr ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
1 hr ago
000af367-ea37-4c70-8191-3a4f31095aba

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की राज्यातील परिस्थिती रसातळाला गेली असून खालच्या स्तरापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहोचवले जात आहेत. त्यांच्या आरोपानुसार, हप्ता वसुलीमुळे पोलीस प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही, म्हणूनच राज्यात ड्रग्जचा खुलेआम काळाधंदा, गांजाची विक्री, तसेच हातभट्ट्या आणि विषारी दारूचे थैमान सुरू आहे. पुण्यात विषारी दारूमुळे २२ निष्पाप लोकांचा बळी जाण्याची घटना याच बेबंदशाहीचा परिणाम असून, राज्याचा गृहविभाग 'पांडू हवालदार' चालवत असल्यामुळे सर्वत्र अराजक माजले आहे, असे सपकाळ यांनी घणाघाती आरोप केला. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी पुण्यातील घटनेनंतरच सरकारला जाग आल्याचे सांगितले आणि आता हातभट्ट्या तोडण्याची कारवाई केली जात असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, या हातभट्ट्या काही एका रात्रीत उभ्या राहिलेल्या नाहीत; राज्यात ५०० शहरे आणि ४३ हजार गावखेड्यांमध्ये अवैध धंदे आणि हातभट्ट्या राजरोसपणे सुरू आहेत. गुजरातमधून महाराष्ट्रात येणारे ड्रग्ज, 'जामतारा'सारखी प्रकरणे आणि अवैध धंद्यांची साखळी गृहविभागाच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्यच बदलल्याचा दावा करत, पुण्यातील प्रकरणामुळे सर्व स्तरातून व्यक्त होत असलेल्या संतापामुळे स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी सध्या कारवाईचे नाटक केले जात असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. गृहविभागाची कार्यपद्धतीवर टीका करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बुलढाणा जिल्ह्यातील एका प्रकरणाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, एक मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांना एक मृतदेह सापडला. हा मृतदेह त्याच मुलीचा आहे असे समजून पोलिसांनी बेपत्ता मुलीच्या वडील आणि भावाला अटक करून बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडून कबुलीजबाब घेतला. पोलिसांनी ४८ तासात प्रकरण सोडवल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली, मात्र नंतर ती बेपत्ता मुलगी परत समोर आली. यातून पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता हे प्रकरण हाताळले, हा प्रकार 'चोर सोडून संन्याशाला फाशी' दिल्यासारखा आहे आणि महाराष्ट्रात पोलीस विभागाचे काम असेच चालत असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणावर बोलताना सपकाळ यांनी मराठा आंदोलनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील वाशी येथे मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण दिल्याचे जाहीर करत गुलाल उधळला होता याची आठवण करून दिली. तसेच, आझाद मैदानातील आंदोलनावेळीही गुलाल उधळला गेला होता, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, असेही ते म्हणाले. या दोन्ही आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले होते, ते जाहीर करावे अशी मागणी सपकाळ यांनी केली. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर जातनिहाय जनगणना करावी, त्यातून मराठा समाजासह सर्वच समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असे मतही सपकाळ यांनी व्यक्त केले. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवेंद्र फडणवीस यांनी याचे प्रायश्चित्त घेऊन राज्याला पूर्णवेळ आणि सक्षम गृहमंत्री द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांच्या मते, महाराष्ट्राचा गृहविभाग 'पांडू हवालदार' चालवतो म्हणूनच राज्यात अवैध धंदे, ड्रग्ज आणि विषारी दारूचे थैमान सुरू आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्रामध्ये मराठा, ओबीसी आणि इतर समाजांमध्ये जाणीवपूर्वक निर्माण होत चाललेल्या वाढत्या दरीवर आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी या सद्यस्थितीवर नेमका उपाय काय असू शकतो आणि या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. पटोले यांच्या मतानुसार, महाराष्ट्राला विकासाच्या मुख्य मुद्द्यांवरून भरकटवण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे मूळ प्रश्न लपवण्यासाठी मुद्दाम समाज-समाजामध्ये वाद निर्माण केले जात आहेत. याचसोबत, अनुसूचित जातींमधील (SC) उपवर्गीकरणाचा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर, आता मूळ प्रश्नांवर एकत्र येण्याची आणि महाराष्ट्राची सामाजिक वीण घट्ट करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन नानाभाऊ पटोले यांनी केले आहे.
    1
    महाराष्ट्रामध्ये मराठा, ओबीसी आणि इतर समाजांमध्ये जाणीवपूर्वक निर्माण होत चाललेल्या वाढत्या दरीवर आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी या सद्यस्थितीवर नेमका उपाय काय असू शकतो आणि या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

पटोले यांच्या मतानुसार, महाराष्ट्राला विकासाच्या मुख्य मुद्द्यांवरून भरकटवण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे मूळ प्रश्न लपवण्यासाठी मुद्दाम समाज-समाजामध्ये वाद निर्माण केले जात आहेत. याचसोबत, अनुसूचित जातींमधील (SC) उपवर्गीकरणाचा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर, आता मूळ प्रश्नांवर एकत्र येण्याची आणि महाराष्ट्राची सामाजिक वीण घट्ट करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन नानाभाऊ पटोले यांनी केले आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • या भागात वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या दिसून येत आहे.
    2
    या भागात वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या दिसून येत आहे.
    user_Ashraf Ahmed
    Ashraf Ahmed
    Contractor उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे इमामांच्या स्मरणार्थ एका ताझियाती जलशाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मोमीन समुदाय सहभागी झाला होता.
    1
    ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे इमामांच्या स्मरणार्थ एका ताझियाती जलशाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मोमीन समुदाय सहभागी झाला होता.
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ग्राहकांनी पूर्ण रक्कम भरल्यानंतरही त्यांना एचएसआरपी (HSRP) आणि वाहन विमा मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदारांनुसार, शोरूम मालकाने ग्राहकांकडून पूर्ण पैसे घेतले, परंतु आवश्यक सेवा पुरवल्या नाहीत. यानंतर, शोरूम बंद करून मालक फरार झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे.
    1
    ग्राहकांनी पूर्ण रक्कम भरल्यानंतरही त्यांना एचएसआरपी (HSRP) आणि वाहन विमा मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदारांनुसार, शोरूम मालकाने ग्राहकांकडून पूर्ण पैसे घेतले, परंतु आवश्यक सेवा पुरवल्या नाहीत. यानंतर, शोरूम बंद करून मालक फरार झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे.
    user_Visas Verma
    Visas Verma
    Thane, Maharashtra•
    3 hrs ago
  • कुर्ला येथील करिश्मा ढाब्यामध्ये खबसा राईसच्या मुद्द्यावरून हॉटेल मालक आणि एका ग्राहकामध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला. या घटनेमुळे ढाब्यामध्ये एक प्रकारचा मुंबईमुद्दा निर्माण झाला असून, ही बातमी सध्या व्हायरल होत आहे.
    1
    कुर्ला येथील करिश्मा ढाब्यामध्ये खबसा राईसच्या मुद्द्यावरून हॉटेल मालक आणि एका ग्राहकामध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला. या घटनेमुळे ढाब्यामध्ये एक प्रकारचा मुंबईमुद्दा निर्माण झाला असून, ही बातमी सध्या व्हायरल होत आहे.
    user_Parvez Shaikh
    Parvez Shaikh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कौसा परिसरात पाणीपुरवठा ५० एमएलडीने वाढवण्यासाठी शानू पठाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
    1
    ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कौसा परिसरात पाणीपुरवठा ५० एमएलडीने वाढवण्यासाठी शानू पठाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
    user_मुंब्रा टाइम्स
    मुंब्रा टाइम्स
    Local News Reporter अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मुंब्रा-कौसाच्या विकासासंदर्भात अशरफ शानू पठान यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वपूर्ण भेट घेतली. या भेटीदरम्यान, ठाणे, मुंब्रा आणि कौसा शहरांसाठी ५० MLD अतिरिक्त पाण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, विविध विकासकामांवरही सविस्तर चर्चा झाली.
    1
    मुंब्रा-कौसाच्या विकासासंदर्भात अशरफ शानू पठान यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वपूर्ण भेट घेतली. या भेटीदरम्यान, ठाणे, मुंब्रा आणि कौसा शहरांसाठी ५० MLD अतिरिक्त पाण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, विविध विकासकामांवरही सविस्तर चर्चा झाली.
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • एका तरुणाला ऑटोवर स्टंटबाजी करणे खूप महागात पडले आहे.
    1
    एका तरुणाला ऑटोवर स्टंटबाजी करणे खूप महागात पडले आहे.
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.