*अर्जुनी/मोरगाव - ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बदनामी करणाऱ्या सोशल मीडिया रील्सविरोधात कठोर कारवाईची मागणी,अर्जुनी/मोरगाव तालुका सरपंच-उपसरपंच संघटनेचे पंचायत समिती प्रशासन व पोलीसांना निवेदन* *अर्जुनी/मोरगाव - ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बदनामी करणाऱ्या सोशल मीडिया रील्सविरोधात कठोर कारवाईची मागणी,अर्जुनी/मोरगाव तालुका सरपंच-उपसरपंच संघटनेचे पंचायत समिती प्रशासन व पोलीसांना निवेदन* अर्जुनी/मोरगाव - तालुक्यातील सरपंच, उपसरपंच,प्रशासक तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर बदनामीकारक रील्स व व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी अर्जुनी/मोरगाव तालुका सरपंच-उपसरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली.याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी 27 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी अर्जुनी/मोरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच अर्जुनी/मोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांना निवेदन दिले.निवेदनात नमूद केल्यानुसार अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील अर्जुनी/मोरगाव,नवेगाव/बांध व केशोरी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील काही गावांमध्ये सोशल मीडियाचा गैरवापर करून लोकनियुक्त सरपंच-उपसरपंच,प्रशासक, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सचिव यांच्याविरुद्ध खोडसाळ, बदनामीकारक आणि आक्षेपार्ह रील्स व व्हिडिओ तयार करून ते व्हॉट्सॲप,फेसबुक,इन्स्टाग्राम आदी माध्यमांवर प्रसारित केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.अशा प्रकारच्या व्हिडिओंमुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची नाहक बदनामी होत असून गावातील सामाजिक सलोखा व शांततेच्या वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींवर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी संबंधित समाजकंटकांचा तातडीने शोध घेऊन लागू असलेल्या माहिती-तंत्रज्ञान कायदे व भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली. निवेदन देताना सरपंच-उपसरपंच संघटनेचे प्रभारी तालुकाध्यक्ष बंसीधर लंजे,सल्लागार हेमकृष्ण संग्रामे,अरततोंडीचे सरपंच प्रदीप कांबळे,तुकूमनारायणचे सरपंच नरेंद्र लोथे,नवनीतपूरचे सरपंच मोहन साखरे,महालगावच्या सरपंच मीना शहारे यांच्यासह तालुक्यातील सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.
*अर्जुनी/मोरगाव - ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बदनामी करणाऱ्या सोशल मीडिया रील्सविरोधात कठोर कारवाईची मागणी,अर्जुनी/मोरगाव तालुका सरपंच-उपसरपंच संघटनेचे पंचायत समिती प्रशासन व पोलीसांना निवेदन* *अर्जुनी/मोरगाव - ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बदनामी करणाऱ्या सोशल मीडिया रील्सविरोधात कठोर कारवाईची मागणी,अर्जुनी/मोरगाव तालुका सरपंच-उपसरपंच संघटनेचे पंचायत समिती प्रशासन व पोलीसांना निवेदन* अर्जुनी/मोरगाव - तालुक्यातील सरपंच, उपसरपंच,प्रशासक तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर बदनामीकारक रील्स व व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी अर्जुनी/मोरगाव तालुका सरपंच-उपसरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली.याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी 27 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी अर्जुनी/मोरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच अर्जुनी/मोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांना निवेदन दिले.निवेदनात नमूद केल्यानुसार अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील अर्जुनी/मोरगाव,नवेगाव/बांध व केशोरी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील काही गावांमध्ये सोशल मीडियाचा गैरवापर करून लोकनियुक्त सरपंच-उपसरपंच,प्रशासक, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सचिव यांच्याविरुद्ध खोडसाळ, बदनामीकारक आणि आक्षेपार्ह रील्स व व्हिडिओ तयार करून ते व्हॉट्सॲप,फेसबुक,इन्स्टाग्राम आदी माध्यमांवर प्रसारित केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.अशा प्रकारच्या व्हिडिओंमुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची नाहक बदनामी होत असून गावातील सामाजिक सलोखा व शांततेच्या वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींवर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी संबंधित समाजकंटकांचा तातडीने शोध घेऊन लागू असलेल्या माहिती-तंत्रज्ञान कायदे व भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली. निवेदन देताना सरपंच-उपसरपंच संघटनेचे प्रभारी तालुकाध्यक्ष बंसीधर लंजे,सल्लागार हेमकृष्ण संग्रामे,अरततोंडीचे सरपंच प्रदीप कांबळे,तुकूमनारायणचे सरपंच नरेंद्र लोथे,नवनीतपूरचे सरपंच मोहन साखरे,महालगावच्या सरपंच मीना शहारे यांच्यासह तालुक्यातील सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.
- बोदा गावात सार्वजनिक देणगीतून बांधलेल्या सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन तिरोडा:- बोदा गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लिमिटेडच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन बुधवारी सार्वजनिक देणग्यांतून करण्यात आले. ही इमारत गावकरी आणि संस्थेच्या सदस्यांकडून गोळा केलेल्या देणग्यांमधून बांधण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप भाऊ बनसोड यांच्या हस्ते झाले. तिरोडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ओम भाऊ पाटले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. अविनाशजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला मोठ्या संख्येने अधिकारी, संचालक मंडळ, मान्यवर आणि गावकरी उपस्थित होते. या प्रसंगी वक्त्यांनी नमूद केले की, गावकऱ्यांनी आपल्या कष्टाच्या पैशातून आणि सार्वजनिक देणग्यांमधून संस्थेसाठी ही इमारत बांधली आहे. हे निश्चितच ग्रामीण एकतेचे आणि सहकार्याच्या भावनेचे उदाहरण आहे. तथापि, ही परिस्थिती ग्रामीण विकास आणि सहकारी संस्थांप्रति सरकारच्या जबाबदारीबद्दल गंभीर प्रश्नही निर्माण करते. ग्रामीण भागातील विकासासाठी सरकारी योजना आणि निधी उपलब्ध असूनही, जर एखाद्या सहकारी संस्थेला स्वतःची इमारत बांधण्यासाठी सार्वजनिक देणग्या गोळा कराव्या लागत असतील, तर ही चिंतेची बाब आहे. ग्रामीण लोकसंख्येचा विकास आणि सहकारी संस्थांच्या पायाभूत सुविधांची जबाबदारी केवळ जनतेचीच आहे का? सरकारने ग्रामीण भागाच्या खऱ्या गरजांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि सहकारी संस्थांना आवश्यक पाठिंबा दिला पाहिजे. सार्वजनिक देणग्यांनी बांधलेली ही इमारत सार्वजनिक एकतेचे प्रतीक आहे, परंतु ती सरकारकडे ठोस पावले उचलण्याची आणि ग्रामीण विकास, सहकारी संस्था व शेतकरी-संबंधित संघटनांना बळकट करण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य देण्याची मागणीही करते. कार्यक्रमाच्या शेवटी, संस्थेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व पाहुणे, सदस्य आणि गावकऱ्यांचे आभार मानले.1
- गोंदिया के टांडा-अदासी मार्ग पर गड्ढे, कापसे कॉलेज ने की मरम्मत खबर और विज्ञापन के लिये 9607860369 पर कॉल करें, डायरेक्टर एवं मुख्य संपादक भूषण राजे1
- अनवारे मुस्तफा कमेटी शास्त्री वार्ड मे नाश्ते के अनेक प्रकार स्वादिष्ट जलपान या अल्पाहार पानी शरबत की कोल्ड ड्रिंक व्यवस्था की गई जश्ने ईद मिलादुन्नबी ईद पर 'लब्बैक या रसूल अल्लाह' की गूंज गोंदिया, ब्यूरो. इस्लाम के पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा (सल्लल्लाहो अलैहि वसल्लम) की विलादत के मुबारक अवसर पर शहर में जश्न-ए-ईद मिलादुन्नबी पूरे अकीदत, उत्साह और सौहार्द के साथ मनाया गया. इस अवसर पर शहर की फिजा 'लब्बैक या रसूल अल्लाह' की सदाओं से गूंज उठी. मरकजी सीरतुन्नबी कमेटी की निगरानी में निकाले गए जुलूस-ए-मोहम्मदिया में बड़ी संख्या में मुस्लिम समाज के लोगों ने हिस्सा लिया. पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद (स.अ.व.) की तालीमात को इंसानियत, अमन, सादगी, गरीबों, बेसहारा और जरूरतमंदों के अधिकारों तथा महिलाओं और बेटियों के सम्मान का संदेश बताते हुए शहरभर में मिलाद का जश्न मनाया गया अनवारे मुस्तफा कमेटी शास्त्री वार्ड मे नाश्ते के अनेक प्रकार स्वादिष्ट जलपान या अल्पाहार पानी शरबत की कोल्ड ड्रिंक व्यवस्था की गई मरकजी कमेटी के सदर 'ईशान' शेख का जगह-जगह इस्तकबाल जश्न-ए-ईद मिलादुन्नबी के आयोजन में मरकजी सीरतुन्नबी कमेटी के सदर जनाब ईरशाद (ईशान) शेख का विभिन्न चौक-चौराहों पर गर्मजोशी से स्वागत किया गया. मुस्लिम समाज के लोगों के साथ ही अन्य समाज के नागरिकों, सामाजिक कार्यकर्ताओं और राजनीतिक क्षेत्र से जुड़े लोगों ने भी फूलों की मालाएं व गुलदस्ते भेंट कर उनका इस्तकबाल किया. मरकजी सीरतुन्नबी कमेटी के सदर ईरशाद (ईशान) शेख और कमेटी पदाधिकारियों ने जुलूस के सफल व शांतिपूर्ण आयोजन में सहयोग देने वाले पुलिस प्रशासन, सामाजिक संगठनों, विभिन्न समाजों के नागरिकों तथा सभी सहयोगियों का आभार व्यक्त किया. परचमकुशाई और सलात-ओ-सलाम : जुलूस से पहले शहर की विभिन्न मस्जिदों में सुबह सादिक के समय नमाज-ए-फजर अदा की गई. इसके बाद परचमकुशाई की रस्म हुई सब्ज पताकों, रोशनी और आकर्षक गेटों से सजा शहर जश्न-ए-ईद मिलादुन्नबी को लेकर शहर के विभिन्न हिस्सों में विशेष सजावट की गई. प्रमुख मागों और मुस्लिम बहुल क्षेत्रों में सब्ज पताकाएं, आकर्षक रोशनी और स्वागत द्वार लगाए गए. कई स्थानों पर इस्लामी झांकियां भी तैयार की गईं, जिन्होंने लोगों का ध्यान आकर्षित किया. जुलूस-ए-मोहम्मदिया का समापन सुभाष स्कूल ग्राउंड में हुआ. इसके बाद सुभाष स्कूल ग्राउंड के साथ ही हुसैनी चौक, रामनगर और बाजार चौक में आम लंगर का आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में लोगों ने सहभागिता की. जुलूस के दौरान अकीदतमंदों ने नात-ए-पाक पढ़ते हुए और दरूद-ओ-सलाम पेश करते हुए अपने नबी की आमद की खुशी का इजहार किया. तथा पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा (स.अ.व.) की विलादत के मौके पर सलात-ओ-सलाम का नजराना पेश किया गया. अफसरी कादिर शेख जिला - गोंदिया4
- सालेकसा तालुक्यात विविध पोलीस ठाणे व कॅम्प येथे भाजप महिला आघाडीतर्फे 'रक्षाबंधन कार्यक्रम' संपन्न; पोलिसांकडून भावना व्यक्त नमस्कार, 'सत्य को जानो न्यूज' मध्ये आपले स्वागत आहे. सालेकसा: भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, सालेकसा तालुक्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) रोजी सालेकसा तालुक्यातील विविध ठिकाणी उत्साहात 'रक्षाबंधन कार्यक्रम' आयोजित करण्यात आला होता. भाजप महिला आघाडी सालेकसाच्या तालुकाध्यक्ष सौ. संगीताताई कुरंजेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन सौ. सविता संजय पुराम (माजी सभापती तथा सदस्य, जि.प. गोंदिया / प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र) यांनी केले होते. यावेळी आयोजक सौ. सविता संजय पुराम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मागील १० वर्षांपासून अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांना आपल्या नोकरीमुळे बऱ्याचदा रक्षाबंधनासारख्या सणापासून वंचित राहावे लागते. त्यांच्या मनातील हीच उणीव व पोकळी भरून काढण्याकरिता हा उपक्रम सातत्याने राबविला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाची वेळ व ठिकाणे: * सकाळी 10 वाजता: पोलीस स्टेशन सालेकसा * सकाळी 11 वाजता: पोलीस कॅम्प पिपरीया * दुपारी 12:30 वाजता: पोलीस कॅम्प दर्रेकसा * दुपारी 2 वाजता: पोलीस कॅम्प मुरकुरडोह * दुपारी 4 वाजता: पोलीस कॅम्प बिजेपार अधिकारी व पोलिसांची प्रतिक्रिया: या उपक्रमांतर्गत बेस कॅम्प मुरकुरडोह येथे भेट देऊन महिला पदाधिकाऱ्यांनी सर्व पोलीस बांधवांना राखी बांधली. याविषयी बोलताना पोलिस उपनिरीक्षक सागर चव्हाण (बेस कॅम्प मुरकुरडोह प्रभारी) यांनी सांगितले की, पोलिस खात्यात सतत बाहेर राहावे लागत असल्यामुळे आणि सुट्ट्या मिळत नसल्याने पोलिसांना कुटुंबीयांसोबत सण साजरा करणे कठीण होते. परंतु, सौ. सविताताई पुराम आणि त्यांच्या महिला टीमने भेट देऊन आम्हा सर्वांना राखी बांधली, ज्यामुळे एक भावनिक पोकळी भरून निघाल्यासारखे वाटले. याप्रसंगी त्यांनी सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच, पीएसआय सतीश एन. शेळके (बटालियन क्रमांक ९ अमरावती) यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ते सतत नक्षलग्रस्त भागात बंदोबस्तासाठी बाहेर असतात. अशा परिस्थितीत महिला आघाडीने कॅम्पवर येऊन जी रक्षारूपी ओढ व भावना व्यक्त केली आणि भर-भरून औक्षण केले, त्याबद्दल त्यांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले. आमगाव तालुका प्रतिनिधी: नरेश सुरेश बोपचे (Swarajyadoot)1
- पवित्रता व परमात्मप्रेमाचा संदेश देत ब्रह्माकुमारीजमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, कामठी सेवा केंद्राच्या वतीने रक्षाबंधन पर्व आध्यात्मिक उत्साह, पवित्रता आणि परमात्मप्रेमाच्या वातावरणात मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, भाऊ-बहिणी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात परमात्म स्मरणाने करण्यात आली. यानंतर ब्रह्माकुमारी बहिणींनी उपस्थितांना राखी बांधून ईश्वरीय मर्यादा, पवित्रता, सद्भावना आणि सकारात्मक जीवन जगण्याचा संकल्प दिला. यावेळी ब्रह्माकुमारी बी.के. प्रेमलता दीदी (संचालिका, कामठी क्षेत्र) यांनी रक्षाबंधनाच्या आध्यात्मिक महत्त्वावर प्रकाश टाकताना सांगितले की, खरी रक्षा ही केवळ बाह्य स्वरूपाची नसून मन, बुद्धी आणि विचारांना विकार व नकारात्मकतेपासून सुरक्षित ठेवण्यात आहे. राखी आत्म्याला परमात्मप्रेमाशी जोडून जीवनात शांती, पवित्रता आणि सद्भावना रुजविण्याचा संदेश देते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून पलोटी स्कूलच्या व्यवस्थापिका शिमिला मॅडम, प्राचार्या अनिला मॅडम, पीएसआय पवार, रूची अॅग्रो फार्मचे संचालक महेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते. त्यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार देवराव रडके, नागोराव साबळे, देवराव आमधरे, विमलताई साबळे, गुलाबराव ढेंगे, निलेश रावेकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना राखी बांधून तिलक लावण्यात आले तसेच ईश्वरीय प्रसादाचे वितरण करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम शांतता, प्रेम आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारलेला होता. या उपक्रमातून समाजात बंधुभाव, प्रेम, पवित्रता आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश देण्यात आला.2
- माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती सोहळ्याचे ३० ऑगस्टला आयोजन माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती सोहळ्याचे ३० ऑगस्टला आयोजन महापौर नीताताई ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार नागपूर : महानुभाव पंथातील थोर ज्ञानवंत माहूर पीठाचे कवीश्वराचार्य गुरुवर्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती निमित्त अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता. कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर येथे करण्यात आले आहे. अभिष्टचिंतन आयोजन समिती आणि नागपूर जिल्हा महानुभाव परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री देवदेवेश्वर श्री दत्त मंदिर, माहूरचे संचालक कवीश्वराचार्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. घोटी (नाशिक) येथील महानुभाव आश्रमाचे संचालक उपाध्य कुलभूषण आचार्य श्री पूजेदकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. सोहळ्याचे उद्घाटन उपाध्य कुलाचार्य महंत श्री वर्धनश्य बिडकर बाबा यांच्या शुभहस्ते होणार असून, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या महापौर मा. नीताताई ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी अजिंठा निवासी आचार्य प्रवर महंत श्री रिद्धूपुरकर बाबा शास्त्री आणि रिद्धपूर निवासी आचार्य प्रवर महंत श्री गोपीराज बाबा शास्त्री यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. ‘व्रतस्थ’ स्मरणिकेचे प्रकाशन माहूरकर बाबा शास्त्री यांनी अशोकांची व रुग्ण संतजनांची सेवा, मंदिर जीर्णोद्धार, ग्रंथ प्रकाशन यांसह विविध सामाजिक व धार्मिक कार्यांत योगदान दिले आहे. ज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचणारे, निष्कलंक चारित्र्य आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘व्रतस्थ’ या गौरवपर स्मरणिकेचे विमोचन फलटण निवासी कवीश्वर कुलाचार्य महंत श्री विद्रांस बाबा यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक व चिंतनशील आचार्य श्री बाबुळगावकर बाबा शास्त्री यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आचार्य श्री न्यायव्यास बाबा शास्त्री उपस्थित राहणार आहेत. तसेच स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याच्या नगररचना विभागाचे माजी संचालक श्री एन. आर. शेळे यांची उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतून ज्ञानसंपन्न संत-महंत, महानुभाव पंथाचे अनुयायी तसेच मान्यवर या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. असे पत्रकार परिषदेमध्ये पुरुषोत्तम ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.1
- माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती सोहळ्याचे ३० ऑगस्टला आयोजन माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती सोहळ्याचे ३० ऑगस्टला आयोजन महापौर नीताताई ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार नागपूर : महानुभाव पंथातील थोर ज्ञानवंत माहूर पीठाचे कवीश्वराचार्य गुरुवर्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती निमित्त अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता. कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर येथे करण्यात आले आहे. अभिष्टचिंतन आयोजन समिती आणि नागपूर जिल्हा महानुभाव परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री देवदेवेश्वर श्री दत्त मंदिर, माहूरचे संचालक कवीश्वराचार्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. घोटी (नाशिक) येथील महानुभाव आश्रमाचे संचालक उपाध्य कुलभूषण आचार्य श्री पूजेदकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. सोहळ्याचे उद्घाटन उपाध्य कुलाचार्य महंत श्री वर्धनश्य बिडकर बाबा यांच्या शुभहस्ते होणार असून, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या महापौर मा. नीताताई ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी अजिंठा निवासी आचार्य प्रवर महंत श्री रिद्धूपुरकर बाबा शास्त्री आणि रिद्धपूर निवासी आचार्य प्रवर महंत श्री गोपीराज बाबा शास्त्री यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. ‘व्रतस्थ’ स्मरणिकेचे प्रकाशन माहूरकर बाबा शास्त्री यांनी अशोकांची व रुग्ण संतजनांची सेवा, मंदिर जीर्णोद्धार, ग्रंथ प्रकाशन यांसह विविध सामाजिक व धार्मिक कार्यांत योगदान दिले आहे. ज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचणारे, निष्कलंक चारित्र्य आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘व्रतस्थ’ या गौरवपर स्मरणिकेचे विमोचन फलटण निवासी कवीश्वर कुलाचार्य महंत श्री विद्रांस बाबा यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक व चिंतनशील आचार्य श्री बाबुळगावकर बाबा शास्त्री यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आचार्य श्री न्यायव्यास बाबा शास्त्री उपस्थित राहणार आहेत. तसेच स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याच्या नगररचना विभागाचे माजी संचालक एन. आर. शेळे यांची उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतून ज्ञानसंपन्न संत-महंत, महानुभाव पंथाचे अनुयायी तसेच मान्यवर या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. असे पत्रकार परिषदेमध्ये पुरुषोत्तम ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.1
- नागपुरात भिवापूरच्या मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित नागपुरात भिवापूरच्या मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित1