Shuru
Apke Nagar Ki App…
मुळा पाटबंधारे विभागाच्या मुख्य चारीला जवखेडे खालसा येथे घळ पडल्याने पाटाचे पाणी वाया, शेतकऱ्यांच्या शेतात पाटाचे पाणी घुसल्याने नूकसान ग्रस्त शेतकरी हवालदिल ? https://www.janlakshya.com/news-post/18082
Pramod dada bari
मुळा पाटबंधारे विभागाच्या मुख्य चारीला जवखेडे खालसा येथे घळ पडल्याने पाटाचे पाणी वाया, शेतकऱ्यांच्या शेतात पाटाचे पाणी घुसल्याने नूकसान ग्रस्त शेतकरी हवालदिल ? https://www.janlakshya.com/news-post/18082
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by अ टाइम्स सागर भाऊ भोसले2
- Post by Peoples News 241
- Post by Riyazisaksayyed1
- राजुर बस स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय चालत असलेल्या पती-पत्नींना पोलिसांनी केली अटक1
- Post by YUVA JALNA NEWS1
- गतिरोधक की डिव्हायडर... प्रवासी वर्गात संभ्रम ! शेवगाव–नेवासा रस्त्यावरील अर्धवट गतिरोधक प्रवाशांसाठी ठरतोय डोकेदुखी; तातडीने तांत्रिक सुधारणा करण्याची प्रवासी वर्गाची मागणी.... शेवगाव दि १२ शेवगाव–नेवासा रोडवरील त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या समोरील रस्त्यावर शेवगाव बांधकाम विभागाच्या वतीने अलीकडेच एक गतिरोधक उभारण्यात आले.. आहे. मात्र हे गतिरोधक नेमके गतिरोधक आहे की डिव्हायडर याबाबत वाहनचालक व सामान्य प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अगोदरच शिक्षण संस्थेचे प्रवेशद्वार हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले असतांना हि गतिरोधकाची अडचण निर्माण झाल्याने हे गतिरोधक विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी आहे की विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढवण्यासाठी आहे, हे मात्र विद्यार्थ्यांना ही समजेना ? सदर संरचनेला गतिरोधक म्हणावे, तर तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेले फलक, रिफ्लेक्टर, रंगसंगती अथवा सूचक चिन्हे कुठेही लावण्यात आलेली नाहीत. परिणामी, येणारी-जाणारी वाहने थेट या अडथळ्यावर आदळत असून, वाहनचालक व प्रवाशांना कंबर, मणके व हाडांच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. सामान्यतः शाळा-महाविद्यालय परिसरात गतिरोधक बसवण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांची सुरक्षितता राखणे हा असतो. मात्र येथे गतिरोधक उभारल्यानंतरही वाहनचालक या अडथळ्यावरून न जाता शाळेच्या गेटलगतच्या मोकळ्या जागेतून वाहने नेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. त्यामुळे ही रचना गतिरोधक आहे की डिव्हायडर, याबाबत प्रवाशांना अजूनही स्पष्टता नाही. या तथाकथित गतिरोधकाच्या अयोग्य व अर्धवट रचनेमुळे बांधकाम विभागातील अभियंते, उपअभियंते व रस्त्यावर काम करणाऱ्या पर्यवेक्षकांची कारागिरी जनतेसमोर उघडी पडली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, प्रवासी वर्गातून या गतिरोधकाला तातडीने तांत्रिकदृष्ट्या योग्य स्वरूप देण्यात यावे, आवश्यक ते फलक, रंग व रिफ्लेक्टर लावून त्याचे शास्त्रशुद्ध पुनर्भरण करावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. याशिवाय, आधीच अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर या अडथळ्यामुळे आणखी अडचणी निर्माण झाल्या असून, वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.2
- विहीरीत पडल्याने गायीचा मृत्यू; वळु बचावला खामगाव : स्थानिक सिव्हील लाईन भागातील सप्तश्रृंगी मंदिर जवळील खुल्या प्लॉट मधील पडक्या विहीरीत १० जानेवारी २६ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वळु गायीचा पाठलाग करीत असतांना गाय व वळु विहीरीत पडले. सदर घटना निदर्शनास येताच उपस्थित नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. राजुभाऊ अवचार यांनी न.प. आरोग्य विभागाचे अनंत निळे यांना याबाबत माहिती दिली असता ते लगेच घटनास्थळी क्रेन घेऊन दाखल झाले व क्रेनद्वारे गाय व वहुला बाहेर काढले होते. यावेळी वळु बचावला होता मात्र दुर्देवाने गायीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मृत गायीवर रावण टेकडी भागातील डींग ग्राउंडजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. बचाव कार्यात एकनिष्ठाचे सुरज यादव व त्यांचे सहकारी यांनी मोलाची भुमिका बजावली. तर नगरसेवक महेंद्र रोहणकार, नगरसेविका सौ. ज्योती श्रीकांत भुसारी, युवा हिंदु प्रतिष्ठाणचे रोहीत पगारिया, प्रसाद डोरले, संजय शर्मा, महेश देशमुख, पप्पु शहाणे आर्दिनी सहकार्य केले.1
- Post by अ टाइम्स सागर भाऊ भोसले1