logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

निवडणूक आयोग कडून ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर निवडणूक आयोग कडून ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर ! मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापन ग्रामपंचायतींसाठी प्रक्रिया सुरू; प्रशासक नियुक्ती प्रकरणी २४ फेब्रुवारीला नागपूर उच्च न्यायालय मध्ये सुनावणी ओमप्रकाश उढाण माहे जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाने आदेश क्रमांक ग्रापंनि-२०२५/प्र.क्र.१३१/ई-१४०९६२३/पं.रा.-२ अन्वये हा कार्यक्रम प्रसिद्ध केला असून त्यानुसार तात्काळ कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सन २०२२ च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. २२ नुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम १० मध्ये सुधारित तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपण्याच्या सहा महिने आधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत क्षेत्र व हद्दीमध्ये बदल करता येणार नाही, अशी तरतूद राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केली आहे. प्रभाग रचना कार्यक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी जाहीर कार्यक्रमानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे. तहसीलदारांनी गुगल अर्थ नकाशांवर अधारित प्रत्येक गावाचा नकाशा अंतिम करणे अपेक्षित आहे. तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग व सीमा निश्चित कराव्यात, असे निर्देश आहेत. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी ५ मार्चपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर प्रस्ताव उपविभागीय अधिकारीमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर केला जाईल. जिल्हाधिकारी यांच्याकडून तपासणीनंतर प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल. आयोगाकडून आवश्यक दुरुस्त्या करून २३ मार्चपर्यंत मान्यता दिली जाणार असून ३० मार्चपर्यंत समितीमार्फत अंतिम स्वाक्षऱ्या करून प्रारूप निश्चित करण्यात येईल. हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया ७ एप्रिल २०२६ रोजी प्रारूप प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देऊन हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. १३ एप्रिलपर्यंत हरकती सादर करता येणार असून त्यावर २१ एप्रिलपर्यंत उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील. त्यानंतर २८ एप्रिलपर्यंत जिल्हाधिकारी प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगास सादर करतील. आयोगाच्या मान्यतेनंतर ४ मे २०२६ रोजी अंतिम प्रभाग रचनेची प्रसिद्धी केली जाईल. प्रशासक नियुक्ती प्रकरणी २४ फेब्रुवारीला सुनावणी दरम्यान, ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती संदर्भातील प्रकरणी २४ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्य शासनाने संबंधित सर्व अधिकाऱ्यांना वेळापत्रकानुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले असून ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया नियोजित वेळेत पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

4 hrs ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
4 hrs ago
ddd048f2-7744-4791-873f-7d20d9fec9a3

निवडणूक आयोग कडून ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर निवडणूक आयोग कडून ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर ! मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापन ग्रामपंचायतींसाठी प्रक्रिया सुरू; प्रशासक नियुक्ती प्रकरणी २४ फेब्रुवारीला नागपूर उच्च न्यायालय मध्ये सुनावणी ओमप्रकाश उढाण माहे जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाने आदेश क्रमांक ग्रापंनि-२०२५/प्र.क्र.१३१/ई-१४०९६२३/पं.रा.-२ अन्वये हा कार्यक्रम प्रसिद्ध केला असून त्यानुसार तात्काळ कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सन २०२२ च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. २२ नुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम १० मध्ये सुधारित तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपण्याच्या सहा महिने आधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत क्षेत्र व हद्दीमध्ये बदल करता येणार नाही, अशी तरतूद राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केली आहे. प्रभाग रचना कार्यक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी जाहीर कार्यक्रमानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे. तहसीलदारांनी गुगल अर्थ नकाशांवर अधारित प्रत्येक गावाचा नकाशा अंतिम करणे अपेक्षित आहे. तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग व सीमा निश्चित कराव्यात, असे निर्देश आहेत. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी ५ मार्चपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर प्रस्ताव उपविभागीय अधिकारीमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर केला जाईल. जिल्हाधिकारी यांच्याकडून तपासणीनंतर प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल. आयोगाकडून आवश्यक दुरुस्त्या करून २३ मार्चपर्यंत मान्यता दिली जाणार असून ३० मार्चपर्यंत समितीमार्फत अंतिम स्वाक्षऱ्या करून प्रारूप निश्चित करण्यात येईल. हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया ७ एप्रिल २०२६ रोजी प्रारूप प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देऊन हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. १३ एप्रिलपर्यंत हरकती सादर करता येणार असून त्यावर २१ एप्रिलपर्यंत उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील. त्यानंतर २८ एप्रिलपर्यंत जिल्हाधिकारी प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगास सादर करतील. आयोगाच्या मान्यतेनंतर ४ मे २०२६ रोजी अंतिम प्रभाग रचनेची प्रसिद्धी केली जाईल. प्रशासक नियुक्ती प्रकरणी २४ फेब्रुवारीला सुनावणी दरम्यान, ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती संदर्भातील प्रकरणी २४ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्य शासनाने संबंधित सर्व अधिकाऱ्यांना वेळापत्रकानुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले असून ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया नियोजित वेळेत पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालना - आयशर व दुचाकीचा अपघात एकजण ठार एक गंभीर ! भरघाव आयशर दुचाकीला धडकला जालन्यात भीषण अपघाताची एक घटना समोर येत असून भारघव आयशर व दुचाकीचा अपघात होऊन एक तरुण जण ठार तर एक गंभीर झाल्याची घटना आज मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी घडलीय.
    1
    जालना - आयशर व दुचाकीचा अपघात एकजण ठार एक गंभीर ! भरघाव आयशर दुचाकीला धडकला 
जालन्यात भीषण अपघाताची एक घटना समोर येत असून भारघव आयशर व दुचाकीचा अपघात होऊन एक तरुण जण ठार तर एक गंभीर झाल्याची घटना आज मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी घडलीय.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • जालन्यात पहिल्यांदा पत्रकार संरक्षण कायदा अनुसार गुन्हा नोंद पत्रकारीते यश
    1
    जालन्यात पहिल्यांदा पत्रकार संरक्षण कायदा अनुसार गुन्हा नोंद पत्रकारीते यश
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    पत्रकार जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 min ago
  • भोकरदन मराठी पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध, अध्यक्ष पदी सांडू पाटील नामदे, सचिव पदी दिपक सोळंके, तर उपाध्यक्ष पदी सुरेश शेळके, शेख सलीम यांची निवड Bharat 24taas News
    1
    भोकरदन मराठी पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध, अध्यक्ष पदी सांडू पाटील नामदे, सचिव पदी दिपक सोळंके, तर उपाध्यक्ष पदी सुरेश शेळके, शेख सलीम यांची निवड
Bharat 24taas News
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • शरद मोरे यांची तारीख 16 समोर रोजी स्वीकृत नगरसेवक म्हणून मुख्याधिकारी सुरज बिस्किटे यांचे उपस्थितीत निवड करण्यात आली.
    1
    शरद मोरे यांची तारीख 16 समोर  रोजी स्वीकृत नगरसेवक म्हणून मुख्याधिकारी सुरज बिस्किटे यांचे उपस्थितीत  निवड करण्यात आली.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार Jalna, Jalna•
    9 hrs ago
  • जालना महानगरपालिका में व्यापारी प्रतिनिधित्व की मांग तेज सतीश पंच को स्वीकृत सदस्य बनाए जाने की अपील, कैट मराठवाड़ा अध्यक्ष हस्तीमल बंब ने उठाई आवाज जालना: शहर के विकास में व्यापारी वर्ग के महत्वपूर्ण योगदान को रेखांकित करते हुए कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) के मराठवाड़ा अध्यक्ष हस्तीमल बंब ने नवनिर्वाचित जालना महानगरपालिका में एक सशक्त व्यापारी प्रतिनिधि को शामिल करने की मांग की है. उन्होंने जालना व्यापारी महासंघ के अध्यक्ष एवं कैट के राज्य उपाध्यक्ष सतीश पंच को महानगरपालिका में स्वीकृत सदस्य नियुक्त करने की जोरदार अपील की है. इस संबंध में हस्तीमल बंब ने भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता एवं पूर्व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील से मुलाकात कर उन्हें लिखित निवेदन सौंपा. बंब ने कहा कि जालना को व्यापारियों और उद्यमियों का शहर माना जाता है, ऐसे में नगर प्रशासन में व्यापारिक हितों की प्रभावी पैरवी के लिए अनुभवी और प्रतिबद्ध व्यापारी प्रतिनिधि की उपस्थिति आवश्यक है. *व्यापारियों की मजबूत आवाज जरूरी हस्तीमल बंब ने बताया कि वर्षों से मांग के बावजूद अब तक व्यापारियों के लिए अलग निर्वाचन क्षेत्र की व्यवस्था नहीं हो सकी है. ऐसी स्थिति में कम से कम महानगरपालिका में व्यापारियों का आधिकारिक प्रतिनिधि होना समय की आवश्यकता बन गई है. सतीश पंच ने विभिन्न व्यापारिक और सामाजिक संगठनों में कार्य करते हुए व्यापक अनुभव प्राप्त किया है. उनकी नियुक्ति से कर प्रणाली, बाजारों की बुनियादी सुविधाएं, लाइसेंस प्रक्रिया और यातायात जैसी व्यापारियों की लंबित समस्याओं को प्रशासन तक प्रभावी ढंग से पहुंचाया जा सकेगा. *पार्टी से जुड़ाव और राष्ट्रीय स्तर का समर्थन गौरतलब है कि सतीश पंच हाल ही में भारतीय जनता पार्टी से जुड़े है. व्यापारी वर्ग का भाजपा के साथ लंबे समय से विश्वासपूर्ण संबंध रहा है. मुंबई में आयोजित कैट की एक महत्वपूर्ण बैठक के दौरान संगठन के राष्ट्रीय महासचिव एवं सांसद प्रवीण खंडेलवाल ने भी रावसाहेब दानवे से चर्चा कर व्यापारियों को राजनीति और निर्णय प्रक्रिया में उचित प्रतिनिधित्व दिए जाने की आवश्यकता पर जोर दिया था. *जालना के विकास के लिए अहम कदम हस्तीमल बंब ने विश्वास व्यक्त किया कि राष्ट्रीय नेतृत्व के संकेतों और व्यापारी समुदाय की भावनाओं को ध्यान में रखते हुए यदि सतीश पंच जैसे अनुभवी व्यक्ति को महानगरपालिका में स्थान दिया जाता है, तो इससे जालना के व्यापारिक और औद्योगिक विकास को नई दिशा मिलेगी. शहर के व्यापारी वर्ग से इस मांग को व्यापक समर्थन मिल रहा है और नियुक्ति होने पर व्यापारिक माहौल में सकारात्मक परिवर्तन की उम्मीद जताई जा रही है.
    1
    जालना महानगरपालिका में व्यापारी प्रतिनिधित्व की मांग तेज
सतीश पंच को स्वीकृत सदस्य बनाए जाने की अपील, कैट मराठवाड़ा अध्यक्ष हस्तीमल बंब ने उठाई आवाज
जालना: शहर के विकास में व्यापारी वर्ग के महत्वपूर्ण योगदान को रेखांकित करते हुए कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) के मराठवाड़ा अध्यक्ष हस्तीमल बंब ने नवनिर्वाचित जालना महानगरपालिका में एक सशक्त व्यापारी प्रतिनिधि को शामिल करने की मांग की है. उन्होंने जालना व्यापारी महासंघ के अध्यक्ष एवं कैट के राज्य उपाध्यक्ष सतीश पंच को महानगरपालिका में स्वीकृत सदस्य नियुक्त करने की जोरदार अपील की है.
इस संबंध में हस्तीमल बंब ने भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता एवं पूर्व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील से मुलाकात कर उन्हें लिखित निवेदन सौंपा. बंब ने कहा कि जालना को व्यापारियों और उद्यमियों का शहर माना जाता है, ऐसे में नगर प्रशासन में व्यापारिक हितों की प्रभावी पैरवी के लिए अनुभवी और प्रतिबद्ध व्यापारी प्रतिनिधि की उपस्थिति आवश्यक है.
*व्यापारियों की मजबूत आवाज जरूरी
हस्तीमल बंब ने बताया कि वर्षों से मांग के बावजूद अब तक व्यापारियों के लिए अलग निर्वाचन क्षेत्र की व्यवस्था नहीं हो सकी है. ऐसी स्थिति में कम से कम महानगरपालिका में व्यापारियों का आधिकारिक प्रतिनिधि होना समय की आवश्यकता बन गई है. सतीश पंच ने विभिन्न व्यापारिक और सामाजिक संगठनों में कार्य करते हुए व्यापक अनुभव प्राप्त किया है. उनकी नियुक्ति से कर प्रणाली, बाजारों की बुनियादी सुविधाएं, लाइसेंस प्रक्रिया और यातायात जैसी व्यापारियों की लंबित समस्याओं को प्रशासन तक प्रभावी ढंग से पहुंचाया जा सकेगा.
*पार्टी से जुड़ाव और राष्ट्रीय स्तर का समर्थन
गौरतलब है कि सतीश पंच हाल ही में भारतीय जनता पार्टी से जुड़े है. व्यापारी वर्ग का भाजपा के साथ लंबे समय से विश्वासपूर्ण संबंध रहा है. मुंबई में आयोजित कैट की एक महत्वपूर्ण बैठक के दौरान संगठन के राष्ट्रीय महासचिव एवं सांसद प्रवीण खंडेलवाल ने भी रावसाहेब दानवे से चर्चा कर व्यापारियों को राजनीति और निर्णय प्रक्रिया में उचित प्रतिनिधित्व दिए जाने की आवश्यकता पर जोर दिया था.
*जालना के विकास के लिए अहम कदम
हस्तीमल बंब ने विश्वास व्यक्त किया कि राष्ट्रीय नेतृत्व के संकेतों और व्यापारी समुदाय की भावनाओं को ध्यान में रखते हुए यदि सतीश पंच जैसे अनुभवी व्यक्ति को महानगरपालिका में स्थान दिया जाता है, तो इससे जालना के व्यापारिक और औद्योगिक विकास को नई दिशा मिलेगी. शहर के व्यापारी वर्ग से इस मांग को व्यापक समर्थन मिल रहा है और नियुक्ति होने पर व्यापारिक माहौल में सकारात्मक परिवर्तन की उम्मीद जताई जा रही है.
    user_Imran Siddiqui
    Imran Siddiqui
    Jalna, Maharashtra•
    14 hrs ago
  • नागपुर से वर्धा जा रही ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन में लगी भीषण आग, सामने आया खौफनाक वीडियो। महाराष्ट्र के वर्धा से एक बड़ी खबर सामने आ रही है। यहां ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन की एक बोगी में भीषण आग लग गई। आग लगने की सूचना मिलटे ही ट्रेन को रुकवा गया और सभी यात्रियों को बाहर निकाला गया। इस हादसे में किसी यात्री के घायल होने की खबर नहीं है। ट्रेन में आग लगने का वीडियो भी सामने आया है। वीडियो में साफ देखा जा सकता है कि ट्रेन की बोगी से आग की लपटें निकल रही है। ट्रेन रेलवे ट्रैक पर खड़ी है और आग बुझाने की कोशिश की जा रही है। जानाकरी के अनुसार, यह ट्रेन नागपुर से वर्धा जा रही थी। हेलोडी के पास अचानक ट्रेन की एक बोगी में आग लग गई। फिलहाल आग पर काबू पा लिया गया है।
    1
    नागपुर से वर्धा जा रही ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन में लगी भीषण आग, सामने आया खौफनाक वीडियो।
महाराष्ट्र के वर्धा से एक बड़ी खबर सामने आ रही है। यहां ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन की एक बोगी में भीषण आग लग गई। आग लगने की सूचना मिलटे ही ट्रेन को रुकवा गया और सभी यात्रियों को बाहर निकाला गया। इस हादसे में किसी यात्री के घायल होने की खबर नहीं है। ट्रेन में आग लगने का वीडियो भी सामने आया है। वीडियो में साफ देखा जा सकता है कि ट्रेन की बोगी से आग की लपटें निकल रही है। ट्रेन रेलवे ट्रैक पर खड़ी है और आग बुझाने की कोशिश की जा रही है। जानाकरी के अनुसार, यह ट्रेन नागपुर से वर्धा जा रही थी। हेलोडी के पास अचानक ट्रेन की एक बोगी में आग लग गई। फिलहाल आग पर काबू पा लिया गया है।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    8 hrs ago
  • महाशिवरात्रीच्या पवित्र प्रभातकाळी मंठा नगरी जणू शिवतत्त्वाच्या अलौकिक स्पंदनांनी न्हाऊन निघाली होती. मंदिरांच्या घंटानादात, मंत्रोच्चारांच्या गंभीर लयीत आणि भक्तिभावाच्या ओलाव्यात अध्यात्म, सेवा आणि समाजबंध यांचा दिव्य त्रिवेणी संगम साकार झाला. या मंगल क्षणी Press Council of Maharashtra (पीसीएम) पत्रकार संघ, मंठा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमय फराळ-वाटप उपक्रमाने सेवाभावाची साक्षात मूर्तीच उभी केली. श्री लक्ष्मीनारायण मंदिर तसेच जगदंबादेवी मार्गावरील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक व सात्विक भावनेने फराळाचे वितरण करण्यात आले. पहाटे ६.४५ ते ११.०० या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात प्रत्येक क्षण ‘ॐ नमः शिवाय’च्या अखंड गजराने दुमदुमत होता. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या स्वरांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता; जणू भक्ती आणि सेवा एकरूप होऊन शिवआराधनेचे सजीव रूप धारण करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प. मदने माऊली महाराज विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून पीसीएम पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार हरिराम तिवारी (बाबूजी तिवारी) तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रदीप देशमुख उपस्थित होते. व्यासपीठावर पीसीएम पत्रकार संघ मंठाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी, योगेश देशमुख, जीवन काळे, अतुल खरात, गजानन माळकर, आतिश राठोड, अंकुश देशमाने, सुभाष झरेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. अध्यक्षीय मनोगतात ह.भ.प. मदने माऊली महाराजांनी अन्नदानाचे दैवी महात्म्य अत्यंत भावपूर्ण शब्दांत अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अन्नदान ही केवळ सामाजिक कृती नसून ती आत्म्याला परमेश्वराशी जोडणारी साधना आहे. सेवा हीच खरी शिवपूजा असून, गरजूंना प्रेमाने अन्न देणे म्हणजे शिवतत्त्वाची प्रत्यक्ष आराधना होय. या प्रसंगी त्यांनी अभंगाच्या ओव्या सादर करत वातावरण अधिक भक्तिमय केले— “तेथे एक शीत दिधल्या अन्न! कोटी कुळांचे होय उद्धरण! कोटी याग केले पूर्ण! ऐसे महिमान ये तीर्थाचे!” प्रेमपूर्वक अर्पण केलेला अन्नाचा एक घासही कोटी कुळांच्या उद्धाराचे कारण ठरतो, असे सांगत त्यांनी या उपक्रमास ‘शिवपूजेचे साक्षात रूप’ असे संबोधले. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांप्रती अनेक वर्षांपासून सातत्याने होत असलेले फराळ-वाटप हे निस्सीम सेवाभावाचे तेजस्वी उदाहरण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. समाजात समत्व, करुणा आणि बांधिलकी जपण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रा. प्रदीप देशमुख यांनीही आपल्या मनोगतात सेवा आणि औदार्य हीच खरी संस्कृतीची ओळख असल्याचे प्रतिपादन केले. “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” ही भावना जपली तर समाजपरिवर्तन सहज शक्य होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीसीएम पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अतुल खरात यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश देशमुख, गणेश खराबे, आतिश राठोड, बाळासाहेब खराबे, राजकुमार कांगणे, रशीद पठाण, विजय राठोड, उस्मान पठाण, एकनाथ एंडइत, जिजाभाऊ गते, शेंडगेभाऊ आदींनी परिश्रम घेतले. फराळाची सात्विक व रुचकर तयारी आचारी कैलास पवार, हुकुमसिंग राजपुरोहित आणि प्रल्हाद नरवडे यांनी केली. महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर साकारलेली ही प्रसादवाटप केवळ अन्नवितरणाचा उपक्रम न ठरता समत्व, सेवा आणि श्रद्धेचा सजीव उत्सव ठरली. शिवनामाच्या अखंड गजरात आणि सेवाभावाच्या ऊर्जेतून प्रकटलेली ही शिवआराधना मंठा नगरीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरली—जिथे सेवा म्हणजेच साधना आणि दान म्हणजेच देवत्व, याची अनुभूती सर्वांना लाभली.
    1
    महाशिवरात्रीच्या पवित्र प्रभातकाळी मंठा नगरी जणू शिवतत्त्वाच्या अलौकिक स्पंदनांनी न्हाऊन निघाली होती. मंदिरांच्या घंटानादात, मंत्रोच्चारांच्या गंभीर लयीत आणि भक्तिभावाच्या ओलाव्यात अध्यात्म, सेवा आणि समाजबंध यांचा दिव्य त्रिवेणी संगम साकार झाला. या मंगल क्षणी Press Council of Maharashtra (पीसीएम) पत्रकार संघ, मंठा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमय फराळ-वाटप उपक्रमाने सेवाभावाची साक्षात मूर्तीच उभी केली.
श्री लक्ष्मीनारायण मंदिर तसेच जगदंबादेवी मार्गावरील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक व सात्विक भावनेने फराळाचे वितरण करण्यात आले. पहाटे ६.४५ ते ११.०० या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात प्रत्येक क्षण ‘ॐ नमः शिवाय’च्या अखंड गजराने दुमदुमत होता. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या स्वरांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता; जणू भक्ती आणि सेवा एकरूप होऊन शिवआराधनेचे सजीव रूप धारण करत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प. मदने माऊली महाराज विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून पीसीएम पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार हरिराम तिवारी (बाबूजी तिवारी) तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रदीप देशमुख उपस्थित होते. व्यासपीठावर पीसीएम पत्रकार संघ मंठाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी, योगेश देशमुख, जीवन काळे, अतुल खरात, गजानन माळकर, आतिश राठोड, अंकुश देशमाने, सुभाष झरेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
अध्यक्षीय मनोगतात ह.भ.प. मदने माऊली महाराजांनी अन्नदानाचे दैवी महात्म्य अत्यंत भावपूर्ण शब्दांत अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अन्नदान ही केवळ सामाजिक कृती नसून ती आत्म्याला परमेश्वराशी जोडणारी साधना आहे. सेवा हीच खरी शिवपूजा असून, गरजूंना प्रेमाने अन्न देणे म्हणजे शिवतत्त्वाची प्रत्यक्ष आराधना होय.
या प्रसंगी त्यांनी अभंगाच्या ओव्या सादर करत वातावरण अधिक भक्तिमय केले—
“तेथे एक शीत दिधल्या अन्न!
कोटी कुळांचे होय उद्धरण!
कोटी याग केले पूर्ण!
ऐसे महिमान ये तीर्थाचे!”
प्रेमपूर्वक अर्पण केलेला अन्नाचा एक घासही कोटी कुळांच्या उद्धाराचे कारण ठरतो, असे सांगत त्यांनी या उपक्रमास ‘शिवपूजेचे साक्षात रूप’ असे संबोधले. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांप्रती अनेक वर्षांपासून सातत्याने होत असलेले फराळ-वाटप हे निस्सीम सेवाभावाचे तेजस्वी उदाहरण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. समाजात समत्व, करुणा आणि बांधिलकी जपण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रा. प्रदीप देशमुख यांनीही आपल्या मनोगतात सेवा आणि औदार्य हीच खरी संस्कृतीची ओळख असल्याचे प्रतिपादन केले. “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” ही भावना जपली तर समाजपरिवर्तन सहज शक्य होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीसीएम पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अतुल खरात यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश देशमुख, गणेश खराबे, आतिश राठोड, बाळासाहेब खराबे, राजकुमार कांगणे, रशीद पठाण, विजय राठोड, उस्मान पठाण, एकनाथ एंडइत, जिजाभाऊ गते, शेंडगेभाऊ आदींनी परिश्रम घेतले. फराळाची सात्विक व रुचकर तयारी आचारी कैलास पवार, हुकुमसिंग राजपुरोहित आणि प्रल्हाद नरवडे यांनी केली.
महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर साकारलेली ही प्रसादवाटप केवळ अन्नवितरणाचा उपक्रम न ठरता समत्व, सेवा आणि श्रद्धेचा सजीव उत्सव ठरली. शिवनामाच्या अखंड गजरात आणि सेवाभावाच्या ऊर्जेतून प्रकटलेली ही शिवआराधना मंठा नगरीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरली—जिथे सेवा म्हणजेच साधना आणि दान म्हणजेच देवत्व, याची अनुभूती सर्वांना लाभली.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by YUVA JALNA NEWS
    1
    Post by YUVA JALNA NEWS
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    पत्रकार जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.