धरणगाव पी.आर.हायस्कूल येथे श्रावण धारा पावसाच्या कवितांचा काव्यवाचन सोहळा संपन्न. विद्यार्थ्यांच्या मनावर साहित्याची नवी पालवी फुलवली. धरणगाव, येथील पी.आर. हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात मंगेश पाडगावकरांच्या टप टप थेंब वाजती या गीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील होते.तर मंचावर शाळेचे पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी, मराठी विभाग प्रमुख डॉ.बापू शिरसाठ उपस्थित होते. मुख्याध्यापकांच्या हस्ते दीप प्रज्वलन होताच वातावरणात बालकवींच्या श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे या अमर ओळी घुमू लागल्या आणि उपस्थितांच्या मनात श्रावण दाटून आला. प्रास्ताविकात ज्येष्ठ शिक्षक डॉ. बापू शिरसाठ यांनी पावसाला केवळ एका नजरेतून न पाहता त्याच्या विविध रूपांचे दर्शन घडवणे आणि विद्यार्थ्यांनी पावसाची रूपे आपल्या सादरीकरणातून उलगडावीत हा हेतू कार्यक्रमाचा मांडला. विद्यार्थ्यांनी बालकवी ठोंबरे यांची श्रावण मास,निर्झरास, फुलराणी,औदुंबर, बा.भ. बोरकर यांची घन येती घिरट्या घालिती,ग.दि.माडगुळकर यांची घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा,ना.धों.महानोर यांची नभ उतरू आलं, चिंब थरथर वलं, अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात,अण्णासाहेब किर्लोस्कर यांची नभ मेघांनी आक्रमिले,कवी ग्रेस यांची पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने,भा.रा.तांबे यांची पिवळे तांबूस ऊन कोवळे, पसरे चौफेर,शांता शेळके यांची वादळ वारं सुटलं गो, मंगेश पाडगावकर यांची श्रावणात घन निळा बरसला, आरती प्रभू यांची येरे घना येरे घना , न्हाऊ घाल माझ्या मना आदी कवितांमधून पावसाचा निसर्ग शृंगार आणि शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाऊस जिवंत केला. यावेळी मार्गदर्शनात पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी यांनी मोबाईलच्या युगात मुलांना निसर्गाकडे वळवण्यासाठी कविता हे सर्वात सुंदर माध्यम आहे. पाऊस फक्त भिजवत नाही तर घडवतोही असे नमूद केले.बाहेर प्रत्यक्षात पाऊस नसला तरी प्रत्येकाच्या मनात मात्र श्रावणाच्या सरी बरसत होत्या. कार्यक्रमादरम्यान शिक्षक गोपाल चौधरी यांनी असा रंगारी श्रावण ही कविता गाऊन उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमात त्रिवेणी पाटील, उर्मिला वाणी, रीना सोनवणे, विभा शिरसाठ ,हर्षदा गोरखा, भावना सोनवणे, यशस्वी मुजगे, आराध्या पवार, प्रथमेश माळी, प्रशांत पाटील, डिंपल बडगुजर, गुंजन कोळी, इशिता पाटील, भाग्यश्री कोळी, आरोही भील, उपासना पाटील, तेजस्विनी पाटील, हर्षाली पाटील, प्रांजल धनगर आदी विद्यार्थ्यांनी निसर्गपर, पावसावर आधारित कविता सादर केल्या.सहभागी विद्यार्थ्यांचा शिक्षक संदीप घुगे यांनी पेन देऊन सत्कार केला. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक डी. एस. पाटील यांनी अशा उपक्रमातूनच उद्याचे साहित्यिक घडतील अशी भावना व्यक्त करुन मराठी विभागाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बेलदार यांनी तर आभार संदीप घुगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
धरणगाव पी.आर.हायस्कूल येथे श्रावण धारा पावसाच्या कवितांचा काव्यवाचन सोहळा संपन्न. विद्यार्थ्यांच्या मनावर साहित्याची नवी पालवी फुलवली. धरणगाव, येथील पी.आर. हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात मंगेश पाडगावकरांच्या टप टप थेंब वाजती या गीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील होते.तर मंचावर शाळेचे पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी, मराठी विभाग प्रमुख डॉ.बापू शिरसाठ उपस्थित होते. मुख्याध्यापकांच्या हस्ते दीप प्रज्वलन होताच वातावरणात बालकवींच्या श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे या अमर ओळी घुमू लागल्या आणि उपस्थितांच्या मनात श्रावण दाटून आला. प्रास्ताविकात ज्येष्ठ शिक्षक डॉ. बापू शिरसाठ यांनी पावसाला केवळ एका नजरेतून न पाहता त्याच्या विविध रूपांचे दर्शन घडवणे आणि विद्यार्थ्यांनी पावसाची रूपे आपल्या सादरीकरणातून उलगडावीत हा हेतू कार्यक्रमाचा मांडला. विद्यार्थ्यांनी बालकवी ठोंबरे यांची श्रावण मास,निर्झरास, फुलराणी,औदुंबर, बा.भ. बोरकर यांची घन येती घिरट्या घालिती,ग.दि.माडगुळकर यांची घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा,ना.धों.महानोर यांची नभ उतरू आलं, चिंब थरथर वलं, अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात,अण्णासाहेब किर्लोस्कर यांची नभ मेघांनी आक्रमिले,कवी ग्रेस यांची पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने,भा.रा.तांबे यांची पिवळे तांबूस ऊन कोवळे, पसरे चौफेर,शांता शेळके यांची वादळ वारं सुटलं गो, मंगेश पाडगावकर यांची श्रावणात घन निळा बरसला, आरती प्रभू यांची येरे घना येरे घना , न्हाऊ घाल माझ्या मना आदी कवितांमधून पावसाचा निसर्ग शृंगार आणि शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाऊस जिवंत केला. यावेळी मार्गदर्शनात पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी यांनी मोबाईलच्या युगात मुलांना निसर्गाकडे वळवण्यासाठी कविता हे सर्वात सुंदर माध्यम आहे. पाऊस फक्त भिजवत नाही तर घडवतोही असे नमूद केले.बाहेर प्रत्यक्षात पाऊस नसला तरी प्रत्येकाच्या मनात मात्र श्रावणाच्या सरी बरसत होत्या. कार्यक्रमादरम्यान शिक्षक गोपाल चौधरी यांनी असा रंगारी श्रावण ही कविता गाऊन उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमात त्रिवेणी पाटील, उर्मिला वाणी, रीना सोनवणे, विभा शिरसाठ ,हर्षदा गोरखा, भावना सोनवणे, यशस्वी मुजगे, आराध्या पवार, प्रथमेश माळी, प्रशांत पाटील, डिंपल बडगुजर, गुंजन कोळी, इशिता पाटील, भाग्यश्री कोळी, आरोही भील, उपासना पाटील, तेजस्विनी पाटील, हर्षाली पाटील, प्रांजल धनगर आदी विद्यार्थ्यांनी निसर्गपर, पावसावर आधारित कविता सादर केल्या.सहभागी विद्यार्थ्यांचा शिक्षक संदीप घुगे यांनी पेन देऊन सत्कार केला. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक डी. एस. पाटील यांनी अशा उपक्रमातूनच उद्याचे साहित्यिक घडतील अशी भावना व्यक्त करुन मराठी विभागाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बेलदार यांनी तर आभार संदीप घुगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
- नेपाल का जलप्रलय भारत के दरवाजे पर! बिहार-UP में हाई अलर्ट, कोसी-गंडक मचा सकती हैं तबाही1
- जळगाव शहरात ईद-ए-मिलाद सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात1
- Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त... Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त... - Grand procession on the occasion of Prophet's birth anniversary in Dhule; Attractive scenes attracted attention, tight police security - #DhuleNews #EidEMilad #PaigambarJayanti #DhuleEidEMilad #DhulePolice1
- सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.2
- छत्रपती संभाजीनगर: 'सियाराम डेव्हलपर्स'च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन1
- पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS "पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS #AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod1
- मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो1
- Dhule News | धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यातर्फे ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा; सण शांततेत आणि जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन - धुळे: ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस हा पवित्र आणि महत्त्वाचा असून, हा सण सर्वांनी उत्साहात, जल्लोषात परंतु शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य टाळावे, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. `#DhuleNews` `#DhulePolice` `#VishalAnandSP` `#EidEMilad2025` `#DhuleCity` Dhule News | धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यातर्फे ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा; सण शांततेत आणि जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन - धुळे: ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस हा पवित्र आणि महत्त्वाचा असून, हा सण सर्वांनी उत्साहात, जल्लोषात परंतु शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य टाळावे, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. `#DhuleNews` `#DhulePolice` `#VishalAnandSP` `#EidEMilad2025` `#DhuleCity`1