logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पांतर्गत, बार्शी तालुक्यातील वैराग परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक काळ्या जमिनींचे अधिग्रहण प्रस्तावित ट्रम्पेटमुळे होणार आहे. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांकडे आधीच अत्यल्प जमीन असून, त्यांची संपूर्ण उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या मालकीच्या उर्वरित आणि अत्यंत सुपीक जमिनीही या प्रकल्पात गेल्याने त्यांच्यासमोर गंभीर आर्थिक व सामाजिक संकट उभे राहिले आहे. ही माहिती मोहोळचे आमदार राजू खरे यांनी दिली. वैराग येथील शेतकरी बांधवांनी आमदार राजू खरे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा आणि समस्या मांडल्या. त्यांच्या अडचणी व मागण्या शांतपणे ऐकून घेतल्यानंतर, आमदारांनी संबंधित शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी ट्रम्पेटच्या प्रस्तावित जागेमध्ये आवश्यक बदल करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याची मागणी केली. यासंदर्भात लवकरच वरिष्ठ व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन वैराग परिसरातील शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठोस पाठपुरावा करणार असून, ट्रम्पेटच्या जागेमध्ये योग्य बदल व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार राजू खरे यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांच्या हिताला बाधा येणार नाही, त्यांच्या उपजीविकेवर गदा येणार नाही आणि विकासासोबतच शेतकऱ्यांचाही न्याय होईल, यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी वैराग येथील श्री. शिवाजी खरटमोल, श्री. विठ्ठल कांबळे, श्री. चंद्रकांत खंडाळे, श्री. सतीश सुरवसे, श्री. बापू माने, श्री. गणेश घोडकर, श्री. संतोष हजारे, श्री. शिवाजी कांबळे, श्री. गिरजाप्पा खरटमोल, श्री. आनंद घोटकर, श्री. शरद वायकर, श्री. भिवाजी खरटमोल, श्री. बापू घोंगडे, श्री. राजेभाऊ भोसले, श्री. प्रशांत घोटकर आदी शेतकरी उपस्थित होते.

2 hrs ago
user_EXPRESS NEWS
EXPRESS NEWS
Press advisory Miraj, Sangli•
2 hrs ago
c5f5d10c-b47c-429c-80f1-4ee04d885a66

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पांतर्गत, बार्शी तालुक्यातील वैराग परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक काळ्या जमिनींचे अधिग्रहण प्रस्तावित ट्रम्पेटमुळे होणार आहे. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांकडे आधीच अत्यल्प जमीन असून, त्यांची संपूर्ण उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या मालकीच्या उर्वरित आणि अत्यंत सुपीक जमिनीही या प्रकल्पात गेल्याने त्यांच्यासमोर गंभीर आर्थिक व सामाजिक संकट उभे राहिले

d7cb8ddc-ae60-47cd-bce9-f755f08df952

आहे. ही माहिती मोहोळचे आमदार राजू खरे यांनी दिली. वैराग येथील शेतकरी बांधवांनी आमदार राजू खरे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा आणि समस्या मांडल्या. त्यांच्या अडचणी व मागण्या शांतपणे ऐकून घेतल्यानंतर, आमदारांनी संबंधित शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी ट्रम्पेटच्या प्रस्तावित जागेमध्ये आवश्यक बदल करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी करण्याबाबत सकारात्मक विचार

dbed43f6-ec19-4474-a9be-633f971dd9c0

करण्याची मागणी केली. यासंदर्भात लवकरच वरिष्ठ व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन वैराग परिसरातील शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठोस पाठपुरावा करणार असून, ट्रम्पेटच्या जागेमध्ये योग्य बदल व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार राजू खरे यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांच्या हिताला बाधा येणार नाही, त्यांच्या उपजीविकेवर गदा येणार नाही आणि विकासासोबतच शेतकऱ्यांचाही न्याय होईल, यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे

c557a8ec-9f91-45b6-bb34-430c9bbbe881

त्यांनी सांगितले. याप्रसंगी वैराग येथील श्री. शिवाजी खरटमोल, श्री. विठ्ठल कांबळे, श्री. चंद्रकांत खंडाळे, श्री. सतीश सुरवसे, श्री. बापू माने, श्री. गणेश घोडकर, श्री. संतोष हजारे, श्री. शिवाजी कांबळे, श्री. गिरजाप्पा खरटमोल, श्री. आनंद घोटकर, श्री. शरद वायकर, श्री. भिवाजी खरटमोल, श्री. बापू घोंगडे, श्री. राजेभाऊ भोसले, श्री. प्रशांत घोटकर आदी शेतकरी उपस्थित होते.

More news from Sangli and nearby areas
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अहिल्यानगर येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, मराठा समाजाला न्याय देणे हीच त्यांच्या सरकारची भूमिका राहिली आहे. पत्रकारांच्या समोरच अंतरवाली सराटी येथे मंत्री विखे पाटील आणि आमदार लाड यांनीही हेच विधान वाचून दाखवले.
    1
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अहिल्यानगर येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, मराठा समाजाला न्याय देणे हीच त्यांच्या सरकारची भूमिका राहिली आहे. पत्रकारांच्या समोरच अंतरवाली सराटी येथे मंत्री विखे पाटील आणि आमदार लाड यांनीही हेच विधान वाचून दाखवले.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory Miraj, Sangli•
    3 hrs ago
  • Post by होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    1
    Post by होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 'थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त कोल्हापूर अभियान' या उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे.
    1
    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 'थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त कोल्हापूर अभियान' या उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे.
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे माती टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर सात जणांनी एकत्र येत एका कुटुंबावर हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या रक्तरंजित मारहाणीमध्ये महिलेसह कुटुंबातील सदस्यांवर काठीने हल्ला करण्यात आला. या प्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित सात जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गतही कलम लावण्यात आले असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
    1
    हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे माती टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर सात जणांनी एकत्र येत एका कुटुंबावर हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या रक्तरंजित मारहाणीमध्ये महिलेसह कुटुंबातील सदस्यांवर काठीने हल्ला करण्यात आला.

या प्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित सात जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गतही कलम लावण्यात आले असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • गुजरातमध्ये एका रस्त्याच्या मधोमध एक होर्डिंग अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही.
    1
    गुजरातमध्ये एका रस्त्याच्या मधोमध एक होर्डिंग अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही.
    user_Prime news 83
    Prime news 83
    Solapur South, Maharashtra•
    12 hrs ago
  • सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महायुतीतील विविध राजकीय घडामोडींवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत घेतलेला निर्णय पूर्णपणे मान्य असल्याचे म्हटले. सरनाईक यांनी नमूद केले की, नवीन सरकार स्थापन झाल्यापासून ते सर्वजण रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्याकडे पाहत होते, परंतु महायुतीचा धर्म पाळण्यासाठी काही वेळा मागे-पुढे करावे लागते. याशिवाय, आगामी विधान परिषदेच्या सर्व जागांवर महायुतीचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केलेल्या जागांच्या मागणीवर बोलताना सरनाईक म्हणाले की, राजकारणात देवाणघेवाण आणि राजकीय समीकरणे बदलत असतात. महायुतीमध्ये आपल्या हक्काच्या जागा मागणे ही मोठी गोष्ट नाही. त्यांच्या आग्रही मागणीनुसार, मागील वेळेस लढवलेल्या पाच जागा कायम राहाव्यात आणि अतिरिक्त दोन जागा मिळाव्यात, अशी त्यांची इच्छा होती. जरी आता समीकरणे बदलली असली तरी, भविष्यात शिवसेनेच्या वाट्याला काही चांगल्या गोष्टी नक्कीच मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी, सरनाईक यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. स्वतःला मोठे नेते म्हणवून घेणाऱ्या लोकांनी संवेदनशील विषयांवर बोलताना तोंडाला कुलूप लावणे गरजेचे आहे, असे सरनाईक म्हणाले. प्रसाद लाड यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीत, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पक्षात कोणतीही नाराजी नसून, महायुतीचे ऐक्य टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले. तसेच, जागावाटपावरून भविष्यात शिवसेनेला योग्य वाटा मिळेल, असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
    4
    सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महायुतीतील विविध राजकीय घडामोडींवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत घेतलेला निर्णय पूर्णपणे मान्य असल्याचे म्हटले. सरनाईक यांनी नमूद केले की, नवीन सरकार स्थापन झाल्यापासून ते सर्वजण रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्याकडे पाहत होते, परंतु महायुतीचा धर्म पाळण्यासाठी काही वेळा मागे-पुढे करावे लागते. याशिवाय, आगामी विधान परिषदेच्या सर्व जागांवर महायुतीचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केलेल्या जागांच्या मागणीवर बोलताना सरनाईक म्हणाले की, राजकारणात देवाणघेवाण आणि राजकीय समीकरणे बदलत असतात. महायुतीमध्ये आपल्या हक्काच्या जागा मागणे ही मोठी गोष्ट नाही. त्यांच्या आग्रही मागणीनुसार, मागील वेळेस लढवलेल्या पाच जागा कायम राहाव्यात आणि अतिरिक्त दोन जागा मिळाव्यात, अशी त्यांची इच्छा होती. जरी आता समीकरणे बदलली असली तरी, भविष्यात शिवसेनेच्या वाट्याला काही चांगल्या गोष्टी नक्कीच मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी, सरनाईक यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. स्वतःला मोठे नेते म्हणवून घेणाऱ्या लोकांनी संवेदनशील विषयांवर बोलताना तोंडाला कुलूप लावणे गरजेचे आहे, असे सरनाईक म्हणाले. प्रसाद लाड यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीत, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पक्षात कोणतीही नाराजी नसून, महायुतीचे ऐक्य टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले. तसेच, जागावाटपावरून भविष्यात शिवसेनेला योग्य वाटा मिळेल, असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
    user_MH07NEWS
    MH07NEWS
    कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • बारामती शहर आणि परिसरातील अवैध दारू व्यवसायावर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. या कारवाई अंतर्गत अवैध हातभट्ट्यांवर छापे टाकण्यात आले, ज्यामुळे अवैध दारू व्यवसायाला मोठा दणका बसला आहे.
    1
    बारामती शहर आणि परिसरातील अवैध दारू व्यवसायावर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. या कारवाई अंतर्गत अवैध हातभट्ट्यांवर छापे टाकण्यात आले, ज्यामुळे अवैध दारू व्यवसायाला मोठा दणका बसला आहे.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • जेजुरी येथील एका टोल नाक्यावर रील स्टार महेश मोटे यांनी टोल भरण्यास नकार देत गोंधळ घातला. 'मी रील स्टार आहे, मी टोल देणार नाही,' असे म्हणत मोटे यांनी टोलनाक्यावर राडा केला होता. या घटनेनंतर, पुण्याच्या रील स्टार अमृता कुलकर्णी यांनी महेश मोटे यांच्या या कृतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. टोल भरण्यावरून महेश मोटे यांनी घातलेल्या या राड्यानंतर इतर अनेक रील स्टार्सनीही त्यांच्यावर टीका केली आहे.
    1
    जेजुरी येथील एका टोल नाक्यावर रील स्टार महेश मोटे यांनी टोल भरण्यास नकार देत गोंधळ घातला. 'मी रील स्टार आहे, मी टोल देणार नाही,' असे म्हणत मोटे यांनी टोलनाक्यावर राडा केला होता. या घटनेनंतर, पुण्याच्या रील स्टार अमृता कुलकर्णी यांनी महेश मोटे यांच्या या कृतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. टोल भरण्यावरून महेश मोटे यांनी घातलेल्या या राड्यानंतर इतर अनेक रील स्टार्सनीही त्यांच्यावर टीका केली आहे.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory Miraj, Sangli•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.