देशात कृत्रिम बुद्धीमत्ता, क्लाऊड कॉप्युटिंग, फिनटेक आणि डिजिटल सेवांच्या विस्तारामुळे डेटा सेंटरची मागणी वेगाने वाढत आहे. अशातच आतापर्यंत मुंबई, ठाणे आणि पुण्याचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात नाशिक शहर देखील वेगाने पुढे येत आहे. नाशिकमध्ये सध्या ३४० लहान-मोठ्या आयटी कंपन्या कार्यरत असून, तब्बल २६ आयटी कंपन्या येथे डेटा सेंटर उभारण्यास उत्सुक आहेत. यातच 'लुमिव्हर्स सोल्युशन प्रा. लि.' आणि 'महिंद्रा आयटी पार्क' यांच्यावतीने पहिल्या टप्प्यात ३० कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून, पुढील पाच वर्षांत ही गुंतवणूक तब्बल २०० कोटींपर्यंत नेली जाणार आहे. नाशिकला डेटा सेंटरचे हब बनवण्यासाठी एमआयडीसीकडून राजूर बहुला येथे आयटी पार्कसाठी २५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, महावितरणकडून डिसेंबर २०२६ पर्यंत ४०० केव्हीचे सबस्टेशन उभारले जाणार आहे. तसेच डेटा सेंटरसाठी लागणारी उपकरणे तयार करणाऱ्या लेग्रंडसारख्या जागतिक कंपनीचे नाशिकमधील उत्पादन आणि सिंहस्थच्या पार्श्वभूमीवर तयार होणारे इन्फ्रास्ट्रक्चर नाशिकला फायदेशीर ठरत आहे. मुंबईच्या तुलनेत स्वस्त जमीन, कमी तापमानामुळे कूलिंग खर्चात होणारी संभाव्य बचत, समृद्धी महामार्ग, मुंबई-आग्रा महामार्ग आणि २२ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून मिळणारे कुशल मनुष्यबळ यामुळे नाशिक गुंतवणूकदारांसाठी मुख्य आकर्षण बनले आहे. नाशिक आयटी असोसिएशन अर्थात 'निटा'कडे दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरूसह देशातील २६ नामांकित कंपन्यांनी डेटा सेंटर उभारण्यास उत्सुकता दाखवली आहे. निटाचे अध्यक्ष अमर ठाकरे यांच्या मते, विदेशी आयटी कंपन्या अहमदाबादऐवजी नाशिकमध्ये त्यांचे सेकंड ऑफिस सुरू करण्यास उत्सुक असून शासनाने वीज आणि भूखंडांवर पुरेशी सबसिडी द्यायला हवी. दरम्यान, नाशिकला डेटा बेस करण्यासाठी 'निमा'चे अध्यक्ष आशिष नहार यांनी ऑगस्टमध्ये राज्यव्यापी 'आयटी कॉनक्लेव्ह' आयोजित करण्याची घोषणा केली असून, यात देशभरातील २०० हून अधिक शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहेत.
देशात कृत्रिम बुद्धीमत्ता, क्लाऊड कॉप्युटिंग, फिनटेक आणि डिजिटल सेवांच्या विस्तारामुळे डेटा सेंटरची मागणी वेगाने वाढत आहे. अशातच आतापर्यंत मुंबई, ठाणे आणि पुण्याचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात नाशिक शहर देखील वेगाने पुढे येत आहे. नाशिकमध्ये सध्या ३४० लहान-मोठ्या आयटी कंपन्या कार्यरत असून, तब्बल २६ आयटी कंपन्या येथे डेटा सेंटर उभारण्यास उत्सुक आहेत. यातच 'लुमिव्हर्स सोल्युशन प्रा. लि.' आणि 'महिंद्रा आयटी पार्क' यांच्यावतीने पहिल्या टप्प्यात ३० कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून, पुढील पाच वर्षांत ही गुंतवणूक तब्बल २०० कोटींपर्यंत नेली जाणार आहे. नाशिकला डेटा सेंटरचे हब बनवण्यासाठी एमआयडीसीकडून राजूर बहुला येथे आयटी पार्कसाठी २५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, महावितरणकडून डिसेंबर २०२६ पर्यंत ४०० केव्हीचे सबस्टेशन उभारले जाणार आहे. तसेच डेटा सेंटरसाठी लागणारी उपकरणे तयार करणाऱ्या लेग्रंडसारख्या जागतिक कंपनीचे नाशिकमधील उत्पादन आणि सिंहस्थच्या पार्श्वभूमीवर तयार होणारे इन्फ्रास्ट्रक्चर नाशिकला फायदेशीर ठरत आहे. मुंबईच्या तुलनेत स्वस्त जमीन, कमी तापमानामुळे कूलिंग खर्चात होणारी संभाव्य बचत, समृद्धी महामार्ग, मुंबई-आग्रा महामार्ग आणि २२ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून मिळणारे कुशल मनुष्यबळ यामुळे नाशिक गुंतवणूकदारांसाठी मुख्य आकर्षण बनले आहे. नाशिक आयटी असोसिएशन अर्थात 'निटा'कडे दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरूसह देशातील २६ नामांकित कंपन्यांनी डेटा सेंटर उभारण्यास उत्सुकता दाखवली आहे. निटाचे अध्यक्ष अमर ठाकरे यांच्या मते, विदेशी आयटी कंपन्या अहमदाबादऐवजी नाशिकमध्ये त्यांचे सेकंड ऑफिस सुरू करण्यास उत्सुक असून शासनाने वीज आणि भूखंडांवर पुरेशी सबसिडी द्यायला हवी. दरम्यान, नाशिकला डेटा बेस करण्यासाठी 'निमा'चे अध्यक्ष आशिष नहार यांनी ऑगस्टमध्ये राज्यव्यापी 'आयटी कॉनक्लेव्ह' आयोजित करण्याची घोषणा केली असून, यात देशभरातील २०० हून अधिक शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहेत.
- बनावट शालार्थ आदेश तयार करून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी धुळे येथून प्रशांत तुळशीराम वाडीले नावाच्या आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर नाशिक येथे आणण्यात येत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात उघड झाल्याप्रमाणे, नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैध मान्यता प्रस्ताव नसतानाही, मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवून बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आले. या आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीत नोंदी करून वेतन आणि थकबाकीची रक्कम लाटण्यात आली. या संपूर्ण गैरव्यवहारातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, आतापर्यंत सुमारे १२०० आरोपी निष्पन्न झाले आहेत. तपासादरम्यान समोर आले आहे की, प्रशांत वाडीले याने धुळे जिल्ह्यातील काही शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बनावट शालार्थ आदेश तयार करून दिले होते. तत्कालीन उपसंचालकांच्या स्वाक्षरीचा वापर करून संबंधितांना वेतन आणि मोठ्या प्रमाणावर थकबाकीची रक्कम मिळवून देण्यात त्याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी धुळे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस हवालदार कराड, गिते, पोलीस अंमलदार येवले तसेच अंबड युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार बोडके, पोलीस अंमलदार पचलोरे व महाले यांच्या पथकाने धुळे येथे कारवाई करून वाडीले याला अटक केली. आरोपीला धुळे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला असून, रविवारी (१२ जुलै) त्याला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे, पोलीस हवालदार राजेंद्र गिते, शिवाजी कुलकर्णी आणि संदीप बागल यांचे पथक करत आहे.1
- नाशिकच्या दत्तनगर भागात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येमुळे अखेर स्थानिकांचा संयम सुटला आहे. पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या संख्येने महिला आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन नगरसेवक नितीन दातीर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर धडक दिली. या वेळी नागरिकांनी तीव्र निदर्शने करत कार्यालयाला घेराव घातला आणि नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी लावून धरली. प्रदर्शनकर्त्या नागरिकांच्या मते, या पाणीसमस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणत्याही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या या दुर्लक्षाने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आता या गंभीर जलसंकटावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- विधानसभेत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रस्तावांवर चर्चा करताना आमदार देवयानी फरांदे यांनी सखोल अभ्यासाच्या आधारे विविध महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी विद्यार्थ्यांचे हित, शिक्षणाचा दर्जा, गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण, शैक्षणिक सुविधा आणि बदलत्या काळानुसार आवश्यक सुधारणांबाबत आपली ठोस भूमिका सभागृहात मांडली. यावेळी देवयानी फरांदे यांनी उच्च शिक्षण अधिक सक्षम, रोजगाराभिमुख आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित केली. तसेच, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. शिक्षण क्षेत्रातील आव्हाने आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन त्यांनी विद्यार्थीकेंद्रित धोरणांवर विशेष भर दिला.1
- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे आज खेडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले. या पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी दिंडोरी पेठचे माजी आमदार धनराज महाले यांनी दिंडीला भेट दिली. यावेळी त्यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत।1
- नाशिकच्या पेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार मनोज दुर्गा गायकवाड (वय ३७) यांना ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील कारवाई थांबवून त्यांचे वाहन सोडण्यासाठी सुरुवातीला १ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. त्यानुसार १० जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.1
- संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावामध्ये ग्रामपंचायतीने गारुडी आणि मातंग समाजाच्या अतिक्रमित जागेवरील घर बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, आश्वी पोलीस स्टेशनमध्ये मानवाधिकार राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या प्रकारानंतर संगमनेर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत निर्णय न झाल्यास, पक्षाच्या वतीने आश्वी पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा देण्यात आला आहे.2
- नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी धडाकेबाज कारवाई करत पेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला तब्बल ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई १० जुलै २०२६ रोजी राऊ हॉटेलसमोर, आमदार चहा दुकान परिसरात सापळा रचून करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, मनोज दगु गायकवाड (वय ३७) या पोलीस अंमलदाराने तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात कोंबड्यांनी भरलेले वाहन सोडून देणे, गुन्हा रद्द करणे आणि पुढील कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले होते. यानुसार एसीबीने सापळा रचून आरोपीला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.1
- नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने गेल्या दोन वर्षांपासून खुनाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीला मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून अटक करण्यात यश मिळवले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन ही कारवाई करण्यात आली असून, त्याला पुढील तपासासाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की, ७ डिसेंबर २०२३ रोजी लहवित येथील रेल्वे पोल क्रमांक १७४/१३१५ जवळ काम सुरू असताना, गुलाबसिंग आखाडे याने कोणतेही कारण नसताना एका मजुरावर लोखंडी पहारीने जीवघेणा हल्ला केला होता. या गंभीर हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होता. गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात विविध ठिकाणी राहत असल्याचे शोधून काढले. पोलिसांच्या विशेष पथकाने दोन दिवस सलग शोधमोहीम राबवून ग्राम चोली (ता. माहेश्वर, जि. खरगोन) येथून आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे (वय ५०, रा. बेरछा, ता. भिकनगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला नाशिक येथे आणण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.3