पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या नेतृत्वाच्या कार्यकाळानिमित्त, २२ सोमवार रोजी भोकरदन येथील तुळजाभवानी नगर येथे एका वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 'एक वृक्ष – एक संकल्प' या भावनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अधिकाधिक वृक्ष लागवड व संगोपनाचे आवाहन यावेळी करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते या कार्यक्रमात १२० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, हरित आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. प्राणवायू ऑक्सिजनच्या अभावी नागरिकांना होणारे हाल सर्वांना माहीत असल्याने, वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी शहरात निसर्गरम्य वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक सात, तुळजाभवानी नगर येथे हे वृक्षारोपण करण्यात आले. प्रथमतः जेसीबीच्या सहाय्याने ती जागा पूर्णपणे साफ करण्यात आली. त्यानंतर १३० खड्डे खोदून त्यामध्ये १२० झाडांची लागवड करण्यात आली आणि प्रत्येक झाडाभोवती संरक्षण भिंत बांधण्यात आली. या संपूर्ण झाडांना पाणी घालण्याची जबाबदारी तुळजाभवानी नगरमधील दीपक भाऊ मोरे मित्रमंडळाने घेतली आहे. या कार्यक्रमाला तुळजाभवानी नगरमधील शुभम दळवी, मोनू जैवाळ, कृष्णा गायकवाड, कृष्णा तेलंग्रे, सोनू दौड यांच्यासह प्रभाग क्रमांक सातमधील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणाऱ्या या निसर्ग संवर्धनाच्या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे दीपक मोरे यांनी आभार मानले. भोकरदन शहरातील नागरिकांनी आज सोमवारी तुळजाभवानी नगर येथे झालेल्या या वृक्षारोपण संकल्पनेचा आदर्श घेऊन, आपल्या घराच्या परिसरात मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे, पर्यावरणाचा समतोल राखून आवश्यक ती झाडे लावावीत आणि ती केवळ लावून थांबून न जाता, ती जगवावीत व त्यांची काळजी घ्यावी, असे आवाहनही या प्रसंगी करण्यात आले. तुळजाभवानी नगर येथे साधारणतः १०० ते १२० झाडांची लागवड करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या नेतृत्वाच्या कार्यकाळानिमित्त, २२ सोमवार रोजी भोकरदन येथील तुळजाभवानी नगर येथे एका वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 'एक वृक्ष – एक संकल्प' या भावनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अधिकाधिक वृक्ष लागवड व संगोपनाचे आवाहन यावेळी करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते या कार्यक्रमात १२० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, हरित आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. प्राणवायू ऑक्सिजनच्या अभावी नागरिकांना होणारे हाल सर्वांना माहीत असल्याने, वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी शहरात निसर्गरम्य वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक सात, तुळजाभवानी नगर येथे हे वृक्षारोपण करण्यात आले. प्रथमतः जेसीबीच्या सहाय्याने ती जागा पूर्णपणे साफ करण्यात आली. त्यानंतर १३० खड्डे खोदून त्यामध्ये १२० झाडांची लागवड करण्यात आली आणि प्रत्येक झाडाभोवती संरक्षण भिंत बांधण्यात आली. या संपूर्ण झाडांना पाणी घालण्याची जबाबदारी तुळजाभवानी नगरमधील दीपक भाऊ मोरे मित्रमंडळाने घेतली आहे. या कार्यक्रमाला तुळजाभवानी नगरमधील शुभम दळवी, मोनू जैवाळ, कृष्णा गायकवाड, कृष्णा तेलंग्रे, सोनू दौड यांच्यासह प्रभाग क्रमांक सातमधील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणाऱ्या या निसर्ग संवर्धनाच्या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे दीपक मोरे यांनी आभार मानले. भोकरदन शहरातील नागरिकांनी आज सोमवारी तुळजाभवानी नगर येथे झालेल्या या वृक्षारोपण संकल्पनेचा आदर्श घेऊन, आपल्या घराच्या परिसरात मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे, पर्यावरणाचा समतोल राखून आवश्यक ती झाडे लावावीत आणि ती केवळ लावून थांबून न जाता, ती जगवावीत व त्यांची काळजी घ्यावी, असे आवाहनही या प्रसंगी करण्यात आले. तुळजाभवानी नगर येथे साधारणतः १०० ते १२० झाडांची लागवड करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.
- जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील रमाई नगर परिसरात राहणाऱ्या प्रदीप बोर्डे यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांनी नगर परिषदेने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांकडून प्रशासकीय हस्तक्षेपाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.1
- बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील फतेहपूर गावातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे, जिथे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भीषण वनवन करावी लागत आहे. येथील ग्रामस्थांनी आरोप केला आहे की, सरकारी निधीतून मंजूर झालेला हातपंप बसवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडून ५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली आहे. फतेहपूर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. ग्रामस्थांनी वारंवार मागणी केल्यानंतर प्रशासनाने हातपंप मंजूर केला होता, मात्र ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या मनमानी कारभारामुळे हा हातपंप संबंधित परिसरात बसवला गेला नाही. ग्रामस्थांनुसार, सरपंचाच्या पतीने हातपंप बसवण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केली आणि पैसे देण्यास नकार दिल्याने हे हातपंप इतरत्र हलवण्यात आले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांकडे आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. स्थानिक नागरिक सुरेश बारेला यांनी आपला संताप व्यक्त करताना सांगितले की, त्यांनी ग्रामसेवक आणि सरपंचाकडे हातपंपाची मागणी केली असता, सरपंचाने स्पष्टपणे ५ हजार रुपये लाच मागितली आणि पैसे न दिल्यास काम होणार नाही अशी कडक भूमिका घेतली. सरपंचाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत मंजूर असलेला हातपंप अशा ठिकाणी हलवला, जिथे आधीच पाणी उपलब्ध आहे. यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे, कारण त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज नदीवर अवलंबून राहावे लागत आहे, जे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सामान्य लोकांना अशा प्रकारे वेठीस धरले जात असेल, तर प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.1
- बुलढाणा जिल्ह्यातील आसलगाव परिसरात २२ जून २०२६ रोजी दुपारी साधारण अकरा वाजता एक हृदयद्रावक घटना घडली, जिथे एक मोटारसायकल विहिरीत पडली होती. ती काढण्यासाठी एक धाडसी व्यक्ती विहिरीत उतरला, मात्र विहिरीतील विषारी वायूमुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला. विहिरीत पेट्रोल आणि ऑईल सांडल्याने, तसेच ती पूर्णपणे कोंदट असल्याने आतमध्ये विषारी वायू तयार झाला होता, ज्यामुळे श्वास घेणेही अशक्य झाले होते. या भयावह परिस्थितीमुळे आत उतरणे कोणालाही शक्य नव्हते. डी.वाय.एस.पी. महाजन साहेबांनी तातडीने ओम साई फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमला घटनास्थळी बोलावले. यावेळी जळगाव जामोदचे तहसीलदार पाटील साहेब, ठाणेदार आणि पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. या जीवघेण्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी विलास निबोळकर, राजू खंडारे, अश्विन फेरण, विष्णू धांडे, वैभव राहणे, कृष्णा वसोकार यांसारख्या ओम साई फाउंडेशनच्या जवानांनी कोणताही विलंब न करता, जीव धोक्यात घालून विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. विहिरीतील विषारी वायू, अंधार आणि पेट्रोलचा उग्र वास यामुळे हे काम एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे वाटत होते. मात्र, योग्य सुरक्षा साधने, एकमेकांवरील विश्वास आणि निःस्वार्थ सेवेच्या दृढ निर्धाराने या योद्ध्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मृतदेहाचे रेस्क्यू यशस्वीरित्या पूर्ण केले. पोलीस यंत्रणेने दाखवलेला विश्वास ओम साई फाउंडेशनने सार्थ ठरवला. ही केवळ एक रेस्क्यू मोहीम नसून, माणुसकीचे दर्शन घडवणारे आणि मृत्यूनंतरही एका कुटुंबाला आपल्या माणसाचे पार्थिव मिळवून देणारे पुण्यकार्य होते. ओम साई फाउंडेशनच्या या सर्व वीर सदस्यांना सलाम!1
- खुलताबाद येथे सोशल मीडियावरील एका पॉडकास्टमध्ये इस्लाम धर्म, पवित्र कुरआन, पैगंबर मोहम्मद (स.) आणि इस्लामी इतिहासाबाबत आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. खुलताबाद येथील शेख इक्बाल अहमद व विविध मुस्लिम समाज प्रतिनिधींनी खुलताबाद पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवली आहे. सादर केलेल्या निवेदनात, नाझिया इलाही खान आणि कंटेंट क्रिएटर दिव्या सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित पॉडकास्टमधील वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून देशातील सामाजिक सलोखा आणि धार्मिक सौहार्द बिघडण्याची शक्यता तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. तक्रारदारांनी भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून, संबंधित सोशल मीडिया अकाउंट्स व चॅनेल्सवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. शेख इक्बाल अहमद यांच्यासह अजाज अहमद, शरफुद्दीन रमजानी, मौलाना तौहीद, अॅड. कासिमुद्दीन, अयाज बेग, अलीमुद्दीन अब्दुल करीम, शेख अजहर, शेख सादिक यांच्यासह अनेक समाजप्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत. खुलताबाद पोलिसांनी तक्रार स्वीकारून पुढील कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे.3
- जनसामान्यांमध्ये शारीरिक योग साधनेची आवड निर्माण व्हावी आणि सर्वांचे स्वास्थ्य चांगले राहावे या उद्देशाने, आदरणीय नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतभर जागतिक योग दिन एक सण म्हणून साजरा करण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला अनुसरून, भाजपा धुळे जिल्हा दिव्यांग आघाडी आणि देवपूर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या योग शिबिरात धुळे शहरातील दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी, देवपूर मंडळाचे माजी प्रदेश मंत्री डॉ. सुशील महाजन, माजी महापौर सौ. प्रतिभा चौधरी, श्री शिवाजी चौधरी, नगरसेविका डॉ. निशा सुशील महाजन, ज्येष्ठ नेते नंदू काका ठोंबरे, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय सरग, सौ. उर्मिला पाटील, श्री. यशवंत येवलेकर, श्री योगेश कोठावदे, श्री. नीरज देसले, श्री. युवराज बोरसे आणि श्री. राहुल राजीव गांधी हे उपस्थित होते.1
- भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी कार्यकर्त्यांसह श्रीक्षेत्र जाळीचा देव ते सावळदबारा सिन्हा घाट या ५२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रस्तावित मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी सुमारे चार किलोमीटर अंतर पायी फिरून रस्त्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला, ज्यामुळे भाविकांचा २० किलोमीटरचा फेरा वाचण्याची आशा निर्माण झाली आहे. या रस्त्याचे काम सन १९७२ च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले होते आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणात काम पूर्णही झाले होते. मात्र, अधिकृत मान्यता आणि क्रमांकाअभावी हा मार्ग गेल्या ५२ वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. पाहणीदरम्यान वन विभागाचे कर्मचारी, पंचायत समितीचे माजी सभापती उत्तम चव्हाण तसेच जयप्रकाश चव्हाण, नारायण कोलते, भाऊराव कोलते, प्रदीप चव्हाण, विनोद टीकारे, मनोज बुढाळ, संजय राजपूत, दीपक मानकर, लवकेश भाऊ, संजू भाऊ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुमारे चार किलोमीटरपर्यंतचा रस्ता स्पष्टपणे अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आले. रस्त्याची रुंदी मोजली असता विविध ठिकाणी १२, १३, १४, १५ आणि १६ मीटर इतकी रुंदी आढळून आली, ज्यामुळे या मार्गाच्या विकासासाठी आवश्यक भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले. सध्या श्रीक्षेत्र जाळीचा देव ते सावळदबारा या प्रवासासाठी भाविकांना गिरडा घाट मार्गे सुमारे २५ किलोमीटर अंतर पार करावे लागते. प्रस्तावित रस्ता विकसित झाल्यास हे अंतर अवघ्या ५ किलोमीटरवर येणार असून, भाविकांचा जवळपास २० किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच परिसरातील नागरिकांच्या दळणवळण, व्यापार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांनाही मोठा फायदा होणार आहे. रस्त्याच्या मंजुरीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून, संबंधित विभागांनी सकारात्मक निर्णय घेतल्यास या भागाच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास इद्रीस मुलतानी यांनी यावेळी व्यक्त केला.1
- उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अलीगंज परिसरात सोमवारी दुपारी एका तीन मजली व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला, ज्यात अॅनिमेशन आणि कोचिंग सेंटरमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीत कोचिंग क्लासेस, अॅनिमेशन प्रशिक्षण केंद्र, वाचनालय आणि इतर व्यावसायिक आस्थापना सुरू होत्या. दुपारच्या सुमारास आग लागल्यानंतर काही मिनिटांतच संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले, ज्यामुळे अनेक विद्यार्थी आणि कर्मचारी आत अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. बचावकार्यात अनेकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असला तरी, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या भीषण दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण लखनऊ शहरात शोककळा पसरली असून, मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.1