मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अहिल्यानगर येथे ‘श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहात काल्याचे कीर्तन पार पडले. 📍अहिल्यानगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अहिल्यानगर येथे ‘श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहात काल्याचे कीर्तन पार पडले. यावेळी वंदे मातरम् गीताच्या समूह गायन बद्दल महंत रामगिरी महाराज यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देण्यात आले. तीर्थस्थळ म्हणून सरला बेटाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून सर्व विकासकामे पूर्ण झाल्यावर सरला बेट महाराष्ट्रातील भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा केंद्र असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्यात दिली. सरला बेट विकासाचा आराखड्याच्या माध्यमातून सभागृह, रस्ते, पूरसंरक्षण आणि सौरऊर्जा यासह विविध कामे सुरू करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. सदगुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेचा उल्लेख करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सरला बेटावर या ठिकाणाहून समाजाला विचार आणि प्रेरणा मिळते. हरिनाम संकीर्तनामुळे दुःखाचे हरण होते, मनातील ‘मी’पणा दूर होतो आणि जातीभेद विसरून सर्वजण एकत्र येतात. प्रत्येकामध्ये विठ्ठलाचे दर्शन घेण्याची भावना निर्माण होते. आजच्या जगामध्ये हरिनाम संकीर्तन समाजाला एकत्र आणणारा आणि जीवनाला सकारात्मक दिशा देणारा मोठा उपाय आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विठ्ठल लंघे, अमोल खताळ, आशुतोष काळे, विवेक कोल्हे, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, महंत रामगिरी महाराज, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अहिल्यानगर येथे ‘श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहात काल्याचे कीर्तन पार पडले. 📍अहिल्यानगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अहिल्यानगर येथे ‘श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहात काल्याचे कीर्तन पार पडले. यावेळी वंदे मातरम् गीताच्या समूह गायन बद्दल महंत रामगिरी महाराज यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देण्यात आले. तीर्थस्थळ म्हणून सरला बेटाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून सर्व विकासकामे पूर्ण झाल्यावर सरला बेट महाराष्ट्रातील भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा केंद्र असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्यात दिली. सरला बेट विकासाचा आराखड्याच्या माध्यमातून सभागृह, रस्ते, पूरसंरक्षण आणि सौरऊर्जा यासह विविध कामे
सुरू करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. सदगुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेचा उल्लेख करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सरला बेटावर या ठिकाणाहून समाजाला विचार आणि प्रेरणा मिळते. हरिनाम संकीर्तनामुळे दुःखाचे हरण होते, मनातील ‘मी’पणा दूर होतो आणि जातीभेद विसरून सर्वजण एकत्र येतात. प्रत्येकामध्ये विठ्ठलाचे दर्शन घेण्याची भावना निर्माण होते. आजच्या जगामध्ये हरिनाम संकीर्तन समाजाला एकत्र आणणारा आणि जीवनाला सकारात्मक दिशा देणारा मोठा उपाय आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विठ्ठल लंघे, अमोल खताळ, आशुतोष काळे, विवेक कोल्हे, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, महंत रामगिरी महाराज, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आदी उपस्थित होते.
- राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य आयोजित २३ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न! 🚩 वर्धापन दिन सोहळा २०२६! 🚩 राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य आयोजित २३ वा वर्धापन दिन सोहळा पुणे येथे संपन्न होत आहे. महाराष्ट्रातील सर्व हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती! 🔹 दिनांक: शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ 🔹 वेळ: सकाळी ठीक ११:०० वाजता 🔹 स्थळ: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ (महात्मा फुले वाडा जवळ), पुणे. चला, एकत्र येऊया आणि पक्षाच्या विचारसरणीला अधिक बळ देऊया! तुमच्या उपस्थितीची आणि शुभेच्छांची आम्हाला प्रतीक्षा राहील. राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य1
- विषय फक्त असा आहे की बालाजी चौक शहापूर रोड गायबान पंपाजवळ जे रस्त्याचे खोदकाम चालू होते त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्यात प्रॉब्लेम होत आहे इचलकरंजी बालाजी चौक शहापूर रोड गायबान पेट्रोल पंप जवळ चार दिवस झाले रस्त्याचे खोदकाम चालू आहे त्या खोदकामासाठी रस्त्यात रस्त्याला येण्या-जाण्यासाठी जनतेला अडथळा होतो फक्त म्हणणं एवढंच आहे की जनतेचा प्रश्न मिटवायला पाहिजे प्रशासनाची लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे.1
- पेणमध्ये संभाजी महाराजांच्या लो-पॉली शिल्पावरून संताप; अभियंत्याच्या निलंबनाची मागणी1
- बारामती तालुक्यातील खांडज गावामध्ये बिबट्याचा वावर असल्याने वन विभागा विरुद्ध प्रशासकीय भवन समोर आंदोलन1
- भोर शहरातील नागोबा आळी येथे मध्यरात्री वाहनातून पेट्रोल चोरी ;घटना सिसिटीव्हीत कैद विक्रम शिंदे /भोर दि. 26 भोर शहरात दुचाकीमधून मध्यरात्री पेट्रोल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून चोरटे सिसिटीव्हीत कैद झाले आहेत. शहरातील नागोबा आळी येतील घटना समोर आली आहे.1
- शिवसेना नेते शंकर (मालक) म्हेत्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शिवसेना नेते शंकर (मालक) म्हेत्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे. शिवसेना नेते तथा अक्कलकोट तालुक्याचे दानशूर नेतृत्व मा. शंकर (मालक) म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त दुधनी येथे त्यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुबारक कोरबू, आझम शेख, जी. अशपाक मुजावर, मजीद कोरबू आदी उपस्थित होते.1
- अग्निसुरक्षेची यंत्रणा २४ तास सज्ज; ICU-SNCU मात्र अजूनही कागदावर..! मावळ, पुणे : अमरावती रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर मावळच्या वडगाव उपजिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा आढावा समोर आला आहे. रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स, फायर एक्स्टिंग्विशर आणि सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा राखीव साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टर रोहित काळे यांनी दिली.सध्या रुग्णालयात ५० बेड आणि ट्रॉमा केअर सेंटरचे २० बेड, अशी एकूण ७० बेडची क्षमता आहे. मात्र अतिगंभीर रुग्णांसाठी ICU आणि नवजात बालकांसाठी SNCU सुविधा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.या दोन्ही सुविधांना तात्पुरती मान्यता मिळाली असून काम सुरू आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा सज्ज असल्याचा दावा होत असला, तरी ICU आणि SNCU कधी कार्यान्वित होणार, याकडे आता मावळकरांचे लक्ष लागले आहे... : डॉक्टर रोहित काळे #Maval #Vadgaon #SubDistrictHospital #FireSafety #HospitalSafety #ICU #SNCU #Healthcare #PuneNews #MaharashtraNews #FireSafetyAudit #TheNayakNews1
- पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम योग्य पद्धतीने करण्यात आले आहे का, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षितपणे खुला करण्यात आला होता का, याबाबत नागरिकांकडून चर्चा सुरू आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची पाहणी करून रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.1