logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सध्या स्मार्ट मीटर बसविण्यावरून महावितरण, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि वीज ग्राहक यांच्यात तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे. या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. चांगल्या प्रकारे सुरू असलेले वीज मीटर काढून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसवून महावितरण ग्राहकांवर अन्याय करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. पूर्वी ज्या ग्राहकांना ७०० रुपये वीजबिल येत होते, त्यांना नवीन स्मार्ट मीटर बसविल्यापासून थेट २१०० रुपये बिल आले आहे. यामुळे स्मार्ट मीटरमुळेच आपली वीजबिले वाढून येत असल्याचा संताप ग्राहकांनी व्यक्त केला आहे. एकीकडे वाढीव बिलांचा भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत असताना, दुसरीकडे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वीजचोरी सुरू आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफ केले असले, तरीही गावोगावी महावितरणच्या विद्युत खांबांवरील तारांवर अनधिकृतपणे आकडे टाकून शेतीसाठी आणि घरासाठी चोरून वीज वापरली जात आहे. तालुक्यात असे एकही गाव नाही, जिथे आकडे टाकून वीजचोरी होत नाही. या चोरीमुळे ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त भार पडून ते जळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम वीज यंत्रणेवर होत असून प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होत आहे. या वीजचोरीमुळे महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, या परिस्थितीला सर्वस्वी महावितरणचे अधिकारी व कर्मचारीच जबाबदार आहेत. महावितरणच्या वरिष्ठ पथकाने जत तालुक्यातील ही वीजचोरी रोखण्यासाठी आकडे टाकून चोरी करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबविण्याची तीव्र गरज आहे. एका बाजूला स्मार्ट मीटर लावून ग्राहकांकडून दुप्पट बिले वसूल करायची आणि दुसऱ्या बाजूला विद्युत खांबांवर मोठ्या प्रमाणात आकडे टाकून सुरू असलेली वीजचोरी उघड्या डोळ्यांनी पाह्यची, असा महावितरणचा अजब कारभार तालुक्यात सुरू आहे.

2 hrs ago
user_सारथी महाराष्ट्राचा न्यूज
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
Voice of people जत, सांगली, महाराष्ट्र•
2 hrs ago
c3cd138d-3788-4736-93c0-32f13a284b58

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सध्या स्मार्ट मीटर बसविण्यावरून महावितरण, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि वीज ग्राहक यांच्यात तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे. या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. चांगल्या प्रकारे सुरू असलेले वीज मीटर काढून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसवून महावितरण ग्राहकांवर अन्याय करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. पूर्वी ज्या ग्राहकांना ७०० रुपये वीजबिल येत होते, त्यांना नवीन स्मार्ट मीटर बसविल्यापासून थेट २१०० रुपये बिल आले आहे. यामुळे स्मार्ट मीटरमुळेच आपली वीजबिले वाढून येत असल्याचा संताप ग्राहकांनी व्यक्त केला आहे. एकीकडे वाढीव बिलांचा भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत असताना, दुसरीकडे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वीजचोरी सुरू आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफ केले असले, तरीही गावोगावी महावितरणच्या विद्युत खांबांवरील तारांवर अनधिकृतपणे

e67939c7-a2b2-4f37-a1ed-1b84f673c76c

आकडे टाकून शेतीसाठी आणि घरासाठी चोरून वीज वापरली जात आहे. तालुक्यात असे एकही गाव नाही, जिथे आकडे टाकून वीजचोरी होत नाही. या चोरीमुळे ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त भार पडून ते जळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम वीज यंत्रणेवर होत असून प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होत आहे. या वीजचोरीमुळे महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, या परिस्थितीला सर्वस्वी महावितरणचे अधिकारी व कर्मचारीच जबाबदार आहेत. महावितरणच्या वरिष्ठ पथकाने जत तालुक्यातील ही वीजचोरी रोखण्यासाठी आकडे टाकून चोरी करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबविण्याची तीव्र गरज आहे. एका बाजूला स्मार्ट मीटर लावून ग्राहकांकडून दुप्पट बिले वसूल करायची आणि दुसऱ्या बाजूला विद्युत खांबांवर मोठ्या प्रमाणात आकडे टाकून सुरू असलेली वीजचोरी उघड्या डोळ्यांनी पाह्यची, असा महावितरणचा अजब कारभार तालुक्यात सुरू आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याशी संबंधित एका भक्तीमय संदेशात, सम्राटेक विजापूर येथील दुर्गा माता देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्व लोकांना जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी देवी माता दुर्गादेवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह व्हीआयपी (VIP) पाहुणे आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र येऊन देवीचे आशीर्वाद घ्यावेत, असा उत्साह या संदेशातून व्यक्त करण्यात आला आहे।
    1
    सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याशी संबंधित एका भक्तीमय संदेशात, सम्राटेक विजापूर येथील दुर्गा माता देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्व लोकांना जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी देवी माता दुर्गादेवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह व्हीआयपी (VIP) पाहुणे आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र येऊन देवीचे आशीर्वाद घ्यावेत, असा उत्साह या संदेशातून व्यक्त करण्यात आला आहे।
    user_Shekhar chavan साहेब
    Shekhar chavan साहेब
    खटाव, सातारा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
    1
    उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पुण्याच्या बारामतीमध्ये पालखी दरम्यान एका ज्येष्ठ व्यक्तीने अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा फोटो आपल्या गळ्यात घालून समाजाला एक संदेश दिला. पालखीमध्ये या ज्येष्ठ व्यक्तीने गळ्यात तुकाराम मुंढे यांचा फोटो घातल्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
    1
    पुण्याच्या बारामतीमध्ये पालखी दरम्यान एका ज्येष्ठ व्यक्तीने अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा फोटो आपल्या गळ्यात घालून समाजाला एक संदेश दिला. पालखीमध्ये या ज्येष्ठ व्यक्तीने गळ्यात तुकाराम मुंढे यांचा फोटो घातल्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • कर्जत तालुक्यातील राशीन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गट क्रमांक १४७६ आणि १४७७ मधील ग्रामपंचायत मिळकतीवरील जागेची मोजणी आज कडक पोलीस बंदोबस्तामध्ये पार पडली. दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या या मोजणी प्रक्रियेदरम्यान भूमी अभिलेख विभागाचे शिस्तेदार सुनील धामणे, मोजणी अधिकारी प्रशांत थोरात, संजय धनवडे, पंकज निमसे यांच्यासह गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी आणि कर्जतचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड उपस्थित होते. याशिवाय महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी रोहिदास कापरे आणि स्थानिक नागरिक तसेच शाहू राजेभोसले, तात्यासाहेब माने, सोयब काझी, राम कानगुडे, अविनाश मासाळ, विक्रम परदेशी हे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी अशी मागणी केली की, गेल्या ५० वर्षांपासून तिथे राहणाऱ्या नागरिकांना शासनाच्या नियमानुसार ५०० स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी आणि ज्यांची घरकुले आहेत, ती जैसे थे ठेवावीत. यावर भूमी अभिलेख विभागाचे शिस्तेदार सुनील धामणे यांनी स्पष्ट केले की, सध्या केवळ जागेची मोजणी करण्याचे काम सुरू असून अतिक्रमण काढण्याची कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. या आश्वासनानंतर उपस्थित रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करत मोजणी प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण केला नाही.
    1
    कर्जत तालुक्यातील राशीन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गट क्रमांक १४७६ आणि १४७७ मधील ग्रामपंचायत मिळकतीवरील जागेची मोजणी आज कडक पोलीस बंदोबस्तामध्ये पार पडली. दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या या मोजणी प्रक्रियेदरम्यान भूमी अभिलेख विभागाचे शिस्तेदार सुनील धामणे, मोजणी अधिकारी प्रशांत थोरात, संजय धनवडे, पंकज निमसे यांच्यासह गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी आणि कर्जतचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड उपस्थित होते. याशिवाय महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी रोहिदास कापरे आणि स्थानिक नागरिक तसेच शाहू राजेभोसले, तात्यासाहेब माने, सोयब काझी, राम कानगुडे, अविनाश मासाळ, विक्रम परदेशी हे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी अशी मागणी केली की, गेल्या ५० वर्षांपासून तिथे राहणाऱ्या नागरिकांना शासनाच्या नियमानुसार ५०० स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी आणि ज्यांची घरकुले आहेत, ती जैसे थे ठेवावीत. यावर भूमी अभिलेख विभागाचे शिस्तेदार सुनील धामणे यांनी स्पष्ट केले की, सध्या केवळ जागेची मोजणी करण्याचे काम सुरू असून अतिक्रमण काढण्याची कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. या आश्वासनानंतर उपस्थित रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करत मोजणी प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण केला नाही.
    user_प्रा .किशोरकुमार  कांबळे
    प्रा .किशोरकुमार कांबळे
    कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना आता दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. यापूर्वी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मधील ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकी ५० हजार रुपयांपर्यंत होती, त्यांना केवळ ५० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंतच कर्जमुक्तीचा लाभ मिळत होता. आता या मर्यादेत वाढ करून ही रक्कम दोन लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.
    1
    महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना आता दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे.

यापूर्वी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मधील ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकी ५० हजार रुपयांपर्यंत होती, त्यांना केवळ ५० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंतच कर्जमुक्तीचा लाभ मिळत होता. आता या मर्यादेत वाढ करून ही रक्कम दोन लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • अकलूजमध्ये पोलिसांनी घेतलेल्या मॉकड्रिलमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अकलूज पोलिसांच्या या मॉकड्रिलमुळे अकलूजमध्ये खरोखरच बॉम्ब ठेवला आहे, असे सर्वांना वाटले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी अत्यंत थरारक प्रसंग दाखवून दिला.
    1
    अकलूजमध्ये पोलिसांनी घेतलेल्या मॉकड्रिलमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अकलूज पोलिसांच्या या मॉकड्रिलमुळे अकलूजमध्ये खरोखरच बॉम्ब ठेवला आहे, असे सर्वांना वाटले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी अत्यंत थरारक प्रसंग दाखवून दिला.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.