ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण शहापूर येथे आमदार दौलत दरोडा यांच्याहस्ते होणार उद्घाटन ठाणे - निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांनी शहापूर येथे एक तारांगण ( Planetarium )आणि चार अत्याधुनिक, मोठ्या दुर्बीणी असलेली वेधशाळा (Astronomical Observatory) बांधली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन रविवार दि. ५ एप्रिल रोजी सायं.५ वाजता खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण आणि आमदार दौलत दरोडा यांच्याहस्ते होणार आहे. निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांना खगोलशास्त्राची आवड आहे. जनमानसात खगोलविज्ञानाची रूची निर्माण व्हावी यासाठी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे साडेतीन एकर जागा घेऊन तेथे हा सॅपो प्रकल्प उभारला आहे. ठाणे जिल्ह्यातील हे पहिलेच तारांगण असून सोबत अत्याधुनिक मोठ्या चार दुर्बीणी असलेली वेधशाळाही त्यामध्ये आहे. खगोलप्रेमींसाठी शहापूर येथील साकडभाव येथे पोकलेवाडी नजिक जुनोनी -कोथरा रोडवर हा सॅपो प्रकल्प उभारण्यात आला आहे. 7506266266 किंवा 7506322322 या दूरध्वनीवर ठाकूर बंधूंशी संपर्क साधून, नावे नोंदवूनच खगोलविज्ञान प्रेमींनी या सॅपो प्रकल्पास भेट देता येणार आहे. अत्याधुनिक तारांगणामध्ये ५६ सीटस् असून तेथे अर्धा ते एक तासांचा, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत खगोलशास्त्रीय माहितीचा शो दाखविण्याची सोय आहे. वेधशाळेत चार मोठ्या दुर्बीणी काॅन्क्रीट पीलर्सवर बसविण्यात आल्या असून आकाशनिरिक्षण करताना एक बटन दाबून स्वयंचलित छप्पर मागे नेण्याची सोय करण्यात आली आहे. १६,१४,१० आणि ६ इंच व्यास असलेल्या आरशाच्या दुर्बिणीतून आकाशातील वेगवेगळ्या गोष्टी निरिक्षण करण्याची सोय आहे. सोलर फिल्टर लावलेल्या एका दुर्बिणीतून दिवसा सारडा, सौरज्वाला निरीक्षण करता येतात. दोन दुर्बिणी संगणकाला जोडलेल्या असून त्यातून दिसणाऱ्या गोष्टींचे छायाचित्रणही करता येते. तसेच प्रोजेक्टरच्या सहाय्याने पडद्यावर ती गोष्ट दाखविण्याची सोयही तेथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुर्बिणीतून गुरू ग्रहाचे चंद्र, गुरू ग्रहावरील पट्टा, डाग स्पष्टपणे दिसतो. शनी ग्रहाची वलये, देवयांनी दीर्घिका सुंदर दर्शन देतात. रात्रभर आकाश निरीक्षण करता येते. रात्री झोपण्यासाठी स्वतंत्र खोल्याही बांधण्यात आल्या आहेत. ग्रुपची डाॅरमेटरी आहेत. या सॅपो प्रकल्पात प्रदर्शन हाॅल आणि सेल्फ पाॅइंटस् देखील आहेत. आकाश दर्शन घडविण्यासाठी स्वयंसेवकही आहेत. तसेच खाद्यपदार्थ, भोजन यासाठी कॅन्टीनही आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाकूर बंधूनी उभारलेले हे पहिले तारांगण आहे.
ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण शहापूर येथे आमदार दौलत दरोडा यांच्याहस्ते होणार उद्घाटन ठाणे - निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांनी शहापूर येथे एक तारांगण ( Planetarium )आणि चार अत्याधुनिक, मोठ्या दुर्बीणी असलेली वेधशाळा (Astronomical Observatory) बांधली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन रविवार दि. ५ एप्रिल रोजी सायं.५ वाजता खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण आणि आमदार दौलत दरोडा यांच्याहस्ते होणार आहे. निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांना खगोलशास्त्राची आवड आहे. जनमानसात खगोलविज्ञानाची रूची निर्माण व्हावी यासाठी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे साडेतीन एकर जागा घेऊन तेथे हा सॅपो प्रकल्प उभारला आहे. ठाणे जिल्ह्यातील हे पहिलेच तारांगण असून सोबत अत्याधुनिक
मोठ्या चार दुर्बीणी असलेली वेधशाळाही त्यामध्ये आहे. खगोलप्रेमींसाठी शहापूर येथील साकडभाव येथे पोकलेवाडी नजिक जुनोनी -कोथरा रोडवर हा सॅपो प्रकल्प उभारण्यात आला आहे. 7506266266 किंवा 7506322322 या दूरध्वनीवर ठाकूर बंधूंशी संपर्क साधून, नावे नोंदवूनच खगोलविज्ञान प्रेमींनी या सॅपो प्रकल्पास भेट देता येणार आहे. अत्याधुनिक तारांगणामध्ये ५६ सीटस् असून तेथे अर्धा ते एक तासांचा, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत खगोलशास्त्रीय माहितीचा शो दाखविण्याची सोय आहे. वेधशाळेत चार मोठ्या दुर्बीणी काॅन्क्रीट पीलर्सवर बसविण्यात आल्या असून आकाशनिरिक्षण करताना एक बटन दाबून स्वयंचलित छप्पर मागे नेण्याची सोय करण्यात आली आहे. १६,१४,१० आणि ६ इंच व्यास असलेल्या आरशाच्या दुर्बिणीतून आकाशातील वेगवेगळ्या गोष्टी निरिक्षण करण्याची सोय
आहे. सोलर फिल्टर लावलेल्या एका दुर्बिणीतून दिवसा सारडा, सौरज्वाला निरीक्षण करता येतात. दोन दुर्बिणी संगणकाला जोडलेल्या असून त्यातून दिसणाऱ्या गोष्टींचे छायाचित्रणही करता येते. तसेच प्रोजेक्टरच्या सहाय्याने पडद्यावर ती गोष्ट दाखविण्याची सोयही तेथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुर्बिणीतून गुरू ग्रहाचे चंद्र, गुरू ग्रहावरील पट्टा, डाग स्पष्टपणे दिसतो. शनी ग्रहाची वलये, देवयांनी दीर्घिका सुंदर दर्शन देतात. रात्रभर आकाश निरीक्षण करता येते. रात्री झोपण्यासाठी स्वतंत्र खोल्याही बांधण्यात आल्या आहेत. ग्रुपची डाॅरमेटरी आहेत. या सॅपो प्रकल्पात प्रदर्शन हाॅल आणि सेल्फ पाॅइंटस् देखील आहेत. आकाश दर्शन घडविण्यासाठी स्वयंसेवकही आहेत. तसेच खाद्यपदार्थ, भोजन यासाठी कॅन्टीनही आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाकूर बंधूनी उभारलेले हे पहिले तारांगण आहे.
- राज्यसभेची जागा शरद पवार यांना दिल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात अंतर्गत वाद सुरू झाले असल्याच्या चर्चा आहेत. ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीत हा वाद उफाळून आला आहे1
- अंबरनाथ प्रशासन नगरपालिका शिव मंदिर1
- जब Eknath Shinde ने Salman Khan से कहा – मैंने भी लिया है विकेट , सामने वाले को किया क्लीन बोल्ड | Breaking Bytes1
- ऑथराइज्ड डीलर भी इन MBO मल्टी ब्रांड शोरूम को गाड़ियां डिस्प्ले के लिए उपलब्ध करा रहे हैं, जो नियमों का सीधा उल्लंघन1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- प्रेसिडेंट कप इंडिया 2026 का उद्घाटन करने पहुंचे बॉलीवुड के भाईजान सलमान खान BNN NEWS1
- बिहार के नालंदा में कानून-व्यवस्था तार-तार: बीच सड़क पर महिला से अभद्रता और सामूहिक दुष्कर्म का प्रयास न्यूज़ रिपोर्ट: नालंदा, बिहार: बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार के गृह जिले नालंदा से एक रूह कंपा देने वाली घटना सामने आई है, जिसने राज्य की कानून-व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। जिले के नूरसराय इलाके में कुछ मनचलों द्वारा बीच सड़क पर एक महिला के साथ न केवल गाली-गलौज की गई, बल्कि उसके साथ सामूहिक दुष्कर्म का प्रयास भी किया गया। घटना का विवरण: प्राप्त जानकारी के अनुसार, दबंगों ने महिला को सरेआम पकड़ लिया और उसे जबरन अपने साथ ले जाने की कोशिश की। इस दौरान आरोपियों ने महिला के साथ अत्यधिक अभद्रता की और उसके कपड़े तक फाड़ दिए। सोशल मीडिया पर इस घटना से जुड़ा आक्रोश तेजी से फैल रहा है। वायरल दावों के मुताबिक, तीन लोगों ने मिलकर इस घृणित कार्य को अंजाम दिया। राजनीतिक घमासान: इस घटना के बाद बिहार की राजनीति गरमा गई है। विपक्ष ने भाजपा-जदयू सरकार पर तीखा हमला बोलते हुए इसे 'महा चौपटराज' करार दिया है। विपक्षी नेताओं का कहना है कि एनडीए सरकार में अपराधियों के हौसले इतने बुलंद हो गए हैं कि उन्हें अब कानून का कोई डर नहीं रहा। आरोप लगाया जा रहा है कि सरकार केवल "कुर्सी के खेल" में व्यस्त है और महिलाओं के खिलाफ बढ़ते अपराधों पर मूकदर्शक बनी हुई है। कार्यवाही की मांग: स्थानीय नागरिकों और सोशल मीडिया यूजर्स ने इस घटना की कड़ी निंदा करते हुए दोषियों पर सख्त से सख्त कार्यवाही की मांग की है। लोगों का कहना है कि जब तक अपराधियों के मन में कानून का खौफ पैदा नहीं होगा, तब तक ऐसी शर्मनाक घटनाएं नहीं रुकेंगी। #BiharCrime #NalandaNews #WomenSafety #JusticeForVictim #LawAndOrder #BiharPolice #CrimeAgainstWomen #NitishKumar #BreakingNews #BiharPolitics1
- अंबड तालुक्यातील महाकाळा परिसरात आज सायंकाळी निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडाचा आश्रय घेतलेल्या तीन युवकांवर वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत दोन तरुण जागीच मृत्युमुखी पडले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा तपशील: आज सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती परिसरात ही घटना घडली. अचानक आलेल्या वादळी पावसापासून बचाव करण्यासाठी तीन तरुणांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला होता. याच दरम्यान झाडावर जोरदार वीज कोसळली. यामध्ये: १. गोविंद प्रल्हाद लहाने (वय २१ वर्षे) – जागीच मृत्यू. २. आदित्य दगडू बेद्रे (वय २० वर्षे) – जागीच मृत्यू. या घटनेत अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासकीय कार्यवाही: घटनेची माहिती मिळताच तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन (Post-Mortem) करण्याची प्रक्रिया सुरू असून, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना तातडीने घटनास्थळाचा पंचनामा व सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन स्तरावरून मृतांच्या नातेवाईकांना नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.1