शिवशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त गलवाड्यात प्रेरणादायी कार्यक्रम शिवशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त गलवाड्यात प्रेरणादायी कार्यक्रम सोयगाव सोयगाव, तालुक्यातील गलवाडा येथे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. समाजसेविका सुशीलाबाई इंगळे यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते व्यक्त केली. तसेच त्यांच्या विचारांचा समाजावर झालेला प्रभाव आणि प्रेरणादायी कार्य यावर लहान मुलांनी भाषणे सादर केली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि पेन्सिलचे वाटप करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. या प्रसंगी आनंदा इंगळे, मिलिंद सोनवणे, गोपाल इंगळे, गोपाल मंडवे, विक्रम इंगळे, दिनेश जाधव, उत्तम कांबळे, सुशील कांबळे, भारत सोनवणे, जितेंद्र सोनवणे, विजय औरंगे, राहुल इंगळे, संजय कुनगर, अमोल दाभाडे,अनिल इंगळे,सुनिल सैदाणे,जीवन पाटील,भारत इंगळे,गोविंदा सोनवणे, सागर बिऱ्हारे, एकनाथ खलसे, राहुल सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. छायाचित्र ओळ :गलवाडा येथे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ.
शिवशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त गलवाड्यात प्रेरणादायी कार्यक्रम शिवशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त गलवाड्यात प्रेरणादायी कार्यक्रम सोयगाव सोयगाव, तालुक्यातील गलवाडा येथे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. समाजसेविका सुशीलाबाई इंगळे यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते व्यक्त केली. तसेच त्यांच्या विचारांचा समाजावर झालेला प्रभाव आणि प्रेरणादायी कार्य यावर लहान मुलांनी भाषणे सादर केली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि पेन्सिलचे वाटप करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. या प्रसंगी आनंदा इंगळे, मिलिंद सोनवणे, गोपाल इंगळे, गोपाल मंडवे, विक्रम इंगळे, दिनेश जाधव, उत्तम कांबळे, सुशील कांबळे, भारत सोनवणे, जितेंद्र सोनवणे, विजय औरंगे, राहुल इंगळे, संजय कुनगर, अमोल दाभाडे,अनिल इंगळे,सुनिल सैदाणे,जीवन पाटील,भारत इंगळे,गोविंदा सोनवणे, सागर बिऱ्हारे, एकनाथ खलसे, राहुल सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. छायाचित्र ओळ :गलवाडा येथे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ.
- भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल, ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी राबवली आहे... Bharat 24Taas News1
- 🚨 MD ड्रग्ज जप्त! २ आरोपी जेरबंद ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत जळगाव जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात आणखी एक मोठी आणि धडक कारवाई करत ६२.०७ ग्रॅम मेफेड्रॉन अर्थात एमडी हा घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "नशामुक्त भारत" अभियानाअंतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ परिसरात एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात एमडी अंमली पदार्थ आहे. या माहितीच्या आधारे ३१ जुलै २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या इम्रान खान हयात खान, वय ३६, रा. फातेमा नगर, जळगाव याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६२.०७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ८८ हजार रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ, २० हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि ५० हजार रुपयांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासादरम्यान या अंमली पदार्थाचा पुरवठा रफीक उर्फ गोल्डन, रा. मालेगाव, जिल्हा नाशिक याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने संयुक्तरित्या यशस्वीपणे पार पाडली. जळगाव जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठ्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.1
- भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून1
- संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।1
- नशिराबाद जवळील बोगद्यात पाणी... नागरिक आक्रमक टोलवसुली बंद! जळगाव शहरापासून नशिराबादजवळील पोलीस ठाणे फाट्यावरील सर्व्हिस रोडच्या बोगद्याखाली गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करून टोलवसुली सुरूच ठेवण्यात आल्याने संतप्त नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी नशिराबाद टोल नाका गाठत काही काळासाठी टोलवसुली बंद पाडली. आंदोलनादरम्यान अनेक वाहनांना टोल न भरता पुढे सोडण्यात आले. बोगद्यातील पाणी तातडीने काढून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था होईपर्यंत टोलवसुली बंद ठेवावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. टोल कंपनी नियमित शुल्क आकारते, मात्र पावसाळ्यातील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. काही काळ टोल नाक्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, "प्रथम सुरक्षित रस्ता आणि नंतर टोल" अशी भूमिका नागरिकांनी स्पष्ट करत हायवे प्रशासनाला इशारा दिला.1
- *पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील एक तरुण नालायच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे....*1