मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! अनधिकृत बांधकामावर कारवाई, पाडलेल्या दुकानाची नुकसानभरपाई आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी.. मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! अनधिकृत बांधकामावर कारवाई, पाडलेल्या दुकानाची नुकसानभरपाई आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी.. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असतानाही डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोप.. आज दिनांक 01 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित अनधिकृत बांधकाम आणि दुकान पाडल्याच्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. विविध मागण्यांसाठी महेबुब कुरेशी, इरफान कुरेशी, नदीम शेख आणि अरमान शेख या चार रहिवाशांनी 27 जुलैपासून जालना महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले असून, आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित विनापरवानगी बांधकाम तातडीने हटवावे, पाडण्यात आलेल्या दुकानाची नुकसानभरपाई द्यावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अ
मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! अनधिकृत बांधकामावर कारवाई, पाडलेल्या दुकानाची नुकसानभरपाई आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी.. मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! अनधिकृत बांधकामावर कारवाई, पाडलेल्या दुकानाची नुकसानभरपाई आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी.. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असतानाही डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोप.. आज दिनांक 01 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित अनधिकृत बांधकाम आणि दुकान पाडल्याच्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. विविध मागण्यांसाठी महेबुब कुरेशी, इरफान कुरेशी, नदीम शेख आणि अरमान शेख या चार रहिवाशांनी 27 जुलैपासून जालना महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले असून, आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित विनापरवानगी बांधकाम तातडीने हटवावे, पाडण्यात आलेल्या दुकानाची नुकसानभरपाई द्यावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अ
- महावितरणचे दीपक देवरे यांना आपल्या जीव वर खेळून लोकांच्या अंधे दुनियेत प्रकाश केला भर पावसाळ्यात बीच कोल्हापूर चढून दिल्लीचे तार जोडले1
- जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त रक जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त1
- वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त1
- ⚡ Bharat 24taas News च्या बातमीची ऊर्जा राज्यमंत्र्यांनी घेतली दखल..! कमलकीशोर जोगदंडे भोकरदन | प्रतिनिधी भर पावसात जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पोलवर चढून दुरुस्ती करणारे महावितरणचे लाईनमन दिपक देवरे यांचा व्हिडिओ Bharat 24taas News चे Digital Media news Editor कमलकिशोर जोगदंडे यांनी सर्वप्रथम प्रसिद्ध केला होता. या वृत्ताची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी स्वतः लाईनमन दिपक देवरे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करत अभिनंदन केले तसेच भर पावसात काम करताना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कार्याची दखल शासन स्तरावर घेतली गेल्याने महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. Bharat 24taas News ने सर्वप्रथम प्रकाशित केलेल्या या बातमीमुळे या घटनेला राज्यस्तरावरही विशेष महत्त्व प्राप्त झाले. Bharat 24taas News1
- छ संभाजीनगर -कॉकरोच पार्टीचे अभिजीत दिपकेची प्रकृती बिघडली छ संभाजीनगर कॉकरोच अभिजीत दिपकेची प्रकृती बिघडली कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची प्रकृती बिघडली असून, भेट देण्यासाठी आलेल्या लोकांना भेटत असताना अभिजीत दिपके यांना उलटी झाली, अभिजीत दिपके यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी डॉक्टर दाखल बाईट -डॉक्टर विशाल लहाने1
- जनहिताच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; जालन्यातील प्रत्येक तालुक्यात ‘रघुपती राघव सत्याग्रह’ आंदोलन करण्याचा निर्णय.. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी, NEET पेपरफुटी व पीककर्जाच्या प्रश्नांवर सरकारविरोधात आंदोलनाचा निर्णय जनहिताच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; जालन्यातील प्रत्येक तालुक्यात ‘रघुपती राघव सत्याग्रह’ आंदोलन करण्याचा निर्णय.. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी, NEET पेपरफुटी व पीककर्जाच्या प्रश्नांवर सरकारविरोधात आंदोलनाचा निर्णय आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या अध्यक्षतेखाली खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अंबड रोडवरील संपर्क कार्यालयात पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ‘रघुपती राघव सत्याग्रह’ आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीत विशेषतः शेतकरी कर्जमाफीच्या यादीतील त्रुटी व कथित गैरव्यवहार, लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा समावेश, NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरण, शेतकऱ्यांना पीककर्ज वितरणातील अडचणी तसेच स्थानिक पातळीवरील विविध जनहिताच्या प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. या सर्व प्रश्नांबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आंदोलन उभारण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनप्रतिनिधी यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन आंदोलनाची रूपरेषा, नियोजन आणि पुढील दिशा निश्चित केली जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी दिली. ‘शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार’, अशी भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली. शासनाने नागरिकांच्या या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याला श्रद्धांजली बैठकीच्या प्रारंभी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्वर्गीय सवईराम जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या सामाजिक व पक्षीय योगदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले. या बैठकीस राजाभाऊ देशमुख, अशोक उबाळे, भाऊसाहेब सोळुंके, सुभाष कोळकर, संजय इंगळे, शांतीलाल बनसोडे, संजय मुथा, राजाभाऊ कुलकर्णी, शिवाजी वाघ, सुखलाल राठोड, राधाकिसन माने, विलास टाकसाळ, बाजीराव खरात, रहीम शेख, विष्णू गजर, राजेंद्र प्रधान, रऊफ परशुवाले, गंगाधर कवठे, देवराव डोंगरे, राधाकिसन शिंदे, जावेद खान पठाण, दिनेश राका, सुनील चौधरी, प्रदीप लेकरवाळे, दिग्विजय धांडगे, गणेशराव आडे, अविनाश चव्हाण, सुरेश पवार, ज्ञानेश्वर शिंदे, प्रकाश घुले, शेख इब्राहिम, अंकुश राऊत, सीताराम अग्रवाल, ज्ञानेश्वर डूकरे, सुभाष मगरे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन अशोक उबाळे व सुभाष कोळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शांतीलाल बनसोडे यांनी केले.1
- अभिजीत दिपके यांची प्रकृती स्थिर; डॉक्टरांकडून आवश्यक उपचार सुरू छत्रपती संभाजीनगर | कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून आवश्यक उपचार केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले. विश्रांतीचा सल्ला देत पुढील काही काळ वैद्यकीय देखरेखीखाली राहण्याचा सल्लाही देण्यात आला.1
- खेळणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या बैलांचा जीवघेणा हल्ला; थरार CCTV मध्ये कैद लखनऊ |उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अर्जुनगंज परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या एका चिमुकल्यावर भटक्या बैलने अचानक हल्ला केला. ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर परिसरात भटक्या जनावरांच्या वाढत्या समस्येबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.1