logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

28 ते 30 ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन; ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ संकल्पनेवर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होणार 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन; ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ संकल्पनेवर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होणार नंदुरबार, दि. 27 ऑगस्ट : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 29 ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. क्रीडा व खेळाचा प्रचार-प्रसार व्हावा, शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत खेळाचे महत्त्व पोहोचावे तसेच युवक-युवतींमध्ये क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व्हावे, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने 28 ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या मुख्य संकल्पनेवर आधारित असून, ‘आदर, खेळ आणि हालचाल’ (Tribute, Play and Move) या तीन प्रमुख स्तंभांवर हा उत्सव साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमांची रूपरेषा व वेळापत्रक: 28 ऑगस्ट 2026 (स्मरण व 29 आव्हाने): • फ्लोरल ट्रिब्यूट (Floral Tribute): मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात येईल. • ‘29 आव्हाने’ (29 Challenges) उपक्रम: सहभागी खेळाडू व नागरिकांनी कोणताही क्रीडा प्रकार 29 वेळा करण्याचे आव्हान पूर्ण करावयाचे आहे. यामध्ये हॉकी ड्रीबल, फुटबॉल किक, बास्केटबॉल ड्रीबल, स्कीपिंग (दोरीच्या उड्या), हॉकी पेनल्टी शूटआऊट, धावण्याची स्पर्धा, 3 कि.मी. चालण्याची स्पर्धा, पुश-अप्स, सिट-अप्स, रस्सीखेच यांसारख्या प्रकारांचा समावेश असेल. खेळाडूंनी या उपक्रमांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून इतरांनाही आव्हान स्वीकारावयास प्रेरित करावे. 29 ऑगस्ट 2026 (हॉकी स्पर्धा): • ‘एक घंटा खेल के मैदान में’ या उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे ‘मेजर ध्यानचंद हॉकी चषक स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. 30 ऑगस्ट 2026 (पारितोषिक वितरण): • तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचा समारोप तसेच आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल. निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी आणि जिल्ह्यात क्रीडामय वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व खेळाडू, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी व नागरिकांनी या उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

2 hrs ago
user_ईश्वर मराठे (पत्रकार)
ईश्वर मराठे (पत्रकार)
Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
2 hrs ago
a324f31f-8a0b-4ce1-9506-3648446ceb12

28 ते 30 ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन; ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ संकल्पनेवर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होणार 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन; ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ संकल्पनेवर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होणार नंदुरबार, दि. 27 ऑगस्ट : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 29 ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. क्रीडा व खेळाचा प्रचार-प्रसार व्हावा, शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत खेळाचे महत्त्व पोहोचावे तसेच युवक-युवतींमध्ये क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व्हावे, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने 28 ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या मुख्य संकल्पनेवर आधारित असून, ‘आदर, खेळ आणि हालचाल’ (Tribute, Play and Move) या तीन प्रमुख स्तंभांवर हा उत्सव साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमांची रूपरेषा व वेळापत्रक: 28 ऑगस्ट 2026 (स्मरण व 29 आव्हाने): • फ्लोरल ट्रिब्यूट (Floral Tribute): मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात येईल. • ‘29 आव्हाने’ (29 Challenges) उपक्रम: सहभागी खेळाडू व नागरिकांनी कोणताही क्रीडा प्रकार 29 वेळा करण्याचे आव्हान पूर्ण करावयाचे आहे. यामध्ये हॉकी ड्रीबल, फुटबॉल किक, बास्केटबॉल ड्रीबल, स्कीपिंग (दोरीच्या उड्या), हॉकी पेनल्टी शूटआऊट, धावण्याची स्पर्धा, 3 कि.मी. चालण्याची स्पर्धा, पुश-अप्स, सिट-अप्स, रस्सीखेच यांसारख्या प्रकारांचा समावेश असेल. खेळाडूंनी या उपक्रमांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून इतरांनाही आव्हान स्वीकारावयास प्रेरित करावे. 29 ऑगस्ट 2026 (हॉकी स्पर्धा): • ‘एक घंटा खेल के मैदान में’ या उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे ‘मेजर ध्यानचंद हॉकी चषक स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. 30 ऑगस्ट 2026 (पारितोषिक वितरण): • तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचा समारोप तसेच आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल. निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी आणि जिल्ह्यात क्रीडामय वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व खेळाडू, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी व नागरिकांनी या उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शिवधाम उद्याना शेजारी दक्षिण मुखी हनुमान, शनी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी शोभायात्रा रविवारी महाप्रसाद शिवधाम उद्याना शेजारी दक्षिण मुखी हनुमान, शनी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी शोभायात्रा रविवारी महाप्रसाद नंदुरबार शहरातील नेहरू चौक परिसरातील शिवधाम उद्याना शेजारी श्री शिव पंचायतन दक्षिण मुखी श्री हनुमान आणि शनि देवाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. दाक्षिणात्य पद्धतीचे सुंदर व आकर्षक मंदिर लक्ष वेधून घेत आहे. या भव्य मंदिरात तीन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते बारा वाजता मूर्तीची शोभायात्रा निघेल. गणेश अंबिका हनुमानजी आणि शनि देवाची मूर्ती नेहरू चौकातील श्रीराम मंदिरापासून नगरपालिका, द्वारकाधीश मंदिर, हाट दरवाजा, गांधी पुतळा मार्गे पुन्हा शिवधाम शेजारी मंदिरात शोभायात्रा येईल. शनिवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत प्रांत पूजन देवता आवाहन स्थापन ग्रहण दुपारी दोन ते सायंकाळी सात पर्यंत प्राणप्रतिष्ठा विधी होईल. रविवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत देवता मूर्ती संस्कार मंगल स्नान न्यास प्राणप्रतिष्ठा प्रधान हवन उत्तरांग हवन कलश शिखर स्थापन ध्वजारोहण, बलिदान, महा पूर्णा होती होईल. त्यानंतर महाआरती महाप्रसाद होईल भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री दक्षिणमुखी हनुमान व शनी मंदिर सेवा समिती तर्फे करण्यात आले आहे.
    3
    शिवधाम उद्याना शेजारी 
दक्षिण मुखी हनुमान, शनी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा 
 शुक्रवारी शोभायात्रा रविवारी महाप्रसाद

शिवधाम उद्याना शेजारी 
दक्षिण मुखी हनुमान, शनी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा 
शुक्रवारी शोभायात्रा रविवारी महाप्रसाद
नंदुरबार शहरातील नेहरू चौक परिसरातील शिवधाम उद्याना  शेजारी श्री शिव पंचायतन दक्षिण मुखी श्री हनुमान आणि शनि देवाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. दाक्षिणात्य  पद्धतीचे सुंदर व
आकर्षक मंदिर लक्ष वेधून घेत आहे. या भव्य मंदिरात तीन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते बारा वाजता मूर्तीची शोभायात्रा निघेल. गणेश अंबिका हनुमानजी आणि शनि देवाची मूर्ती नेहरू चौकातील श्रीराम मंदिरापासून नगरपालिका, द्वारकाधीश मंदिर, हाट दरवाजा, गांधी पुतळा मार्गे पुन्हा शिवधाम शेजारी मंदिरात शोभायात्रा  येईल. शनिवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत प्रांत पूजन देवता आवाहन स्थापन ग्रहण दुपारी दोन ते सायंकाळी सात पर्यंत प्राणप्रतिष्ठा विधी होईल. रविवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत देवता मूर्ती संस्कार मंगल स्नान न्यास प्राणप्रतिष्ठा प्रधान हवन उत्तरांग हवन कलश शिखर स्थापन ध्वजारोहण, बलिदान, महा पूर्णा होती होईल. त्यानंतर महाआरती महाप्रसाद होईल भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री दक्षिणमुखी हनुमान व शनी मंदिर सेवा समिती तर्फे करण्यात आले आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Dhule News | धुळे: व्याघ्र कक्ष (Tiger Cell) समितीची मासिक बैठक संपन्न; वन्यजीव संरक्षण आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी 10 महत्त्वाचे निर्णय... - धुळे (दि. 27/08/2026): पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे आज सकाळी 11.00 वाजता पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद (भापोसे) यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष (Tiger Cell) समितीची मासिक बैठक पार पडली. Dhule News | धुळे: व्याघ्र कक्ष (Tiger Cell) समितीची मासिक बैठक संपन्न; वन्यजीव संरक्षण आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी 10 महत्त्वाचे निर्णय... - धुळे (दि. 27/08/2026): पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे आज सकाळी 11.00 वाजता पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद (भापोसे) यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष (Tiger Cell) समितीची मासिक बैठक पार पडली. - 1) संयुक्त गस्त व नाकाबंदी: पोर्णिमा दरम्यान वनक्षेत्र व संशयास्पद मार्गावर पोलीस व वन विभागाची संयुक्त गस्त, नाकाबंदी आणि वाहन तपासणीचे नियोजन करणे. 2) वन कर्मचाऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण: वन विभागातील क्षेत्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार पोलीस दलातर्फे शस्त्र प्रशिक्षण आयोजित करणे. 3) अतिक्रमण निर्मूलन: वनक्षेत्रातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर कडक कारवाई करुन अतिक्रमण निर्मूलन करणे. 4) मानव-वन्यजीव संघर्ष नियंत्रण: वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीकडे वाढलेला ओघ लक्षात घेता नागरिक व प्राण्यांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करणे. 5) मांस विक्रीवर प्रतिबंध: धुळे शहर व परिसरात काळवीट तसेच इतर वन्यप्राण्यांच्या मांसाच्या बेकायदेशीर विक्रीवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करणे. 6) एअर गनने शिकार करणाऱ्यांचा शोध: लळींग परिसरात Air Gun च्या सहाय्याने शिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करणे. 7) गांजा लागवडीस प्रतिबंध: शिरपूर व परिसरात वनक्षेत्रात गांजा लागवडीस पुर्णपणे प्रतिबंध करण्यासाठी पोलीस व वन विभागाची संयुक्त कारवाई आयोजित करणे. 8) सर्पप्रदर्शनावर बंदी व पोलीस मदत: शिरपूर परिसरात सर्पमित्रांकडुन करण्यात येणारे सर्वांचे बेकायदेशीर प्रयोग/प्रदर्शन रोखण्यासाठी स्थानिक पोलीसांची मदत घेऊन संयुक्त कारवाई करणे. 9) ग्राम सुरक्षा दल व जनजागृती: गांजा लागवड किंवा अवैध वन्यजीव शिकार यासारख्या घटनांची माहिती त्वरीत मिळण्यासाठी स्थानिक पोलीस पाटील यांची मदत घेणे तसेच ग्राम सुरक्षा दल स्थापन करुन माहिती संकलित करणे. 10) रस्ता सुरक्षा उपाययोजना: महामार्ग व वनक्षेत्रातील रस्त्यांवर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी Underpass (भुयारी मार्ग) आणि Sign Board (सुचना फलक) उभारण्याबाबत संबंधित कंत्राटदारांना सुचना देणे. - #DhulePolice #TigerCell #VishalAnand #WildlifeProtection #DhuleNews
    1
    Dhule News | धुळे: व्याघ्र कक्ष (Tiger Cell) समितीची मासिक बैठक संपन्न; वन्यजीव संरक्षण आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी 10 महत्त्वाचे निर्णय...
-
धुळे (दि. 27/08/2026): पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे आज सकाळी 11.00 वाजता पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद (भापोसे) यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष (Tiger Cell) समितीची मासिक बैठक पार पडली.
Dhule News | धुळे: व्याघ्र कक्ष (Tiger Cell) समितीची मासिक बैठक संपन्न; वन्यजीव संरक्षण आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी 10 महत्त्वाचे निर्णय...
-
धुळे (दि. 27/08/2026): पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे आज सकाळी 11.00 वाजता पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद (भापोसे) यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष (Tiger Cell) समितीची मासिक बैठक पार पडली.
-
1) संयुक्त गस्त व नाकाबंदी: पोर्णिमा दरम्यान वनक्षेत्र व संशयास्पद मार्गावर पोलीस व वन विभागाची संयुक्त गस्त, नाकाबंदी आणि वाहन तपासणीचे नियोजन करणे.
2) वन कर्मचाऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण: वन विभागातील क्षेत्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार पोलीस दलातर्फे शस्त्र प्रशिक्षण आयोजित करणे.
3) अतिक्रमण निर्मूलन: वनक्षेत्रातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर कडक कारवाई करुन अतिक्रमण निर्मूलन करणे.
4) मानव-वन्यजीव संघर्ष नियंत्रण: वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीकडे वाढलेला ओघ लक्षात घेता नागरिक व प्राण्यांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करणे.
5) मांस विक्रीवर प्रतिबंध: धुळे शहर व परिसरात काळवीट तसेच इतर वन्यप्राण्यांच्या मांसाच्या बेकायदेशीर विक्रीवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करणे.
6) एअर गनने शिकार करणाऱ्यांचा शोध: लळींग परिसरात Air Gun च्या सहाय्याने शिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करणे.
7) गांजा लागवडीस प्रतिबंध: शिरपूर व परिसरात वनक्षेत्रात गांजा लागवडीस पुर्णपणे प्रतिबंध करण्यासाठी पोलीस व वन विभागाची संयुक्त कारवाई आयोजित करणे.
8) सर्पप्रदर्शनावर बंदी व पोलीस मदत: शिरपूर परिसरात सर्पमित्रांकडुन करण्यात येणारे सर्वांचे बेकायदेशीर प्रयोग/प्रदर्शन रोखण्यासाठी स्थानिक पोलीसांची मदत घेऊन संयुक्त कारवाई करणे.
9) ग्राम सुरक्षा दल व जनजागृती: गांजा लागवड किंवा अवैध वन्यजीव शिकार यासारख्या घटनांची माहिती त्वरीत मिळण्यासाठी स्थानिक पोलीस पाटील यांची मदत घेणे तसेच ग्राम सुरक्षा दल स्थापन करुन माहिती संकलित करणे.
10) रस्ता सुरक्षा उपाययोजना: महामार्ग व वनक्षेत्रातील रस्त्यांवर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी Underpass (भुयारी मार्ग) आणि Sign Board (सुचना फलक) उभारण्याबाबत संबंधित कंत्राटदारांना सुचना देणे.
-
#DhulePolice #TigerCell #VishalAnand #WildlifeProtection #DhuleNews
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जायखेडा पोलिसांनी पाठलाग करून पिकअप मधून गोवंश जनावरे केली जप्त जायखेडा पोलिसांची पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत ३ लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गोवंश घेऊन जाणारी पिक अप पाठलाग करून ताब्यात घेणेत आली.
    1
    जायखेडा पोलिसांनी पाठलाग करून पिकअप मधून गोवंश जनावरे केली जप्त 
जायखेडा पोलिसांची पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत ३ लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गोवंश घेऊन जाणारी पिक अप पाठलाग करून ताब्यात घेणेत आली.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो
    1
    मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो
मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो
    user_SACH TAK TV NEWS MALEGAON
    SACH TAK TV NEWS MALEGAON
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी प्रतिनिधी बोरगाव. जय गांगुर्डे गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील मोठामाळ, श्रीभुवन परिसरात निसर्गसौंदर्याची मोठी देणगी असून, या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटनस्थळाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र हद्दीतील वनविभागाच्या जागेचा योग्य नियोजनातून पर्यटनासाठी विकास केल्यास या परिसराला नवी ओळख मिळू शकते, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. मोठामाळ–श्रीभुवन परिसरात नैसर्गिक सौंदर्य, डोंगररांगा आणि हिरवाई असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे. वनविभागाने या परिसराची पाहणी करून पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच हॉटेल, खाद्यपदार्थ, स्थानिक उत्पादने, वाहतूक व इतर पूरक व्यवसायांना चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल. त्यामुळे वनविभाग व संबंधित प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन मोठामाळ–श्रीभुवन परिसराच्या पर्यटन विकासासाठी ठोस प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    4
    मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी

मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी
प्रतिनिधी बोरगाव. जय गांगुर्डे 
गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील मोठामाळ, श्रीभुवन परिसरात निसर्गसौंदर्याची मोठी देणगी असून, या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटनस्थळाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र हद्दीतील वनविभागाच्या जागेचा योग्य नियोजनातून पर्यटनासाठी विकास केल्यास या परिसराला नवी ओळख मिळू शकते, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
मोठामाळ–श्रीभुवन परिसरात नैसर्गिक सौंदर्य, डोंगररांगा आणि हिरवाई असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे. वनविभागाने या परिसराची पाहणी करून पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच हॉटेल, खाद्यपदार्थ, स्थानिक उत्पादने, वाहतूक व इतर पूरक व्यवसायांना चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल. त्यामुळे वनविभाग व संबंधित प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन मोठामाळ–श्रीभुवन परिसराच्या पर्यटन विकासासाठी ठोस प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_जय राजू गांगुर्डे
    जय राजू गांगुर्डे
    सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पत्रकारावरही गुन्हा; माध्यमस्वातंत्र्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा आरोप पुणे | प्रतिनिधी पुण्यातील प्रतिष्ठित सी ओ पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहातील वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सुरू झालेल्या या प्रकरणात विद्यार्थी संघटनांमधील संघर्षानंतर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आणि आता ए बी पी माझाचे पुणे प्रतिनिधी पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातही तक्रार गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने पत्रकाराने परवानगीशिवाय वसतिगृह परिसरात प्रवेश केल्याचा आरोप करत कायदेशीर तक्रार केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने तीव्र नाराजी व्यक्त करत पत्रकारांवर अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करून माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. सी ओ पी परिसरातील घटनेनंतर पोलिसांनी आधी ए बी व्ही पी सदस्याच्या तक्रारीवरून एन एस यु आय आणि युवक काँग्रेसशी संबंधित ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार मंदार गोंजारी यांनी सी ओ पी परिसरातील विद्यार्थ्यांच्या कथित प्रश्नांबाबत केलेले वृत्तांकनही चर्चेत आले आहे. एबीपी माझाच्या अधिकृत संकेतस्थळावर गोंजारी यांच्या नावाने सी ओ पी प्रकरणावरील वृत्त प्रकाशित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने वृत्तांकन करणे हा पत्रकारितेचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्याचा भाग आहे. एखाद्या पत्रकाराने नियमांचे उल्लंघन केले असल्यास कायदा आपले काम करेल; मात्र पत्रकाराने केलेल्या वृत्तांकनामुळे प्रशासन किंवा सत्ताधारी अस्वस्थ झाले म्हणून पत्रकाराविरोधात कारवाई होत असेल, तर हा माध्यमस्वातंत्र्यासाठी गंभीर इशारा आहे, अशी भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने व्यक्त केली आहे. सी ओ पी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या शुल्क, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवरून वाद निर्माण झाल्याचे विविध वृत्तांतून समोर आले आहे. एका विद्यार्थिनीने सुरुवातीला कॉलेजकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे सांगितले होते; त्यानंतर तिने दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्यावर दबाव निर्माण झाल्याचे सांगत राजकीय वादात आपल्याला ओढू नये, असे आवाहन केले. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत, त्यावर प्रशासनाची भूमिका काय आहे, विद्यार्थी संघटनांमध्ये नेमका संघर्ष कशामुळे झाला आणि पत्रकाराविरोधातील तक्रारीमागील वास्तविक कारण काय आहे, हे स्पष्टपणे समोर येणे गरजेचे आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. म्हस्के म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने बातमी केली म्हणून पत्रकाराला गुन्ह्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा केवळ एका पत्रकाराचा प्रश्न राहात नाही; हा संपूर्ण माध्यमविश्वाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न बनतो. “पत्रकार चुकीचा असेल तर कायदा तपास करेल, पुरावे असतील तर न्यायालयीन प्रक्रिया होईल. मात्र पत्रकाराने प्रश्न उपस्थित केले म्हणून त्याच्यावर दबाव निर्माण करणे, त्याला घाबरवणे किंवा गुन्ह्याच्या माध्यमातून त्याची लेखणी रोखण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या माध्यमांकडे संशयाने पाहिले जात असेल, तर ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचेही म्हस्के यांनी नमूद केले. “महाराष्ट्रातील पत्रकार निर्भयपणे काम करतील. माध्यमांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असा इशाराही त्यांनी दिला. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनीही सी ओ पी प्रकरणातील पत्रकाराविरोधातील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला. चोरडिया म्हणाले की, पत्रकार हा समाजातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या समोर आणणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे. “पत्रकाराने बातमी केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. पत्रकारितेवर दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न महाराष्ट्रातील पत्रकार सहन करणार नाहीत. पत्रकाराच्या लेखणीला घाबरवण्याऐवजी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” अशी भूमिका चोरडिया यांनी मांडली. सी ओ पी प्रकरणात पत्रकाराविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि पत्रकाराला केवळ त्याच्या व्यावसायिक कर्तव्यामुळे लक्ष्य केले जात नाही ना, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सी ओ पी प्रकरण आता केवळ विद्यार्थी संघटनांमधील संघर्षापुरते मर्यादित राहिलेले नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यापीठ प्रशासनाची भूमिका, राजकीय हस्तक्षेप, विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आणि आता पत्रकाराविरोधातील कायदेशीर कारवाई या सर्व मुद्द्यांमुळे प्रकरण अधिक व्यापक झाले आहे. पोलिसांनी सी ओ पी परिसरात राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर तसेच राजकीय कार्यक्रमांवर काही काळ निर्बंधही लागू केले होते. मात्र प्रश्न असा आहे की, विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमके काय आहेत? त्यांची उत्तरे कोण देणार? आणि ते प्रश्न जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकाराचे संरक्षण कोण करणार? व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने स्पष्ट केले आहे की, पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर संघटना पत्रकारांच्या घटनात्मक अधिकारांच्या बाजूने ठामपणे उभी राहील. “पत्रकारांवर दबाव टाकून प्रश्न सुटणार नाहीत. उलट दबाव वाढला की प्रश्न अधिक तीव्रतेने जनतेसमोर येतील. विद्यार्थ्यांना न्याय आणि पत्रकारांना निर्भयपणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणे, हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे,” अशी भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे. दरम्यान, पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातील तक्रारीसह सी ओ पी प्रकरणातील सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आणि विद्यार्थी, विद्यापीठ प्रशासन, विद्यार्थी संघटना तसेच पत्रकार,सर्वांची बाजू ऐकून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यावर पुढची भूमिका घेणार आहे.
    1
    पत्रकारावरही गुन्हा; माध्यमस्वातंत्र्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा आरोप
पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील प्रतिष्ठित सी ओ पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहातील वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सुरू झालेल्या या प्रकरणात विद्यार्थी संघटनांमधील संघर्षानंतर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आणि आता ए बी पी माझाचे पुणे प्रतिनिधी पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातही तक्रार गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने पत्रकाराने परवानगीशिवाय वसतिगृह परिसरात प्रवेश केल्याचा आरोप करत कायदेशीर तक्रार केली आहे. 
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने तीव्र नाराजी व्यक्त करत पत्रकारांवर अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करून माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
सी ओ पी परिसरातील घटनेनंतर पोलिसांनी आधी ए बी व्ही पी सदस्याच्या तक्रारीवरून एन एस यु आय आणि युवक काँग्रेसशी संबंधित ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. 
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार मंदार गोंजारी यांनी सी ओ पी  परिसरातील विद्यार्थ्यांच्या कथित प्रश्नांबाबत केलेले वृत्तांकनही चर्चेत आले आहे. एबीपी माझाच्या अधिकृत संकेतस्थळावर गोंजारी यांच्या नावाने सी ओ पी प्रकरणावरील वृत्त प्रकाशित झाले आहे. 
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने वृत्तांकन करणे हा पत्रकारितेचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्याचा भाग आहे. एखाद्या पत्रकाराने नियमांचे उल्लंघन केले असल्यास कायदा आपले काम करेल; मात्र पत्रकाराने केलेल्या वृत्तांकनामुळे प्रशासन किंवा सत्ताधारी अस्वस्थ झाले म्हणून पत्रकाराविरोधात कारवाई होत असेल, तर हा माध्यमस्वातंत्र्यासाठी गंभीर इशारा आहे, अशी भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने व्यक्त केली आहे.
सी ओ पी  प्रकरणात विद्यार्थ्यांच्या शुल्क, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवरून वाद निर्माण झाल्याचे विविध वृत्तांतून समोर आले आहे. एका विद्यार्थिनीने सुरुवातीला कॉलेजकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे सांगितले होते; त्यानंतर तिने दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्यावर दबाव निर्माण झाल्याचे सांगत राजकीय वादात आपल्याला ओढू नये, असे आवाहन केले. 
म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत, त्यावर प्रशासनाची भूमिका काय आहे, विद्यार्थी संघटनांमध्ये नेमका संघर्ष कशामुळे झाला आणि पत्रकाराविरोधातील तक्रारीमागील वास्तविक कारण काय आहे, हे स्पष्टपणे समोर येणे गरजेचे आहे.
व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.
म्हस्के म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने बातमी केली म्हणून पत्रकाराला गुन्ह्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा केवळ एका पत्रकाराचा प्रश्न राहात नाही; हा संपूर्ण माध्यमविश्वाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न बनतो.
“पत्रकार चुकीचा असेल तर कायदा तपास करेल, पुरावे असतील तर न्यायालयीन प्रक्रिया होईल. मात्र पत्रकाराने प्रश्न उपस्थित केले म्हणून त्याच्यावर दबाव निर्माण करणे, त्याला घाबरवणे किंवा गुन्ह्याच्या माध्यमातून त्याची लेखणी रोखण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या माध्यमांकडे संशयाने पाहिले जात असेल, तर ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचेही म्हस्के यांनी नमूद केले.
“महाराष्ट्रातील पत्रकार निर्भयपणे काम करतील. माध्यमांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असा इशाराही त्यांनी दिला.
व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनीही सी ओ पी  प्रकरणातील पत्रकाराविरोधातील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला.
चोरडिया म्हणाले की, पत्रकार हा समाजातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या समोर आणणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे.
“पत्रकाराने बातमी केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. पत्रकारितेवर दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न महाराष्ट्रातील पत्रकार सहन करणार नाहीत. पत्रकाराच्या लेखणीला घाबरवण्याऐवजी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” अशी भूमिका चोरडिया यांनी मांडली.
सी ओ पी  प्रकरणात पत्रकाराविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि पत्रकाराला केवळ त्याच्या व्यावसायिक कर्तव्यामुळे लक्ष्य केले जात नाही ना, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
सी ओ पी  प्रकरण आता केवळ विद्यार्थी संघटनांमधील संघर्षापुरते मर्यादित राहिलेले नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यापीठ प्रशासनाची भूमिका, राजकीय हस्तक्षेप, विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आणि आता पत्रकाराविरोधातील कायदेशीर कारवाई या सर्व मुद्द्यांमुळे प्रकरण अधिक व्यापक झाले आहे.
पोलिसांनी सी ओ पी  परिसरात राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर तसेच राजकीय कार्यक्रमांवर काही काळ निर्बंधही लागू केले होते. 
मात्र प्रश्न असा आहे की, विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमके काय आहेत? त्यांची उत्तरे कोण देणार? आणि ते प्रश्न जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकाराचे संरक्षण कोण करणार?
व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने स्पष्ट केले आहे की, पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर संघटना पत्रकारांच्या घटनात्मक अधिकारांच्या बाजूने ठामपणे उभी राहील.
“पत्रकारांवर दबाव टाकून प्रश्न सुटणार नाहीत. उलट दबाव वाढला की प्रश्न अधिक तीव्रतेने जनतेसमोर येतील. विद्यार्थ्यांना न्याय आणि पत्रकारांना निर्भयपणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणे, हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे,” अशी भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे.
दरम्यान, पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातील तक्रारीसह सी ओ पी  प्रकरणातील सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आणि विद्यार्थी, विद्यापीठ प्रशासन, विद्यार्थी संघटना तसेच पत्रकार,सर्वांची बाजू ऐकून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यावर पुढची भूमिका घेणार आहे.
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त... Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त... - Grand procession on the occasion of Prophet's birth anniversary in Dhule; Attractive scenes attracted attention, tight police security - #DhuleNews #EidEMilad #PaigambarJayanti #DhuleEidEMilad #DhulePolice
    1
    Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त...
Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त...
-
Grand procession on the occasion of Prophet's birth anniversary in Dhule; Attractive scenes attracted attention, tight police security
-
#DhuleNews #EidEMilad #PaigambarJayanti #DhuleEidEMilad #DhulePolice
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • मित्रांमध्ये झालेली किरकोळ बोलाचाली पाहता पाहता उग्र वादात रूपांतरित झाली. या वादातून २७ वर्षीय हेमंत विलास सूर्यवंशी याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच सापुतारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
    1
    मित्रांमध्ये झालेली किरकोळ बोलाचाली पाहता पाहता उग्र वादात रूपांतरित झाली. या वादातून २७ वर्षीय हेमंत विलास सूर्यवंशी याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच सापुतारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.