अमरावती जिल्ह्यात संविधान लोकशाहीवादी जनसंघटना समन्वय समितीच्या वतीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी-युवकांच्या "रास्त व न्याय" आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांच्या नावे एक निवेदन सादर केले. या निवेदनात शिक्षण आणि रोजगार हा विद्यार्थी-युवकांचा घटनात्मक अधिकार असल्याचे ठामपणे मांडण्यात आले आहे. तसेच, शिक्षण क्षेत्रातील वाढते खासगीकरण, व्यापारीकरण, बाजारपेठीकरण आणि भ्रष्टाचारावर तीव्र चिंता व्यक्त करत यामुळे विद्यार्थ्यांचे हक्क हिरावले जात असल्याचे म्हटले आहे. शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभार, पेपरफुटी आणि गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य व आत्महत्येच्या घटना वाढत असल्याबद्दल निवेदनात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सरकारने याबाबत जबाबदारी स्वीकारून कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. समितीने NEET तसेच इतर परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली आहे. यासोबतच, शिक्षण क्षेत्रातील या संपूर्ण भ्रष्टाचाराची आणि अनागोंदी कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर डॉ. प्रकाश मानोकर, प्रा. संतोष शुक्ला, कु. मीनाताई वाठोरेकर, उपाताई पांडुरे, मायाताई वाकोडे, पंकजभाऊ वैद्य, प्रा. प्रविणजी गुल्हाने, गोविंदजी रोहनकर, विवेक वाठोरेकर, हरीश दादा, डॉ. पृथ्वीराज राजपूत, पंकज देशमुख, आशीष कडू, प्रदीप भाऊरावजी भगत, प्रभाकरराव आकोटकर, सरोजभाऊ चौफकर, सौ. प्रियाताई चौफकर, सुनील घटोळे, अंडू सुयोग माठुरकर आणि प्रदीपभाऊ पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अमरावती जिल्ह्यात संविधान लोकशाहीवादी जनसंघटना समन्वय समितीच्या वतीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी-युवकांच्या "रास्त व न्याय" आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांच्या नावे एक निवेदन सादर केले. या निवेदनात शिक्षण आणि रोजगार हा विद्यार्थी-युवकांचा घटनात्मक अधिकार असल्याचे ठामपणे मांडण्यात आले आहे. तसेच, शिक्षण क्षेत्रातील वाढते खासगीकरण, व्यापारीकरण, बाजारपेठीकरण आणि भ्रष्टाचारावर तीव्र चिंता व्यक्त करत यामुळे विद्यार्थ्यांचे हक्क हिरावले जात असल्याचे म्हटले आहे. शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभार, पेपरफुटी आणि गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य व आत्महत्येच्या घटना वाढत असल्याबद्दल निवेदनात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सरकारने याबाबत जबाबदारी स्वीकारून कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. समितीने NEET तसेच इतर परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली आहे. यासोबतच, शिक्षण क्षेत्रातील या संपूर्ण भ्रष्टाचाराची आणि अनागोंदी कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर डॉ. प्रकाश मानोकर, प्रा. संतोष शुक्ला, कु. मीनाताई वाठोरेकर, उपाताई पांडुरे, मायाताई वाकोडे, पंकजभाऊ वैद्य, प्रा. प्रविणजी गुल्हाने, गोविंदजी रोहनकर, विवेक वाठोरेकर, हरीश दादा, डॉ. पृथ्वीराज राजपूत, पंकज देशमुख, आशीष कडू, प्रदीप भाऊरावजी भगत, प्रभाकरराव आकोटकर, सरोजभाऊ चौफकर, सौ. प्रियाताई चौफकर, सुनील घटोळे, अंडू सुयोग माठुरकर आणि प्रदीपभाऊ पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
- लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमरावतीमध्ये 'जनसेवा सप्ताह' अंतर्गत २६ जुलै २०२६ रोजी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष यश सुलभा संजय खोडके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा सत्कार सोहळा स्थानिक श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड येथे सकाळी ११ वाजता पार पडणार असून यामध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू, प्रशस्तीपत्र आणि वृक्ष देऊन गौरविण्यात येईल. तसेच यावेळी मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शनही लाभणार आहे. राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने २२ जुलै ते २७ जुलै २०२६ या कालावधीत 'जनसेवा सप्ताह' साजरा केला जात आहे. या सप्ताहादरम्यान अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या संकल्पनेतून 'ग्रीन अमरावती' मोहीम राबवून शहरात २५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. या पर्यावरणपूरक अभियानाचा शुभारंभ २२ जुलै रोजी शासकीय आयटीआय संस्था येथून केला जाईल. या जनसेवा सप्ताहादरम्यान अमरावतीच्या विविध प्रभागांमध्ये भरगच्च लोककल्याणकारी कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये २२ जुलै रोजी रक्तदान शिबिर, महिलांना शिलाई मशीन वाटप, आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन वाटप केले जाईल. २३ जुलै रोजी एसटी बस एनएमसी कार्ड शिबिर व रुग्णालयात स्नेहभोजन, २४ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात फळ वाटप व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भोजन वाटप होईल. २५ जुलै रोजी महाराजस्व अभियान आणि आरोग्य तपासणी शिबिर, २६ जुलै रोजी मुख्य विद्यार्थी सत्कार सोहळा आणि २७ जुलै रोजी विलास नगर स्मशानभूमीत भव्य वृक्षारोपण, मृगेंद्र मठ येथे रक्तदान शिबिर, तसेच युसूफ पॅलेस येथे रेशन कार्ड व एनएमसी कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शोध प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.1
- छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त मा. जी. श्रीकांत (भा.प्र.से.) यांनी भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सघन पुनरिक्षण (SIR) मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला असून, नागरिकांना मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षण प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी मतदार यादीतील त्रुटी दूर करून पात्र मतदारांची नोंद सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. एक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपल्या परिसरातील बीएलओ (BLO) यांच्याशी संपर्क साधून आपली आवश्यक माहिती अद्ययावत करावी, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग हाच पारदर्शक आणि बळकट लोकशाहीचा पाया असल्याने, सर्व नागरिकांनी या विशेष मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.1
- छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील कामाचा सविस्तर आढावा घेतला आहे. मतदार यादी अत्यंत अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावरील काम ठरवून दिलेल्या वेळेतच पूर्ण करावे, तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या कामाचे नियमित परीक्षण करावे, अशा कडक सूचना त्यांनी दिल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी रणजीत पाटील, सह आयुक्त मंजुषा मिसकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर आणि तहसिलदार के. के. भदाने यांच्यासह सर्व संबंधित मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा घेत बीएलओ अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराची प्रत्यक्ष पडताळणी करणे, गणना फॉर्म काळजीपूर्वक भरणे, कागदपत्रांची तपासणी करणे आणि प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढणे या बाबींचा समावेश आहे. कोणताही पात्र मतदार यादीतून सुटणार नाही याची दक्षता घेण्याचे सांगत अपात्र मतदारांची नावे नियमानुसार वेळेत वगळण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. या कामात नागरिकांनीही बीएलओ अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे देऊन सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले असून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील एसआयआर कार्यक्रमाच्या प्रगतीची माहिती सादर केली.1
- औरंगाबाद येथे भाजपा शहराध्यक्ष उत्तम मामा ढोके यांनी आमदार सुहास शिरसाट यांचा भव्य नागरी सत्कार केला असून, यावेळी त्यांची लाडू तुला देखील करण्यात आली आहे.1
- दिल्लीत अमेरिकन ट्रेड डीलच्या विरोधात देशातील शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले असता, माननीय मंत्री महादेव जानकर आणि त्यांच्यासोबत गेलेल्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी राजघाट परिसरातून ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे, या आंदोलनासाठी देशातील १५४ हून अधिक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकरी आधीच किसान घाट येथे दाखल झाले आहेत.1
- राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. या आंदोलनाद्वारे त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पंतप्रधान मोदी आणि शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.1
- नांदेड-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी येथील उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्यानंतर आता तो पूलच ढासळू लागला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून खबरदारी म्हणून पुलाखालील मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोणताही पाऊस नसतानाही या राष्ट्रीय महामार्गाच्या संरक्षक भिंतीचा भाग अशा प्रकारे कोसळत असल्याने उड्डाणपुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि दर्जावर आता थेट प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.2