logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पालघर जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेत दीर्घकालीन आणि सर्वसमावेशक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने 'पालघर जिल्हा शिक्षण रूपांतरण कार्यक्रम' अंतर्गत बहु-भागीदार सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पालघर जिल्हा परिषद आणि मोतीलाल ओसवाल फाउंडेशनच्या संयुक्त पुढाकाराने जिल्हा परिषद मुख्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्याला मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या महत्त्वपूर्ण उपक्रमात विविध स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटना सहभागी झाल्या असून, यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, शिक्षकांचे कौशल्यवर्धन करणे, अंगणवाडी स्तरावरील शिक्षण बळकट करणे, इंग्रजी संभाषण कौशल्ये विकसित करणे, करिअर मार्गदर्शन देणे, तसेच युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. शाळा, शिक्षक, पालक, समुदाय आणि युवकांना एकाच विकास प्रक्रियेत सामावून घेत शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याचे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मोतीलाल ओसवाल फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात लीडरशिप फॉर इक्विटी, लर्निंग लिंक्स फाउंडेशन, क्वेस्ट आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन या संस्था विविध स्तरांवर काम करणार आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि युवकांना होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी मोतीलाल ओसवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीता अग्रवाल, शिक्षण प्रकल्प संचालक पूर्वशा रॉय, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, क्वेस्टचे संचालक नितीन विशे, लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या उपाध्यक्ष रूपा भट्टाचार्य, लीडरशिप फॉर इक्विटीच्या संचालिका अहोना कृष्णा, लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या अमृता बहुलेकर यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, विविध संस्थांच्या सहभागातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शिक्षकांना क्षमता विकासाच्या संधी, आणि युवकांना कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सामूहिक प्रयत्नांच्या बळावर पालघर जिल्हा शिक्षण परिवर्तनाचे एक आदर्श मॉडेल म्हणून पुढे येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी राहुल नागरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

11 hrs ago
user_अमोल काळे
अमोल काळे
Newspaper advertising department पालघर, पालघर, महाराष्ट्र•
11 hrs ago
f38dbcba-60d4-4eb7-857c-c4f75a5a48fb

पालघर जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेत दीर्घकालीन आणि सर्वसमावेशक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने 'पालघर जिल्हा शिक्षण रूपांतरण कार्यक्रम' अंतर्गत बहु-भागीदार सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पालघर जिल्हा परिषद आणि मोतीलाल ओसवाल फाउंडेशनच्या संयुक्त पुढाकाराने जिल्हा परिषद मुख्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्याला मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या महत्त्वपूर्ण उपक्रमात विविध स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटना सहभागी झाल्या असून, यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, शिक्षकांचे कौशल्यवर्धन करणे, अंगणवाडी स्तरावरील शिक्षण बळकट करणे, इंग्रजी संभाषण कौशल्ये विकसित करणे, करिअर मार्गदर्शन देणे, तसेच युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. शाळा, शिक्षक, पालक, समुदाय आणि युवकांना एकाच विकास प्रक्रियेत सामावून घेत शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याचे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मोतीलाल ओसवाल फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात लीडरशिप फॉर इक्विटी, लर्निंग लिंक्स फाउंडेशन, क्वेस्ट आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन या संस्था विविध स्तरांवर काम करणार आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि युवकांना होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी मोतीलाल ओसवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीता अग्रवाल, शिक्षण प्रकल्प संचालक पूर्वशा रॉय, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, क्वेस्टचे संचालक नितीन विशे, लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या उपाध्यक्ष रूपा भट्टाचार्य, लीडरशिप फॉर इक्विटीच्या संचालिका अहोना कृष्णा, लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या अमृता बहुलेकर यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, विविध संस्थांच्या सहभागातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शिक्षकांना क्षमता विकासाच्या संधी, आणि युवकांना कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सामूहिक प्रयत्नांच्या बळावर पालघर जिल्हा शिक्षण परिवर्तनाचे एक आदर्श मॉडेल म्हणून पुढे येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी राहुल नागरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दिनांक २२-०६-२०२६ रोजी कोळीपाड्यात धो धो पावसाचे दमदार आगमन झाले, ज्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला. या पावसामुळे सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला आणि शेतकरी पेरणीच्या लगबगीत लागले. तहानलेले प्राणी आणि पक्षी देखील आनंदाने चिवचिव करू लागले आहेत, कारण बळी राजाचे आगमन झाल्याने सगळीकडे आनंदी आनंद पसरला आहे.
    1
    दिनांक २२-०६-२०२६ रोजी कोळीपाड्यात धो धो पावसाचे दमदार आगमन झाले, ज्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला. या पावसामुळे सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला आणि शेतकरी पेरणीच्या लगबगीत लागले. तहानलेले प्राणी आणि पक्षी देखील आनंदाने चिवचिव करू लागले आहेत, कारण बळी राजाचे आगमन झाल्याने सगळीकडे आनंदी आनंद पसरला आहे.
    user_Nilesh Nana Dhinda
    Nilesh Nana Dhinda
    वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहारोली येथील विश्वास दिवा यांनी आपली कन्या प्रसूतकाळासाठी सरकारी रुग्णालय, वाडा येथे दाखल केली होती. मात्र, येथील डॉक्टरांनी रुग्णालयात पुरेशा सुविधा नसल्याचे सांगत रुग्णाला इतरत्र हलवण्यास सांगितले. दिवा यांनी त्यांच्याकडे इतर ठिकाणी जाण्यासाठी पैसे नसल्याचे सांगून वाड्याच्या सरकारी रुग्णालयातच प्रसूती करण्याची विनंती केली. त्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना IDL रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आणि तिथे उपचार मोफत होतील असे आश्वासन दिले. त्यानुसार, त्यांनी रुग्णाला IDL रुग्णालयात दाखल केले. परंतु, आता IDL रुग्णालयातील कर्मचारी पैशांची मागणी करत आहेत. विश्वास दिवा यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब असल्याचे म्हटले आहे आणि त्यामुळे त्यांना पैसे भरणे शक्य नाही. विशेष म्हणजे, त्यांच्या रुग्णाकडे आयुष्मान कार्ड असूनही रुग्णालयाने हे कार्ड स्वीकारण्यास नकार दिला आहे, असे सांगत की आयुष्मान योजनेतून उपचार होणार नाही. या गंभीर स्थितीत त्यांनी मदतीची याचना केली आहे.
    1
    पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहारोली येथील विश्वास दिवा यांनी आपली कन्या प्रसूतकाळासाठी सरकारी रुग्णालय, वाडा येथे दाखल केली होती. मात्र, येथील डॉक्टरांनी रुग्णालयात पुरेशा सुविधा नसल्याचे सांगत रुग्णाला इतरत्र हलवण्यास सांगितले. दिवा यांनी त्यांच्याकडे इतर ठिकाणी जाण्यासाठी पैसे नसल्याचे सांगून वाड्याच्या सरकारी रुग्णालयातच प्रसूती करण्याची विनंती केली.

त्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना IDL रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आणि तिथे उपचार मोफत होतील असे आश्वासन दिले. त्यानुसार, त्यांनी रुग्णाला IDL रुग्णालयात दाखल केले. परंतु, आता IDL रुग्णालयातील कर्मचारी पैशांची मागणी करत आहेत.

विश्वास दिवा यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब असल्याचे म्हटले आहे आणि त्यामुळे त्यांना पैसे भरणे शक्य नाही. विशेष म्हणजे, त्यांच्या रुग्णाकडे आयुष्मान कार्ड असूनही रुग्णालयाने हे कार्ड स्वीकारण्यास नकार दिला आहे, असे सांगत की आयुष्मान योजनेतून उपचार होणार नाही. या गंभीर स्थितीत त्यांनी मदतीची याचना केली आहे.
    user_Vishwas Diva
    Vishwas Diva
    वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • वेगामुळे झालेल्या एका भीषण अपघातात दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात वेगामुळे झाल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला.
    1
    वेगामुळे झालेल्या एका भीषण अपघातात दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात वेगामुळे झाल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला.
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात प्रेम पांडे नावाच्या एका व्यक्तीने घरात घुसून चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक त्याच्या दहशतीमुळे अत्यंत त्रस्त झाले असून, त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.
    1
    मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात प्रेम पांडे नावाच्या एका व्यक्तीने घरात घुसून चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक त्याच्या दहशतीमुळे अत्यंत त्रस्त झाले असून, त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून रेती बंदर परिसरात राहणाऱ्या समीरवर हल्ला केल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांची नावे पॉकेटमार आर्यन पांडे आणि नशेड्या प्रेम पांडे अशी आहेत.
    1
    ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून रेती बंदर परिसरात राहणाऱ्या समीरवर हल्ला केल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांची नावे पॉकेटमार आर्यन पांडे आणि नशेड्या प्रेम पांडे अशी आहेत.
    user_Parvez Shaikh
    Parvez Shaikh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Hot aunty romance ....................................
    1
    Hot aunty romance ....................................
    user_Sumit Dhepe
    Sumit Dhepe
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) शरद पवार गटाचे कळवा-मुंब्रा विभागाचे अध्यक्ष शमीम खान यांनी 'SIR' संबंधित माहिती दिली आहे.
    1
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) शरद पवार गटाचे कळवा-मुंब्रा विभागाचे अध्यक्ष शमीम खान यांनी 'SIR' संबंधित माहिती दिली आहे.
    user_Maharashtra7 tv
    Maharashtra7 tv
    News Anchor Thane, Maharashtra•
    8 hrs ago
  • लखनऊ शहरात भीषण आग लागल्याने 14 जणांचा दर्दनाक मृत्यू झाला आहे.
    1
    लखनऊ शहरात भीषण आग लागल्याने 14 जणांचा दर्दनाक मृत्यू झाला आहे.
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.