क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त भव्य प्रभात फेरी! नांदेड, दि. ११ एप्रिल : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आज ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ९ या वेळेत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड यांच्या वतीने स्व. वसंतराव नाईक चौक ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीत शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह तसेच महाविद्यालयीन सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून तसेच शैक्षणिक संदेशपर कविता सादर करून सामाजिक जागृतीचा प्रभावी संदेश दिला. यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले प्रमुख उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व मान्यवरांना द्विशताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच समग्र वाङ्मय ग्रंथ भेट म्हणून प्रदान केले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी नांदेड जिल्ह्याचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त भव्य प्रभात फेरी! नांदेड, दि. ११ एप्रिल : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आज ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ९ या वेळेत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण
विभाग, नांदेड यांच्या वतीने स्व. वसंतराव नाईक चौक ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीत शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह तसेच महाविद्यालयीन सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी पथनाट्य
सादर करून तसेच शैक्षणिक संदेशपर कविता सादर करून सामाजिक जागृतीचा प्रभावी संदेश दिला. यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले प्रमुख उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व मान्यवरांना द्विशताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच
समग्र वाङ्मय ग्रंथ भेट म्हणून प्रदान केले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी नांदेड जिल्ह्याचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
- सांगलीत पत्रकार संजय भोकरे यांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळत तीन आरोपींना अटक केली आहे. अंबाबाई तालीम संस्थेच्या वादामुळे हा कट रचला गेल्याचा संशय असून, आरोपी फेब्रुवारीपासून भोकरेंची रेकी करत होते. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून, भोकरेंना तातडीने 'झेड प्लस' सुरक्षा देण्याची मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.1
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात पोलिसांनी अवैध 'जुगाड' वाहतूक आणि जुगारावर धडक कारवाई केली. या कारवाईत तीन जुगाड चालकांना अटक करण्यात आली असून, ₹3.45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या अवैध वाहनांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.1
- अक्कलकुवा शहरातील वरखेडी नदी परिसरात साठवलेल्या फिल्टर पाण्याच्या पाईपांना कचऱ्याच्या आगीने भीषण आग लागली. आगीची तीव्रता इतकी होती की, काळ्या धुराचे लोट दोन किलोमीटर अंतरावरून दिसत होते, ज्यामुळे लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. तालुका मुख्यालय असूनही अग्निशमन दलाअभावी ही आग विझवण्यात मोठी अडचण निर्माण झाल्याने नागरिकांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.1
- हॅन्ड पंप दुरुस्ती जवळवाडी या गावातील दोन वर्ष झाले पाणी असूनही दुरुस्त करत नाहीत दोन वर्षे झालं आहे हॅन्ड पंप बंद पडला आहे दुरुस्त करत नाहीयेत जवळगा वाडी या गावातील पाणी असूनही दुरुस्त करत नाहीत2
- मेहकरमधील सामाजिक लोकांनी 'गाथा माथा', 'संत देशी' आणि जनहित यावर आपले मत व्यक्त केले. त्यांनी या प्राचीन परंपरा आणि लोककल्याण यांच्यातील संबंधावर भर दिला.1
- डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गावरील तालखेड फाटा परिसरात डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीवाची पर्वा न करता डिझेल मिळवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.1
- धाराशिव-उजनी राज्यमार्गावर झालेल्या भीषण अपघातात बीएलओचे काम पूर्ण करून परतणाऱ्या एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली असून, राज्यमार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.1
- घाटंजीमध्ये धम्म बालसंस्कार शिबिराचा समारोप,विद्यार्थ्यांची धम्म शांतता रॅली २ ते ९ मे पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये धम्म बालसंस्कार शिबिर घेण्यात आले.घाटी येथील धम्म चेतना बुद्धविहार मध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ४० विद्यार्थी हे सहभागी झाले होते. ९ मे रोजी या शिबिराची सांगता करण्यात आली.1
- Post by Sharad Dayedar1