क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त भव्य प्रभात फेरी! नांदेड, दि. ११ एप्रिल : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आज ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ९ या वेळेत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड यांच्या वतीने स्व. वसंतराव नाईक चौक ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीत शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह तसेच महाविद्यालयीन सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून तसेच शैक्षणिक संदेशपर कविता सादर करून सामाजिक जागृतीचा प्रभावी संदेश दिला. यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले प्रमुख उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व मान्यवरांना द्विशताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच समग्र वाङ्मय ग्रंथ भेट म्हणून प्रदान केले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी नांदेड जिल्ह्याचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त भव्य प्रभात फेरी! नांदेड, दि. ११ एप्रिल : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आज ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ९ या वेळेत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण
विभाग, नांदेड यांच्या वतीने स्व. वसंतराव नाईक चौक ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीत शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह तसेच महाविद्यालयीन सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी पथनाट्य
सादर करून तसेच शैक्षणिक संदेशपर कविता सादर करून सामाजिक जागृतीचा प्रभावी संदेश दिला. यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले प्रमुख उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व मान्यवरांना द्विशताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच
समग्र वाङ्मय ग्रंथ भेट म्हणून प्रदान केले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी नांदेड जिल्ह्याचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. त्यांचे हे उपोषण भाजप सरकारविरोधात आहे.1
- खासदार संजय जाधव यांनी आंतरवाली येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. "लाख मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे," अशी तीव्र प्रतिक्रिया खासदार जाधव यांनी व्यक्त केली.1
- सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीचा एक भाग म्हणून संबोधी अकादमीचे अध्यक्ष डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांनी विवाह सोहळ्याच्या मंडपाची पाहणी केली.1
- हिंगोली जिल्ह्यात दामिनी पथकाने विद्यार्थ्यांसाठी बालसुरक्षेबाबत एक विशेष जनजागृती मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत, विद्यार्थ्यांना बालसुरक्षा आणि सुरक्षिततेचे महत्त्वाचे धडे देण्यात आले, ज्याचा उद्देश त्यांना संरक्षणाविषयी जागरूक करणे आहे. ही मोहीम विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आली.1
- २९ मे रोजी मानवत येथे एक भीषण अपघात घडला, ज्यात मानवतचे चार नागरिक जागीच ठार झाले. ही दुर्दैवी घटना ट्रॅव्हल वाहन आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेमुळे घडली.1
- यशवंत संघर्ष सेनेने मनोज दादा जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.1
- एका प्रेमी युगुलाची खरी प्रेम कहाणी समोर आली आहे. आजाराने त्रस्त असलेल्या आपल्या प्रेयसीला 'दुसऱ्या जन्मातही तूच माझी हो' असे म्हणत, तिच्या प्रियकराने दवाखान्यातच तिच्याशी लग्नगाठ बांधली.1
- परभणी जिल्ह्यातील मानवत येथे झालेल्या एका घटनेत, खाजगी ट्रॅव्हल्सच्या धडकेमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे.1