जून महिना अर्धा उलटून गेला तरी घनसावंगी तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाऐवजी गेल्या काही दिवसांपासून जोरदार वारे वाहत असल्याने शेतकऱ्यांवर आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून, ऊसासह अन्य पिकांवरही मोठे संकट आले आहे. शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामासाठी मोठ्या आशेने बी-बियाणे, खते आणि अन्य शेती साहित्याची खरेदी केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतशिवार पेरणीसाठी तयार केले असून काही ठिकाणी नागरटही करण्यात आली आहे. मात्र, पावसाअभावी जमिनीत मोठी ढेकळे पडून ओलावा नसल्याने पेरणीसाठी पोषक परिस्थिती नाही. गतवर्षी मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती आणि जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात बहुतांश शेतकऱ्यांच्या खरीप पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, पण यंदाचे चित्र पूर्णपणे वेगळे आहे. तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर, मका यांसारख्या विविध पिकांच्या पेरणीची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. पाऊस आणखी लांबल्यास पेरणीचे नियोजन विस्कळीत होऊन उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील मान्सूनची वाटचाल सध्या सलग आठव्या दिवशी ठप्प झाली आहे. २० ते २२ जूननंतर त्याच्या पुढील वाटचालीस गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस राज्यातील तुरळक भागांत वादळी पावसाची शक्यता असली तरी, अनेक भागांत उष्णतेची लाट आणि उकाडा कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्र सध्या पावसाच्या प्रतीक्षेत असून, पावसाअभावी ग्रामीण भागातील चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. वेळेत आणि समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर बी-बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी होते; मात्र यंदा पाऊस नसल्याने बाजारपेठेत शुकशुकाट असून, कृषी निविष्ठांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. घनसावंगी तालुक्याचे कृषी अधिकारी एस. एन. पवळ यांनी शेतकऱ्यांना संयम बाळगून दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी किंवा लागवड न करण्याचा सल्ला दिला आहे. घाईघाईने पेरणी केल्यास दुबार पेरणीचा धोका वाढू शकतो आणि पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य बीजप्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणि खते खरेदी करून शेत तयार ठेवले असून, आता ते फक्त पावसाची प्रतीक्षा करत आहेत. चांगला पाऊस न झाल्यास पेरण्या आणखी लांबतील, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसाचा अनिश्चित प्रवास पाहता शेती व्यवसायासमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून, पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस होतो का, याकडे घनसावंगी तालुक्यासह राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जून महिना अर्धा उलटून गेला तरी घनसावंगी तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाऐवजी गेल्या काही दिवसांपासून जोरदार वारे वाहत असल्याने शेतकऱ्यांवर आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून, ऊसासह अन्य पिकांवरही मोठे संकट आले आहे. शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामासाठी मोठ्या आशेने बी-बियाणे, खते आणि अन्य शेती साहित्याची खरेदी केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतशिवार पेरणीसाठी तयार केले असून काही ठिकाणी नागरटही करण्यात आली आहे. मात्र, पावसाअभावी जमिनीत मोठी ढेकळे पडून ओलावा नसल्याने पेरणीसाठी पोषक परिस्थिती नाही. गतवर्षी मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती आणि जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात बहुतांश शेतकऱ्यांच्या खरीप पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, पण यंदाचे चित्र पूर्णपणे वेगळे आहे. तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर, मका यांसारख्या विविध पिकांच्या पेरणीची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. पाऊस आणखी लांबल्यास पेरणीचे नियोजन विस्कळीत होऊन उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील मान्सूनची वाटचाल सध्या सलग आठव्या दिवशी ठप्प झाली आहे. २० ते २२ जूननंतर त्याच्या पुढील वाटचालीस गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस राज्यातील तुरळक
भागांत वादळी पावसाची शक्यता असली तरी, अनेक भागांत उष्णतेची लाट आणि उकाडा कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्र सध्या पावसाच्या प्रतीक्षेत असून, पावसाअभावी ग्रामीण भागातील चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. वेळेत आणि समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर बी-बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी होते; मात्र यंदा पाऊस नसल्याने बाजारपेठेत शुकशुकाट असून, कृषी निविष्ठांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. घनसावंगी तालुक्याचे कृषी अधिकारी एस. एन. पवळ यांनी शेतकऱ्यांना संयम बाळगून दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी किंवा लागवड न करण्याचा सल्ला दिला आहे. घाईघाईने पेरणी केल्यास दुबार पेरणीचा धोका वाढू शकतो आणि पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य बीजप्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणि खते खरेदी करून शेत तयार ठेवले असून, आता ते फक्त पावसाची प्रतीक्षा करत आहेत. चांगला पाऊस न झाल्यास पेरण्या आणखी लांबतील, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसाचा अनिश्चित प्रवास पाहता शेती व्यवसायासमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून, पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस होतो का, याकडे घनसावंगी तालुक्यासह राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
- परभणी जिल्ह्यातील एका मंदिरात आज शनिवारी दर्शनासाठी आणि प्रसादासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. याचवेळी मंदिराच्या चालू बांधकामाचे छत अचानक कोसळल्याने एक भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात भाविक जागीच ठार झाले आहेत, तर अनेक भाविक घायाळ झाले आहेत. सध्या काहीजण अजूनही ढिगाऱ्याखाली दबल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, मंदिराचे छत कोसळल्याने सात जण ठार झाल्याची आणि अनेक जण दबल्याची शंका यातून व्यक्त होत आहे.1
- बाजार सावंगी येथे एका चहाच्या हॉटेलमध्ये थुंकण्यास विरोध केल्याच्या रागातून दोन भावांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीची खुलताबाद पोलिसांनी मुख्य बाजारपेठेतून धिंड काढली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.4
- योगा दिनानिमित्त उत्साहात जबरदस्त योगा करण्यात आला. या योगसत्रासोबत सर्वांनी मनसोक्त आनंदही घेतला.1
- परभणी जिल्ह्यात एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) मोठी कारवाई करत १५ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. या छापेमारीदरम्यान, एटीएसने काही युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.1
- विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. या पायी वारीचे हे ५७ वे वर्ष असून, यामध्ये ७०० हून अधिक वारकरी भगव्या पताका घेऊन सहभागी झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात संत गजानन महाराजांची पालखी आज सकाळी पंढरपूरकडे निघाली. शेगाव ते पंढरपूर असा सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास ही पालखी ३३ दिवसांत पूर्ण करेल आणि २३ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. त्यानंतर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होऊन ही पालखी २८ जुलैपर्यंत पंढरपुरातच मुक्काम करणार आहे. या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आज लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झाले होते, ज्यामुळे संपूर्ण संत नगरी 'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. पंढरपुरातील मुक्कामानंतर, पालखी शेगावसाठी परतीच्या प्रवासाला निघेल.4
- दामिनी पथक महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी आणि टवाळखोरांना योग्य धडा शिकवण्यासाठी नेहमीच तत्पर असते.1
- खुलताबाद तालुक्यातील सालूखेडा येथील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून, पंचायत समिती सदस्य सुरेश बापू जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणीप्रश्नावर सुरेश बापू जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनात झालेल्या चर्चेदरम्यान 'सालूखेड्यातील एक जरी नागरिक उपोषणाला बसला, तर मी स्वतः त्यांच्यासोबत उपोषणाला बसेन,' असा निर्वाणीचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडले आणि गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ सालूखेडा गावासाठी दोन पाणी टँकर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर, जलजीवन मिशन अंतर्गत अनेक दिवसांपासून बंद असलेली पाईपलाईन त्वरित दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश सराई ग्रामसेवक आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे बंद पडलेले काम पूर्ण करण्यात आले असून, मावसाळा येथील तलावातील पाणी सालूखेडा गावात पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. या कामात नव्याने रुजू झालेल्या पाणीपुरवठा शाखेच्या अभियंत्यांनीही विशेष पुढाकार घेतला आणि ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा मोटारीसाठी स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे. सालूखेडा येथील नागरिकांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या पंचायत समिती सदस्य सुरेश बापू जाधव, गटविकास अधिकारी तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.2
- परळी वैजनाथमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे प्रशांत प्रल्हाद देशमुख यांना संत भगवान बाबा चौक ते तहसीलकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका थार गाडीने धडक दिली. या घटनेनंतर गाडीचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. या अपघातात प्रशांत देशमुख गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणामुळे परळी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. देशमुख कुटुंबीयांनी हा केवळ अपघात नसून प्रशांत देशमुख यांना जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित थार गाडी स्पष्टपणे कैद झाली असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, फुटेजमध्ये चारचाकी वाहन चालकाने संशयास्पद पद्धतीने मागून गाडी आणून धडक दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देशमुख कुटुंबीयांसह नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, संबंधित वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. "सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असताना आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा," अशी जोरदार मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, पुढील कारवाईकडे संपूर्ण परळीकरांचे लक्ष लागले आहे.1
- परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथील मारुती मंदिराचा सभा मंडप कोसळल्याची दुःखद घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, आणखी १८ जण जखमी झाले आहेत.1