logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

संत संस्कृतीची परंपरा जपणे काळाची गरज स्वामी अमृताश्रम महाराजांचे प्रतिपादन *"जनसेवा हीच ईश्वरसेवा; संत संस्कृतीची परंपरा जपणे काळाची गरज" - स्वामी अमृताश्रम महाराजांचे प्रतिपादन* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सप्ताहात भक्तिमय कीर्तनसेवा *पाळधी प्रतिनिधी, दि. 29 मे - "जनसेवा हीच ईश्वरसेवा" हा संदेश देताना समाजातील गरजू, पीडित आणि वंचित घटकांच्या सेवेतच खऱ्या अर्थाने ईश्वराचे दर्शन घडते, असे प्रतिपादन ह.भ.प. स्वामी अमृताश्रम महाराज यांनी केले. लोककल्याणासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणारी व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान ठरते, असे सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे महत्त्वही अधोरेखित केले.* पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पाळधी येथे आयोजित भव्य अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहात तिसऱ्या दिवसाची सेवा स्वामी अमृताश्रम महाराज यांच्या ओजस्वी, रसाळ व विचारप्रवर्तक कीर्तनाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. *कीर्तनात महाराष्ट्राच्या संत, महंत आणि साधुसंतांच्या पवित्र परंपरेचा उल्लेख करताना स्वामी महाराज म्हणाले की, संतांच्या विचारांनी समाजात प्रेम, समता, सद्भावना आणि अध्यात्मिक जागृती निर्माण होते. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान बाळगत संतविचारांचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. धर्मनिष्ठा आणि संतांच्या शिकवणीची कास धरल्यास समाज अधिक सुसंस्कृत व सुदृढ बनेल, असेही स्वामी अमृताश्रम महाराज यांनी सांगितले.* यावेळी त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जनहिताच्या कार्याचा गौरव करताना आरोग्यसेवा, वैद्यकीय मदत, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया तसेच दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी त्यांनी सातत्याने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. समाजहितासाठी सुरू असलेले त्यांचे कार्य हे जनसेवेचे जिवंत उदाहरण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. स्वामी अमृताश्रम महाराज यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. कीर्तनासाठी भगवान महाराज धरणगावकर, माधवानंद महाराज सरस्वती, निंबा महाराज वाघडूतकर, यज्ञेश महाराज माळी, मयूर महाराज दरेकर, कैलास महाराज पवार, शेखरजी वानखेडे, रामेश्वर महाराज नाशिक यांच्यासह अनेक मान्यवर महाराज मंडळी उपस्थित होती. जीपीएस ग्रुप तसेच युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली व नियोजनातून आयोजित या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी हजारो भाविकांनी उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेतला. पाळधी येथे उभारण्यात आलेला भव्य मंडप, आधुनिक ध्वनी व्यवस्था, आकर्षक व भव्यदिव्य व्यासपीठ तसेच भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांमुळे सप्ताहाचे स्वरूप अधिकच दिमाखदार झाले आहे. एकावेळी 5-6 हजारांहून अधिक भाविक बसू शकतील अशी प्रशस्त व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण परिसरात भक्ती, अध्यात्म आणि संतविचारांचा जागर अनुभवायला मिळत आहे. पाळधी परिसरात सुरू असलेल्या या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहामुळे संपूर्ण पंचक्रोशीत भक्तिरसाची उधळण झाली असून दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेत आहेत.

4 hrs ago
user_Gopal Sonawane
Gopal Sonawane
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
4 hrs ago
8b413383-652a-4acd-b1f3-fc2265415bfa

संत संस्कृतीची परंपरा जपणे काळाची गरज स्वामी अमृताश्रम महाराजांचे प्रतिपादन *"जनसेवा हीच ईश्वरसेवा; संत संस्कृतीची परंपरा जपणे काळाची गरज" - स्वामी अमृताश्रम महाराजांचे प्रतिपादन* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सप्ताहात भक्तिमय कीर्तनसेवा *पाळधी प्रतिनिधी, दि. 29 मे - "जनसेवा हीच ईश्वरसेवा" हा संदेश देताना समाजातील गरजू, पीडित आणि वंचित घटकांच्या सेवेतच खऱ्या अर्थाने ईश्वराचे दर्शन घडते, असे प्रतिपादन ह.भ.प. स्वामी अमृताश्रम महाराज यांनी केले. लोककल्याणासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणारी व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान ठरते, असे सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे महत्त्वही अधोरेखित केले.* पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पाळधी येथे आयोजित भव्य अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहात तिसऱ्या दिवसाची सेवा स्वामी अमृताश्रम महाराज यांच्या ओजस्वी, रसाळ व विचारप्रवर्तक कीर्तनाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. *कीर्तनात महाराष्ट्राच्या संत, महंत आणि साधुसंतांच्या पवित्र परंपरेचा उल्लेख करताना स्वामी महाराज म्हणाले की, संतांच्या विचारांनी समाजात प्रेम, समता, सद्भावना आणि अध्यात्मिक जागृती निर्माण होते. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान बाळगत संतविचारांचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. धर्मनिष्ठा आणि संतांच्या शिकवणीची कास धरल्यास समाज अधिक सुसंस्कृत व सुदृढ बनेल, असेही स्वामी अमृताश्रम महाराज यांनी सांगितले.* यावेळी त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जनहिताच्या कार्याचा गौरव करताना आरोग्यसेवा, वैद्यकीय मदत, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया तसेच दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी त्यांनी सातत्याने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. समाजहितासाठी सुरू असलेले त्यांचे कार्य हे जनसेवेचे जिवंत उदाहरण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. स्वामी अमृताश्रम महाराज यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. कीर्तनासाठी भगवान महाराज धरणगावकर, माधवानंद महाराज सरस्वती, निंबा महाराज वाघडूतकर, यज्ञेश महाराज माळी, मयूर महाराज दरेकर, कैलास महाराज पवार, शेखरजी वानखेडे, रामेश्वर महाराज नाशिक यांच्यासह अनेक मान्यवर महाराज मंडळी उपस्थित होती. जीपीएस ग्रुप तसेच युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली व नियोजनातून आयोजित या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी हजारो भाविकांनी उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेतला. पाळधी येथे उभारण्यात आलेला भव्य मंडप, आधुनिक ध्वनी व्यवस्था, आकर्षक व भव्यदिव्य व्यासपीठ तसेच भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांमुळे सप्ताहाचे स्वरूप अधिकच दिमाखदार झाले आहे. एकावेळी 5-6 हजारांहून अधिक भाविक बसू शकतील अशी प्रशस्त व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण परिसरात भक्ती, अध्यात्म आणि संतविचारांचा जागर अनुभवायला मिळत आहे. पाळधी परिसरात सुरू असलेल्या या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहामुळे संपूर्ण पंचक्रोशीत भक्तिरसाची उधळण झाली असून दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जळगाव जिल्ह्यातील वाघ नगर, कोल्हे परिसर आणि जाणता राजा स्कूल परिसरात गेल्या १२ ते १३ दिवसांपासून पाणी आलेले नाही, ज्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. सध्या या भागात दर आठ दिवसांनी पाणीपुरवठा होतो, पण नागरिकांची तीव्र मागणी आहे की, हा कालावधी कमी करून दर तीन दिवसांनी पाणी सोडावे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने आणि बोरिंगलाही पाणी नसल्याने, नागरिकांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत, अन्यथा त्यांची नाराजी आणखी वाढेल असे म्हटले आहे.
    1
    जळगाव जिल्ह्यातील वाघ नगर, कोल्हे परिसर आणि जाणता राजा स्कूल परिसरात गेल्या १२ ते १३ दिवसांपासून पाणी आलेले नाही, ज्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. सध्या या भागात दर आठ दिवसांनी पाणीपुरवठा होतो, पण नागरिकांची तीव्र मागणी आहे की, हा कालावधी कमी करून दर तीन दिवसांनी पाणी सोडावे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने आणि बोरिंगलाही पाणी नसल्याने, नागरिकांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत, अन्यथा त्यांची नाराजी आणखी वाढेल असे म्हटले आहे.
    user_Akshay koli
    Akshay koli
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • बनावट शिक्का प्रकरणामध्ये जाफ्राबाद पोलिसांना न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने तातडीने जामीन मंजूर केला, ज्यामुळे पोलिसांच्या कारवाईला एक मोठा झटका लागल्याचे दिसून येत आहे.
    1
    बनावट शिक्का प्रकरणामध्ये जाफ्राबाद पोलिसांना न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने तातडीने जामीन मंजूर केला, ज्यामुळे पोलिसांच्या कारवाईला एक मोठा झटका लागल्याचे दिसून येत आहे.
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांनी तळपत्या उन्हात सुरू केलेल्या आमरण उपोषणाला भोकरदन तालुक्यातून तीव्र पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या विविध मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. या मागणीसाठी भोकरदन तालुक्यातील मराठा सेवकांच्या वतीने पोलीस प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली असून, अन्यथा मराठा समाजाच्या वतीने व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रा. अंकुश जाधव, सतीष जाधव, विकास जाधव, अप्पासाहेब जाधव, विलास पवार, अंगद सहाने, परमेश्वर पालोदे, श्रीकृष्ण जाधव, प्रकाश जाधव, उमेश घोडके आदी मराठा सेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यातील मराठा समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली असून, सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
    1
    संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांनी तळपत्या उन्हात सुरू केलेल्या आमरण उपोषणाला भोकरदन तालुक्यातून तीव्र पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या विविध मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे.

या मागणीसाठी भोकरदन तालुक्यातील मराठा सेवकांच्या वतीने पोलीस प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली असून, अन्यथा मराठा समाजाच्या वतीने व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनावर प्रा. अंकुश जाधव, सतीष जाधव, विकास जाधव, अप्पासाहेब जाधव, विलास पवार, अंगद सहाने, परमेश्वर पालोदे, श्रीकृष्ण जाधव, प्रकाश जाधव, उमेश घोडके आदी मराठा सेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यातील मराठा समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली असून, सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    3 hrs ago
  • जालना येथील सिंधी बाजारमध्ये रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिवशक्ती-लहूशक्ती-भीमशक्ती अभियानाच्या वतीने मा. आमदार अमितजी गोरखे साहेबांना ‘झेड-प्लस’ सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. तळपत्या ४२ डिग्री तापमानात 'जिगरबाज लहू सैनिकांनी' हा एल्गार पुकारला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेल्या तरतुदीनुसार अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण व्हावे, या मागणीसाठी आमदार अमितजी गोरखे शासन दरबारी अभ्यासपूर्ण मांडणी करत असताना, काही समाजकंटक सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करून अपशब्द वापरत असल्याने त्यांच्या संरक्षणाची ही मागणी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान, "आमदार अमित गोरखे आगे बढो-हम तुम्हारे साथ है", "आमदार अमित गोरखे से जो टकरायेगा वह मिट्टी मे मिल जायेगा", आणि "आरक्षण वर्गीकरण झालंच पाहीजे" या घोषणांनी परिसर दणाणून गेला. राज्य समन्वयक रविकांत जगधने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी डॉ. मनोहर जाधव, छगन वाघमारे, देविदास जाधव, सचिन साने, बंडू निकाळजे, दत्ता घोडे, अशोक लोखंडे, प्रकाश काका साळवे, सतीष खंडागळे, नरेश जगधने, शाम खंदारे, सुधाकर तुपसौन्दर, सुदाम दाभाडे, अभिनेते अरुण गाढे, प्रदीप पडूळ, अनिल लोखंडे, रमेश कासार, राहुल गोफने, मनोज बॉबी, सोमेश कांबळे, विजय आठवले यांसह अनेक 'जिगरबाज लहू सैनिकांची' प्रमुख उपस्थिती होती. या प्रकरणी विद्यमान मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
    1
    जालना येथील सिंधी बाजारमध्ये रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिवशक्ती-लहूशक्ती-भीमशक्ती अभियानाच्या वतीने मा. आमदार अमितजी गोरखे साहेबांना ‘झेड-प्लस’ सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. तळपत्या ४२ डिग्री तापमानात 'जिगरबाज लहू सैनिकांनी' हा एल्गार पुकारला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेल्या तरतुदीनुसार अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण व्हावे, या मागणीसाठी आमदार अमितजी गोरखे शासन दरबारी अभ्यासपूर्ण मांडणी करत असताना, काही समाजकंटक सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करून अपशब्द वापरत असल्याने त्यांच्या संरक्षणाची ही मागणी करण्यात आली.

या आंदोलनादरम्यान, "आमदार अमित गोरखे आगे बढो-हम तुम्हारे साथ है", "आमदार अमित गोरखे से जो टकरायेगा वह मिट्टी मे मिल जायेगा", आणि "आरक्षण वर्गीकरण झालंच पाहीजे" या घोषणांनी परिसर दणाणून गेला. राज्य समन्वयक रविकांत जगधने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी डॉ. मनोहर जाधव, छगन वाघमारे, देविदास जाधव, सचिन साने, बंडू निकाळजे, दत्ता घोडे, अशोक लोखंडे, प्रकाश काका साळवे, सतीष खंडागळे, नरेश जगधने, शाम खंदारे, सुधाकर तुपसौन्दर, सुदाम दाभाडे, अभिनेते अरुण गाढे, प्रदीप पडूळ, अनिल लोखंडे, रमेश कासार, राहुल गोफने, मनोज बॉबी, सोमेश कांबळे, विजय आठवले यांसह अनेक 'जिगरबाज लहू सैनिकांची' प्रमुख उपस्थिती होती.

या प्रकरणी विद्यमान मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण कडक उन्हात सुरू ठेवले आहे. त्यांनी मंडप सोडून, बाज वर बसून उपोषण सुरू केले आहे.
    1
    मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण कडक उन्हात सुरू ठेवले आहे. त्यांनी मंडप सोडून, बाज वर बसून उपोषण सुरू केले आहे.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • रियांश अमृत जूस हे अत्यंत 'पॉवरफुल' असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात, मित्रांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी रियांशच्या या 'पॉवर'चा अनुभव घ्यावा.
    1
    रियांश अमृत जूस हे अत्यंत 'पॉवरफुल' असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात, मित्रांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी रियांशच्या या 'पॉवर'चा अनुभव घ्यावा.
    user_Sagar Chimkar
    Sagar Chimkar
    Public Health Specialist नांदुरा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील 'सिर कटी लडकी' प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात कारागृहातून बाहेर पडताच पिता-पुत्रांनी पोलिसांना मारहाणीच्या त्या बातमीपासून क्लीन चिट दिली आहे. या घडामोडीमुळे बुलढाणा पोलिसांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न सुरू असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. कारागृहाबाहेर आल्यानंतर वडिलांनी पोलिसांना निर्दोष ठरवत, त्यांच्यावरील मारहाणीचे आरोप फेटाळले.
    1
    जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील 'सिर कटी लडकी' प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात कारागृहातून बाहेर पडताच पिता-पुत्रांनी पोलिसांना मारहाणीच्या त्या बातमीपासून क्लीन चिट दिली आहे.

या घडामोडीमुळे बुलढाणा पोलिसांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न सुरू असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. कारागृहाबाहेर आल्यानंतर वडिलांनी पोलिसांना निर्दोष ठरवत, त्यांच्यावरील मारहाणीचे आरोप फेटाळले.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी एक शिष्टमंडळ पोहोचले आहे.
    1
    मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी एक शिष्टमंडळ पोहोचले आहे.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.