परळी वैजनाथ शहरातील आठवडी बाजारात बारा मोबाईल चोरी -------------------------------- सिध्दोधन घाटे जिल्हा प्रतिनिधी बीड बीड : दि. १३ जानेवारी २०२६ बीड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या परळी वैजनाथ शहरातून एकाच दिवशी दहा ते बारा मोबाईल फोन चोरीला गेल्याने परळी शहरातील आठवडी बाजार पेठेत खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परळी वैजनाथ शहरातील आठवडी बाजारात मोबाईल चोरीचे प्रकार घडत असून याप्रकरणी परळी वैजनाथ पोलिस प्रशासनाने कार्यवाही करणे गरजेचे आहे. परळी शहरात प्रत्येक सोमवारी आठवडी बाजार भरतो या बाजार पेठेत परळी वैजनाथ तालुका आणि शहरातील व्यापारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने भाजीपाला, किराणा, खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवतात आठवडी बाजार असल्याने दररोजच्या पेक्षा जास्त प्रमाणात शहरातील बाजार समितीच्या परिसरातील हनुमान मंदिर आणि घरणीकर रोडवरील अरूणोदय मार्केट ते अण्णाभाऊ साठे चौक भाजीपाला किराणा खाद्यपदार्थ विक्रीसाठी दुकाने थाटतात. या परिसरात परळी नगरपरिषदेने किंवा पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची मदत केंद्रे किंवा पोलिस बंदोबस्त ठेवलेला नाही संध्याकाळच्या वेळी परिसरात मोबाईल चोरी पाकीट मार फिरत असतात व संधीचा फायदा घेऊन मोबाईल फोन चोरने लोकांचे खिसे कापले पाकिट मारे असे प्रकार घडतात गर्दी आड चोर चोरी करून निघून जातात. आणि प्रकार लक्षात आला तरी पोलिस ठाणे बाजारपेठेपासून लांब असल्याने तक्रार दाखल करेपर्यंत पसार होतात. असे अनेक प्रकार यापुर्वीही घडलेले आहेत. तेव्हा परळी वैजनाथ नगर परिषद तथा पोलिस ठाणे यांनी याप्रकरणी लवकरात लवकर कार्यवाही करावी आणि परळी वैजनाथ शहरातील बाजार पेठेतील बाजार समिती परिसरातील हनुमान मंदिर, घरणीकर रोडवरील अरूणोदय मार्केट ते अण्णाभाऊ साठे चौक या परिसरात सोमवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी पोलिस कर्मचारी यांनी गस्त वाढवावी अशी मागणी जनतेतून येत आहे.
परळी वैजनाथ शहरातील आठवडी बाजारात बारा मोबाईल चोरी -------------------------------- सिध्दोधन घाटे जिल्हा प्रतिनिधी बीड बीड : दि. १३ जानेवारी २०२६ बीड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या परळी वैजनाथ शहरातून एकाच दिवशी दहा ते बारा मोबाईल फोन चोरीला गेल्याने परळी शहरातील आठवडी बाजार पेठेत खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परळी वैजनाथ शहरातील आठवडी बाजारात मोबाईल चोरीचे प्रकार घडत असून याप्रकरणी परळी वैजनाथ पोलिस प्रशासनाने कार्यवाही करणे गरजेचे आहे. परळी शहरात प्रत्येक सोमवारी आठवडी बाजार भरतो या बाजार पेठेत परळी वैजनाथ तालुका आणि शहरातील व्यापारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने भाजीपाला, किराणा, खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवतात आठवडी बाजार असल्याने दररोजच्या पेक्षा जास्त प्रमाणात शहरातील बाजार समितीच्या परिसरातील हनुमान मंदिर आणि घरणीकर रोडवरील अरूणोदय मार्केट ते अण्णाभाऊ साठे चौक भाजीपाला किराणा खाद्यपदार्थ विक्रीसाठी दुकाने थाटतात. या परिसरात परळी नगरपरिषदेने किंवा पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची मदत केंद्रे किंवा पोलिस बंदोबस्त ठेवलेला नाही संध्याकाळच्या वेळी परिसरात मोबाईल चोरी पाकीट मार फिरत असतात व संधीचा फायदा घेऊन मोबाईल फोन चोरने लोकांचे खिसे कापले पाकिट मारे असे प्रकार घडतात गर्दी आड चोर चोरी करून निघून जातात. आणि प्रकार लक्षात आला तरी पोलिस ठाणे बाजारपेठेपासून लांब असल्याने तक्रार दाखल करेपर्यंत पसार होतात. असे अनेक प्रकार यापुर्वीही घडलेले आहेत. तेव्हा परळी वैजनाथ नगर परिषद तथा पोलिस ठाणे यांनी याप्रकरणी लवकरात लवकर कार्यवाही करावी आणि परळी वैजनाथ शहरातील बाजार पेठेतील बाजार समिती परिसरातील हनुमान मंदिर, घरणीकर रोडवरील अरूणोदय मार्केट ते अण्णाभाऊ साठे चौक या परिसरात सोमवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी पोलिस कर्मचारी यांनी गस्त वाढवावी अशी मागणी जनतेतून येत आहे.
- महानगरपालिका के प्रभाग क्रमांक 9 में राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार गुट) के उम्मीदवारों का चुनाव प्रचार के उद्देश्य से एक सभा1
- गलास या बोतल में पानी डालते समय गिरना आम समस्या है, लेकिन इसके पीछे साफ़ विज्ञान काम करता है। सही एंगल पर बर्तन झुकाने और ग्लास को पास रखने से हवा का गैप कम होता है, जिससे पानी की धार नियंत्रित रहती है। सतह तनाव और फ्लो रेट संतुलित होने पर पानी साफ़ तरीके से गिरता है। यह छोटा सा तरीका रोज़मर्रा की गंदगी से बचा सकता है। #ScienceHack #PhysicsTrick #LifeHacks #EverydayScience #FluidDynamics #SmartTips1
- बीड जिल्हा...1
- शेतकऱ्यांच्या कष्टाचे सोयाबीन पळवले !! एलसीबीने आरोपींना रंगेहात पकडले !! लातूर (ॲड.एल.पी. उगिले) शेतकऱ्यांनी मोठा कष्टाने ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता रात्रंदिवस कष्ट करून शेतामध्ये पीक घ्यावे, आणि रास झाली की, चोरट्यांनी ते पळवावे. म्हणजे वर्षभराची मेहनत वाया गेली. अशी दुर्दैवी वेळ कधी कधी शेतकऱ्यावर येते. त्यांच्या मेहनतीचे फळ पळवले गेल्यामुळे शेतकऱ्यांचे स्वप्नच भंग होण्याची वेळ आलेली असते. अशावेळी मोठ्या कर्तबगारीने लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शेतकऱ्याच्या चोरीला गेलेल्या सोयाबीनच्या कट्ट्यासह तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जवळपास एक लाख 38 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. शेतकऱ्यासाठी शेतीचा माल चोरी झाली ही केवळ आर्थिक हानी नसून त्यांच्या कष्टावर झालेला अन्याय आहे. आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमूल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दखल घेत मालमत्ते विषय घडणाऱ्या विशेषतः शेतकऱ्यासंदर्भात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याचा छडा लावण्याच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निलंगा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पानचिंचोली पाटी परिसरातील हनुमंत वाडी ते निलंगा जाणाऱ्या रोडवरील मसलगाव शेत शिवारात चार ते पाचव्यक्ती चोरट्या पद्धतीने संशयितरित्या सोयाबीनचे कट्टे पांढऱ्या रंगाच्या पिकप वाहनात भरत आहेत. अशी माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांची चाहूल लागल्यामुळे संशयित इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने पथकातील अधिकारी व अंमलदारांनी प्रसंगावधान राखत, पाठलाग करून तीन व्यक्तींना ताब्यात घेतले. एक व्यक्ति मात्र पिकअप वाहन घेऊन पसार होण्यात यशस्वी झाला. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे दीपक तानाजी पवार (वय 27 वर्ष), नवनाथ छगन उर्फ अचित काळे (वय 25 वर्ष), संतोष सखाराम काळे (वय 23 वर्ष, सर्व रा. गोरोबा गल्ली तेर तालुका जिल्हा धाराशिव) यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, तपासा दरम्यान आरोपीने कबूल केले की, त्यांनी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी खरोसा जवळील सिंधी जवळगा गावातील शेत शिवारातून रात्रीच्या वेळी एकूण 40 कट्टे सोयाबीनची चोरी केली होती. तो चोरीचा माल लपवून ठेवला होता, आणि आता तो माल पिकप वाहनाद्वारे इतरत्र हलविण्याच्या तयारीत असताना ते पकडले गेले. या कारवाईत एकूण एक लाख 38 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये चोरीचे सोयाबीनचे कट्टे तसेच गुन्ह्यात वापरलेली एम एच 25 ए व्ही 4427 क्रमांकाची हिरो कंपनीची काळया रंगाची स्प्लेंडर मोटार सायकल यांचा समावेश आहे. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिकअप वाहनसह पसार झालेला आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल. अशी खात्री पोलीस पथकाने दिली आहे. ही कारवाई म्हणजे केवळ चोरीचा गुन्हा उघडकीस आणणे नाही तर शेतकऱ्यांच्या कष्टाचे संरक्षण करणे, गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करणे, आणि समाजात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे, हे या कारवाईचे खरे उद्दिष्ट आहेत. लातूर पोलीस प्रशासनातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शेतमाल चोरी, अवैध वाहतूक किंवा कोणत्याही संशयास्पद हालचाली बाबत त्वरित नजीकच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधावा. नागरिकांचे सहकार्य, गुप्त माहिती देणाऱ्यांची भूमिका आणि पोलीस दलाची तत्परता या तिन्हींच्या समन्वयातूनच अशा मोठ्या गुन्ह्यांचा पडदाफास शक्य आहे. गुन्हेगार कितीही चालाख असला तरी, कायद्याच्या कचाट्यातून तो सुटू शकत नाही. हा ठाम संदेश देणारी ही कारवाई असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि समाजाच्या सुरक्षितते साठी लातूर पोलीस दल सदैव सज्ज आहे. हे सांगणारी आहे. या चोरीचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनी सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार नवनाथ हसबे, माधव बिलापट्टे, राजेश कंचे, तुराब पठाण, प्रशांत स्वामी, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रदीप स्वामी, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठ्ठेवाड, गणेश साठे, गोविंद भोसले, अंजली गायकवाड, शैलेश सुडे, हरी पतंगे, श्रीनिवास जांभळे यांच्या पथकाने यशस्वी करून दाखवली आहे. पिकअप घेऊन फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगळी पथके रवाना झाली आहेत. शेतकऱ्याचा माल शोधून दिल्याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.2
- तामसा येथे डॉक्टर बोंदरवाड यांचा पदोन्नती व बदली निमित्त सत्कार1
- 🗳️🚔 महानगरपालिका निवडणूक : पोलीस प्रशासन सज्ज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ डिसेंबर २०२५ पासून आचारसंहिता लागू असून 🗳️ १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान 📊 १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. शहरातील २० प्रभाग व ६०० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत, भयमुक्त व निपक्षपणे पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मतदानाच्या दिवशी सीसीटीव्ही, ड्रोन, व्हिडीओ कॅमेरे, तसेच १०३ वाहनांद्वारे पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणतीही तक्रार असल्यास डायल-112 किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. ✋ कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. #नांदेडमहानगरपालिका #महानगरपालिका_निवडणूक #पोलीस_प्रशासन_सज्ज #भयमुक्त_निवडणूक #कडेकोट_बंदोबस्त VoteSafely Dial112 NandedPolice लोकशाहीचा_उत्सव https://www.instagram.com/reel/DTapsBIkgr4/?igsh=MXE0NXdzbWxxYWd3bw==1
- राजुर बस स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय चालत असलेल्या पती-पत्नींना पोलिसांनी केली अटक1
- किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ येथे सामाजिक बहिष्कारांचे गंभीर प्रकरण.. एका कुटुंबावर आठ महिन्यापासून अ मानवी जाच..1