logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील किरात, चाहाडे, नागझरी, कोकणेर, गुंदाळे, चिंचरा, वाडावळी-सावणे, वासा, गिरगाव, घिमणीया, कोचाई, सुत्राकार, उधवा, मळयाण, बोर्डी, चिखले, सरावली, कोलवली, चिंचणी, सावटा, साये आणि उरसे यासह अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून डहाणू, तलासरी आणि पालघर तालुक्यातील २८४ कुटुंबांतील एकूण १,१५५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या नागरिकांची सोय शासकीय निवारा केंद्रांमध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे करण्यात आली असून त्यांना अन्न, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत व इतर अत्यावश्यक सुविधा पुरवण्यात येत आहेत. या पावसाच्या आपत्तीत डहाणू तालुक्यात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अगवाण गावातील ३९ वर्षीय जगदीश वसंत माछी हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने, तर अंबेवाडी (लखाटपाडा) येथील ३० वर्षीय रुपेश पांडुरंग धाडगा हे शेतात जाताना पुराच्या पाण्यात घसरून पडल्याने मरण पावले. तसेच तिसऱ्या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबांना शासकीय नियमानुसार आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू केली जाईल. पुराचे पाणी ओसरलेल्या भागांत महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून उर्वरित भागात पाणी ओसरताच पाहणी करून पात्र लाभार्थ्यांना मदत दिली जाणार आहे. मुसळधार पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत तब्बल २९.४५ किलोमीटरचे रस्ते, २४ मोऱ्या/कॉझवे आणि ६ पुलांचे नुकसान झाले असून या दुरुस्तीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १३.५५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग ४८ (मुंबई-अहमदाबाद महामार्ग) वरील तलासरी-अहमदाबाद टप्प्यासह झाई-बोर्डी-रेड्डी रस्ता, वाणगाव-रानशेत रस्ता आणि इतर मार्गांवर दरड कोसळणे, झाडे पडणे व रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून पालघर-मनोर-चाहाडे-कोकणेर, सरावली-सावटा, झाई-बोर्डी-रेड्डी, तलासरी-उधवा आणि परनाळी-कोलगाव यांसारख्या बहुतांश मार्गांवर वाहतूक पूर्ववत केली आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ. इंदू राणी जाखड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क असून सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत आहेत.

17 hrs ago
user_आपले मानवाधिकार
आपले मानवाधिकार
Psychologist Mumbai, Maharashtra•
17 hrs ago

पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील किरात, चाहाडे, नागझरी, कोकणेर, गुंदाळे, चिंचरा, वाडावळी-सावणे, वासा, गिरगाव, घिमणीया, कोचाई, सुत्राकार, उधवा, मळयाण, बोर्डी, चिखले, सरावली, कोलवली, चिंचणी, सावटा, साये आणि उरसे यासह अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून डहाणू, तलासरी आणि पालघर तालुक्यातील २८४ कुटुंबांतील एकूण १,१५५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या नागरिकांची सोय शासकीय निवारा केंद्रांमध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे करण्यात आली असून त्यांना अन्न, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत व इतर अत्यावश्यक सुविधा पुरवण्यात येत आहेत. या

पावसाच्या आपत्तीत डहाणू तालुक्यात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अगवाण गावातील ३९ वर्षीय जगदीश वसंत माछी हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने, तर अंबेवाडी (लखाटपाडा) येथील ३० वर्षीय रुपेश पांडुरंग धाडगा हे शेतात जाताना पुराच्या पाण्यात घसरून पडल्याने मरण पावले. तसेच तिसऱ्या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबांना शासकीय नियमानुसार आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू केली जाईल. पुराचे पाणी ओसरलेल्या भागांत महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून उर्वरित भागात पाणी ओसरताच पाहणी करून पात्र लाभार्थ्यांना मदत दिली जाणार आहे. मुसळधार पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत तब्बल २९.४५ किलोमीटरचे

87b08081-23c4-4027-8c52-076700bbcb0e

रस्ते, २४ मोऱ्या/कॉझवे आणि ६ पुलांचे नुकसान झाले असून या दुरुस्तीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १३.५५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग ४८ (मुंबई-अहमदाबाद महामार्ग) वरील तलासरी-अहमदाबाद टप्प्यासह झाई-बोर्डी-रेड्डी रस्ता, वाणगाव-रानशेत रस्ता आणि इतर मार्गांवर दरड कोसळणे, झाडे पडणे व रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून पालघर-मनोर-चाहाडे-कोकणेर, सरावली-सावटा, झाई-बोर्डी-रेड्डी, तलासरी-उधवा आणि परनाळी-कोलगाव यांसारख्या बहुतांश मार्गांवर वाहतूक पूर्ववत केली आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ. इंदू राणी जाखड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क असून सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंबईत NEET परीक्षेच्या मुद्द्यावर पत्रकारांशी बोलताना मंत्री नितीश राणे यांनी मोठे विधान केले आहे. NEET परीक्षेबाबत सरकार आवश्यक ती पावले उचलत असल्याचे सांगतानाच त्यांनी स्पष्ट केले की, हल्ला करणारे लोक विद्यार्थी असूच शकत नाहीत. पत्रकारांशी बोलताना नितीश राणे म्हणाले की, 'सर तन से जुदा'चे नारे देणारे कधीही विद्यार्थी असू शकत नाहीत. पोलिसांवर हल्ला करणारे आणि देशविरोधी घोषणाबाजी करणारे लोक कधीही विद्यार्थी असू शकत नाहीत, असे कडक विधान त्यांनी केले.
    1
    मुंबईत NEET परीक्षेच्या मुद्द्यावर पत्रकारांशी बोलताना मंत्री नितीश राणे यांनी मोठे विधान केले आहे. NEET परीक्षेबाबत सरकार आवश्यक ती पावले उचलत असल्याचे सांगतानाच त्यांनी स्पष्ट केले की, हल्ला करणारे लोक विद्यार्थी असूच शकत नाहीत.

पत्रकारांशी बोलताना नितीश राणे म्हणाले की, 'सर तन से जुदा'चे नारे देणारे कधीही विद्यार्थी असू शकत नाहीत. पोलिसांवर हल्ला करणारे आणि देशविरोधी घोषणाबाजी करणारे लोक कधीही विद्यार्थी असू शकत नाहीत, असे कडक विधान त्यांनी केले.
    user_News Vani 24
    News Vani 24
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पीएम मोदी यांनी "ये प्यार बना रहेगा" असे विधान केले असून, त्यांच्या या वक्तव्याला प्रतिसाद देत "आम्हीही तुमच्यासोबत आहोत" असा ठाम पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. पीएम मोदी यांच्याबद्दलचे हे प्रेम आणि आपुलकी अशीच कायम राहील असा विश्वास व्यक्त करत समर्थकांनी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश दिला आहे.
    1
    पीएम मोदी यांनी "ये प्यार बना रहेगा" असे विधान केले असून, त्यांच्या या वक्तव्याला प्रतिसाद देत "आम्हीही तुमच्यासोबत आहोत" असा ठाम पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. पीएम मोदी यांच्याबद्दलचे हे प्रेम आणि आपुलकी अशीच कायम राहील असा विश्वास व्यक्त करत समर्थकांनी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश दिला आहे.
    user_Mani menan
    Mani menan
    Photographer मुंबई, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विलेपार्ले पूर्व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शिवसेना शाखा क्रमांक ८५ च्या वतीने समर्थ सहनिवास SRA सोसायटी आणि संत जनाबाई रोड परिसरात या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत संपूर्ण परिसरात स्वच्छता अभियानासोबतच कीटकनाशक धूर फवारणी आणि औषध फवारणी करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाला पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांची विशेष उपस्थिती लाभली.
    1
    शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विलेपार्ले पूर्व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शिवसेना शाखा क्रमांक ८५ च्या वतीने समर्थ सहनिवास SRA सोसायटी आणि संत जनाबाई रोड परिसरात या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमांतर्गत संपूर्ण परिसरात स्वच्छता अभियानासोबतच कीटकनाशक धूर फवारणी आणि औषध फवारणी करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाला पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांची विशेष उपस्थिती लाभली.
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • NEET परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, सरकार आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर आंदोलकांनी मोठा दावा केला असून, सरकारने विद्यार्थ्यांशी संबंधित दोन महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. बैठकीनंतर CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी माहिती दिली की, आंदोलनाशी जोडलेल्या विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे आणि पीडित कुटुंबांना भरपाई देणे या दोन मागण्यांवर सरकारने सहमती दर्शवली आहे. तर दुसरीकडे, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर पुढे विचार करण्यासाठी सरकारने वेळ मागितला आहे. आपली सर्वात मोठी मागणी मान्य होईपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील, असा पवित्रा विद्यार्थी संघटनांनी घेतला आहे. आता यावर सरकारच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, विद्यार्थ्यांचा हा लढा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचणार की आंदोलनाचे पुढील स्वरूप आणखी मोठे होणार, याकडे लक्ष आहे.
    1
    NEET परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, सरकार आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर आंदोलकांनी मोठा दावा केला असून, सरकारने विद्यार्थ्यांशी संबंधित दोन महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

बैठकीनंतर CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी माहिती दिली की, आंदोलनाशी जोडलेल्या विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे आणि पीडित कुटुंबांना भरपाई देणे या दोन मागण्यांवर सरकारने सहमती दर्शवली आहे. तर दुसरीकडे, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर पुढे विचार करण्यासाठी सरकारने वेळ मागितला आहे.

आपली सर्वात मोठी मागणी मान्य होईपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील, असा पवित्रा विद्यार्थी संघटनांनी घेतला आहे. आता यावर सरकारच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, विद्यार्थ्यांचा हा लढा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचणार की आंदोलनाचे पुढील स्वरूप आणखी मोठे होणार, याकडे लक्ष आहे.
    user_MUNNA MIYAN
    MUNNA MIYAN
    Voice of people मुंबई, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • आषाढी एकादशीच्या शुभप्रसंगी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या पवित्र दिनाचे औचित्य साधून पायी वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांचे रक्षण कर, अशी आर्त प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करण्यात आली आहे.
    1
    आषाढी एकादशीच्या शुभप्रसंगी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या पवित्र दिनाचे औचित्य साधून पायी वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांचे रक्षण कर, अशी आर्त प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करण्यात आली आहे.
    user_आपले मानवाधिकार
    आपले मानवाधिकार
    Psychologist Mumbai, Maharashtra•
    14 hrs ago
  • केंद्रातील मोदी सरकार बदलावं, अशी स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांचीच इच्छा आहे.
    1
    केंद्रातील मोदी सरकार बदलावं, अशी स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांचीच इच्छा आहे.
    user_Mumbai Sahara News
    Mumbai Sahara News
    TV News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • भाजपच्या मनोज तिवारी यांनी सोनम वांगचुक यांचे स्वागत केले आहे.
    1
    भाजपच्या मनोज तिवारी यांनी सोनम वांगचुक यांचे स्वागत केले आहे.
    user_Lokhit Hindi
    Lokhit Hindi
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • भारत हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, हे सर्व देशवासियांनी नीट लक्षात ठेवावे, असा थेट आणि कडक इशारा देण्यात आला आहे.
    1
    भारत हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, हे सर्व देशवासियांनी नीट लक्षात ठेवावे, असा थेट आणि कडक इशारा देण्यात आला आहे.
    user_Mumbai Sahara News
    Mumbai Sahara News
    TV News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.