शहापूर तालुक्यातील कसारा खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील विविध आदिवासी पाड्यांमध्ये सुरू असलेली बेकायदेशीर दारू विक्री आणि उघडपणे होणारे दारू सेवन तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत श्रमजीवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आज कसारा पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक श्री. सुरेश गावित साहेब यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. कसारा खुर्द येथील लतिफवाडी, चिंतामणवाडी, ओहोळाचीवाडी, पारधवाडी, सावंतवाडी, बिबलवाडी, नारळवाडी आणि पायरवाडी या आदिवासी पाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री व सेवन सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांमध्ये कौटुंबिक हिंसाचार, वाद-विवाद, आर्थिक नुकसान, महिलांवरील अत्याचार तसेच सामाजिक तणाव वाढत आहे. याचा मुलांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होत असून महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. आदिवासी समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासातही यामुळे मोठे अडथळे निर्माण होत असल्याचा मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ आणि पेसा कायद्यांतर्गत अनुसूचित क्षेत्रांमध्ये मद्यविक्री व मद्यसेवनावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आलेले आहेत. असे असतानाही संबंधित भागात बेकायदेशीर दारू व्यवसाय सुरू असल्याने तात्काळ विशेष मोहीम राबवून छापेमारी, नियमित पोलीस गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, परिसर दारूमुक्त करण्यासाठी महिला, ग्रामस्थ व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक आयोजित करून प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणीही करण्यात आली. या प्रसंगी श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. मालू हुमणे, तालुका उपाध्यक्ष श्री. पप्पू वाघ, तालुका सचिव श्री. प्रकाश खोडका, गट सचिव श्री. रामा आघाण, गण अध्यक्ष सौ. यमुना गिरे, गण सचिव श्री. राजू आवाटे, ग्रामपंचायत अध्यक्ष सौ. मंदा कवटे, गण सचिव श्री. रमेश वाघ आणि गट सचिव श्री. चंद्रकांत फसाळी यांच्यासह श्रमजीवी संघटनेच्या ८७ महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
शहापूर तालुक्यातील कसारा खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील विविध आदिवासी पाड्यांमध्ये सुरू असलेली बेकायदेशीर दारू विक्री आणि उघडपणे होणारे दारू सेवन तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत श्रमजीवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आज कसारा पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक श्री. सुरेश गावित साहेब यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. कसारा खुर्द येथील लतिफवाडी, चिंतामणवाडी, ओहोळाचीवाडी, पारधवाडी, सावंतवाडी, बिबलवाडी, नारळवाडी आणि पायरवाडी या आदिवासी पाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री व सेवन सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांमध्ये कौटुंबिक हिंसाचार, वाद-विवाद, आर्थिक नुकसान, महिलांवरील अत्याचार तसेच सामाजिक तणाव वाढत आहे. याचा मुलांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होत असून महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. आदिवासी समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासातही यामुळे मोठे अडथळे निर्माण होत असल्याचा मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ आणि पेसा कायद्यांतर्गत अनुसूचित क्षेत्रांमध्ये मद्यविक्री व मद्यसेवनावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आलेले आहेत. असे असतानाही संबंधित भागात बेकायदेशीर दारू व्यवसाय सुरू असल्याने तात्काळ विशेष मोहीम राबवून छापेमारी, नियमित पोलीस गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, परिसर दारूमुक्त करण्यासाठी महिला, ग्रामस्थ व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक आयोजित करून प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणीही करण्यात आली. या प्रसंगी श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. मालू हुमणे, तालुका उपाध्यक्ष श्री. पप्पू वाघ, तालुका सचिव श्री. प्रकाश खोडका, गट सचिव श्री. रामा आघाण, गण अध्यक्ष सौ. यमुना गिरे, गण सचिव श्री. राजू आवाटे, ग्रामपंचायत अध्यक्ष सौ. मंदा कवटे, गण सचिव श्री. रमेश वाघ आणि गट सचिव श्री. चंद्रकांत फसाळी यांच्यासह श्रमजीवी संघटनेच्या ८७ महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
- ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील सागांव येथील ग. अं. पाटील विद्यालयात, वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत, जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी योग सत्रासह आरोग्य मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून आरोग्य सेवक प्रभाकर भेरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीसाठी योगाचे महत्त्व समजावून सांगितले. प्रभाकर भेरे यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आरोग्य शिक्षणाविषयी स्वतः रचलेल्या कवितेच्या माध्यमातून माहिती दिली, तसेच योग आणि पूरक हालचालींचे प्रात्यक्षिक स्वतः करून दाखवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनीही विविध योगासने आणि पूरक हालचाली उत्साहाने केल्या. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला असून, शाळेच्या वतीने आरोग्य सेवक प्रभाकर भेरे यांचे आभार मानण्यात आले.3
- उष्णतेच्या कडाक्यातून गारवा मिळवण्यासाठी सध्या जव्हार तालुक्यातील काळमांडवी धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. जव्हार तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असून थंड हवेसाठी एक उत्तम ठिकाण म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात अनेक सुंदर फिरण्याची ठिकाणे असली तरी, काळमांडवीचा धबधबा विशेषत्वाने पर्यटकांना आकर्षित करत आहे. दूरदूरहून मोठ्या संख्येने येणारे पर्यटक या धबधब्यावर गर्दी करत असून, पाण्यात मनसोक्त पोहण्याचा आनंद घेत आहेत. यामुळे, सध्या काळमांडवी धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा प्रमुख केंद्रबिंदू बनला आहे.4
- शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 'टेस्ट ट्यूब बेबी' असे संबोधले आहे. राऊत यांनी हे वक्तव्य करत शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.1
- Hot aunty romance suhgdhjgfghggffcssfgggfffhifdggggggg1
- मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 मध्ये भेडसावणाऱ्या समस्यांबाबत एमआयएम नगरसेवक नफीस अन्सारी यांनी काय भूमिका मांडली आहे, यावर चर्चा सुरू आहे. त्यांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- रेल्वे पोलिसांनी यमराजाचे रूप धारण करून रेल्वे प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे. प्रवाशांना जागरूक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.1
- नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा पुरवण्याच्या उद्देशाने एका मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्य तपासणी केली, तसेच रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सल्ला आणि औषधेही पुरवण्यात आली. याप्रसंगी नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड बनवण्याची आणि संबंधित माहिती मिळवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना सरकारी आरोग्य योजनांचा लाभ घेता येईल. या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेतली आणि या लोकहिताच्या उपक्रमाचे कौतुक केले. आयोजकांनी सांगितले की, भविष्यातही असे सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जात राहतील, जेणेकरून सामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळू शकतील.1
- एका लहान मुलाने टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ वस्तू तयार करत आपले अद्भुत 'जुगाड' कौशल्य दाखवले आहे. ही घटना लहान मुलांच्या अफाट कल्पनाशक्तीचे आणि सर्जनशीलतेचे उत्तम उदाहरण आहे, जिथे निरुपयोगी वस्तूंनाही उपयुक्त रूप दिले जाते.1