एरंडोल येथे चार वर्षीय बालिकेवर आजोबांनी केला अत्याचार एरंडोल येथे चार वर्षीय बालिकेवर आजोबांनी केला अत्याचार जळगाव / एरंडोल – येथील लांडापूर भागातील चार वर्षीय बालिकेवर तिच्याच नातेवाईक असलेल्या ५९ वर्षीय मामे आजोबांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर संतप्त जमावाने संशयिताविरुद्ध कडक कारवाईच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांच्यासह एरंडोलचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, पारोळ्याचे निरीक्षक अशोक पवार, धरणगावचे निरीक्षक सुनील पवार, कासोद्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी संतप्त जमावाची समजूत काढली. संशयितास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत माहिती अशी की, शहरातील लांडापूर भागात राहणारी चार वर्षीय बालिका दुपारी बारा वाजेच्या सुमारास आपल्या घरात आई व भावंडांसह खेळत होती. बालिकेची आई प्रातर्विधीसाठी गेल्यानंतर सुमारे पंधरा मिनिटांनी घरी परतली असता बालिका घरात आढळून आली नाही. त्यामुळे तिने मुलांसह आजूबाजूला चौकशी केली. घराशेजारीच राहणारे बालिकेचे नात्याने मामे आजोबा असलेल्या नातेवाईकाकडे बालिकेची आई चौकशीसाठी गेली असता घराचा दरवाजा अर्धवट लावलेला दिसून आला. तिने त्यांच्याकडे बालिकेबाबत विचारणा केली असता त्यांनी मला माहिती नाही असे सांगितले. मात्र ते अर्धनग्न अवस्थेत दिसल्याने आईला संशय आला. तिथे तिची चार वर्षीय बालिका आढळून आली. आईने बालिकेला घरी आणले आणि घडलेल्या घटनेची माहिती पतीला दिली. याबाबत बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयिताविरुद्ध पोक्सो (POCSO ACT) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सहाय्यक निरीक्षक शंकर पवार पुढील तपास करत आहेत. दरम्यान, चार वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना समजताच संशयिताविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, तसेच त्याला आमच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत शेकडो महिला व पुरुषांनी पोलीस स्थानक परिसरात गर्दी केली. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील कासोदा फाट्याजवळ रास्तारोको आंदोलन सुरू केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्यासह हवालदार अनिल पाटील, आकाश शिंपी, पोपट सोनार, सचिन पाटील, दीपक पाटील आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन संतप्त जमावाची समजूत काढली व विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली. परिसरात शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या तसेच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. .
एरंडोल येथे चार वर्षीय बालिकेवर आजोबांनी केला अत्याचार एरंडोल येथे चार वर्षीय बालिकेवर आजोबांनी केला अत्याचार जळगाव / एरंडोल – येथील लांडापूर भागातील चार वर्षीय बालिकेवर तिच्याच नातेवाईक असलेल्या ५९ वर्षीय मामे आजोबांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर संतप्त जमावाने संशयिताविरुद्ध कडक कारवाईच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांच्यासह एरंडोलचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, पारोळ्याचे निरीक्षक अशोक पवार, धरणगावचे निरीक्षक सुनील पवार, कासोद्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी संतप्त जमावाची समजूत काढली. संशयितास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत माहिती अशी की, शहरातील लांडापूर भागात राहणारी चार वर्षीय बालिका दुपारी बारा वाजेच्या सुमारास आपल्या घरात आई व भावंडांसह खेळत होती. बालिकेची आई प्रातर्विधीसाठी गेल्यानंतर सुमारे पंधरा मिनिटांनी घरी परतली असता बालिका घरात आढळून आली नाही. त्यामुळे तिने मुलांसह आजूबाजूला चौकशी केली. घराशेजारीच राहणारे बालिकेचे नात्याने मामे आजोबा असलेल्या नातेवाईकाकडे बालिकेची आई चौकशीसाठी गेली असता घराचा दरवाजा अर्धवट लावलेला दिसून आला. तिने त्यांच्याकडे बालिकेबाबत विचारणा केली असता त्यांनी मला माहिती नाही असे सांगितले. मात्र ते अर्धनग्न अवस्थेत दिसल्याने आईला संशय आला. तिथे तिची चार वर्षीय बालिका आढळून आली. आईने बालिकेला घरी आणले आणि घडलेल्या घटनेची माहिती पतीला दिली. याबाबत बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयिताविरुद्ध पोक्सो (POCSO ACT) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सहाय्यक निरीक्षक शंकर पवार पुढील तपास करत आहेत. दरम्यान, चार वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना समजताच संशयिताविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, तसेच त्याला आमच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत शेकडो महिला व पुरुषांनी पोलीस स्थानक परिसरात गर्दी केली. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील कासोदा फाट्याजवळ रास्तारोको आंदोलन सुरू केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्यासह हवालदार अनिल पाटील, आकाश शिंपी, पोपट सोनार, सचिन पाटील, दीपक पाटील आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन संतप्त जमावाची समजूत काढली व विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली. परिसरात शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या तसेच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. .
- सोयगाव पंचायत समिती सभापतीपदी उत्तम चव्हाण; उपसभापतीपदी गयाबाई घोडे सोयगाव प्रतिनिधी : सोयगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे उत्तम महारू चव्हाण यांची तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) च्या गयाबाई गोविंदा घोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे सोयगाव पंचायत समितीवर भाजप-शिवसेना (शिंदे) युतीची सत्ता प्रस्थापित झाली आहे. मंगळवारी (दि. १० मार्च) पंचायत समिती सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकारी एकनाथ बांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी उत्तम चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, तर उपसभापती पदासाठी गयाबाई गोविंदा घोडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत एकमेकांचे अभिनंदन केले. यावेळी ईदरीस मुलतानी, पुष्पाताई काळे नारायण कोलते, शिवाजी बुढाळ, प्रदीप चव्हाण, दारासिंग शेषमल चव्हाण, रहीम पठाण, गुलाबराव कोलते, जयप्रकाश चव्हाण, गणेश लोखंडे, युसुफ पठाण, शेख निसार, मोहम्मद नूर, अजित खान, अजीज खान, हरी भांबरे, प्रभाकर सूर्यवंशी व भाजपा तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- प्रतिनिधि.... दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.2
- लाखोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती1
- क्रांती चौकात 'पुतळा युद्ध'! आंदोलकांचा एल्गार की पोलिसांची धावपळ? सत्तेच्या रक्षणार्थ खाकी मैदानात! छत्रपती संभाजीनगर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार देशासाठी 'धोकादायक' असल्याचा गंभीर आरोप करत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांती चौकात जो 'हायव्होल्टेज ड्रामा' रंगला, त्याने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. आंदोलकांनी निषेधाचा पुतळा उगारला खरा, पण तो जाळण्यापूर्वीच पोलिसांनी जो 'मॅरेथॉन' धावण्याचा पराक्रम केला, तो पाहून उपस्थित नागरिकही अवाक झाले. सवाल: लोकशाही की दडपशाही? या घटनेनंतर आता काही ज्वलंत प्रश्न उपस्थित होत आहेत: १. जनतेचा आक्रोश पुतळ्यातच अडकलाय का? जनतेचा निषेध नोंदवण्याचा हक्क पोलिसांच्या बळावर किती काळ दाबला जाणार? २. पोलिसांची ही 'धाव' कोणासाठी? पुतळा वाचवण्यासाठी पोलिसांनी जी तत्परता दाखवली, तीच तत्परता शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी का दिसत नाही? ३. सरकार खरोखरच 'धोकादायक' वळणावर आहे का? वंचितच्या आरोपांमध्ये तथ्य आहे की हे केवळ राजकीय शक्तीप्रदर्शन? काय घडलं नेमकं? आज, ११ मार्च २०२६ रोजी क्रांती चौकात वंचितच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने पंतप्रधान मोदींचा पुतळा मैदानात आणला. "देश वाचवा, संविधान वाचवा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांनी पुतळा पेटवण्याचा प्रयत्न करताच, पोलिसांनी जी झटापट केली ती एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखी होती. आंदोलकांच्या हातातून पुतळा हिसकावून घेऊन पोलीस कर्मचारी अक्षरशः धावत सुटले. जणू काही एखादा जिवंत माणूस वाचवण्यासाठी ही धावपळ होती! वाहतुकीचा खोळंबा की प्रशासनाचे अपयश? तासभर जालना रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सर्वसामान्य नागरिक उन्हात होरपळत होते. पण प्रशासनाला मात्र आंदोलकांचे आवाज दाबण्यात आणि पुतळ्याचे रक्षण करण्यातच जास्त रस दिसला. कार्यकर्त्यांचा पवित्रा स्पष "आमचा आवाज दाबाल, पण विचारांना कसं रोखाल?" सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे हे आंदोलन आता शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रतिनिधी: गौतम हिवराळे1
- सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..1
- आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली1
- #marathi#newsjalna#1
- गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात बातमी : सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.2