Shuru
Apke Nagar Ki App…
भारतीय शेतकरी कामगार पक्ष ७९ वा वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना क्रांतिकारी लाल सलाम
भाई लक्ष्मण सोळुंके
भारतीय शेतकरी कामगार पक्ष ७९ वा वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना क्रांतिकारी लाल सलाम
More news from महाराष्ट्र and nearby areas
- साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना लातूरमध्ये शिवसेनेच्या (उबाटा) वतीने हजारो कार्यकर्त्यांसह विनम्र अभिवादन! साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना लातूरमध्ये शिवसेनेच्या (उबाटा) वतीने हजारो कार्यकर्त्यांसह विनम्र अभिवादन! सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026. "जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव..." हाच क्रांतिकारी विचार उराशी बाळगत आपल्या कणखर लेखणीतून, प्रभावी शाहिरीतून आणि साहित्याच्या सामर्थ्याने वंचित, शोषित, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या संघर्षाला वाचा फोडणारे युगपुरुष, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरात त्यांना अभिवादन करण्यात आले. लातूर येथील लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खंदे समर्थक शंकर राजनकर आणि त्यांच्या हजारो सहकाऱ्यांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कोटी-कोटी प्रणाम केला. याप्रसंगी शिवसैनिकांनी व नागरिकांनी अण्णाभाऊंच्या विचारांचे स्मरण करत चौकात मोठी गर्दी केली होती. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजात निर्माण केलेली क्रांती आणि कामगार-वंचितांच्या हक्कासाठी दिलेला लढा आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत या वेळी उपस्थितांनी व्यक्त केले. प्रमुख उपस्थितांची हजेरी या अभिवादन सोहळ्यास शिवसेना (उबाटा) पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते व पदाधिकारी शंकर राजनकर (शिवसेना समर्थक), बालाजी रेड्डी (जिल्हाप्रमुख), नामदेव चाळक (संपर्क प्रमुख), विष्णुपंत साठे, रोहिदास चव्हाण, कैलास पाटील, बाबासाहेब सोनवणे, एस. आर. चव्हाण, चंद्रकांत जाधव यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली. संपूर्ण परिसर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.2
- भीमा नदीच्या वाढत्या पाण्यात खानापूर बंधाऱ्यावरून जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास सततच्या पावसामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, खानापूर बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. जीव मुठीत धरून नागरिकांना या बंधाऱ्यावरून ये-जा करावी लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. खानापूर परिसरातील अनेक नागरिक कामानिमित्त, शिक्षणासाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र वाढत्या पाण्यामुळे बंधाऱ्यावरून प्रवास करताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरीही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अनेकांना धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक सुरक्षेची उपाययोजना करावी, धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक व बॅरिकेड्स लावावेत आणि परिस्थिती गंभीर झाल्यास वाहतूक बंद करून पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास भीमा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.1
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या किर्तन पासदगाव येथे संपन्न1
- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आम आदमी पार्टी, बीडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आम आदमी पार्टी, बीडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, बीड), सय्यद सादेक (शहराध्यक्ष), माऊली शिंदे (जिल्हा बॉडी सदस्य), बाळासाहेब मोरे पाटील (संस्थापक अध्यक्ष, शिवशाही आंबेडकर विचार मंच), भीमराव कुटे (सामाजिक कार्यकर्ते) तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणी आणि शाहिरीतून सामाजिक न्याय, समता आणि वंचितांच्या हक्कांसाठी दिलेला लढा आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!2
- आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन किर्तनकार इंदुरीकर महाराज किर्तन सोहळा संपन्न1
- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती महामानव अभिवादन ग्रुप तर्फे उत्साहात संपन्न... साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती महामानव अभिवादन ग्रुप तर्फे उत्साहात संपन्न... बीड (प्रतिनिधी) "जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव" असे उद्गार काढणारे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती महामानव अभिवादन ग्रुपने सर्व परिवर्तनवादी महापुरुषांच्या जयंत्या संपन्न करण्याचे जाहीर केल्याप्रमाणे बीड शहरात सर्वप्रथम 26 जून 2026 रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सार्वजनिक रित्या बीड शहरांमध्ये संपन्न केली होती. त्यानुसार 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ही जयंती संपूर्ण बीड शहरातील समाजबांधवांना एकत्रित करून तसेच विविध संघटनांना;भारतीय बौद्ध महासभा शाखा बीड, धम्म महासंघ बीड, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा सम्राट अशोक शाक्य संघ बीड तसेच इतर अनेक संघटनाना एकत्रित करून महामानव अभिवादन ग्रुपने बीड शहरांमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असताना सर्वप्रथम बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समता सैनिक दला तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे रथातून सुवाद्यासह व विविध घोषणा देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत शोभायात्रा काढून रस्त्यामधील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या सर्व परिवर्तनवादी महापुरुषांचा आदर्श सतत डोळ्यासमोर राहावा व कृती कार्यक्रम करण्यास प्रवृत्त व्हावे हा उद्देश ठेवूनच महामानव अभिवादन ग्रुपच्या वतीने सर्व महापुरुषांच्या जयंती स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या जवळ आल्यानंतर सर्वप्रथम समता सैनिक दलातर्फे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना पुष्पमाला अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर रॅलीचे रूपांतर सभेमध्ये झाले. त्या ठिकाणी सेवानिवृत्त पी व्ही बनसोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रबोधनात्मक विचार उपस्थित मान्यवरांकडून मांडण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महामानवाभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी .एम भोले सर यांनी केले तर प्रास्ताविक अमरसिंह ढाका राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य यांनी केले. ह्या प्रसंगी विचार मंचावर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष ॲड तेजस वडमारे,कॉम्रेड नामदेवराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक जे. टी साळवे, सतिष कापसे, ॲड हनुमंत कांबळे,ॲड चंद्रवदन जाधव, कल्याण भंडारे, शिवाजी जोगदंड, रंजना चांदणे, कॅप्टन राजाभाऊ आठवले उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या, "शिका संघटित व्हा व संघर्ष करा" या बहुमोल उपदेशाचे महत्त्व लक्षात ठेवून प्रबोधनात्मक विचार मांडले. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आज समाजामध्ये बदल घडविण्यासाठी किती गरज आहे यावर सखोल प्रकाश टाकला. या कार्यक्रमास बीड शहरातील बहुसंख्य नागरिकांची, विविध संघटनेतील सदस्यांची महामानव अभिवादन ग्रुपच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती. शेवटी आभार प्रदर्शन प्रशांत वासनिक यांनी केले. या कार्यक्रमास वंचित चे माजी जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, प्रा.अशोक गायकवाड, डी .एम राऊत, यु एस वाघमारे, प्रकाश खंडारे, आर.डी चक्रे, वसंतराव तरकसे , एस एस सोनवणे, बि.जी दळवी, वैशाली शिंदे, बी.डी तांगडे, अर्जुन जवंजाळ, कुमारथ पारवे, संजय मिसाळ, प्रवीण टाकणखार संदीप जाधव, बबन जोगदंड, राजू भोले, अनिल डोळस, सिद्धार्थ जगताप, नंदा भंडारे, अंजली वडमारे, शोभाताई आठवले, सूर्यकांत जोगदंड,बौद्धाचार्य ॲड भास्कर सोनवणे, शेवाळे साहेब यांची उपस्थिती होती.1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण इशारा परिषद नांदेड लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण इशारा परिषद नांदेड1