गंगापूर हादरले: तेंभापुरी धरणात ३ तरुणांचा दुर्दैवी अंत गंगापूर हादरले: तेंभापुरी धरणात ३ तरुणांचा दुर्दैवी अंत छत्रपती संभाजीनगर गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथे असलेल्या तेंभापुरी धरणात तीन तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच शोध व बचाव पथक तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले असून धरण परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुडालेल्या तरुणांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: शैलेश हेलासकर (वय २५), शैलेश जोगदंड (वय २४), आविष्कार लोखंडे (वय २५). हे तिघेही रांजणगाव शेणपुंजी एमआयडीसी परिसरात वास्तव्यास असल्याचे समजते. घटनेची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. सध्या शोधमोहीम सुरू असून अधिक तपशील प्रतीक्षेत आहे.
गंगापूर हादरले: तेंभापुरी धरणात ३ तरुणांचा दुर्दैवी अंत गंगापूर हादरले: तेंभापुरी धरणात ३ तरुणांचा दुर्दैवी अंत छत्रपती संभाजीनगर गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथे असलेल्या तेंभापुरी धरणात तीन तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच शोध व बचाव पथक तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले असून धरण परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुडालेल्या तरुणांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: शैलेश हेलासकर (वय २५), शैलेश जोगदंड (वय २४), आविष्कार लोखंडे (वय २५). हे तिघेही रांजणगाव शेणपुंजी एमआयडीसी परिसरात वास्तव्यास असल्याचे समजते. घटनेची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. सध्या शोधमोहीम सुरू असून अधिक तपशील प्रतीक्षेत आहे.
- Post by Anis qureshi sillod1
- बदनापुर येथील रोडचे काम अर्धवट सोडून ठेकदार फरार.... मात्र वाहनधारकात बाचाबाची.... बदनापूर-चिखली महामार्ग क्रमांक 225 रोडचे काम सुरु होऊन तब्बल एक वर्षाचा कालावधी गेला असूनही हे काम पूर्ण झाले नसल्याने आणि आता मागील एक महिन्यापासून हे काम अर्धवट सोडून ठेकेदार फरार झाले असल्याने एकतर्फी रोड तयार केले असल्याने वाहने याच रोडने येत आहे मात्र रोज अरुंद असल्याने वाहने जाण्यास अडचण निर्माण होत असल्याने या वाहन धारकात दररोज हे वाहन धारक भांडण करीत आहे. या मुळे नागरिकांचे हाल होत आहे मात्र प्रशासन गाढ झोपेत असून हे काम मात्र कासवगतीने होत असल्याने आणि अर्धवट सोडल्याने आता नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. रेल्वे स्टेशन रोड लगट नाल्या आणि रोडचे काम हे कासव गतीने सुरू होते या बद्दल लोकमत समाचार ने बातमी ही प्रकाशित केली होती. मागील तीन महिण्यात हा रस्ता खड्डेमय झाला आहे. तसेच रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम अपूर्ण राहिल्याने संपूर्ण रोडवर खाली वर जागा झाली त्यामुळे मोटार सायकल चालक खड्यात पडून जखमी होत आहे हा राजमार्ग 225 आहे याला राजूर हे तीर्थक्षेत्र जोडलेले आहे आणि बदनापूर शहरातील प्रमुख शाळांना आणि बदनापूर रेल्वे स्थानकाला जोडणारा मुख्य जीवनदायी मार्ग आहे. पण आज या रस्त्याची अवस्था पाहिली तर हा विकासाचा मार्ग नसून थेट नरकाचा प्रवास वाटतो. कारण रस्त्यालगत सुरू केलेले रोड चे काम ठेकेदाराने अर्ध्यावर सोडून दिले आहे. परिणामी गेल्या मार्च महिन्यात या ठेदाराचे पेमेंट अडकल्याने त्यांनी काम बंद केल्याचे बोलले जात आहे. मात्र शासनाच्या आणि गुत्तेदार यांच्या वादात नागरिकांची प्रचंड गैरसोय सुरू झाली आहे. रस्त्याने जाणाऱ्या शालेय विद्यार्थी, महिला व रोजंदारी करणारे कामगार या साचलेल्या पाण्यातून कसेबसे मार्ग काढत प्रवास करत आहेत. दुचाकीस्वारांना तर दररोज अपघाताचा धोका डोक्यावर घेऊन प्रवास करावा लागत आहे. ठेकेदार व संबंधित विभागाने केलेले हे बेफिकिरीचे काम थेट सामान्य जनतेच्या जिवाशी खेळणारे आहे. कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी असलेले अधिकारीसुद्धा गप्प बसलेले दिसतात. याची सखोल चौकशी होण्याची नितांत गरज आहे.1
- छत्रपती संभाजी नगर मधील अतुल सावे साहेब व माननीय संजयजी शिरसाट यांच्या हस्ते शुभारंभ उपस्थित माननीय कल्याणजी काळे साहेब व माननीय अनुराधाताई चव्हाण राजगुरू साहेब तसेच राजेंद्र जंजाळ साहेब तसेच माननीय सर्व पदाधिकारी व आयुक्त साहेब तसेच सर्व भागातील प्रभागातील झोनल व प्रभा ग अधिकारी तसेच नगरसेवक हे सगळ्यांनी उपस्थित होते व कामगारांना गाड्या सोपवण्यात करण्यात आला व गाड्या वाटप करण्यात आले व आज कामगार दिनानिमित्ताने कामगारांच्या हक्कासाठी व नवीन कामगारांना संधी देणे देण्यात आली तसेच महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन घंटागाडी जेसीबी टिप्पर 407 व टाटा एसी व टाटा एसी ev छत्रपती संभाजी नगर मधील प्रभागांमध्ये रूट मॅप सहित नागरिकांना सेवेसाठी देण्यात आले तसेच4
- वाघरुळ शिवारात घटना; छोटा हत्ती दोन पलट्या मारून उलटला, बोलेरो थेट हॉटेलमध्ये घुसली; चालक नशेत असल्याचा आरोप जालना–देऊळगाव राजा मार्गावरील वाघरुळ शिवारात आज भीषण अपघात घडला असून या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.1
- जालना जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- Post by Anis qureshi sillod1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- महाराष्ट्रः नवापुर में बर्ड फ्लू का गहराया संकट, मारी जाएंगी 1.40 लाख मुर्गियां, 5 km तक बनाया बफर जोन पशुपालन विभाग की ओर से यह अपील की गई है कि बर्ड फ्लू के संक्रमण को देखते हुए लोग अंडे और चिकन के सेवन को लेकर सरकारी दिशा-निर्देशों का पालन करें. बर्ड फ्लू के खतरे के बीच अन्य जिलों को भी अलर्ट कर दिया गया है. देश में बर्ड फ्लू के संक्रमण के मामले बढ़ने लगे हैं. महाराष्ट्र में बर्ड फ्लू से खासी तबाही मची है. नंदुरबार के नवापुर के एक पोल्ट्री फार्म में बर्ड फ्लू के संक्रमण की पुष्टि होने के बाद करीब 1 लाख 40 हजार मुर्गियों को मारने का आदेश जारी किया गया है. साथ ही प्रभावित क्षेत्र के एक किलोमीटर के दायरे में आने वाली मुर्गियों को भी मारा जाएगा. संक्रमित मुर्गियों को मारने का काम आज शुक्रवार से शुरू किया जाएगा. नवापुर तालुका के 3 पोल्ट्री फार्म के सैंपल इंदौर की प्रयोगशाला में भेजे गए थे, जिनकी रिपोर्ट पॉजिटिव आई है. नाजुक स्थिति को देखते हुए तालुका स्तर की एक समिति का गठन किया गया है और अब नवापुर क्षेत्र के सभी पोल्ट्री फार्म के सैंपल लिए जाने के आदेश दिए गए हैं. इससे पहले मामला तब सामने आया जब 12 और 13 अप्रैल को यहां के कुछ पोल्ट्री फार्म में मुर्गियों के संदिग्ध परिस्थितियों में मौत हो गई थी.1