logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शेतकरी कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात ! शेतकरी कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात ! मुंबई/ चंद्रपूर: महायुती सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक आहे. सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेत ३० सप्टेंबर २०२५ ची अट घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे असे स्पष्ट मत आज विधिमंडळात मांडले. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज २ लाखांच्या वर आहे त्यांना लाभ कसा मिळणार ? सरकारने ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले ? शेतकरी कर्जमाफीचे नेमके निकष काय आहेत ? याबाबत सरकारने काहीही स्पष्टता दिलेली नाही. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची मागणी होती, मात्र अर्थसंकल्पात याचा उल्लेख ही केलेला नाही. सरकारने तातडीने हा बोनस जाहीर करावा अशी आग्रही मागणी यावेळी मांडली. यासह महाराष्ट्रातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, शेती, सिंचन अशा विविध विषयांवर सभागृहात परखड भूमिका मांडली.

on 13 March
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Arts Organisation हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
on 13 March

शेतकरी कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात ! शेतकरी कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात ! मुंबई/ चंद्रपूर: महायुती सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक आहे. सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेत ३० सप्टेंबर २०२५ ची अट घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे असे स्पष्ट मत आज विधिमंडळात मांडले. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज २ लाखांच्या वर आहे त्यांना लाभ कसा मिळणार ? सरकारने ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले ? शेतकरी कर्जमाफीचे नेमके निकष काय आहेत ? याबाबत सरकारने काहीही स्पष्टता दिलेली नाही. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची मागणी होती, मात्र अर्थसंकल्पात याचा उल्लेख ही केलेला नाही. सरकारने तातडीने हा बोनस जाहीर करावा अशी आग्रही मागणी यावेळी मांडली. यासह महाराष्ट्रातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, शेती, सिंचन अशा विविध विषयांवर सभागृहात परखड भूमिका मांडली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • रेल मंत्री जी, ज़रा इधर भी देखिए! ट्रेन के फर्श और टॉयलेट के पास सोने को मजबूर हैं लोग।" #viralreels #viralvideos #bihar #reality #mantri #worldbiharnews
    1
    रेल मंत्री जी, ज़रा इधर भी देखिए! ट्रेन के फर्श और टॉयलेट के पास सोने को मजबूर हैं लोग।"
#viralreels #viralvideos #bihar #reality #mantri #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • पूर्व पुलिस महानिदेशक अनिल प्रथम गुजरात के साथ जयंती मे जाने का मौका मिला..
    2
    पूर्व पुलिस महानिदेशक अनिल प्रथम गुजरात के साथ जयंती मे जाने का मौका मिला..
    user_Misty Helping Foundation
    Misty Helping Foundation
    Voice of people Samudrapur, Wardha•
    23 hrs ago
  • कोळगाव (साखरा) आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांच्या हालचालींमध्ये मोठी वाढ झाली असून, आज सकाळी प्रत्यक्ष 'पट्टेदार वाघ' दिसून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शेतकरी, शेतमजूर आणि वेकोलीतील कामगारांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, वेकोलीमार्फत सुरू असलेल्या डम्पिंग क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे स्थानिक नागरिक सांगत होते. मात्र, आज सकाळी एका सतर्क कामगाराला प्रत्यक्ष वाघ दिसून आला. त्या कामगाराने प्रसंगावधान राखत आपल्या मोबाईलमध्ये वाघाचा व्हिडिओ कैद केला. हा व्हिडिओ सध्या परिसरात वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, वाघाचे वास्तव्य याच परिसरात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शेतकरी आणि कामगारांत भीतीचे सावट वाघाच्या या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत. डम्पिंग यार्डमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. वाघाच्या उपस्थितीमुळे पाळीव जनावरांवर हल्ले होण्याची किंवा मानवी जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. वन विभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी परिसरातील वाढती दहशत पाहता, वन विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वन विभागाने तात्काळ या भागात गस्त वाढवावी आणि वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, जेणेकरून शेतकरी आणि कामगारांना निर्भयपणे आपली कामे करता येतील. "वाघ दिसल्याने परिसरात भीती आहे. आम्ही वन विभागाला विनंती करतो की त्यांनी तातडीने पावले उचलून आमचे आणि आमच्या पशुधनाचे रक्षण करावे." — स्थानिक ग्रामस्थ
    1
    कोळगाव (साखरा) आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांच्या हालचालींमध्ये मोठी वाढ झाली असून, आज सकाळी प्रत्यक्ष 'पट्टेदार वाघ' दिसून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शेतकरी, शेतमजूर आणि वेकोलीतील कामगारांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वेकोलीमार्फत सुरू असलेल्या डम्पिंग क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे स्थानिक नागरिक सांगत होते. मात्र, आज सकाळी एका सतर्क कामगाराला प्रत्यक्ष वाघ दिसून आला. त्या कामगाराने प्रसंगावधान राखत आपल्या मोबाईलमध्ये वाघाचा व्हिडिओ कैद केला. हा व्हिडिओ सध्या परिसरात वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, वाघाचे वास्तव्य याच परिसरात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
शेतकरी आणि कामगारांत भीतीचे सावट
वाघाच्या या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत. डम्पिंग यार्डमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. वाघाच्या उपस्थितीमुळे पाळीव जनावरांवर हल्ले होण्याची किंवा मानवी जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वन विभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
परिसरातील वाढती दहशत पाहता, वन विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वन विभागाने तात्काळ या भागात गस्त वाढवावी आणि वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, जेणेकरून शेतकरी आणि कामगारांना निर्भयपणे आपली कामे करता येतील.
"वाघ दिसल्याने परिसरात भीती आहे. आम्ही वन विभागाला विनंती करतो की त्यांनी तातडीने पावले उचलून आमचे आणि आमच्या पशुधनाचे रक्षण करावे."
— स्थानिक ग्रामस्थ
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    7 min ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.घाटंजी येथील जयस्तंभ चौकात महिलांनी नृत्य विस्कारातुन बाबासाहेबांना आगळी वेगळी आदरांजली वाहीली.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.घाटंजी येथील जयस्तंभ चौकात महिलांनी नृत्य विस्कारातुन बाबासाहेबांना आगळी वेगळी आदरांजली वाहीली.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    22 hrs ago
  • नागपूर दंगल पूर्वनियोजित . तर मग तुम्ही झोपला होता काय
    1
    नागपूर दंगल पूर्वनियोजित . तर मग तुम्ही झोपला होता काय
    user_Mangesh Dmaduji Shivaruke
    Mangesh Dmaduji Shivaruke
    Waiter/Waitress नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मोरथमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी; 'जय भीम'च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोरथ येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. निळ्या रंगाच्या पताकांनी आणि विद्युत रोषणाईने सजलेल्या मोरथ परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. मुख्य सोहळा आणि अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी स्थानिक बुद्ध विहारात पंचशील ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो", "भारतीय संविधानाचा विजय असो" आणि "जय भीम" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
    2
    मोरथमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी; 'जय भीम'च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोरथ येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. निळ्या रंगाच्या पताकांनी आणि विद्युत रोषणाईने सजलेल्या मोरथ परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते.
मुख्य सोहळा आणि अभिवादन
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी स्थानिक बुद्ध विहारात पंचशील ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो", "भारतीय संविधानाचा विजय असो" आणि "जय भीम" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.