अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य शासनाकडून ₹५३.७३ कोटींचा निधी वितरित अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य शासनाकडून ₹५३.७३ कोटींचा निधी वितरित बुलढाणा, दि.१८ (जिमाका): राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ तसेच जानेवारी-मार्च २०२६ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देत ₹५३ कोटी ७३ लाख ७ हजार निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी सर्वाधिक ₹३७ कोटी १५ लाख ५ हजार निधी मंजूर करण्यात आला असून, ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. जिल्हानिहाय मदतीचा तपशील नोव्हेंबर २०२५ नुकसान: ३७,१४० शेतकऱ्यांसाठी ₹३०२०.२६ लाख जानेवारी २०२६ नुकसान: ७,३५७ शेतकऱ्यांसाठी ₹६९४.७९ लाख एकूण निधी: ₹३७१५.०५ लाख (₹३७.१५ कोटी) थेट लाभ हस्तांतरण (DBT) मदतीचा निधी DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. यासाठी लाभार्थ्यांची माहिती ऑनलाइन प्रणालीवर अद्ययावत करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. बँकांना स्पष्ट निर्देश शासनाने बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ही मदत कोणत्याही कर्ज वसुलीसाठी वळती करता येणार नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बँकांना सूचना देण्यात येणार आहेत. दुबार मदत टाळण्यासाठी उपाय एकाच नुकसानीसाठी दुबार मदत दिली जाणार नाही लाभार्थ्यांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार पारदर्शकतेसाठी प्रशासनाकडून विशेष देखरेख अंमलबजावणीची जबाबदारी शासन निर्णयानुसार, या निधीचे वितरण आणि नियोजन जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांमार्फत करण्यात येणार आहे. निधी खर्चानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनाकडे सादर केले जाणार आहे. 👉 शेतकऱ्यांसाठी दिलासा: या निर्णयामुळे अवेळी पावसामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य शासनाकडून ₹५३.७३ कोटींचा निधी वितरित अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य शासनाकडून ₹५३.७३ कोटींचा निधी वितरित बुलढाणा, दि.१८ (जिमाका): राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ तसेच जानेवारी-मार्च २०२६ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देत ₹५३ कोटी ७३ लाख ७ हजार निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी सर्वाधिक ₹३७ कोटी १५ लाख ५ हजार निधी मंजूर करण्यात आला असून, ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. जिल्हानिहाय मदतीचा तपशील नोव्हेंबर २०२५ नुकसान: ३७,१४० शेतकऱ्यांसाठी ₹३०२०.२६ लाख जानेवारी २०२६ नुकसान: ७,३५७ शेतकऱ्यांसाठी ₹६९४.७९ लाख एकूण निधी: ₹३७१५.०५ लाख (₹३७.१५ कोटी) थेट लाभ हस्तांतरण (DBT) मदतीचा निधी DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. यासाठी लाभार्थ्यांची माहिती ऑनलाइन प्रणालीवर अद्ययावत करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. बँकांना स्पष्ट निर्देश शासनाने बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ही मदत कोणत्याही कर्ज वसुलीसाठी वळती करता येणार नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बँकांना सूचना देण्यात येणार आहेत. दुबार मदत टाळण्यासाठी उपाय एकाच नुकसानीसाठी दुबार मदत दिली जाणार नाही लाभार्थ्यांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार पारदर्शकतेसाठी प्रशासनाकडून विशेष देखरेख अंमलबजावणीची जबाबदारी शासन निर्णयानुसार, या निधीचे वितरण आणि नियोजन जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांमार्फत करण्यात येणार आहे. निधी खर्चानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनाकडे सादर केले जाणार आहे. 👉 शेतकऱ्यांसाठी दिलासा: या निर्णयामुळे अवेळी पावसामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- प्रतिनिधी D.M... घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही. कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 🔹 घटनेचा तपशील: माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही. 🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग: घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. 🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण: भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 🔹 पोलिसांचे आवाहन: पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.1
- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”1
- सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे1
- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, यावल नगरपालिका, यावल महोदय, यावल नगरपालिका हद्दीतील वॉर्ड क्रमांक २, आयशानगर परिसरामध्ये असलेला नाला अनेक दिवसांपासून साफसफाई न करता तसाच पडून आहे. नाल्याची नियमित सफाई होत नसल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यात साचलेल्या घाण व पाण्यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये डेंग्यू, मलेरिया यांसारखे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सदर बाबीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्यापूर्वी संबंधित विभागाने तात्काळ नाला सफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, ही नम्र विनंती. अन्यथा उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांची जबाबदारी प्रशासनावर राहील.1
- बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची ३७० वर्षांची ऐतिहासिक घटमांडणी दरवर्षी अक्षय्य तृतीयेला चर्चेचा विषय ठरते. मात्र, यंदा ही चर्चा भाकितांपेक्षा एका 'आव्हाना'मुळे अधिक गाजत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी भेंडवळच्या घटमांडणीला उघड आव्हान दिले आहे. ही प्रथा केवळ श्रद्धा आहे की अंधश्रद्धा, यावरून आता राज्यभरात नवा वाद निर्माण झाला आहे.श्याम मानव यांनी भेंडवळच्या भाकितांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, कोणत्याही प्रकारच्या खगोलशास्त्रीय किंवा सांख्यिकीय पुराव्याशिवाय वर्तवलेली ही भाकिते म्हणजे लोकांच्या श्रद्धेचा खेळ आहे. त्यांनी जाहीर केले आहे की, जर भेंडवळच्या घटमांडणीतील यंदाची भाकिते ९० टक्क्यांपेक्षा जास्त अचूक ठरली, तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे ८० लाखांचे रोख पारितोषिक संबंधित महाराजांना दिले जाईल.श्याम मानव यांच्या या आव्हानामुळे भेंडवळच्या घटमांडणी करणाऱ्या पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्यासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. अंनिसचा दावा आहे की, केवळ अंदाज वर्तवून समाजात संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे. विज्ञानाच्या कसोटीवर आणि अचूकतेच्या निकषावर ही भाकिते खरी ठरली पाहिजेत, अन्यथा हे अंधश्रद्धेचे प्रदर्शन असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे.एकीकडे ३७० वर्षांची परंपरा जपणाऱ्या भाविकांची मोठी फळी आहे, ज्यांच्यासाठी हे भाकीत शेती नियोजनाचा एक अविभाज्य भाग आहे. तर दुसरीकडे, पुरोगामी विचारवंत आणि अंनिस याला विज्ञानाच्या चौकटीत बसवून तपासण्याची मागणी करत आहेत. '८० लाखांचे बक्षीस' हे केवळ एक निमित्त असून, त्यामागे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा मुख्य उद्देश असल्याचे श्याम मानव यांनी स्पष्ट केले आहे.1
- पिकांची नासाडी आणि रोगराईचे सावट; भेंडवळच्या अंदाजाने बळीराजाची चिंता वाढली.1
- सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे नळाला मोटर लावत असताना बारा वर्षे चिमुकल्याला विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर घटने प्रकरणी पोलीस ठाणे येथे नोंद घेण्यात आली आहे1