विकासाच्या प्रतीक्षेत इंदिराबाई पांडे लेआऊट!वीज खांबांसाठी नागरिकांचा आक्रोश! रिसोड शहरातील इंदिराबाई पांडे लेआऊट परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. सन्मान हॉटेल ते लताबाई शिंदे यांच्या घरापर्यंत तसेच कालुशाबाबा दर्गा ते आनंदी चौकपर्यंतचा विद्युत खांब उभारण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.असुविधामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच वाहनचालकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अभावामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून, या भागातील विकास केवळ आश्वासनांपुरताच मर्यादित राहिल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी २७ जुलै रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करूनआवश्यक त्या ठिकाणी विद्युत खांब बसविण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही अनेक वेळा निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे. या निवेदनावर कैलास शिंगणे, सारंग जिरवणकर, अमर सानप, अक्षय जिरवणकर, अनिल तायडे, संजय गुजरे, अविनाश कायंदे, दादाराव वाळके, प्रदीप टेकाळे, विठ्ठल आंधळे यांच्यासह सुमारे ४० ते ५० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
विकासाच्या प्रतीक्षेत इंदिराबाई पांडे लेआऊट!वीज खांबांसाठी नागरिकांचा आक्रोश! रिसोड शहरातील इंदिराबाई पांडे लेआऊट परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. सन्मान हॉटेल ते लताबाई शिंदे यांच्या घरापर्यंत तसेच कालुशाबाबा दर्गा ते आनंदी चौकपर्यंतचा विद्युत खांब उभारण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.असुविधामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच वाहनचालकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अभावामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून, या भागातील विकास केवळ आश्वासनांपुरताच मर्यादित राहिल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी २७ जुलै रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करूनआवश्यक त्या ठिकाणी विद्युत खांब बसविण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही अनेक वेळा निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे. या निवेदनावर कैलास शिंगणे, सारंग जिरवणकर, अमर सानप, अक्षय जिरवणकर, अनिल तायडे, संजय गुजरे, अविनाश कायंदे, दादाराव वाळके, प्रदीप टेकाळे, विठ्ठल आंधळे यांच्यासह सुमारे ४० ते ५० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ1
- बुलढाणा :-आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन; येळगाव धरण १०० टक्के भरल्याने बुलढाण्यात आनंदोत्सव!1
- माटरगाव बेलुरा नदीवर असलेला पुल गेला वाहुन मुसळधार पावसामुळे माटरगाव–बेलुरा मार्ग बंद; विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दूध व्यावसायिकांचे हाल1