करवीर पंचायत समितीवर पहिल्यांदाच महायुतीचा झेंडा राष्ट्रवादीचा सभापती तर उपसभापती पद भाजपकडे कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क 65 वर्षांच्या काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत करवीर पंचायत समितीवर महायुतीने पहिल्यांदाच झेंडा फडकवला आहे. आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने 24 पैकी तब्बल 16 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 7, भारतीय जनता पक्षाने 6 तर शिवसेनेने तीन जागांवर विजय मिळवला होता. आज पार पडलेल्या निवडीवेळी सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साताप्पा धोंडीराम पाटील तर उपसभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या दिपाली संजय पाटील यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे पिठासीन अधिकाऱ्यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले. साताप्पा पाटील हे परिते पंचायत समिती गणातून तर दिपाली पाटील या पाचगाव पंचायत समिती गणातून विजयी झाल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आमदार अमल महाडिक यांनी महायुतीमध्ये समन्वयाची भूमिका घेत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त जागांवर विजय संपादन केला होता. त्यामुळे करवीर पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच उपसभापतीपदी भाजपच्या दिपाली पाटील यांना संधी मिळाली आहे.
करवीर पंचायत समितीवर पहिल्यांदाच महायुतीचा झेंडा राष्ट्रवादीचा सभापती तर उपसभापती पद भाजपकडे कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क 65 वर्षांच्या काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत करवीर पंचायत समितीवर महायुतीने पहिल्यांदाच झेंडा फडकवला आहे. आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने 24 पैकी तब्बल 16 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 7, भारतीय जनता पक्षाने 6 तर शिवसेनेने तीन जागांवर विजय मिळवला होता. आज पार पडलेल्या निवडीवेळी सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साताप्पा धोंडीराम पाटील तर उपसभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या दिपाली संजय पाटील यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे पिठासीन अधिकाऱ्यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले. साताप्पा पाटील हे परिते पंचायत समिती गणातून तर दिपाली पाटील या पाचगाव पंचायत समिती गणातून विजयी झाल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आमदार अमल महाडिक यांनी महायुतीमध्ये समन्वयाची भूमिका घेत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त जागांवर विजय संपादन केला होता. त्यामुळे करवीर पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच उपसभापतीपदी भाजपच्या दिपाली पाटील यांना संधी मिळाली आहे.
- इचलकरंजी जवळील तारदाळ येथे जुन्या वादातून चाकूहल्ल्याची धक्कादायक घटना घडली. जावेद मुजावर वय अंदाजे बावीस वर्षे राहणार तारदाळ याच्यावर यश गायकवाड राहणार जावई वाडी याने चाकूने जीवघेणा वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या जावेद मुजावर याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. शहापूर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.1
- मालवण कोळंब खालचीवाडी येथे गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर रविवारी रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला. गोळी त्यांच्या डोक्याच्या बाजूने गेल्यामुळे ते बचावले आहेत ज्या ठिकाणी गोळीबार झाला या घटनेत शिरटकर थोडक्यात बजावले आहेत रात्री उशिरा घटना घडल्यानंतर पोलिसांचे पथक कोळंबी ते दाखल झाला होतं पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत1
- वारंवार होणारी वीज रोहित्र (डीपी) चोरी आणि त्यामुळे अंधारात जाणारी शेती यावर अखेर चितळीच्या शेतकऱ्यांनी स्वतःच 'इलाज' शोधला आहे. टेंभू कॅनॉल जलसेतू परिसरातील जंगल डीपीवर पुन्हा एकदा दरोडा टाकण्याचा चोरट्यांचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि बसवलेल्या सीसीटीव्ही सायरनमुळे फसला आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून आता 'मायणी पोलीस' त्यांना कधी गजाआड करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चितळी येथील टेंभू कॅनॉल नजीक असलेला 'जंगल डीपी' चोरट्यांचे सॉफ्ट टार्गेट बनला होता. यापूर्वी दोन वेळा या ठिकाणची चोरी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते आणि पिकांना पाणी देणेही कठीण झाले होते. सततच्या या त्रासाला कंटाळून येथील लाभार्थी शेतकऱ्यांनी एकत्र येत एक अनोखा निर्णय घेतला. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नवीन डीपी बसवताना शेतकऱ्यांनी स्वखर्चाने वर्गणी गोळा केली आणि या परिसरात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे व हाय-डेसिबल सायरन बसवला. तंत्रज्ञानाचा हा वापर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला. सायरन वाजला अन् चोरट्यांनी पळ काढला! ५ मार्च २०२६ च्या रात्री चोरट्यांनी पुन्हा एकदा या डीपीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, डीपीला हात लावताच कार्यान्वित झालेल्या सायरनने परिसरात एकच खळबळ उडवून दिली. सायरनच्या आवाजाने धास्तावलेल्या चोरट्यांनी सामानासह तिथून पोबारा केला. या धावपळीत चोरट्यांचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे टिपला गेला आहे. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे चितळीकर शेतकरी हैराण आहेत. आतापर्यंत या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नव्हते. मात्र, आता शेतकऱ्यांनी चोरट्याचा थेट 'फोटो'च उपलब्ध करून दिल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी याठिकाणचे शेतकरी राजू पाटील,लालासो पाटील, दादासो पवार , विश्वजित पवार,लक्ष्मण कदम,गणेश मदने,सचिन पाटील,प्रशांत पवार,सुरेश सूर्यवशी,इंद्रजीत पवार,विकास पवार व ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. चौकट - "शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांच्या प्रश्नाकडे पोलिस विभागाने आजवर दुर्लक्ष केल्यानेच चोरट्याचे धाडस वाढले आहे. आता स्थानिक शेतकऱ्यांनी पैसे जमवून स्वतःच सुरक्षा यंत्रणा बसवली. आता चोरट्याचा पुरावाही त्यांनी पोलिसांकडे दिला आहे. पोलिस प्रशासनाने आता तरी कडक पावले उचलून या टोळीचा बंदोबस्त करावा, जेणेकरून शेतकरी सुखाची झोप घेऊ शकेल." - सौ,अनिता संभाजी कोळी, सदस्या,पंचायत समिती. (चितळी) चौकट - चितळीत वाळू चोरी, शेतकऱ्यांच्या विहिरीच्या मोटारी, डिपी , केबल चोरी,अवैध दारू विक्री,शालेय वस्तूंची चोरी ,अवैध धंदे असा लहान मोठ्या चोऱ्यां आणि प्रकरणाचा सिलसिला सुरूच आहे. याची पोलिस प्रशासनात दफ्तरी नोंद होते आणि प्रकरण विसरून टाकले जाते. काही बाबांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षही केले जाते . लोकांनी आता आपल्या चोऱ्यांची माहितीही पोलिसांना देणेही टाळले आहे. सातत्याने होणाऱ्या या चोऱ्यांच्या घटनांचा बीमोड करण्यासाठी मायणी पोलिसांना आपल्या धडक मोहिमेच्या कारभारातून आपली प्रतिमा उंचावून जनतेत आपली विश्वासार्हता वाढवण्याची गरज आहे. फोटो ओळी - १) चितळी येथील डीपी चोरीच्या प्रकरणात शेतकऱ्यांनी बसवलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेला चोर. २) डिपी चोरी आणि हतबल शेतकरी यांचे काल्पनिक चित्र2
- मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1
- ठीक आहे. **“मयूर एक्सप्रेस न्यूज”** साठी न्यूज स्टाईलमध्ये हेडलाईन आणि छोटा रिपोर्ट असा तयार करून देतो. --- **हेडलाईन :** **बांधकाम कामगारांवर प्रायव्हेट भांडे किट वाटप करणारारे ठेकेदारांची हुकूमशाही; मूलभूत सुविधांचा अभाव** **सोलापूर | प्रतिनिधी – मयूर एक्सप्रेस न्यूज** सोलापूर येथे बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांड्यांच्या किटचे वितरण करताना गोडाउनवर काही प्रायव्हेट ठेकेदारांकडून हुकूमशाही पद्धतीने वागणूक दिली जात असल्याची तक्रार कामगारांकडून करण्यात येत आहे. कामगारांना बसण्यासाठी जागा नाही, उभे राहण्यासाठीही योग्य व्यवस्था नाही, तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठीही कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कामगारांशी अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक केली जात असून त्यांचा सन्मान राखला जात नसल्याची नाराजी कामगारांनी व्यक्त केली आहे. भारत हा कामगारांचा देश आहे आणि सोलापूर ही चार हुतात्म्यांची भूमी आहे, जे गिरणी कामगार होते. त्यामुळे कामगारांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र काही प्रायव्हेट ठेकेदारांना कामगारांची काळजी नसून फक्त टेंडर घेण्याचीच घाई दिसून येत असल्याची टीका कामगारांनी केली आहे. याशिवाय गोडाउन परिसरात व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात येत असून व्हिडिओ काढणाऱ्या नागरिकांशी आक्रमक पद्धतीने वागण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कामगारांना योग्य सन्मान देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनावर राहील, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत1
- पिंपरी चिंचवड : - लग्नासाठी माझ्यावर बळजबरी झाली नसली तरी मला प्रेमामध्ये संमोहित करण्यात आलं होतं आणि त्या संमोहनामध्ये मी माझ्या मर्जीने लग्न केले. तरीही हा एक लव जिहादचाच प्रकार असल्याचं नुकत्याच हिंदू धर्मात घर वापसी केलेल्या अद्या उर्फ सायली सुर्वे हिने स्पष्ट केलं आहे... लग्न झाल्यानंतर घरामध्ये हिंद ू रिती रिवाजाने वागण्याचा प्रयत्न केला तर विरोध होत होता, असंही अद्यान स्पष्ट केले. लग्नानंतर काही दिवसातच मारहाण सुरू झाली. मात्र मुलांसाठी अन्याय सहन केला पण शेवटी सहनशीलतेचा अंत झाला आणि मी माझी चूक सुधारल्याचही अद्या ने स्पष्ट केलं. चारही मुलांना हिंदू धर्मात परत आणल्याचं सांगतानाच, दोन जावांपैकी एका जावेने मुस्लिम धर्म पूर्णपणे स्वीकारला असून ती तिथेच राहत असल्याचं सांगतानाच तिसऱ्या क्रमांकाच्या सुनेवरही अत्याचार होत होता. मात्र तिला तिच्या नवऱ्याची साथ असल्याचं अद्या ने स्पष्ट केले. अद्याने दहा वर्षात झालेल्या अन्यायाविरोधात पोलिसात तक्रार केली असून आता भीती वाटत नाही मुलांसाठी मी खंबीरपणे उभा असल्याचं ही ती म्हणाली...! : अद्या उर्फ सायली सुर्वे #सायलीसुर्वे #घरवापसी #पिंपरीचिंचवड #लव्हजिहादप्रकरण #धर्मांतरवाद #महिलाअत्याचार #पोलीसतक्रार #पुणेबातम्या #सामाजिकप्रकरण #कौटुंबिकवाद #SayaliSurve #GharWapsi #PimpriChinchwad #LoveJihadCase #ReligiousConversion #WomenHarassment #PoliceComplaint #PuneNews #SocialIssue #FamilyDispute1
- आंध्र प्रदेश के कड़पा जिले में पुणे से तिरुमला जा रहा 21,000 लीटर घी से भरा टैंकर नेशनल हाईवे-67 पर पलट गया। दुर्घटना के बाद बड़ी संख्या में स्थानीय लोग बर्तन और बाल्टियाँ लेकर मौके पर पहुँच गए और बहते घी को लूटने लगे। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।1