तंत्रज्ञानाच्या युगात लोककला जोपासणे काळाची गरज - सौ.अर्चना भोंगळे सावलहिरा येथे महिला भारुड व भजन स्पर्धा उत्साहात संपन्न. जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर बिनधास्त न्यूज नेटवर्क चंद्रपूर/कोरपना: (दि १७) लोककला केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ते समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. घरकाम आणि संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळून महिलांनी भारुड व भजन ही पारंपरिक कला जिवंत ठेवली आहे. तुमच्या आवाजातील गोडवा आणि अभिनयातील सहजता खरोखरच कौतुकास्पद आहे.अशा व्यासपीठामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या सुप्त गुणांना नक्कीच मोठी दिशा मिळेल,असे प्रतिपादन सौ. अर्चना देवराव भोंगळे यांनी केले. कोरपना तालुक्यातील सावलहिरा येथे जय जगन्नाथ बाबा महिला भारुड,भजन मंडळ व गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने महिला भारुड व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यावेळी सौ.भोंगळे बोलत होत्या. पुढे बोलतांना सौ.अर्चना भोंगळे म्हणाल्या की, भारुड आणि भजन ही आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख आहे. आजच्या आधुनिक काळातही महिला ही परंपरा तितक्याच निष्ठेने पुढे नेत आहेत, सावलहिरा येथे महिलांनी या स्पर्धेतून एकजुटीचे आणि भक्तीचे दर्शन घडवले आहे.अध्यात्म आणि प्रबोधनाचा मेळ घालत महिलांनी सादर केलेल्या भजन व भारुडांनी मन अगदी प्रसन्न झाले असल्याचेही सौ.भोंगळे यांनी सांगितले. यावेळी सावलहिरा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'महिला भारुड व भजन' स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. पारंपरिक लोककला जोपासण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत पंचक्रोशीतील अनेक महिला मंडळांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, सरपंच उमेश पेंदोर,उपसरपंच संतोष जोगी, उमेश पालीवाल, देविदास मालेकर,पुंजाराम कोवे, दिनकर मुसळे, वसंता बहिरे, विनोद नागोसे, रामदास ठाकूर,लक्ष्मण पेंदोर,सुनील गेडाम,सुधाकर बहिरे,सुधाकर मालेकर, कुमार मुसळे,पवन मुसळे, यशोदा साकाटे, निर्मला साकाटे यांचेसह भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तंत्रज्ञानाच्या युगात लोककला जोपासणे काळाची गरज - सौ.अर्चना भोंगळे सावलहिरा येथे महिला भारुड व भजन स्पर्धा उत्साहात संपन्न. जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर बिनधास्त न्यूज नेटवर्क चंद्रपूर/कोरपना: (दि १७) लोककला केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ते समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. घरकाम आणि संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळून महिलांनी भारुड व भजन ही पारंपरिक कला जिवंत ठेवली आहे. तुमच्या आवाजातील गोडवा आणि अभिनयातील सहजता खरोखरच कौतुकास्पद आहे.अशा व्यासपीठामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या सुप्त गुणांना नक्कीच मोठी दिशा मिळेल,असे प्रतिपादन सौ. अर्चना देवराव भोंगळे यांनी केले. कोरपना तालुक्यातील सावलहिरा
येथे जय जगन्नाथ बाबा महिला भारुड,भजन मंडळ व गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने महिला भारुड व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यावेळी सौ.भोंगळे बोलत होत्या. पुढे बोलतांना सौ.अर्चना भोंगळे म्हणाल्या की, भारुड आणि भजन ही आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख आहे. आजच्या आधुनिक काळातही महिला ही परंपरा तितक्याच निष्ठेने पुढे नेत आहेत, सावलहिरा येथे महिलांनी या स्पर्धेतून एकजुटीचे आणि भक्तीचे दर्शन घडवले आहे.अध्यात्म आणि प्रबोधनाचा मेळ घालत महिलांनी सादर केलेल्या भजन व भारुडांनी मन अगदी प्रसन्न झाले असल्याचेही सौ.भोंगळे यांनी सांगितले. यावेळी
सावलहिरा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'महिला भारुड व भजन' स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. पारंपरिक लोककला जोपासण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत पंचक्रोशीतील अनेक महिला मंडळांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, सरपंच उमेश पेंदोर,उपसरपंच संतोष जोगी, उमेश पालीवाल, देविदास मालेकर,पुंजाराम कोवे, दिनकर मुसळे, वसंता बहिरे, विनोद नागोसे, रामदास ठाकूर,लक्ष्मण पेंदोर,सुनील गेडाम,सुधाकर बहिरे,सुधाकर मालेकर, कुमार मुसळे,पवन मुसळे, यशोदा साकाटे, निर्मला साकाटे यांचेसह भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- पवनी/भंडारा: मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने जि.प. भोजापूर शाळेत 'चला गणिताच्या लग्नाला' हा आयताकृती संकल्पनेवर आधारीत सहशालेय उपक्रम घेण्यात आला1
- Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi1
- Post by The Indian Matrimony2
- पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन1
- There are two types of Energy inside Negative & Positive1
- safety grill bacche ke liye1
- एआईएमआईएम के वरिष्ठ नेता एवं पूर्व तालुका अध्यक्ष मजा़हीर अनवर ने संज्ञान देते हुए बताया कि नगरपंचायत येरखेडा को महामार्ग से जोड़ने वाले प्रमुख मार्ग — खुशबू मोटर्स के बाजू स्थित सड़क — की खराब एवं खतरनाक स्थिति है। महामार्ग से अंदर प्रवेश करते ही यह सड़क उबड़-खाबड़ और सकरी सकरी हो जाती है, जिसके कारण प्रतिदिन सैंकड़ों नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। बड़ी गाड़ियों जैसे कार, ट्रक आदि के गुजरने के समय दोपहिया एवं विशेष रूप से ई-रिक्शा चालकों को अपनी जान जोखिम में डालकर वाहन साइड में करना पड़ता है। सड़क किनारे ढलान एवं खराब सतह के कारण वाहन पलटने की आशंका बनी रहती है, जिससे किसी भी समय गंभीर दुर्घटना हो सकती है। यह मार्ग नगर के लिए अत्यंत महत्वपूर्ण है, फिर भी इसकी अनदेखी जनसुरक्षा के साथ खिलवाड़ के समान है। इन्होंने मांग है कि संबंधित विभाग को तत्काल सड़क का निरीक्षण करे प्राथमिकता के आधार पर सड़क का चौड़ीकरण, मरम्मत एवं समतलीकरण का काम जल्द से जल्द शुरू किया जाए।3
- Post by Ammar haider (ezaan)1