उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; अधिकारी एसीमध्ये तर आंदोलनकर्ते उन्हात – दोन दिवसांपासून उपोषण सुरू पुणे, दि. — पुणे शहरात सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाकडे प्रशासनाकडून गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दोन दिवसांपासून प्रखर उन्हात बसून आंदोलन सुरू असतानाही संबंधित अधिकारी कोणतीही दखल घेत नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. युवक काँग्रेस पुणे शहर यांच्या वतीने कै. भाऊदास जेधे व्यायाम शाळा, महालुंगे नगर येथील अनधिकृत रित्या ताब्यात ठेवलेल्या जागेबाबत तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कथित कारभाराविरोधात हे उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, संबंधित प्रकरणात प्रशासनाने तातडीने कारवाई करावी व जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी. मात्र दोन दिवस उलटूनही कोणताही अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन चर्चा करण्यास पुढे आलेला नाही. उपोषणस्थळी बसलेल्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की, “आम्ही दोन दिवसांपासून प्रखर उन्हात बसून न्यायासाठी लढत आहोत, पण अधिकारी मात्र एसी कार्यालयात बसून दुर्लक्ष करत आहेत. प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.” दरम्यान, या आंदोलनामुळे परिसरात राजकीय आणि सामाजिक चर्चेला उधाण आले असून प्रशासनाने लवकरात लवकर या प्रकरणात मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; अधिकारी एसीमध्ये तर आंदोलनकर्ते उन्हात – दोन दिवसांपासून उपोषण सुरू पुणे, दि. — पुणे शहरात सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाकडे प्रशासनाकडून गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दोन दिवसांपासून प्रखर उन्हात बसून आंदोलन सुरू असतानाही संबंधित अधिकारी कोणतीही दखल घेत नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. युवक काँग्रेस पुणे शहर यांच्या वतीने कै. भाऊदास जेधे व्यायाम शाळा, महालुंगे नगर येथील अनधिकृत रित्या ताब्यात ठेवलेल्या जागेबाबत तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कथित कारभाराविरोधात हे उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, संबंधित प्रकरणात प्रशासनाने तातडीने कारवाई करावी व जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी. मात्र दोन दिवस उलटूनही कोणताही अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन चर्चा करण्यास पुढे आलेला नाही. उपोषणस्थळी बसलेल्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की, “आम्ही दोन दिवसांपासून प्रखर उन्हात बसून न्यायासाठी लढत आहोत, पण अधिकारी मात्र एसी कार्यालयात बसून दुर्लक्ष करत आहेत. प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.” दरम्यान, या आंदोलनामुळे परिसरात राजकीय आणि सामाजिक चर्चेला उधाण आले असून प्रशासनाने लवकरात लवकर या प्रकरणात मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
- पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड शहरातील एका व्यापाऱ्याचं 50 लाख रुपयांसाठी अपहरण करण्यात आले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने संगमनेर येथे तब्बल 100 किलोमीटर पाठलाग करून पाच आरोपींना अटक करत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे, 9 मार्च रोजी सायंकाळी 5:15 च्या सुमारास राहटणी येथील शिवराज नगर येथून हॉटेलच्या बाहेरून एका चार चाकी वाहनातून *सुरेशकुमार बाबूमल जयस्वानी* या 47 वर्षीय व्यावसायिकाचा अपहरण करण्यात आलं होतं. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात पाच अनोळखी व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत या पाचही जणांना ताब्यात घेतला आहे. हे पाचही आरोपी मूळचे बिहार मधील असून अपहरण करण्याकरिता ते पिंपरी चिंचवड शहरात आले असल्याची माहिती समोर आली या अपहरणाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे.... #पिंपरीचिंचवड #अपहरण #व्यापारीअपहरण #खंडणीप्रकरण #पिंपरीचिंचवडपोलीस #गुंडाविरोधीपथक #राहटणी #काळेवाडीपोलीस #सीसीटीव्ही #गुन्हेवार्ता #पुणेबातम्या #क्राईमन्यूज #महाराष्ट्रबातम्या #PimpriChinchwad #KidnappingCase #BusinessmanKidnapped #CrimeNews #PuneCrime #PimpriChinchwadPolice #AntiGundaSquad #CCTVFootage #MaharashtraNews #BreakingNews #PuneNews #IndiaCrime1
- आंध्र प्रदेश के कड़पा जिले में पुणे से तिरुमला जा रहा 21,000 लीटर घी से भरा टैंकर नेशनल हाईवे-67 पर पलट गया। दुर्घटना के बाद बड़ी संख्या में स्थानीय लोग बर्तन और बाल्टियाँ लेकर मौके पर पहुँच गए और बहते घी को लूटने लगे। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- ५० लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; पोलिसांचा थरारक पाठलाग करून ५ आरोपी अटकेत पिंपरी : प्रतिनिधी, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक आणि काळेवाडी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी थरारक पाठलाग करून अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका केली. ९ मार्च रोजी रहाटणी येथील शिवराजनगर परिसरातून एका व्यापाऱ्याचे स्विफ्ट कारमधून अपहरण करून आरोपींनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू केला. आरोपी अपहृत व्यक्तीला उत्तरप्रदेशकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर टोल नाक्यावर सापळा रचण्यात आला. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन देशी पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, रोख रक्कम व स्विफ्ट कारसह एकूण १८.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान आरोपींनी अपहृत व्यक्तीला चंदनापुरी घाट परिसरात सोडून दिले होते. पोलिसांनी शोध घेऊन त्या व्यक्तीला सुखरूप ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व काळेवाडी पोलिसांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.1
- Post by Maharashtra 18 news1
- #psi #atulshete #pcmc #pune #marathinews1
- देहूरोड येथे सलामती पीर उर्स उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न.... ईदगाह मैदानातील दर्ग्यावर हजारो भाविकांची उपस्थिती; रमजाननिमित्त रोजा इफ्तार व लंगर-ए-आमची व्यवस्था... देहूरोड येथील ईदगाह मैदानात असलेल्या हजरत सलामती पीर दर्ग्यावर १४ वा उर्स उत्सव मोठ्या दिमाखात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्ग्यावर हजेरी लावून सलामती पीर साहेबांचे यांचे दर्शन घेतले. या उर्स उत्सवाचे आयोजन सलामती पीर दर्गा ट्रस्ट तसेच जामा मशीद ॲडहोक कमिटी यांच्या वतीने करण्यात आले होते. सध्या पवित्र रमजान महिना सुरू असल्याने ईदगाह मैदानात ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांसाठी रोजा इफ्तारची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच संध्याकाळी सर्वांसाठी लंगर-ए-आम चे आयोजन करण्यात आले होते. उर्स उत्सवानिमित्त दर्गा परिसरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भक्तांनी प्रार्थना करून सलामती पीर यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला विशेष करून या उर्स साठी अनेक सुफी संत, इस्लामिक गुरु त्याचप्रमाणे सर्वधर्मचे मान्यवर व सर्वसामान्य नागरिक मोठे संख्येने उपस्थित होते.1
- पिंपरी चिंचवड : - लग्नासाठी माझ्यावर बळजबरी झाली नसली तरी मला प्रेमामध्ये संमोहित करण्यात आलं होतं आणि त्या संमोहनामध्ये मी माझ्या मर्जीने लग्न केले. तरीही हा एक लव जिहादचाच प्रकार असल्याचं नुकत्याच हिंदू धर्मात घर वापसी केलेल्या अद्या उर्फ सायली सुर्वे हिने स्पष्ट केलं आहे... लग्न झाल्यानंतर घरामध्ये हिंद ू रिती रिवाजाने वागण्याचा प्रयत्न केला तर विरोध होत होता, असंही अद्यान स्पष्ट केले. लग्नानंतर काही दिवसातच मारहाण सुरू झाली. मात्र मुलांसाठी अन्याय सहन केला पण शेवटी सहनशीलतेचा अंत झाला आणि मी माझी चूक सुधारल्याचही अद्या ने स्पष्ट केलं. चारही मुलांना हिंदू धर्मात परत आणल्याचं सांगतानाच, दोन जावांपैकी एका जावेने मुस्लिम धर्म पूर्णपणे स्वीकारला असून ती तिथेच राहत असल्याचं सांगतानाच तिसऱ्या क्रमांकाच्या सुनेवरही अत्याचार होत होता. मात्र तिला तिच्या नवऱ्याची साथ असल्याचं अद्या ने स्पष्ट केले. अद्याने दहा वर्षात झालेल्या अन्यायाविरोधात पोलिसात तक्रार केली असून आता भीती वाटत नाही मुलांसाठी मी खंबीरपणे उभा असल्याचं ही ती म्हणाली...! : अद्या उर्फ सायली सुर्वे #सायलीसुर्वे #घरवापसी #पिंपरीचिंचवड #लव्हजिहादप्रकरण #धर्मांतरवाद #महिलाअत्याचार #पोलीसतक्रार #पुणेबातम्या #सामाजिकप्रकरण #कौटुंबिकवाद #SayaliSurve #GharWapsi #PimpriChinchwad #LoveJihadCase #ReligiousConversion #WomenHarassment #PoliceComplaint #PuneNews #SocialIssue #FamilyDispute1