Shuru
Apke Nagar Ki App…
गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या दापोली आणि परिसरातील नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळनंतर हवामानात अचानक बदल होऊन दापोलीत ढगांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पहिल्याच दमदार पावसामुळे संपूर्ण परिसरात गारवा पसरला असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सकाळपर्यंत कडक ऊन आणि हवेत प्रचंड दमटपणा जाणवत होता. मात्र, सकाळनंतर आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले आणि पाहता पाहता सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वारा इतका मोठा होता की काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली. दापोली शहरासह पंचक्रोशीतील गावांमध्येही या पावसाने चांगलीच बॅटिंग केली असल्याचे बोलले जात आहे.
चिपळुण न्यूज सं.स्वाती हडकर
गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या दापोली आणि परिसरातील नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळनंतर हवामानात अचानक बदल होऊन दापोलीत ढगांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पहिल्याच दमदार पावसामुळे संपूर्ण परिसरात गारवा पसरला असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सकाळपर्यंत कडक ऊन आणि हवेत प्रचंड दमटपणा जाणवत होता. मात्र, सकाळनंतर आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले आणि पाहता पाहता सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वारा इतका मोठा होता की काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली. दापोली शहरासह पंचक्रोशीतील गावांमध्येही या पावसाने चांगलीच बॅटिंग केली असल्याचे बोलले जात आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पुणे शहर पोलिसांनी गुन्हेगारी आणि अवैध कृत्यांवर आळा घालण्यासाठी एक मोठी मोहीम हाती घेतली आहे, ज्याअंतर्गत शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिसांच्या फरासखाना आणि खडक पोलीस स्टेशनच्या पथकांनी संयुक्तपणे कोंबिंग ऑपरेशन राबवून बुधवार पेठ भागातून ६ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-१, पुणे शहर) श्री. कृषिकेश रावले यांना बुधवार पेठ भागातील अवैध वास्तव्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, दिनांक २४/०५/२०२६ रोजी मध्यरात्री ०१:०० वाजताच्या सुमारास हे विशेष ऑपरेशन आयोजित करण्यात आले. या कारवाईसाठी फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे आणि खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत चव्हाण यांच्या अधिपत्त्याखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. एस. पी. मुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कुदळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. अरविंद शिंदे, श्री. जवळगी आणि श्री. कांबळे यांच्यासह दोन्ही पोलीस स्टेशनच्या अंमलदारांचे एक विशेष पथक 'सागर बिल्डिंग' येथील रेडलाईट एरियामध्ये छापायुक्त कारवाईसाठी रवाना करण्यात आले. छाप्यादरम्यान ताब्यात घेतलेल्या ६ बांगलादेशी महिलांच्या सखोल चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिलांनी बांगलादेशातून बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून छुप्या मार्गाने भारतात प्रवेश केला होता. सुरुवातीला त्या पश्चिम बंगाल येथे आल्या आणि तेथून एजंटच्या माध्यमातून त्यांना पुण्यातील बुधवार पेठ भागात शिलाईकाम, ब्युटी पार्लर आणि घरकाम करण्याच्या उद्देशाने आणण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्या स्वतःच्या इच्छेने वेश्याव्यवसाय करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे ठोस पुरावे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. पोलीस उप-आयुक्त (झोन १, पुणे शहर) श्री. कृषिकेश रावले यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अनधिकृत परदेशी नागरिकांविरुद्ध तीव्र मोहीम उघडली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सुमारे १०३ बांगलादेशी महिला व पुरुषांना वेगवेगळ्या कारवायांद्वारे शोधून काढून त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची (deportation) कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पुण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले असून, शहर पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार; मा. पोलीस सह आयुक्त, श्री. प्रविण दराडे; मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेश बनसोडे; मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, श्री. कृषिकेश रावले; मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ (अति. कार्यभार), श्री. पी. आर. पाटील; आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, श्रीमती अनुजा देशमाने यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. फरासखाना पोलीस स्टेशनचे अंमलदार मोरे, वशीम शेख, महिला पोलीस अंमलदार बनसोडे, चोरघडे, महाडीक, तसेच खडक पोलीस स्टेशनचे अंमलदार दिवटे, गायकवाड, केदारी आणि महिला पोलीस अंमलदार हर्षल दुडुम, हरबा, यादव, परदेशी, लांडगे यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.1
- संजय आवटे यांनी एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, लोक इतरांची स्वप्ने पाहतात, परंतु वास्तविकतेत जे पेरले जाते, तेच उगवते.1
- मोदींना थेट आव्हान देण्याच्या बाबतीत काँग्रेस पक्ष शरद पवारांपेक्षा अधिक पसंत केला जात आहे. हे सांगण्यात आले आहे की काँग्रेस मोदींना समोरासमोर आव्हान देत आहे, तर शरद पवार मात्र असे करत नाहीत. देशाच्या गाव पातळीपासून ते लोकसभेपर्यंत आणि मुंबईपर्यंत काँग्रेस पक्ष मोदींना सातत्याने शह देत आहे, परंतु शरद पवारांकडून असा थेट सामना होताना दिसत नाही.1
- पंढरपूरजवळील करकंब येथे शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यात आला आहे. स्थानिक शेतकरी आणि एका समितीने या महामार्गास आपला विरोध दर्शवला आहे.1
- यावल शहरात पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. इंधनाच्या या समस्येमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, ज्यामुळे त्यांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.1
- शाहूवाडी तालुक्यातील आंबर्डे गावात वनअधिकारी असल्याचे भासवून पैशांची मागणी करणाऱ्या तोतयाला ग्रामस्थांनी पकडले. उत्तम खंडू खोत नावाचा हा संशयित जंगलातून लाकूड आणल्याची भीती दाखवून नागरिकांकडून पैसे उकळत होता. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.1
- भोर तालुक्यातील नसरापूर-वेल्हे मार्गावर एका मोटारीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.1
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील निमजी येथे केलेल्या वक्तव्यात इंधन बचत करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी नागरिकांना आणि संबंधित घटकांना इंधन वापर टाळण्यासाठी ई-बाईक, ई-बस आणि ई-ट्रक यांसारख्या ई-वाहनांचा वापर करण्याचे आवाहन केले. यामुळे भविष्यात इंधनाची गरज लागणार नाही आणि प्रदूषणावरही नियंत्रण मिळेल, असे गडकरींनी नमूद केले. या प्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.1
- कुमार विश्वास यांनी एक विधान केले आहे, ज्यात त्यांनी म्हटले की झुरळे कुजण्यातून जन्माला येतात. यासोबतच, त्यांनी असेही सांगितले की झुरळांवर उपचार केले जातील.1